Halloween Costume ideas 2015

जकात, सदक-ए-फित्र आणि उश्र


पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ''निश्चितच अल्लाहने लोकांवर 'सदका' (दानधर्म) अनिवार्य केला आहे, जो त्यांच्यापैकी श्रीमंत लोकांकडून घेतला जाईल आणि त्यांच्यापैकी गरजवंतांमध्ये परतविला जाईल.'' (हदीस : मुत्तफ़क़ अलैहि)

स्पष्टीकरण : 'सदका' हा शब्द 'जकात' (ऐपतीप्रमाणे अनिवार्य दान) साठीही वापरला जातो, जी देणे आवश्यक आहे आणि येथे हाच अर्थबोध होतो. एखाद्या मनुष्याने स्वखुशीने अल्लाहच्या मार्गात खर्च केलेल्या संपत्तीवरदेखील जारी होत असतो. या हदीसमधील 'तुरद्दु' (परतविला जाईल) या शब्दाने स्पष्ट होते की श्रीमंतांकडून वसूल करण्यात आलेली 'जकात'वर खरे तर समाजातील गरीब आणि गरजवंतांचा अधिकार आहे, तो त्यांना मिळवून दिला जाईल.

माननीय जाबिर (रजि.) यांच्या कथनानुसार, मुआज बिन जबल (रजि.) पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याबरोबर ('मस्जिद-ए-नबवी'मध्ये 'नफ्ल' (ऐच्छिक) नमाज अदा करीत आणि मग आपल्या समुदायाची इमामत करीत असत. त्यांनी एके रात्री इशाची नमाज पैगंबर मुहम्मद (स.) यांच्यासह अदा केली आणि मग आपल्या समुदायाची इमामत केली आणि 'सूरह बकरा'चे पठण सुरू केले तेव्हा एका मनुष्याने नमाज समाप्त केली आणि वेगळी आपली नमाज अदा करून घरी गेला. दुसऱ्या नमाजींनी (नमाज अदा केल्यानंतर) त्याला म्हटले, ''तू विद्रोहाचे काम केले.'' तो म्हणाला, ''नाही. मी धर्मद्रोहाचे काम केलेले नाही. अल्लाहची शपथ! मी पैगंबरांकडे जाईन.'' मग तो पैगंबरांकडे येऊन म्हणाला, ''हे पैगंबर! आम्ही उंटांद्वारे शेताला पाणी देण्याचे काम करतो (मजुरीवर लोकांच्या बागा आणि शेतीच्या सिंचनाचे काम करतो). दिवसभर आमच्या कामात व्यस्त असतो आणि मुआज यांची स्थिती अशी आहे की इशाची नमाज पैगंबरांसमवेत अदा करून गेले आणि सूरह बकराचे पठण सुरू केले (आम्ही दिवसभर कंटाळलेलो असल्याकारणाने इतका वेळ कसे उभे राहू शकतो)?'' हे सर्व पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ऐकल्यानंतर मुआजकडे वळले आणि म्हणाले, ''हे मुआज! तुम्ही लोकांमध्ये भांडणे लावू इच्छिता काय? 'वश्शमसि व जुहाहा'चे पठण करा, 'वल्ललि इज़ा यग़शा'चे पठण करा, 'सब्बिहिस्मा रब्बिकल अअला'चे पठण करा.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) इशाची नमाज एकतृतियांश रात्र उलटल्यानंतर अदा करीत असत. माननीय मुआज (रजि.) पैगंबरांबरोबर 'नफ्ल'च्या संकल्पासह सहभागी होत असत, मग पोहोचण्यात काही वेळ निघून जात असे, मग 'सूरह बकरा'सारखे सूरहचे पठण करीत, त्यासाठी बराच वेळ व्यतीत होत असे आणि तिकडे परिस्थिती अशी होती की लोक दिवसभर शेतात आणि बागांमध्ये काम करून थकून जात होते. अशा स्थितीत आणि अशा लोकांदरम्यान दीर्घ नमाज अदा करण्याचा परिणाम असा होऊ शकतो की लोक (नमाज अदा न करताच) निघून जातील. याबाबत पैगंबरांनी माननीय मुआज (रजि.) यांना सतर्क केले. अल्लाह माननीय मुआज (रजि.) यांच्याशी राजी होवो, कारण त्यांच्या वर्तनामुळे लोकसमुदायाच्या इमामांना किती मोठ्या उपदेशाचा लाभ झाला.


संकलन - सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget