Halloween Costume ideas 2015

मौलवी लियाकत अली खान (१८१७-१८९२)


शिपायांनी सुरू केलेल्या १८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात सर्व स्तरांतील लोकांनी भाग घेतला. काही विद्वानांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी होण्यासाठी त्यांच्या पेनाला निरोप दिला आणि तलवारी हाती घेतल्या. मौलवी लियाकत अली खान हे त्यापैकीच एक. लियाकत अली यांचा जन्म ५ ऑक्टोबर १८१७ रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यातील चायिल तालुक्यातील महागाव गावात एका विणकर कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव अमिनाबी आणि वडील सय्यद मेहर अली. लियाकत अली यांनी लहानपणापासूनच धार्मिक ज्ञान मिळवले आणि ब्रिटीशविरोधी वृत्ती विकसित केली. ते ब्रिटीश सैन्यात दाखल झाले आणि भारतीय सैनिकांच्या मनात ब्रिटीशविरोधी विचार रुजवू लागले. ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात आणून दिले आणि त्याला सैन्यातून हाकलून दिले.

मौलवी लियाकत अली यांनी एकीकडे लोकांना धार्मिक मार्गदर्शन करून आपल्या मूळ गावी महागाव येथून आपले कार्य पुन्हा सुरू केले आणि आपले कायदेशीर हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि दुसरीकडे स्थानिक राजवट पुन्हा स्थापित करण्यासाठी ब्रिटीशांविरुद्ध धार्मिक युद्ध पुकारण्याचे आवाहन केले. त्यांनी अलाहाबादमध्ये ब्रिटीशविरोधी गटांना एकत्र करण्यास सुरुवात केली.

लियाकत अली यांच्या प्रयत्नांच्या परिणामस्वरुप त्यांनी आपल्या सैन्यासह अलाहाबाद शहरात प्रवेश केला, ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य आणि अधिकाऱ्यांना हाकलून लावले आणि शहरावर ताबा मिळविला. मौलवी लियाकत अली यांनी स्वतःला दिल्लीचा सम्राट बहादूर शाह जफरचा प्रतिनिधी म्हणून घोषित केले आणि आपले मुख्यालय म्हणून कौसरबाग येथून शहराचा कारभार चालवला. त्यांनी ‘पयाम-ए-अमल’ हे गाणे लिहून ब्रिटिश राजवटीतील दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला आणि हिंदू-मुस्लिम-शीख ऐक्याचे आवाहन केले, तसेच देशवासीयांमध्ये आणि विशेषत: ब्रिटीश सैन्यातील भारतीय सैनिकांमध्ये देशभक्तीची प्रेरणा दिली. दुसरे स्वातंत्र्यसैनिक अझीमुल्ला खान संपादक असलेल्या ‘पयाम-ए-आझादी’ या उर्दू नियतकालिकात ते प्रकाशित झाले.

ईस्ट इंडिया कंपनीच्या जनरल नीलने आवश्यक सैन्य जमा केले आणि ११ जून १८५७ रोजी लियाकत अली यांच्या मुख्यालयावर हल्ला केला. मौलवींनी शेवटपर्यंत शौर्याने लढा दिला, परंतु प्रतिकूल परिस्थितीत १७ जून रोजी रणांगण सोडले. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शिरावर मोठे बक्षीस जाहीर केले. मौलवी लियाकत अली १४ वर्षे इंग्रजांच्या हाती आले नाहीत. नंतर एका देशद्रोहीकडून मिळालेल्या माहितीवरून त्यांना ब्रिटीश सैन्याने अटक केली.

त्यानंतर चालविण्यात आलेल्या खटल्यात त्यांनी स्पष्टपणे घोषित केले की त्यांनी केवळ आपल्या मातृभूमीला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी शस्त्रे उचलली होती. खटल्यानंतर मौलवी लियाकत अली खान यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यांना अंदमानला लहविण्यात करण्यात आले, जिथे त्यांनी १७ मे १८९२ रोजी अखेरचा श्वास घेतला.


लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget