Halloween Costume ideas 2015

सत्तेचे हस्तांतरण


इस्लामिक स्कॉलर सय्यद अबुल आला मौदीदी रहे. यांनी 10 मे 1947 रोजी पठाणकोट येथे हिंदू, मुस्लीम आणि शीख समुदायाच्या दरम्यान ’रचना आणि बिघाड’ या विषयावर दिलेल्या एका महत्वपूर्ण भाषणाचा सारांश आजही समर्पक असल्याने खाली देत आहे.

ईश्वर आपल्या पृथ्वीच्या दावेदारांचे आणि इच्छुकांचे वडिलोपार्जीत अथवा जन्मजात हक्क पाहत नसतो तो हे पाहत असतो की यांच्या पैकी कोण सकारात्मक कार्यासाठी जास्तीत जास्त योग्यता आणि बिघाडाची सर्वांपेक्षा कमी प्रवृत्ती राखणारा आहे. एकाच वेळेतील एकूण उमेदवारांपैकी जे या दृष्टिने सर्वाधिक योग्यतेचे दिसतात त्यांचीच निवड होते तो पर्यंत त्यांच्या बिघाडापेक्षा त्यांची रचना जास्त असते किंवा त्यांच्या तुलनेत जास्त चांगली रचना करणारा व कमी उपद्रवी इतर कोणीही मैदानात येत नाही तोपर्यंत व्यवस्था त्यांच्याच हाती राहू दिली जाते. हे जे काही मी सांगत आहे ईश्वराने सदैव आपल्या पृथ्वीची व्यवस्था याच नियमानुसार राखली आहे. इतिहास याची साक्ष देतो खुद्द आपल्या देशाचाच इतिहास पहा या ठिकाणी जे लोक वसले होते त्यांचे रचनात्मक गुण जेव्हा संपुष्टात आले तेव्हा ईश्वराने येथील व्यवस्थापनाची संधी आर्य लोकांना दिली. त्यांनी बिघाडापेक्षा अधिक प्रमाणात रचनात्मक कामे करून दाखविली परंतू आर्य जेव्हा उपद्रवी बनले, त्यांनी रचनात्मक कामे कमी आणि बिघाडाची कामे जास्त करण्यात सुरूवात केली. आर्यांर्नी मानव जातीची विभागणी करून खुद्द आपल्याच समाजाला जाती व वर्णभेद भाषांद्वारे विभागून टाकले तेव्हा सरते शेवटी ईश्वराने त्यांच्याकडून देशाची व्यवस्था हिरावून घेतली आणि मध्य आशिया खंडामध्ये त्या लोकांना येथे काम करण्यास संधी दिली जे त्यावेळी इस्लामी चळवळीने प्रभावित झाले होते. मध्य आशियातून आलेले हे मुस्लीम लोक शतकानुशतके या देशाच्या व्यवस्थेवर विराजमान राहीले या देशातील बहुतेक लोकांनी इस्लाम धर्म स्विकार केला व त्यांच्यात ते सामील झाले मुस्लीम राजकर्त्यांनी बरीच रचनात्मक कामे केली परंतू रचनात्मक कामाच्या तुलनेत जेव्हा बिघाडांच्या कामांचे प्रमाण वाढले तेव्हा ईश्वराने त्यांच्याकडून देशाची व्यवस्था हिरावून घेतली व ती इंग्रजांच्या सुपूर्द केली. इंग्रजांनी जी काही रचनात्मक कार्य केली तशी.. इतर कोणी केली नाहीत परंतू जेव्हा त्यांचे कडूनही रचनात्मक कामाच्या तुलनेत बिघाडाच्या कामांची संख्येत वाढ होऊ लागलीत तेव्हा 18 व्या शतकाच्या काळामध्ये ईश्वराने जो निर्णय घेतला तो चुकीचा नव्हता. इंग्रज स्वतःच सरळपणे येथून जाण्यास तयार झाले आहे हा प्रसंग की, ज्यांच्या अगदी टोकावर आपण सर्वजण उभे आहोत इतिहासाच्या अशा महत्वपूर्ण प्रसंगापैकी आहे अधिकार सुत्राच्या हस्तांतरणाची बाब पुर्ण होत असल्याचे दिसत आहे. देशाची व्यवस्था देशवासीयांच्या स्वाधिन केले जाण्याचे हे निर्णायक पाउल आहे. परकीय लोक जे बाहेरून राज्य करीत आहे ते परत जात आहेत. पुर्वीसुध्दा केवळ लहर म्हणून त्याने आपल्या हातातून व्यवस्था हिरावून घेतली नव्हती व आताही त्याला लहर आली म्हणून तो व्यवस्था आपल्या हातात देईल असे मुळीच नाही आता जरा हे तपासून पाहूया की, हिंदूस्तानचे हिंदू मुस्लीम शिख हे लोक सदरहू परिक्षणात ईश्वरासमोर अशा कोणत्या योग्यता व क्षमता प्रस्तूत करीत आहेत की जेणेकरून ईश्वर आपल्या मुलखाची व्यवस्था पुन्हा त्यांच्याच स्वाधीन करेल. आपल्या देशबांधवाचे दोष बोलून दाखविण्यात मला आनंद होतो अशातली गोष्ट नाही. कोणाचाही हक्क मारणे नैतिक दृष्टिने वाईट आहे. आमच्या व्यापारी वर्गात जे फसवेगिरी, लबाडी, खोटेपणा आणि काळ्या नफेबाजीपासून अलिप्त असतील आमच्या उद्योगपती पैकी जे आपल्या फायद्यांबरोबरच ग्राहकांचा लाभ आणि आपले राष्ट्र आपल्या देशाच्या हिताचाही काही विचार करीत असतील अशी किती टक्के लोक आहेत आमच्या जमीनदारांपैकी जे धान्यसाठा करतांना आणि नंतर अत्यंत महाग किंमतीमध्ये ते विकतात. आपल्या नफेबाजीमुळे कोट्यावधी माणसांना उपासमाराची यातना देतात. शिवाय असा विचार करणारे किती टक्के लोक आहेत. आमच्या सरकारी नौकरवर्गापैकी जे लाच लुचपत आणि अपहारांपासून अन्याय आणि सामान्य जणाला त्रास देण्यापासून कामचुकारपणा व आपल्या अधिकारांचा दुरूपयोग करण्यापासून अलिप्त आहेत. किती लोक आहेत मी जर असे म्हटले की, केवळ 5 टक्के काय ते लोक या अनैतिकतेच्या महारोगापासून कदाचित अलिप्त असतील, उरलेले 95 टक्के लोक या संसर्गजन्य महारोगाने भयंकरपणे ग्रासलेले आहेत तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. वाईट गोष्टीपासून रोखणे आणि चांगल्या गोष्टीचा उपदेश करणे समाजात एक असहनीय गोष्ट बनली आहे. प्रत्येक लोकसमुहाला केवळ असेच लोक पसंत आहेत जे त्यांच्या इच्छा- आकांशा व उद्दीष्ठांसाठी वकीली करीत असतात आपण स्वतः व स्वदेशाच्या भविष्यासंबंधी निराश व्हावे म्हणून मी या गोष्टी सांगत आहे असे मुळीच नाही मी स्वतः हि निराश नाही व इतरांनाही निराश करू इच्छित नाही. 5 टक्के लोक जरूर असे आहेत जे सर्वत्र माजलेल्या अनैतिकतेपासून सुरक्षीत आहेत हेच ते भांडवले आहे ज्याला सुधारण्याच्या प्रारंभासाठी उपयोगात आणले जाऊ शकते आपल्या इथे दुराचारी संघटित असून पध्दशीरपणे आपले कार्य करीत आहेत परंतू सदाचारी मात्र संघटित नाहीत. खरे तर हेच आमच्या दुर्देवाचे मोठे कारण आहे. मौलाना म्हणतात, आमच्या सत्तानिष्ठ लोकांची एक अशी संघटना विद्यमान असणे आवश्यक आहे जेणेकरून बिघाडण्याच्या कारणांना प्रतिबंध आणि रचनेच्या सदरहू गोष्टींना अंमलात आणण्यासाठी निरंतरपणे प्रयत्नांची पराकाष्टा होईल, यातच आम्हा सर्वांचे भले आहे. या देशाच्या रहीवाशांना सरळ मार्गावर आणलात अशा प्रकारचे प्रयत्न यशस्वी ठरले तरी विनाकारणच आपल्या भुमीची व्यवस्था भूमीपुत्राकडून हिरावून अन्य कोणाला सुपूर्द करण्याइतपत ईश्वर अन्यायी नाही. परंतू ईश्वर न करो जर प्रयत्नांची पराकाष्टा अयशस्वी ठरली तर आपण सर्वांचा तसेच भारतीयांच्या सर्व रहीवाशांचा शेवट काय होइल हे आम्ही सांगू शकत नाही. इंग्रज गेले देशाचे व्यवस्थापन देशवासीयांच्या एका पक्षाकडे सोपविण्यात आले. परत ईश्वराने दर पाच वर्षानी रचनात्मक व बिघाडाच्या कामानुसार देश चालविण्याची संधी कार्यक्षम असलेल्या संबंधितांच्या स्वाधीन केली. मौलाना मौदुदी यांच्या म्हणण्यानुसार एकूण उमेदवारांपैकी जे या दृष्टिने सर्वाधिक योग्यतेचे दिसतात त्यांचीच निवड होते. जोपर्यंत त्यांच्या बिघाडापेक्षा त्यांची रचना जास्त असते किंवा त्यांच्या तुलनेत जास्त चांगली रचना करणारा व कमी उपद्रवी इतर कोणी मैदानात येत नाही तोपर्यत व्यवस्था त्यांच्याच हाती राहू दिली जाते. ईश्वराच्या मर्जीनुसार पुढची व्यवस्था कोणाकडे जात आहे याकडे सर्व देशवासीयांच्या नजरा उत्सूकतेने वाट पाहत आहेत.

- इद्रीस खान

पुसद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget