या पावसाच्या आनंदात आणि उल्हासात लोक हे अगदी विसरून जातात की या सुखद पावसाळ्यापूर्वी एक कडक उन्हाळा आपण असा अनुभवलाय की एखाद्या दिवशी पिण्याच्या पाण्याचे वांधे तर कधी बिना आंघोळीचा एखादा दिवस आपण घालवलाय. पावसाळ्यात जेव्हा या दिवसांची आठवण होते तेव्हा ’गेले ते दिवस’ म्हणून आपण सुटकेचा श्वास घेतो. मात्र तेच दिवस परत पुढच्या उन्हाळ्यात येतील आणि आपल्याला आज पडणाऱ्या पावसाचे व्यवस्थापन करावे हा विचार फार कमी लोकांच्या मनात येतो. यासाठी योग्य विचार आणि चिरकाल तोडगा काढण्यासाठी शाश्वत जल व्यवस्थापन ही संकल्पना पुढे आली.
शाश्वत जल व्यवस्थापन म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण आणि सामाजिक समता सुनिश्चित करत, वर्तमान आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी जलसंपत्तीचा कार्यक्षम आणि जबाबदारीने वापर करणे. शाश्वत जल व्यवस्थापन करण्यासाठी पहिला पैलू म्हणजे जलसंवर्धन; यामध्ये आपण कार्यक्षम पद्धतींद्वारे पाण्याचा अपव्यय टाळून आणि वापर कमी करून पाण्याचे संवर्धन म्हणजे बचत करू शकतो. दुसरा पैलू वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकतो ज्यामध्ये आपण पिण्यायोग्य वापरासाठी पावसाचे पाणी गोळा करून साठवून ठेवतो. पाण्याचा पुनर्वापर हा तिसरा पैलू आहे. कृषी किंवा औद्योगिक क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जाऊ शकतो. आणखी एक पैलू म्हणजे पाणलोट व्यवस्थापन. यात नैसर्गिक जलचक्र आणि वेगवेगळ्या अधिवासांचे संरक्षण करून त्यांचे पुनर्संचयन केल्यास पाण्याचे व्यवस्थापन होते. पाणी आणि उर्जेचा वापर यांच्यातील परस्परावलंबन सुद्धा जल व्यवस्थापनात मदत करू शकते. कृषी जल व्यवस्थापन हा पैलूही उल्लेखनीय आहे; कार्यक्षम सिंचन प्रणाली आणि पद्धतींची अंमलबजावणी केल्यास फायदेशीर ठरेल. जल-कार्यक्षम पायाभूत सुविधा आणि पद्धतींसह शहरांची रचना करून देखील शाश्वत जल व्यवस्थापनास हातभार लागेल. विविध जल धोरणे आणि प्रशासनाने घालून दिलेले नियम यात उपयोगी ठरतील. जलशिक्षण आणि जागरूकता; वापरकर्त्यांना पाणी टंचाई आणि संवर्धनाबद्दल वेळीच जागरूक केले जावे. जल तंत्रज्ञान आणि नवकल्पना हाही एक पैलू होऊ शकतो ज्यामध्ये शाश्वत जल व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करणे आणि लागू करणे जेणेकरून जास्तीत जास्त पाण्याची बचत होईल. शाश्वत जल व्यवस्थापन केल्यास जीवन अधिक सुखकर होईल यात शंका नाही. याशिवाय अन्न सुरक्षा सुनिश्चित होईल, आर्थिक पाठिंबा, परिसंस्थांचे संरक्षण, हवामान बदलाचे परिणाम कमी होतील, सामाजिक समता आणि न्याय यांना प्रोत्साहन मिळेल. शाश्वत जल व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करून आपण येणाऱ्या पिढ्यांसाठी पाणी-सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू शकतो ज्यामध्ये विद्यार्थी, शेतकरी, वारकरी आणि पर्यटक तितक्याच उल्हासात पावसाळ्याची सुरूवात करतील.
- डॉ. हर्षदीप बी. सरतापे
मो. : 7507153106
करतात. त्याशिवाय, विविध माशांच्या वेगवेगळे काम असतात, जो राणीमाशीने त्यांना दिलेली असतात. राणीमाशीचे खरे कार्य हे आहे की ती तीन आठवड्यांमध्ये सुमारे 11 ते 12 हजार अंडे घालते. या अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम इतर माशांचा एक गट करतो. आणि एक समूह तो असतो, जो अंड्यांमधून - बाहेर पडलेल्या बाळांची देखभाल आणि प्रशिक्षण करतो. काही माशा पोळा बनवतात, तर काही संरक्षणाची कामे करतात. रक्षक माशा कोणत्याही अनोळखी व्यक्तीस पोळयात येऊ देत नाहीत. काही माशांचा समूह तो असतो जो सैनिकाची भूमिका बजावतो. त्याचे काम शत्रूंशी सामना करणे असते आणि पोळयाचे रक्षण करणे हेसुद्धा त्याच गटाची जबाबदारी असते. काही माशा रस ओढून आणतात, काही मध आणि मोमचा पोळा बनवण्याचे काम करतात.
या माशांमध्ये नकाशा बनवण्याची क्षमता असते, जशी गूगल मॅपमध्ये असते. या माशा सूर्यप्रकाश आणि पृथ्वीच्या चुंबकीय ताकतचे वापर करून कठीण नकाशा बनवू शकतात. आणि आपल्या पोळयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तयार करतात. एखादी दुसरी माशी राणीमाशी बनण्याची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला मारले जाते. या माशा स्वच्छ असतात, स्वच्छ वस्तूंपासून अन्न बनवतात, अस्वच्छ वस्तूंवर बसत नाहीत, आणि कोणालाही हानी पोहोचवत नाहीत.
एक हदीस आहे ज्यामध्ये मानवाचे उदाहरण मधमाशी सारखे दिले आहे. हदीस हे आहे की, ‘माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे, जी पवित्र वस्तू खाते आणि पवित्र वस्तू उत्पन्न करते. ती जेथे बसते तेथे ती ना तोडते, ना बिघडवते (मुस्नद अहमद)’.
खरोखरच, माणसाचे उदाहरण त्या मधमाशीप्रमाणे आहे जे माणूस स्वच्छता आणि पवित्रता पसंत करतो, मेहनती असतो, आणि स्वतःचा मार्ग शोधतो. अल्लाहने दिलेल्या बुद्धीचा वापर करून, आपले ध्येय गाठतो, मग ते या जगाचे ध्येय असो किंवा परलोकाचे.
तो माणूस नफा देणारा असतो, लोकांच्या भल्यासाठी कार्य करीत असतो, आणि लोकांना नफा पोहोचवण्यासाठी प्रयत्न करतो, अगदी त्या मधमाशीप्रमाणे जी मेहनत करून रस ओढून आणते. तो संघटनेत राहतो, संघटनेशी जोडलेला राहतो, एकटे भरकटत नाही, आपल्या प्रमुखांच्या(अमीर) आज्ञेचे पालन करतो.
जर संघटनेच्या संरचनेत काही त्रुटी दिसली तर तो ती सुधारण्याचा प्रयत्न करतो. जर कोणी त्रुटी निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर त्याला योग्य मार्गावर आणतो. जर कोणी शत्रू संघटनेच्या संरचनेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर त्याला आपला शत्रू समजून त्याचा नाश करतो.
खरोखर, एका माणसाची आणि खऱ्या व्यक्तीची अशी गुणधर्म असावी की तो प्रमुखाचे आज्ञा पालन करतो, कारण प्रमुखाचे आज्ञापालन हे रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन आहे, आणि रसूलल्लाह (सल्ल.) चे आज्ञापालन करणे हे अल्लाहचे आज्ञापालन आहे.
आणि जो कोणी अल्लाहचे आज्ञा पालन करतो, तो खरेच या जगात आणि परलोकात यशस्वी होतो, कारण जीवनाचा खरा उद्देश अल्लाहचे आज्ञा पालन आहे, त्याची बंदगी आहे, त्याच्यासमोर नतमस्तक होणे आहे, त्याच्याशी प्रेम करणे आहे, त्याच्याशी मागणे आहे, त्याच्यासाठी जगणे आहे, आणि त्याच्यासाठीच मरणे आहे.
ज्याप्रमाणे मधमाशी मध बनवण्याचे कार्य करते, फुलांचा रस ओढते, ज्यामध्ये उपजिविका आहे आणि औषध देखील आहे, तसाच एक माणूसही लोकांची भूक आणि तहान मिटवण्याचे कार्य करतो,लोकांच्या दुःखांची वेदना कमी करणारा बनतो.
अगदी त्याचप्रमाणे एक नेक व्यक्ती आणि इमानवंत बंधू, कुरआनावर विचार करतो व बुद्धीचा वापर करतो, कानांनी ऐकतो, कुरआणाच्या गोष्टी समजुन घेतो, ज्यामुळे त्याला सत्य प्राप्त होते, कुरआन ऐकून, समजून, बुद्धीचा वापर करून, कुरआनावर विचार करुन आणि अल्लाहशी जवळीक साधून. त्याला अल्लाह मिळतो, तो अल्लाहशी प्रेम करतो, त्यांचे जीवन पवित्र होते. तो लोकांना भल्याचा आदेश देतो आणि वाईटापासून दूर ठेवतो. एक शिस्तबद्ध जीवन जगतो आणि खोटे आणि वाईट कामांपासून दूर राहतो.
पवित्र कुरआनमध्ये आहे की,’’ आणि पहा, तुमच्या पालनकर्त्याने मधमाशीवर ही गोष्ट दिव्य प्रकटन केली की पर्वतामध्ये आणि वृक्षामध्ये आणि मांडवावर चढविलेल्या वेलीत आपले मोहळ बनव.व प्रत्येक प्रकारच्या फळांचे रस शोषून घे आणि आपल्या पालनकर्त्याच्या सुरळीत केलेल्या मार्गावर चालत राहा. या माशीमधून रंगीबेरंगी एक सरबत निघते जे लोकांकरिता आरोग्यदायी आहे, निश्चितपणे यातदेखील संकेत आहे त्या लोकांकरिता जे गांभिर्याने विचार करतात.(दिव्य कुरआन सुरह: अन नहल: आयत:68,69)
मधमाशीला ही बुद्धी कोणी दिली? स्पष्टच आहे की तिच्या निर्माणकर्ता ने दिली. ही मधमाशी, बुद्धीचा योग्य वापर करून, अल्लाहच्या आज्ञेनुसार लाभदायक काम करते.
अखिल मानवजाती साठी यात खूप मोठा धडा आहे. मानवाला पाहिजे की त्याने या छोट्या मधमाशीपासून धडा घ्यावा, आपल्या बुद्धीचा योग्य वापर करावे, आपल्या क्षमतांचे ओळख करून घ्यावे, आणि त्यांचा अधिकाधिक चांगला वापर करून घ्यावा. एक नीतिमान आणि पवित्र जीवन जगावे, अल्लाहचा दास बनून राहावे, आणि त्याचीच आज्ञा पाळावी. जसे, अल्लाहचे दास बनून मधमाशी अल्लाहच्या आज्ञेचे पालन करते आणि एक पवित्र जीवन जगते. तुमच्या पैकी श्रेष्ठ तो आहे जो लोकांना फायदा पोहचवत असतो. (हदिस)
- आसिफ खान, धामणगाव बढे
9405932295
मला ही भीती वाटते की तुम्ही तुमच्या मृतांना दफन करणे थांबवाल, अन्यथा मी अल्लाहकडे प्रार्थना केली असती की मी ऐकत असलेल्या कबरीतील यातनांचा आवाज तुम्हालाही ऐकू यावा. (हदीस संग्रह मुस्लिम - 7213 खपीं.. 2867 - इस्लाम 360 )बरज़ख़ी जीवनात मिळणारी शिक्षा जिन्न आणि मानवांपासून लपवून ठेवली गेली आहे. त्यांना ती अजिबात दिसत नाही, पण त्यांच्याशिवाय इतर प्राण्यांना त्याची थोडीफार जाणीव होत असते. जर ती परिस्थिती उघड केली गेली आणि लोकांनी मृतांचे रडणे, ओरडणे ऐकले तर त्यांना मृत्यूची इतकी भीती वाटेल की ते कुणाच्याही अंत्यसंस्काराला जाऊ शकणार नाहीत, कोणतेही काम करू शकणार नाहीत आणि जगाची व्यवस्था विस्कळीत होईल. कबरमध्ये मिळणाऱ्या यातना अल्लाहच्या अदृश्य व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यापासून सुरक्षित राहण्यासाठी ही प्रार्थना नेहमी केली पाहिजे, अल्लाहुम्-म इन्नी अऊज़ुबि-क मिन् अज़ाबिल्-कब्-रि हे अल्लाह! कबरीच्या यातनापासून मी तुझा आश्रय घेतो.( हदीस संग्रह - बुख़ारी 1377 - इस्लाम 360 )
याशिवाय शिक्षेकडे नेणाऱ्या सर्व कृती टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. कबरीच्या शिक्षेस कारणीभूत ठरणारे काही गुन्हे पुढीलप्रमाणे आहेत. अल्लाहच्या अस्तित्वात, गुण सामर्थ्यात, हक्क व अधिकारात कुणाला सामील करणे, दांभिकपणा, ढोंगीपणा करणे, अल्लाहचे कायदे बदलणे, लघवीच्या थेंबापासून स्वतःचे रक्षण न करणे, एखाद्याच्या पाठीमागे त्याच्या बद्दलच्या वाईट गोष्टी दुसर्यास सांगणे, लावालावी करणे, खोटे बोलणे, कुरआन शिकल्यानंतर त्याकडे लक्ष न देणे, अनिवार्य नमाज़ झोपेत घालविणे, व्याज खाणे, व्यभिचार करणे, लोकांना चांगले शिकवणे पण स्वतःला विसरणे, रमजानमधील उपवास विनाकारण तोडणे, पुरुषांनी घोट्याच्या खालपर्यंत असलेले कपडे घालणे, एखाद्या प्राण्याला कैद करून त्याचा छळ करणे व कर्ज न फेडणे इत्यादी. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी पाहा,
इस्लाम सवाल व जवाब
अज़ाबे कब्र के तफ्सिली असबाब.
- अब्दुल कय्यूम शेख अहमद.
9730254636 - औरंगाबाद.
१८५७ च्या सैनिक बंडात, राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल आणि झाशीची राणी यांसारख्या स्त्रियांनी आपले शौर्य आणि पराक्रम दाखवून ब्रिटिश सैन्याला कडवी लढाई दिली. सामाजिक सुधारकांनी शिक्षण, विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह सारख्या मुद्द्यांवर लढा दिला. यात रमाबाई, ज्योतिबा फुले आणि पंडिता रमाबाई यांचा समावेश होता.
२० व्या शतकाच्या सुरुवातीला, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेसोबतच स्त्रियांचा सक्रिय सहभाग वाढू लागला. या आंदोलनात पुरुषांच्या जोडीला अनेक महिला स्वातंत्र्य सेनानींही सहभाग घेतला होता. सरोजिनी नायडू, अरुणा आसफ अली, आणि कस्तुरबा गांधी यांसारख्या स्त्रियांनी भाषणे, निषेध मोर्चे आणि बहिष्कार चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील अहिंसक सत्याग्रहात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महिलांचा सहभाग हा चळवळीचा एक महत्त्वाचा आणि प्रभावशाली पैलू होता. स्त्रियांच्या स्वातंत्र्य युद्धातील कामगिरीकडे सतत दुर्लक्ष झाले आहे.
अनेक महिला काँग्रेस पदाधिकाऱ्या बनल्या आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी रणनीती तयार करण्यात आणि अंमलात आणण्यात सहभागी झाल्या. महिलांनी समाज सुधारणे आणि शिक्षण, आरोग्य आणि कल्याण यासारख्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक संस्था आणि आंदोलने सुरू केली. अनेक महिलांनी स्वदेशी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वातंत्र्यलढ्यासाठी निधी उभारण्यासाठी दान केले. काही महिलांनी क्रांतिकारी चळवळीत भाग घेतला आणि ब्रिटिश सरकारविरोधात लढा दिला.
स्त्रियांच्या सहभागाने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला मोठी गती मिळाली. या लढ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावना निर्माण झाली. स्वातंत्र्यानंतर, महिलांना समान अधिकार आणि संधी मिळण्यासाठी लढण्यास प्रेरणा मिळाली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांचे योगदान अमूल्य होते. त्यांच्या धैर्य, त्याग आणि बलिदानाने भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात मोठी भूमिका बजावली. आजही, त्यांची प्रेरणादायी कथा आपल्याला समानता आणि न्यायासाठी लढण्यास प्रेरित करते. राणी लक्ष्मीभाई देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. १८१७ च्या सुरुवातीला भीमाबाई होळकर यांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा दिल्यापासून भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महिलांचा सहभाग सुरू झाला. मादाम भिकाजी कामा, १८५७ च्या उठावानंतर आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या पहिल्या भारतीय महिला समाजवादी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महाराष्ट्रातील अनेक गांधीवादी महिलांचे योगदान आहे. डॉ. अॅनी बेझंट यांचेही भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान महत्वाचे आहे. स्वातंत्र्यासाठी व्यापक, सर्वसमावेशक आणि शाश्वत चळवळ उभारण्यात या महिलांचे योगदान मोलाचे होते. स्वराज्यासाठीच्या चळवळीत जशा अहिंसक सत्याग्रहात हजारो स्त्रिया सामील झाल्या, तशा अनेक स्त्रिया सशस्त्र क्रांतिकारक बनल्या. भारतीय स्वातंत्र्य चळवळ ही ऐतिहासिक घटनांची मालिका होती, ज्याचा अंतिम उद्देश भारतातील ब्रिटिश राजवट संपवणे हा होता.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात स्त्रियांना सहभागी करुन गांधींनी स्त्रीयांना नागरीक म्हणून आपले कर्तव्ये पार पाडण्याची संधी दिली. बेगम साफिया अब्दुल वाजिद यांनी ‘भारत छोडो’ आंदोलनासाठी अलाहाबाद विद्यापीठातली आपली प्राध्यापकीची नोकरी सोडली, मादाम भिकाजी कामा यांनी देशाबाहेर भारताला स्वातंत्र्य मिळावे, या विचारांचा प्रसार केला. भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीचं सर्वांत मोठं आंदोलन म्हणून ‘चले जाव’ची नोंद होते. या आंदोलनात असंख्य भारतीयांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर अनेक सुधारणावादी चळवळी सुरु झाल्या. स्त्रियांच्या दर्जात सुधारणा घडविण्यासाठी अनेक समाजसुधारकांनी मोठे आणि महत्त्वपूर्ण योगदान दिले. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अनेकांचे बलिदान आहे. त्यात वेगवेगळया धर्माचे, समाजातील व्यक्तींचा सहभाग आहे. देशातल्या अनेक राज्यांतील नेत्यांच्या योगदानानं देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे. हे आपल्याला माहिती आहे. मात्र यासगळ्या लढ्यात महिलांच्या संघर्षाकडं फारसं लक्ष देण्यात आलं नाही. त्यांच्या योगदानाची म्हणावी अशी दखल घेण्यात आली नाही.
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महिलांचे योगदान महत्वाचे आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात त्याचा उल्लेखही आहे. त्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी आपलं जीवन समर्पित केलं आहे. मात्र आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नाही. त्यांचा संघर्ष आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. याचा विचार आपण करायला हवा. त्या महिला शूर आणि निडर होत्या. मात्र यासगळ्यात आपल्याला त्यांच्या त्या संघर्षाचा विसर पडला की काय असे वाटते, आपण त्यांच्या त्या योगदानाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं नाही. ज्या महिलांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं त्यांच्या योगदानाची नोंद आपण घ्यायला हवी. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ ही महिलांच्या योगदानाच्या उल्लेखाअभावी अपूर्ण आहे. असे आपल्याला वाटते. हे मानसीनं म्हटलं आहे. त्यामुळे यंदाच्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यानं आपण त्या महिला स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणींना उजाळा द्यायला हवा.
चले जाव आंदोलनाच्या नायिका म्हणून अरुणा असफ अलींकडे पाहिलं जातं. भूमीगत राहून स्वातंत्र्य चळवळीत काम करणाऱ्या अरुणाबाईंच्या क्रांतीच्या निर्धाराला स्वत: महात्मा गांधीही बदलू शकले नाहीत. मात्र, गांधींची भेट घेण्यासाठी अरुणाबाईंनी केलेलं अद्वितीय धाडस इतिहासात नोंदवलं गेलंय. अरुणाबाई विचारानं समाजवादी. चले जाव आंदोलनातील त्यांचे समाजवादी साथी एक एक करून गजाआड होत होते. त्यात जयप्रकाश नारायण यांना गुन्हा मान्य करण्यासाठी बर्फाच्या लादीवर झोपवल्याची बातमी फुटली. संपूर्ण देश हादरला. यावेळी अरुणाबाईंची तर सरकारला खाऊ की गिळू अशी अवस्था झाली होती. पायाला भिंगरी लावून अरुणाबाई तरुणांना चळवळीत आणण्यासाठी फिरत होत्या. हे सर्व भूमीगत कार्य असल्यानं त्यांची तब्येतही ढासळत जात होती. अरुणाबाईंच्या तब्येतीच काळजी वाटत असल्याचं म्हणत गांधीजींनी त्यांना भेटण्यास बोलावले. या भेटीची जबाबदारी ग. प्र. प्रधान यांच्यावर होती. पुण्याच्या पारसी सॅनिटोरियमच्या मागील बाजूस गांधीजींच्या निवासाची कुटी होती. सॅनिटोरियमचा भाग असल्यानं तिथं फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. याचाच फायदा घेत अरुणाबाई तिथं पोहोचल्या.
अरुणाबाई वेशांतर करून तिथं पोहोचल्या होत्या. पारशी महिलेचं वेशांतर अरुणाबाईंनी केलं होतं. गांधींना त्यांची ओळख पटावी म्हणून अरुणाबाईंनी गांधींना भेटल्यावर ‘कापडिया’ हा सांकेतिक शब्द उचारण्याचं ठरलं होतं. अरुणाबाईंना पाहताच गांधींनी त्यांना घातपाती चळवळ बंद करून पोलिसांच्या स्वाधीन होण्याची विनंती केली. मात्र, त्यावर अरुणाबाई म्हणाल्या, “मी तुमचा अत्यंत आदर करते. पण आपले विचार जुळणारे नाहीत. मी क्रांतीवादी आहे आणि क्रांतीवादी म्हणूनच काम करणार. आपल्याला शक्य असल्यास मला आशीर्वाद द्यावा.” आपले रस्ते वेगळे आहेत, हे सांगण्याचे धाडस अरुणाबाईंमध्ये होतं आणि गांधींनी भेटीसाठी बोलावलंय म्हटल्यावर जीवावर बेतणार असल्याचं कळूनही त्यांना भेटण्यासाठी जाण्याचं धाडसही त्यांच्यात होतं. अरुणा असफअली मात्र अखेरपर्यंत इंग्रजांच्या हातात सापडल्या नाहीत. त्यांना पकडून देणाऱ्यास पाच हजारांचं बक्षीस इंग्रजांनी जाहीर केलं होतं. युसुफ मेहरअलींनी अरुणाबाईंबद्दल म्हटलं होतं की, ‘झाशीच्या राणी लक्ष्मीबाईनंतर अरुणाताई याच स्वातंत्र्ययुद्धाच्या नायिका होत्या.’
- डॉ. सुनील दादा पाटील
कवितासागर फिचर्स, जयसिंगपूर जि.कोल्हापूर, मो.-9975873569
अज्ञानकाळात व्याज घेण्याची एक पद्धत अशी होती की शेतकरी पुढच्या वर्षी जे पीक घेईल त्यावर कर्जाची परतफेड करण्याचे आश्वासन देऊन सावकाराकडून कर्ज धेत होते. पण जेव्हा घेतलेले कर्ज फेडण्याइतके शेतीचे उत्पन्न निघाले नाही तर सावकार त्यांना पुढच्या वर्षीचे पीक येईपर्यंत कर्जफेडीची मुदत वाढवून द्यायचे. पण आधी जे ठरले होते त्यापेक्षा अधिक उत्पन्न त्यांना सावकारांना द्यावे लागे. एका वर्षासाठी जर त्यांनी १० माप अन्नधान्य किंवा इतर जे कोणते पीक असेल तेवढे द्यायचे ठरवले गेले होते तर मुदतवाढीमुळे त्यांना पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट माल द्यावा लागत होता. त्या वर्षीही शेतीउत्पन्न बरोबर आले नाही तर पुढच्या वर्षी त्याच्या दुप्पट म्हणजे दोन वर्षांत चार पटीने जास्त द्यावे लागत होते. जितके कर्ज घेतले गेले असेल त्याच्या कित्येक पटीने कर्जाची परतफेड करावी लागत होती. अल्लाहने पवित्र कुरआनद्वारे तंबी दिली की, “श्रद्धावंत लोकहो, दुप्पट-चौपट चक्रवाढ पद्धतीने व्याज खाऊ नका. अल्लाहचे भय बाळगा, तरच तुम्हाला यशप्राप्ती होईल.” (पवित्र कुरआन, ३:१३०)
या आयतीत हेही सांगितले गेले आहे की व्याज घेणाऱ्यावना नरकाची शिक्षा भोगावी लागणार आहे. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी व्याज घेणाऱ्यांना म्हटले होते की “मी पाहतो की रक्ताच्या एका नदीत एक माणूस पोहत आहे आणि दुसरा माणूस त्या नदीच्या काठावर हातात दगड घेऊन उभा आहे. रक्ताच्या नदीत पोहणारा माणूस जेव्हा थकून किनाऱ्यावर येण्याचा प्रयत्न करते तेव्हा काठावर उभा असलेला दुसरा माणूस आपल्या हातातील दगड पोहणाऱ्या माणसाच्या तोंडाचा नेम धरत त्याला मारतो. श्वास घेम्यासाठी त्याने तोंड उघडताच त्याच्या तोंडात दगड मारतो. पोहणारा तो दगड गिळून पुन्हा त्याच रक्तात गुरफटून जातो. रक्ताच्या नदीत पोहणारा हा माणूस व्याजाचा धंदा करतो हे अल्लाहचे दूत (फरिश्ते) जिब्रईल (अ.) यांनी म्हटले आहे.” (सहीह बुखारी)
लोक मेहनत-मजुरी करून आपल्या रक्त व घामाने जी कमाई करतात, व्याज खाणारा सहजतेने काही कष्ट सहन न करता त्याच्या कमाईवर कब्जा करतो. म्हणजे असा माणूस इतर माणसांच्या रक्तात पोहत असतो. जे इतरांच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होतात त्यांनाही प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सहाय्य करण्यास रोखले आहे. व्याज घेणारे, व्याज देणारे, व्याजाच्या व्यवहारावर साक्ष असणारे आणि व्याजावर आधारित देवाणघेवाण करण्यासाठी कागदपत्रे लिहिणारे या सर्वांचा धिःक्कार केला गेला आहे.
(सीरतुन्नबी – शिबली नोमानी, सुलैमान नदवी, खंड-६)
संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद
(९८) हा बदला आहे त्यांच्या या कृत्यांचा की त्यांनी आमच्या आयतींचा इन्कार केला आणि म्हटले, ‘‘आम्ही जेव्हा केवळ हाडे व माती बनून जाऊ तेव्हा नव्याने आम्हाला निर्माण करून उभे केले जाईल काय?’’
(९९) काय त्यांना हे उमगले नाही की ज्या अल्लाहने आकाशांना व जमिनीला निर्माण केले तो यांच्यासारख्यांना निर्माण करण्याचे सामर्थ्य अवश्य राखतो? त्याने (मृत्युपश्चात) यांच्या पुनरुत्थानाची एक वेळ निश्चित केली आहे जिचे येणे निश्चित आहे, पण अत्याचार्यांचा हट्ट आहे की ते त्याचा इन्कारच करतील.
(१००) हे पैगंबर (स.)! यांना सांगा, ‘‘जर एखादे वेळी माझ्या पालनकर्त्याच्या कृपेचे खजिने तुमच्या ताब्यात असते तर तुम्ही खर्च होण्याच्या भीतीने त्यांना जरूर रोखून ठेवले असते, खरोखरच मनुष्य मोठा संकुचित मनाचा आहे.३९
३९) मक्केचे अनेकेश्वरवादी ज्या मानसिक कारणांनी मुहम्मद (स.) यांच्या पैगंबरत्वाचा इन्कार करीत असत, यापैकी एक महत्त्वाचे कारण असे की तसे न केल्याने त्यांना पैगंबर (स.) यांचे श्रेष्ठत्व मान्य करावे लागत होते. परंतु आपल्या एखाद्या समकालीन अथवा समवर्गीयाचे श्रेष्ठत्व मान्य करण्यात माणूस मुश्किलीनेच तयार होत असतो. यासाठीच फरमाविले जात आहे की, कोणाचेही वास्तविक श्रेष्ठत्व मान्य करण्यात हृदये दु:खी व्हावीत या अवस्थेला ज्यांची कृपणता पोहचली आहे अशा लोकांना जर एखाद्या वेळी अल्लाहने आपल्या कृपेच्या खजिन्याच्या किल्ल्या सुपुर्द केल्या असत्या तर त्यांनी कुणाला फुटकी कवडीदेखील दिली नसती