Halloween Costume ideas 2015
Latest Post


साधारणपणे कुणी कुणाची एखादी वस्तू, सामुग्री, मालकास न विचारता लपूनछपून घेतली असेल तर त्याला चोरी म्हणतात. या कुकर्माची शिक्षा चोराचे हात कापणे आहे. इस्लाम धर्मात नाजूक आणि क्षुल्लक प्रकरणाचीही दखल घेतली जाते, ज्याला चोरी म्हटले जात नाही. अशा कर्माचीही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दखल घेतली आणि त्याचे महत्त्व स्पष्ट करुन दिले.

या संदर्भात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मापतोलमध्ये कमी-जास्त करणे. जवळपास सर्वच नागरिकांचा याच्याशी संबंध येतो. यात व्यापारीवर्ग गुंतलेले असतात आणि ज्याचा फटका गरीब लोकांना बसतो. अल्लाहच्या नैसर्गिक नियमांमध्ये एक अति महत्त्वाचा घटक न्याय आहे. याचे उद्दिष्ट असे की जी वस्तू ज्याची असेल ती त्यालाच दिली जावी. जमिनीवर जे संतुलन आहे ते अल्लाहने प्रस्थापित केले आहे. याच सूत्रानुसार प्रत्येकाला त्याचे हक्काधिकार दिले जावेत. जर एखादी व्यक्ती दुसऱ्याचा जो अधिकार असेल तो त्यास देत नाही किंवा त्यामध्ये कमी करतो, तो या संतुलनाचे उल्लंघन करतो. पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे आदेश आहेत की “उत्तुंग अवकाश उभारलं आणि समतोल निर्माण केला. या संतुलनाचे उल्लंघन करू नका. हे संतुलन कायम ठेवा आणि मोजमापात कसर ठेवू नका.” (पवित्र कुरआन, ५५:७-९)

याच संतुलनामुळे या ब्रह्मांडाची व्यवस्था होते. मोजमापात कमी-जास्त करण्याचा वास्तवात दुसऱ्याच्या अधिकारावर ताबा मिळवणे. जर कुणी माल घेताना वाढवून घेतो आणि देताना मापात कमी करतो. तो दुसऱ्या३च्या वस्तूवर हबाडीने ताबा मिळवतो हीदेखील चोरी आहे.

प्रेषित शुऐब (अ.) यांचा समूह व्यापार करत होता. ते आपल्या लोकांना उद्देशून समजवतात की “तुम्ही पुरेपूर मोजमाप करा. कोणाचं नुकसान करू नका. प्रामाणिक तराजूने तोला. लोकांच्या वस्तूंमध्ये घट करू नका. धरतीवर अनाचार माजवू नका.” (पवित्र कुरआन, २६:१८१-१८३)

मोजमापात लबाडी करण्याने बरकत जाते. बाजारात जे व्यापारी असे काम करतात त्यांचा अनादर होतो आणि पुढे जाऊन ही बेइमानी त्यांच्या आर्थिक स्थितीचे विघटन करते.

समाजात समूहामध्ये अनैतिकता पसरण्याचे कारण हे असते की लबाडी करणाऱ्या लोकांना याचा विश्वास नसतो की त्यांचे गुपित पाहणारे डोळे सगळीकडे विखुरलेले असतात. एक दिवस असा उजाडेल जेव्हा आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्या विधात्यासमोर उभे राहून द्यावा लागणार आहे. देवाणघेवाणीत तफावत करणाऱ्यांचा धिक्कार आहे. लोक इतरांकडून घेताना माप भरभरून घेतता, दुसऱ्यांना मापून वजन करून देतात तेव्हा प्रमाणापेक्षा कमी देतात.

(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)

- संकलन :

सय्यद इफ्तिखार अहमद



(८३) मानवाची अवस्था अशी आहे की आम्ही जेव्हा त्याला देणगी प्रदान करतो तेव्हा तो ऐटीत येतो व पाठ दाखवतो आणि जेव्हा जरा संकटात सापडतो तेव्हा निराश होऊ लागतो. 

(८४) हे पैगंबर (स.)! या लोकांना सांगा, ‘‘प्रत्येक आपल्या पद्धतीने काम करीत आहे, आता तुमचा पालनकर्ताच हे उत्तम जाणतो की सरळमार्गावर कोण आहे.’’ 

(८५) हे लोक तुम्हाला आत्म्याविषयी विचारतात, सांगा, ‘‘हा आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या आज्ञेने येतो, पण तुम्हा लोकांना अल्पज्ञान मिळाले आहे.’’३८ 


३८) या ठिकाणी ‘रुह’ या शब्दाने आत्मा अभिप्रेत आहे असे सर्वसामान्यपणे समजले जाते. म्हणजे लोकांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याकडे जीवन आत्म्यासंबंधी विचारले होते की त्याची वास्तवता काय आहे, तर तो अल्लाहच्या आज्ञेने येत असतो, असे त्याचे उत्तर दिले गेले. परंतु आयतीचा संदर्भ दृष्टीसमोर ठेवून पाहिल्यास या ठिकाणी आत्म्याने अभिप्रेत पैगंबरत्वाचा आत्मा अथवा दिव्यबोध (वह्य) असल्याचे स्पष्टपणे कळते. हीच गोष्ट सूरह-१६ अन्नह्ल, आयत क्र. २ आणि सूरह-४० अल्मुअ्मिन, आयत क्र. १५ व सूरह-४२ अश्शूरा आयत क्र. ५२ मध्ये फरमाविली गेली आहे. प्रारंभिक काळातील विद्वानांपैकी इब्ने-अब्बास (रजि.), कतादा व हसन बसरी (रह.) यांनीदेखील हेच भाष्य स्वीकारले आहे. ‘रूहुल-मआनी’ यांनी हसन बसरी व कतादा यांचे कथन उद्धृत केले की, ‘रुह-आत्माने अभिप्रेत आदरणीय जिब्रिल (अ.) आहेत व ते कसे उतरतात आणि कशा प्रकारे पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या हृदयात दिव्यबोध टाकतात, मूळ प्रश्न असा होता.


देशातील जनतेने मोदी सरकारला कठीण परिस्थितीतून तिसऱ्यांदा सत्तेवर आणले आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांवर चांगल्या मदतीचा वर्षाव होईल, अशी अपेक्षा होती, पण दुर्दैवाने या अपेक्षा पूर्ण करण्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प यशस्वी झाला नाही, असेच म्हणावे लागेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 23 जुलै 2024 रोजी सादर केलेला 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प 4820512.08 कोटी रुपये आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 1% जास्त आहे.

भाजप सरकार आपल्या अर्थमंत्र्यांसह आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी कॉर्पोरेट कर कपातीसह अपयशी आणि नाकारलेल्या नवउदारमतवादी आर्थिक धोरणांचा पाठपुरावा करत आहे. तथापि, कॉर्पोरेट कर कपातीमुळे आर्थिक वाढीस प्रभावीपणे चालना मिळाली नसल्याचे ऐतिहासिक पुरावे सूचित करतात. असे असूनही नवउदारमतवादी भांडवलदार आणि त्यांचे कॉर्पोरेट सहकारी या करकपातीची बाजू मांडत आहेत आणि असा युक्तिवाद करतात की यामुळे नफा वाढतो आणि आर्थिक विस्तार होतो. प्रत्यक्षात, या धोरणांमुळे बऱ्याचदा उत्पन्नातील विषमता वाढते आणि नोकरदार लोकांच्या किंमतीवर मोठ्या कंपन्यांना फायदा होतो.

करकपात आणि आर्थिक विकास यांच्यातील संबंधांवरील सर्वात विश्वसनीय अभ्यासअसे दर्शवितात की या दोघांमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण संबंध नाहीत. कॉर्पोरेट करकपातीचा आर्थिक विकासावर नगण्य ते शून्य परिणाम झाल्याचे आढळून आले आहे. जागतिक बँक आणि टॅक्स फाऊंडेशनसारख्या संस्थांच्या पक्षपाती अनुभवजन्य अभ्यासावरूनही असे दिसून येते की कॉर्पोरेट कराच्या दरात 10 टक्के कपात केल्यास वार्षिक जीडीपी वाढीत केवळ 0.2 टक्के योगदान मिळते. जीडीपीमध्ये करकपातीचे हे नगण्य आणि अस्पष्ट योगदान हे राजकारणाचे अफू आहे, जे कॉर्पोरेट हितसंबंध जपण्यासाठी कर कपातीच्या जागतिक शर्यतीत स्पर्धा करते.

सर्व आंतरराष्ट्रीय अनुभव आणि पुरावे असूनही, जनविरोधी राजकारण कॉर्पोरेट हितसंबंधांचे समर्थन करत आहे आणि लोक बेरोजगारी, उपासमार, बेघर आणि गरिबीने त्रस्त आहेत. कॉर्पोरेट कर कमी केल्याने कंपन्यांना त्यांच्या स्वत:च्या गुंतवणुकीसाठी बचत करण्यास प्रोत्साहित केले जाते, जे नफा संचयासाठी कॉर्पोरेट भांडवल प्रसारित करते. त्यामुळे कॉर्पोरेट करकपात ही सामाजिक हिताची नसून कॉर्पोरेट्सना बचतीची भेट आहे.

या अर्थसंकल्पात विद्यार्थी, शेतकरी आणि उद्योजकांना बँकांनी निर्माण केलेल्या कर्जाच्या जाळ्यात अडकवणारी यंत्रणा आखली आहे, ज्यामुळे अनुत्पादक, भाडेकरू अर्थव्यवस्थेचे हित संबंध पुढे सरकतात. भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान देणारी कौशल्ये शिकण्यासाठी आणि मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, फेलोशिप आणि चांगल्या शैक्षणिक पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. मात्र, अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना कर्जाच्या तरतुदीमुळे विद्यार्थ्यांसाठी कर्जाचा सापळा रचला जाण्याची शक्यता असून, त्याचा निव्वळ फायदा बँका चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) देण्यात आलेल्या पतपुरवठ्यामुळे उद्योजकांसाठी कर्जाचे सापळे निर्माण होण्याची शक्यता आहे. हा दृष्टिकोन नाविन्यपूर्ण विकासासाठी परिस्थिती निर्माण करण्यात अपयशी ठरतो आणि एमएसएमई नेत्यांना भरभराटीसाठी आवश्यक समर्थन प्रदान करत नाही. खऱ्या अर्थाने विकास आणि नावीन्याला चालना देण्याऐवजी या उपाययोजनांमुळे छोट्या व्यावसायिकांवरील आर्थिक बोजा वाढतो आणि ते अर्थव्यवस्थेत अर्थपूर्ण योगदान देण्याऐवजी कर्जाच्या ओझ्याखाली दबले जातात.

कॉर्पोरेट कर कमी करणे हा हिंदुत्ववादी समाजाचा बुर्जुआ समाजवाद आहे जो आर्थिक विकासाच्या नावाखाली कॉर्पोरेट बचतीसाठी कष्टकरी लोकांचे खिसे लुटतो. सामाजिक पायाभूत सुविधा आणि समन्यायी करआकारणीतील गुंतवणुकीसह अधिक संतुलित दृष्टिकोन देशाच्या आर्थिक हिताची अधिक चांगली सेवा करेल आणि शाश्वत विकासास कारणीभूत ठरेल, असा टीकाकारांचा युक्तिवाद आहे.

2023-24 मध्ये 2,608.93 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजाच्या तुलनेत 2024-25 साठी अल्पसंख्याक मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद 574.31 कोटी रुपयांनी वाढून 3,183.24 कोटी रुपये झाली आहे, जी एकूण बजेटच्या अंदाजे 0.0660% आहे.

अल्पसंख्याक मंत्रालयासाठी प्रस्तावित तरतूदीपैकी 1,575.72 कोटी रुपये शिक्षण सक्षमीकरणासाठी आहेत. अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीसाठी 326.16 कोटी रुपये आणि अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी 1,145.38 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या प्रमुख योजना/प्रकल्पांसाठी एकूण 2,120.72 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या प्रमुख कार्यक्रमांपैकी एक असलेल्या ’प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमा’साठी यंदा 910.90 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

केंद्र सरकारने महत्त्वाच्या योजनांच्या बजेटमध्ये कपात केली आहे जी खालीलप्रमाणे आहे.

मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेत 106.84 कोटींची कपात, मॅट्रिकोत्तर योजनेत 80.38 कोटींची वाढ, मेरिट-कम-मीन्स योजनेत 10.2 कोटींची कपात, मौलाना आझाद फेलोशिप योजनेत 50.92 कोटींची कपात, कोचिंग योजनेत 40 कोटींची कपात, व्याज अनुदानात 5.70 कोटींची कपात, यूपीएससी तयारी योजनेत शून्य तरतूद. कौमी वक्फ बोर्ड तारकियाती योजनेच्या बजेटमध्ये एक कोटींची कपात, कौशल्य विकास उपक्रम योजनेत अजिबात तरतूद नाही, नई मंजिल योजनेत कोणतीही तरतूद नाही, अल्पसंख्याक महिला नेतृत्व विकास योजनेत तरतूद नाही, उस्ताद योजनेत तरतूद नाही, नई मंजिल योजनेत तरतूद नाही, हमारी धरोहर योजनेत तरतूद नाही, पीएम विरासत का संवर्धन योजनेत 40 कोटींची कपात,  राष्ट्रीय अल्पसंख्याक वित्त व विकास महामंडळात केंद्राच्या वाट्याची तरतूद नाही, अल्पसंख्याक आणि मदरशांच्या शैक्षणिक योजनेत 8 कोटींची कपात, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अर्थसंकल्पात 1 कोटी कपात, भाषिक अल्पसंख्याकांच्या बजेटमध्ये 1 कोटी कपात, मौलाना आझाद फाऊंडेशनसाठी कोणतीही तरतूद नाही, पीएमजेव्हीकेमध्ये 310.90 कोटी वाढ प्रस्तावित आहे.

वरील आकडेवारीवरून गेल्या वर्षीच्या आणि यंदाच्या अर्थसंकल्पातील तफावत दिसून येते. यावरून सरकार अल्पसंख्याक समाजासोबत भेदभाव करत असल्याचे दिसून येते. भारतातील अल्पसंख्याक समाजाने विकासाच्या मार्गावर प्रगती करावी, असे सरकारला वाटत नाही.

गेल्या वेळी सरकारने लोकांना नव्या करप्रणालीचे आमिष दाखविले होते. या वेळी जुनी करप्रणाली असलेल्या लोकांना सावत्र वागणूक देण्यात आली. जी काही किरकोळ सवलत देण्यात आली ती केवळ नवीन करप्रणाली असलेल्यांसाठी होती. स्टँडर्ड डिडक्शनमध्ये 25,000 रुपयांची किरकोळ सूट आणि टॅक्स स्लॅबमध्ये अवाजवी फेरफार. हा एक असा बदल आहे ज्याचा फायदा फार कमी लोकांना होईल. 17 हजाररुपयांपेक्षा जास्त रक्कम कोणालाही मिळणार नाही. 

इथे मोठा प्रश्न असा आहे की, अर्थसंकल्पात मध्यमवर्गासाठी काहीच नाही, तरुणांसाठी काहीच नाही, शेतकऱ्यांसाठी काही नाही, गरिबांसाठी काही नाही, महागाईसाठी काहीच नाही, तर त्यात कोणासाठी काही आहे? म्हणजे हा अर्थसंकल्प कोणाचा आहे? केवळ किसान सन्मान निधीच नाही, तर संपूर्ण अर्थसंकल्पात देशातील शेतकऱ्यांना काही दिलासा मिळेल असे काहीही नाही. सध्या देशात नवीन गुंतवणूक नाही. नवे युनिट्स येत नाहीत, त्यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत नाहीत. त्यासाठी अर्थसंकल्पात काहीच ऐकले गेले नाही. काही लॉलीपॉप जसे की प्रथम नोकरी शोधणाऱ्यांना एक महिन्याचा पगार आणि त्यांच्या मालकांना दरमहा तीन हजार रुपये मदत. एक कोटी तरुणांना अप्रेंटिसशिप देण्याची योजना आहे, पण त्यानंतर त्यांचे काय होईल, याची शाश्वती नाही.

सरकारला अर्थव्यवस्थेला कुठे घेऊन जायचे आहे, कोणाला फायदा करायचा आहे आणि कोणाला गमावायचे आहे, हे स्पष्ट होत नाही. बिहार आणि आंध्र प्रदेशला दिलेल्या पॅकेजवरून एवढंच म्हणता येईल की, हा केवळ युतीची सक्ती असलेला अर्थसंकल्प आहे. दुसरं काही नाही. हा अर्थसंकल्प कष्टकरी जनतेच्या गरजा भागविण्याऐवजी आणि संपत्ती आणि संधींचे अधिक समन्यायी वाटप करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी, मोठ्या कॉर्पोरेशन्सच्या हितसंबंधांना पाठिंबा देण्यावर आणि प्रोत्साहन देण्यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करीत आहे. असे केल्याने श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी वाढण्यास मदत होते, लोकशाही आणि सामाजिक न्यायाच्या तत्त्वांची पायमल्ली होते. कॉर्पोरेट वर्चस्वावर भर दिल्याने सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सलोख्याला चालना देणाऱ्या धोरणांपासून दूर जाणे सुचते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेच्या दिशाहीन नेतृत्वात भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासाची भविष्यातील दिशा काय असेल याबद्दल चिंता निर्माण होते.

अर्थसंकल्पात निश्चित केलेल्या प्राधान्य क्षेत्रांसाठीही पुरेशी आर्थिक तरतूद नसल्याने सरकारकडे यासंदर्भात कोणताही वैध युक्तिवाद होताना दिसत नाही. अर्थसंकल्पातील अन्य सवलतींमध्ये सोन्या-चांदीवरील सीमा शुल्कात सवलत, मोबाइल उत्पादनांवरील सीमा शुल्कात सवलत यांचा समावेश आहे. परंतु या सवलतींची व्याप्ती अधिक असणे अपेक्षित होते. अर्थसंकल्पात महागाईच्या समस्येवर प्रभावी उत्तर शोधण्याचा प्रयत्न झालेला नाही. महागाईचा दर 4 टक्क्यांच्या मर्यादेत ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, एवढाच त्यात उल्लेख आहे. तेलबिया आणि भाजीपाल्याच्या बाबतीत हे सरकार देशाला स्वयंपूर्ण बनवणार आहे, तोपर्यंत सर्वसामान्यांना आजच्याच स्थितीत जगावे लागणार आहे, असा या अर्थसंकल्पाचा आशय आहे.


- शाहजहान मगदूम


1986 सालची ती एक प्रसन्न सकाळ होती.  दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये राजीव गांधी बसलेले होते. त्यांच्यासमोर मुस्लिम उलेमांचे एक शिष्टमंडळ बसलेले होते. हे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे सदस्य होते. शाहबानो केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम महिलांना इद्दतची अवधी संपल्यानंतरही पोटगी देण्याचा निर्णय दिला होता. तो निर्णय राजीव गांधी यांनी संसदेत कायदा करून फिरवावा, असा या शिष्टमंडळाचा आग्रह होता. सविस्तर चर्चा होऊनही राजीव गांधी घटस्फोटित मुस्लिम महिलांना पोटगी नाकारणारा कायदा करण्यासाठी तयार नव्हते. वादविवाद वाढत गेला तेव्हा राजीव गांधी यांनी वैतागून शिष्टमंडळाला एक प्रश्न विचारला की, मी जगात अनेक मुस्लिम देशांमध्ये फिरून आलोय त्या ठिकाणी तर असा कायदा नाही. मग भारतातच असा कायदा असावा असा तुमचा आग्रह का? त्यावर आतापर्यंत शिष्टमंडळाच्या एका कोपर्यात शांत बसलेले हडकुड्या शरीरयष्टीचे मौलाना अलिमिया नदवी एकदम उसळून म्हणाले, भारताच्या मुसलमानावर अशी वेळ आली आहे का की त्यांनी विदेशी मुसलमानांचे अनुसरण करावे. आम्ही कुरआन आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्याशिवाय कोणाचेही अनुकरण करणार नाही. बाकीच्या मुस्लिम देशात काय चालले आहे ते आम्हाला माहित नाही. आम्हाला हा कायदा हवा.  

तेव्हा राजीव गांधींनी शिष्टमंडळाला उद्देशून सांगितले की, तुम्हाला कसा कायदा हवा, त्याचा मसुदा तयार करून माझ्या कार्यालयात द्या, मी तो पास करून घेतो. अशा प्रकारे मुस्लिम महिला हक्क संरक्षण कायदा-1986 चा जन्म झाला. या कायद्यात तीच गोष्ट म्हटलेले आहे जी कुरआनच्या खालील आयातीत म्हटले आहे. 

अशाच तर्हेने ज्या स्त्रियांना घटस्फोट देण्यात आला असेल त्यांना देखील योग्य प्रकारे काहीना काही देऊन निरोप देण्यात यावा. हा हक्क आहे अल्लाहचे भय बाळगणार्या लोकांवर.  (सूरह अलबकरा 2: आयात क्र. 241) 

इस्लाममध्ये घटस्फोटित महिलांना पोटगी न देण्यामागे काय कारणं आहेत? हे समजण्यापूर्वी इस्लाममध्ये विवाहाची संकल्पना काय आहे? हे समजून घेणे गरजेचे आहे. इस्लाममध्ये विवाह हिंदू धर्मातील विवाहासारखा नाही. हिंदू धर्मामध्ये विवाह एक सॅक्रामेंट अर्थात संस्कार आहे. जो की, कधीच संपुष्टात येवू शकत नाही. म्हणूनच महिला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झडाला प्रदशिणा घालून जन्मोजन्मी हाच पती मिळो म्हणून प्रार्थना करत असतात. इस्लाममध्ये यापेक्षा एकदम वेगळी संकल्पना आहे. इस्लाममध्ये विवाह एक सामाजिक करार आहे. इतर करारांप्रमाणे हा करारही शेवटपर्यंत टिकून राहू शकतो किंवा टिकण्यासारखी परिस्थिती नसेल तर तो भंग ही होऊ शकतो. याचा अर्थ असा नाही की, इस्लाममध्ये  विवाह पाश्चिमात्य देशासारखे टिकतच नाहीत. उलट इस्लामची व्यवस्था एवढी मॅथेमॅटिकल आहे की, तोंडी तलाक देण्याची शरियतमध्ये तरतूद असूनसुद्धा जगामध्ये सर्वात कमी तलाक मुस्लिम जोडप्यांमध्ये होतात. ते कसे? त्याची काय कारण आहेत. हा आजचा विषय नसल्यामुळे त्याला बाजूला सारून आपण पोटगी या विषयाकडे वळूया. 

पोटगी हा विषय मुसलमानांपैकी बहुतेकांना समजत नाही. म्हणूनच ते पोटगी मागण्यासाठी कोर्टात जातात. देशात एकही असे कोर्ट नसेल ज्यात सीआरपीसी कलम 125 खाली पोटगी मागणार्या महिलांमध्ये मुस्लिम महिलांचा समावेश नसेल. जेव्हा मुसलमानानांच पोटगी संबंधिचा शरियतचा आदेश मान्य नाही तेव्हा कोर्टाला काय दोष देणार? इस्लाममध्ये लग्न वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जातात आणि शेवटी अशी परिस्थिती एखाद्या प्रकरणात निर्माण होईल की, लग्न कंटिन्यू करणे हा दोघांवरही अत्याचार असेल तेव्हा घटस्फोटाची तरतूद सुद्धा शरियतमध्ये आहे. यात घटस्फोट दिल्यानंतर घटस्फोटित महिलेला तीन महिन्यापर्यंत तिचा खर्च देणे पतीवर बंधनकारक आहे. तीन महिन्यानंतर मात्र योग्य ती रक्कम, दागिने किंवा इतर काही संपत्ती देऊन नेहमीसाठी तिला सोडून द्यावे लागते. यानंतर मात्र त्या महिलेला आपली उपजिविका चालविण्यासाठी शरियतच्या परिघामध्ये राहून काम करण्याची परवानगी आहे. किंवा तिला जर कमावती मुलं असतील तर त्यांच्यावर तिची जबाबदारी येते. मुलं नसतील किंवा छोटी असतील तेव्हा मुलांच्या संगोपनाच्या खर्चाची जबाबदारी त्यांच्या वडिलांनाच करावी लागते. मात्र तिची जबाबदारी तिचे लग्न झाले नसते तर ज्यांच्यावर नैसर्गिकरित्या येणार होती त्यांच्यावर येते. घटस्फोट झाल्यानंतर पती-पत्नीसाठी आणि पत्नी-पतीसाठी परके होऊन जातात. म्हणून परक्या पुरूषाकडून उपजिविकेसाठी रक्कम घेणे शरियतच्या दृष्टीकोनातून घटस्फोटित महिलेचा अपमान आहे. शिवाय, घटस्फोटित पुरूष दुसरे लग्न करणार, त्यामुळे त्याच्या आयुष्यात येणार्या दुसर्या स्त्रिचा खर्च त्याला करावाच लागणार. त्या खर्चाबरोबर घटस्फोटित पत्नीचा खर्च उचलायला त्याला भाग पडणे हा पुरूषावर अन्याय आहे. हेच कारण आहे की, इतर समाजामध्ये घटस्फोटानंतर पोटगी देण्याची पाळी येवू नये म्हणून महिलांना रखेलसारखे ठेवले जाते. याचे सर्वात मोठे उदाहरण आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त रोनाल्डो याचे आहे. त्याला त्याच्या महिला मैत्रिणीकडून तीन मुलं झालेली आहेत. तरीही त्याने तिच्याबरोबर लग्न केलेले नाही. अनेक ठिकाणी पोटगी देण्याची वेळ येवू नये म्हणून महिलांवर एवढा दबाव आणला जातो की, त्या आत्महत्या करतात. अनेकवेळा पोटगी देण्याची पाही येवू नये म्हणून महिलांची हत्या केली जाते. अनेक ठिकाणी वैवाहिक संबंध ही ठेवले जात नाहीत आणि घटस्फोट ही दिला जात नाही अधांतरी लटकत ठेवले जाते, अनेक महिला पोटगी मिळत रहावी म्हणून दुसरे लग्न करत नाहीत आणि अनैतिक संबंधांमध्ये अडकून पडतात. येणेप्रमाणे पोटगी देण्याचे एक ना अनेक नुकसान महिलांना होत असतात. म्हणून शरियतने स्त्रिला पोटगी घेण्यापासून प्रतिबंध करून तिचा सन्मानच वाढविलेला आहे. एक प्रश्न असाही निर्माण होवू शकतो की, समाज एखादी स्त्री अशीही आहे की, घटस्फोटानंतर तिला सांभाळणारा नैसर्गिर्क पालक असतित्वात नाही व ती स्वतः सुद्धा अपंग आहे. त्यामुळे ती काही काम करू शकत नाही. अशा वेळेस तिचा सांभाळ करण्याची जबाबदारी शरियतने शासनावर टाकलेली आहे. महिलांना परावलंबी ठेवण्यामागे त्यांना यातना द्याव्यात, त्या अत्याचारांना बळी पडाव्यात असा शरियतचा मूळीच उद्देश नाही. परावलंबीवत्व ही त्यांची कमकुवत बाजू नसून तो त्यांचा अधिकार आहे. मुलं जन्माला घालणे आणि त्यांचे संवर्धन करणे ही जगातील सर्वात मोठी, कठीण आणि महत्त्वाची जबाबदारी आहे. या जबाबदारीपुढे दूसरी कोणतीच जबाबदारी महत्त्वाची नाही. म्हणूनच ईश्वराने महिलेला ही जबाबदारी देऊन दुसऱ्या प्रत्येक जबाबदारी तून मुक्ती दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना अर्थार्जनाच्या कष्टापासून मुक्त ठेवलेले आहे आणि तीची जबाबदारी पुरूषांवर टाकलेली आहे. मुलं जन्माला घालून त्यांचे संगोपन करून पुन्हा अर्थार्जनासाठी कष्ट करणे ही  अत्यंत पीडा दायक व्यवस्था आहे. अर्थार्जनासाठी महिलांना भाग पाडले गेले तर नैसर्गिकरित्या त्या मुलं जन्माला घालण्याचे टाळतात. ही पद्धत युरोप आणि अमेरिकेमध्ये रूढ असल्यामुळे आज त्या ठिकाणी लोकसंख्या उणेमध्ये गेलेली आहे आणि अप्रवाशांची समस्या उभी राहिलेली आहे. त्यातून अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. ईश्वरी व्यवस्थेमध्ये माणूस ज्या-ज्या वेळेस हस्तक्षेप करील त्या-त्या वेळेस त्याला वाईट परिणाम भोगावे लागणारच आहेत, हे वाचकांनी लक्षात घ्यावे. 

कुरआन आणि 1986 च्या कायद्यामध्ये जेव्हा एकदाच काही रक्कम, संपत्ती भेट म्हणून देण्याची तरतूद असतांना घटस्फोटित महिलेला पुन्हा दर महिना पोटगी देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय यामुळेच चुकीचा आहे. मुस्लिम पुरूषांना घटस्फोटित महिलेला कायम पोटगी देण्याचा निर्णय कायम राहिला तर मुस्लिम पुरूषही पोटगी देण्याची जबाबदारी टाळण्यासाठी महिलांवर अत्याचार करू लागतील, अशी सार्थ भीती वाटत आहे.

मग या प्रश्नावर उपाय काय?

मुस्लिम समाजामध्ये पोटगीचा हा प्रश्न कुरआन समजून न वाचल्यामुळे निर्माण झालेला आहे. प्रत्येक मुसलमानाने कुरआन ही समजून वाचणे अनिवाय आहे. मुसलमानांनी कुरआनमधील विवाह, घटस्फोट आणि पोटगी या संबंधीच्या तरतूदी शांतपणे वाचाव्यात, त्यावर चिंतन, मनन करावे आणि त्यावर प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. घटस्फोटित महिलेची जबाबदारी त्या नैसर्गिक पालकांनी उचलावी ज्यांच्यावर ती जबाबदारी शरियतने टाकलेली आहे. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, हे अल्लाह! कुठल्याही महिलेचा घटस्फोट होवू नये आणि दुर्दैवाने झालाच तर तिची जबाबदारी नैसर्गिक पालकांना उचलण्याची शक्ती आणि समज दे. आमीन


- एम. आय. शेख

लातूर



वस्तू असो की व्यक्ती, ती ओळखली जाते तिच्या नावावरून आणि नावात त्या व्यक्तीचे किंवा वस्तूचे गुणवैशिष्ट्य लपलेले असते. चाळणी- चाळण्यासाठी वापरली जाणारी, सूर्यफूल- सूर्यासारखे दिसणारे फुल, रमाकांत- रमा नावाच्या मुलीचा पती, अब्दुल्लाह- अल्लाहचा भक्त किंवा दास, यावरून हे लक्षात येते की कोण्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या नावात तिचा गुणधर्म दिसून येतो. शेक्सपियर म्हणतो, ’नावात काय आहे?’ परंतु व्यक्तीच्या किंवा वस्तूच्या नावात बरेच काही आहे म्हणूनच मुल जन्माला येताच त्याचे सुयोग्य नाव ठेवले जाते.   आय.सी.बी.एन. (International Code for Botanical Nomenclature) किंवा आय.सी.झेड.एन. (International Code for Zoological Nomenclature) वनस्पती आणि प्राण्यांना नावे देण्याचे काम चोखपणे बजावतात जेणेकरून त्यांना जगभरात एकाच वैज्ञानिक नावाने ओळखले जावे. यावरून नावाचे महत्त्व लक्षात येते. जगात आणि विशेष करून भारतासारख्या देशात मानवी संस्कृतीनुसार नावांमध्ये बरीच भिन्नता दिसून येते. या वैविध्यपूर्ण संस्कृती, भौगोलिक परिस्थिती, भाषा, इत्यादी बाबींचा विचार करून व्यक्तीचे नाव ठेवले जाते आणि म्हणूनच बऱ्याचशा नावात त्या व्यक्तीची ओळख दडलेली असते. परंतु लोकांनी आपला स्वार्थीपणा, आपापसातील वैर आणि एकमेकांच्या वरचढपणाच्या भावनेने नावांना बदनाम करून भेदभावाला चालना देऊ केली. ज्यांच्या हाती सत्ता असेल ते स्वतःला उच्च आणि दुसऱ्यांना नीच लेखत गेले. यातुनच वर्णवाद, जातीवाद बळावला आणि लोकांच्या नावात त्यांची जात शोधू लागली गेली. संपूर्ण भारत या वर्णवादात आणि जातीवादात हजारो वर्षे होरपळून निघाला. याचा अंत स्वातंत्र्यानंतर देशाला मिळालेल्या लोकशाहीच्या रूपात दिसून आला. लोकशाहीप्रधान देशात अशा भेदभावाला कुठेही स्थान नाही. कुठल्याही व्यक्तीला तिच्या नावावरून हिणवणे, तिला त्रास देणे हे लोकशाहीघातक आणि असंवैधानिक आहे. मात्र वर्णवाद्यांना हे पचणारे नाही. सतत काही ना काही गैरव्यवहार करून ते याला चिथावणी देतच राहतात. मागील काही दिवसांपासून उत्तरप्रदेशात दुकानदारांना आपल्या दुकानांवर नावाचा उल्लेख करण्यासाठी उत्तरप्रदेश सरकारकडून सक्ती करण्यात आली आहे. यामध्ये त्या सरकारचा उद्देश काय असावा हे स्पष्ट आहे. हिंदू बांधवांची पारंपरिक कावड यात्रा दरवर्षी जाते येते. पवित्र नद्यांचे जल कावडीत भरून ते घेऊन जातात. या प्रवासात त्यांना लागणाऱ्या वस्तूंची, फळांची दुकाने, जेवणाच्या खानावळी विविध धर्मियांच्या, विविध संप्रदायाच्या असतात. लोकशाहीप्रधान देशात समानतेच्या तत्त्वावर कावड यात्री साहाजिकच कुठलाही भेदभाव न करता आपली यात्रा पुर्ण करतात. परंतु उत्तर प्रदेश सरकारच्या या नेम प्लेट सक्तीने कावड यात्रींनाही शंकेत पडायला भाग पाडले आणि दुकानदारांनाही असमानतेच्या भावनेने अपमानित केले. या माध्यमातून फक्त हिंदू - मुसलमान दुकानदार स्पष्ट होतील एवढेच नाही तर आडनावांनी प्रत्येकाच्या खास करून हिंदू दुकानदारांच्या जाती समोर येतील. यातुन संविधानाच्या समानतेला आणि पर्यायाने भारतीय एकात्मतेला धक्का बसण्याची शक्यता आहे. तरी सर्वोच्च न्यायालयाने उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश आणि उत्तराखंड सरकारच्या या सक्तीवर स्थगिती देत लोकशाहीला बळकटीकरण दिले, परंतु असे वाटते की या प्रकरणात ही स्थगिती देण्याऐवजी ठोस निर्णय घेतला असता तर कदाचित लोकशाहीचा पाया अजून मजबूत झाला असता.


खरे तर आपल्या गावाचं, शहराचं, राज्याचं, देशाच्या विकासाचं भविष्य आपण निवडणुकीच्या माध्यमातून ठरवत असतो. मात्र हल्ली निवडणुका आल्या की, उत्साहाच्या जागी आता चिंता वाटायला लागली आहे. देशातील अनेक पक्ष आता जातीयवाद आणि धर्मवादाच्या आजाराने ग्रस्त झाले आहेत. सोबतच त्यांनी मोठ्या प्रमाणात जनतेलाही आपलसं बनवलं असल्याचे पहायला मिळत आहे. हल्ली आता कुठल्याही निवडणुका असोत राजकीय पक्षांचे काही पदाधिकारी विकासाऐवजी विनाशाचीच भाषा बोलताना पहावयास मिळत आहेत. त्यामुळे निवडणुका आल्या की संवदेनशील व्यक्ती चिंताग्रस्त होताना पहायला मिळत आहेत. 

आपण क्वचितच पहायले असेल की, अतिक्रमणामुळे दंगल घडली असेल. मात्र असे झाले आहे. नुकतेच विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या नावावरून काही धर्मांधानी दंगल घडवून आणली. मुस्लिम समाजाला टार्गेट केले. दंगेखोरांचा आणि गजापूर येथील नागरिकांचा कधी साधा व्यवहारही झालेला नसेल अथवा त्यांनी एकमेकांना पाहिलेही नसेल. तरी परंतु, मुस्लिम वस्त्यांवर दंगेखोरांनी हल्ला चढविला. तेथील मस्जिदीची तोडफोड केली. वाहने जाळली, असे का बरे केले असेल. तर चिंतनाअंती आणि समाजमाध्यमांवर होत असलेल्या चर्चेअंती असे निदर्शनास येते की, निवडणूक जवळ आली आहे. नागरिकांनी जागल करायला हवी. निवडणुकीच्या तोंडावर  दंगे करून मतांची विभागणी करावी, असा उद्देश काहींचा असू शकतो. दंगेखोरांनी छत्रपती शाहूंच्या शांततेच्या नगरीला टार्गेट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी आता जागल करायला हवी, चांगल्या विचारांची गावोगावी पेरणी करायला हवी. महापुरूषांचा विचार अंगी बाळगायला हवा आणि निवडणुका व्यवस्थित पार पाडायला हव्यात.

- बशीर शेख.



हदीस संग्रह बुखारी आणि मुस्लिममध्ये एक हदीस आलेली आहे. ज्यात प्रेषित वचन खालीलप्रमाणे उधृत करण्यात आलेले आहे, ’’ ज्या व्यक्तीने माझा संदर्भ सांगून कोणाला एखादी चुकीची गोष्ट सांगितली तर त्याने स्वतःचे ठिकाण नरकात आहे, एवढे समजून घ्यावे’’ एवढी कडक चेतावनी मिळाल्यानंतरही इस्लामच्या इतिहासामध्ये अशा अनेक व्यक्ती होवून गेल्या ज्यांनी चुकीची प्रेषित वचने तयार करून समाजात प्रस्तुत केली. यामागे त्यांचे राजकीय समर्थन किंवा विरोध हे कारण होते. सत्ताधाऱ्यांकडून भौतिक मदत मिळावी म्हणून किंवा मुसलमानांच्या दुसऱ्या गटाशी असलेले मतभेद वाढावेत म्हणून अशी प्रेषित वचने पेरली गेली. हा प्रकार इस्लामच्या सुरूवाती काळापासूनच सुरू झालेला आहे. शेकडो लोकांनी हे घृणित काम केलेले आहे आणि हजारो खोटी प्रेषित वचने तयार केली गेली आहेत. ईश्वराची कृपा हो त्या हदीसच्या विद्वानांवर ज्यांनी वेळीच अशा खोट्या प्रेषित वचनांना ओळखून त्यांना खऱ्या प्रेषित वचनांपासून वेगळे करून टाकले आहे. असे करण्याच्या कृतीला अस्माउल रिजाल पद्धत असे म्हणतात. या पद्धतीतून हजारो लोकांच्या जीवनाचे अहवाल गोळा केले गेले. त्यावर संशोधन केले गेले आणि त्याच्यापैकी जे खरे वाटले त्यांना सन्माननीय हदीसचे संदर्भकार म्हणून नोंदविले गेले. ज्यांच्याव्यक्तिमत्वाविषयी संशय किंवा ते खोटे असल्याविषयीची खात्री होती त्यांना वेगळे करण्यात आले. त्यांची ओळख पटविण्यात आली. जेणेकरून समाज त्यांच्यापासून सावध राहील. 

हदीसच्या अभ्यासामध्ये अनेक महिलांनी मोठी जबाबदारी पेललेली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, खोट्या हदीस तयार करण्यामध्ये एकाही महिलेचे नाव नाही. ही मुस्लिम महिलांसाठी गर्व करण्यासारखी गोष्ट आहे. ईमाम अल जरह वल तआदील, अल्लाम्मा शम्सुद्दीन जहबी यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की, आम्हाला माहित नाही की हदीसच्या संदर्भात एकाही स्त्रीने चुकीची हदीस संदर्भित केलेली आहे. महिलांची ही गोष्ट खरोखर स्तुतीपात्र आहे. 

- डॉ. रजिउल इस्लाम नदवी

दिल्ली


पुस्तक : मेमारे जहाँ तू है

भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget