Halloween Costume ideas 2015

श्रीमंत आणि शक्तिशाली विरुद्ध गरीब आणि वंचित


गुन्हेगारी आणि गरिबीचे एकमेकांशी घट्ट नाते असते. लोकांना गुन्हेगार बनवायचे असेल तर त्यांना गरीब ठेवावे. जर लोकांना गरीब ठेवायचे असेल तर त्यांना गुन्हेगारीत गुंतवून ठेवावे. अशा प्रकारची रणनीती सत्ताधारी आणि संपन्न समाजाची असते. जगात कोणतेही सरकार असो, कोणत्याही देशात असो गरीब आणि श्रीमंतवर्ग नक्कीच असतात. जर प्रगत देशांनी ठरवलं तर त्यांना उपलब्ध सोयीसुविधा आणि आर्थिक धोरणानुसार आपल्या देशात कुणाला अति गरीब आणि अतिश्रीमंत ठेवायचेच नाही तर ही राष्ट्रे तसे सहजासहजी करू शकतात. पण त्यांच्या विचारधारेने हे ठरविलेले असते की समाजात सर्व नागरिकांना एकसारख्या सोयी, संपत्तीतून वाटा मिळू नये. एका वर्गाला श्रीमंत आणि एकाला गरीब ठेवायचे आहे हे त्यांच्या विचारधारेतच समाविष्ट आहे. म्हणून आपण जगात सर्वत्र गरीब आणि श्रीमंत असे दोन वर्ग पाहत आहोत. पुढे जाऊन गरीबच अति गरीब, नंतर दारिद्र्यरेषेखालील आणि नंतर उपाशी अशा विविध श्रेणींत या गोरगरीब जनतेला विभागून टाकले जाते. गरीब म्हणजे एवढेच नाही की त्यांना पोट भरण्याच्या, जगण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. गरीबीचा पहिला परिणा असतो की त्यांची सामाजिक क्षमता शून्य होऊन जाते इतकी की त्यांना समाजाचे अंग समजणे सुद्धा लोकांना आवडत नाही. सामाजिक स्थान नसले की नैतिक स्थान कुठले? जगण्याच्या जीवनमूल्यांशी यांचा काय संबंध? आणि याचा शेवट थेट त्यांना मानवजातीचा दर्जाच दिला जात नाही. आपल्या देशात आहेत असे वर्ग ज्यांना माणुसकी नाकारली गेली आहे. भले संविधानाने त्यांना माणूस म्हटले असले तरी इतर लोक त्यांना तो दर्जा बहाल करण्यास तयार नाहीत. जगाने इतकी प्रचंड प्रगती केलेली असताना सुद्धा अशा लोकांनी संपत्ती व संपन्नतेतून कसलाही वाटा मिळवता कामा नये याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. त्यांना गुलामीच्या उंबरठ्यावर ठेवण्यात यावे यासाठी बऱ्याच राजकीय व शासकीय युक्त्या आखल्य जातात, पण ह्याचा तपशील या जगी देता येणार नाही, कारण तो खूप विस्तृत विषय आहे.

आपण पाहत आहोत की कोट्यवधी नागरिकांच्या आपल्या देशात रोज कुठे ना कुठे माणसांच्या भावना दुखवणाऱ्या घटना घडत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात हत्येच्या घटना, दुसऱ्या क्रमांकावर आत्महत्येच्या घटना आहेत. हत्या आणि आत्महत्या मागची मानसिकता वेगळी नाही. ती एकाच माणसाला जेव्हा असे वाटते की त्याला होत असलेल्या यातना, त्याला हर प्रकारे वंचित ठेवणे, दैनंदिन गरजा पुऱ्या करणेसुद्धा जड जाते. अशा अवस्थेत तो नैराश्येच्या आहारी जातो. तो ठरवतो की माझ्या या अवस्थेला जो कुणी कारणीभूत असेल मी त्याला मारून टाकीन. काही लोक कोणते न् कोणते निमित्त करून दुसऱ्याची हत्या करुन टाकतात. पण काही असेही माणसे असतात ज्यांना इतरांना जिवे मारण्याचे साहस होत नाही, तेव्हा ते स्वतःच्याच जीवाची हत्या करतात. आपल्या देशात १०,००० माणसांकडे देशातल्या ३० कोटी नागरिकांकडे असलेली साधने आणि तितकी संपत्ती आहे. मग अशा देशात जिवावर उठणारे किती असतील! एका मुखबधीर मुलाला दगडाने ठेचून मारण्याची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे. त्या मुखबधीर मुलाचा दोष कोणता, का त्याला मारले? याचे उत्तर एकच की ज्याने कुणी त्याला मारले असेल त्याने आपला राग व्यक्त केला पण त्याची वेदना समजणारा कोण आहे? त्याला स्वतःलाच प्रेमभावना माहीत नाहीत, कारण त्याच्या सामाजिक माणुसकीला अस्तित्वच नाही.

आज उच्च शिक्षणाची जिकडेतिकडे चर्चा आहे. गरीब-श्रीमंत कोणीही असो, सगळ्यांना उच्च शिक्षण- त्यातल्या त्यात डॉक्टर व्हायचे आहे. एका आईने आपल्या मुलीसह आत्महत्या केली. कारण त्या मुलीला सीबीएसई शाळेत प्रवेश घ्यायचा होता, पण तिच्याकडे पैसे नव्हते. म्हणून आईलेक दोघांनी आपला जीव दिला. पण त्यांच्या आत्महत्येमुळे या देशाच्या सत्ता-संपत्ती-संपन्नवर्गाला त्यांच्या संवेदना समजणार आहेत? भारतात दरवर्षी कोट्यवधी मुलेमुली स्पर्धात्मक परीक्षा देतात जेणेकरून त्यांना नोकरी मिळावी. उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा, डॉक्टर, अभियंता होता यावे, पण दर वर्षी या परीक्षांचे पेपर फुटतात, परीक्षा रद्द होतात आणि वर्षानुवर्षे परिश्रम घेतल्यानंतर जे स्वप्न साकार करायचे होते ते भंग होते. या पेपरफुटीमागे कोणत्या शक्ती? त्याच शक्ती ज्यांचा परिचय सुरुवातीला दिलेला आहे, त्यांना नको आहे. या इतर जातींना उच्चपदावर बसवायचे म्हणून ते पेपर फोडतात. ४० लाखांस विकत घेणारे गर्भश्रीमंत आहेत, ते विकत घेऊन ज्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम केले होते त्यांना वंचित ठेवतात. NEET चे पेपर फुटले, यात ज्यांची नावे सुरुवातीला बाहेर आली, ते भट, परशुराम राय, पुरुषोत्तम शर्मा आणि इत्यादी, त्यांचे काय झाले माहीत नाही. हेच लोक त्या मानसिकतेचे सूत्रधार आहेत ज्याची चर्चा केली आहे. हेच माफिया गरीब आणि श्रीमंतांचे वर्गीकरण करणारे. हेच लोक श्रीमंत आणि शक्तिशाली विरुद्ध गरीब आणि वंचित.

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक

मो.: 9820121207

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget