Halloween Costume ideas 2015

न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी


(१८४४-१९०६)

न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांचा जन्म ८ ऑक्टोबर १८४४ रोजी कांबे, महाराष्ट्र येथे झाला. ते अशा कुटुंबातील होते ज्यांच्या तीन पिढ्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्यांचे वडील तय्यब अली आणि आई अमिना तय्यबजी. 

देशांतर्गत आणि परदेशात व्यापाराचे स्वतःचे साम्राज्य निर्माण करणाऱ्या तय्यब अली यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शिक्षण दिले. बदरुद्दीन लहान वयात उर्दू, फारसी, अरबी, गुजराती, मराठी आणि थोडे इंग्रजी शिकले. १८६५ मध्ये त्यांनी मोती बेगम यांच्याशी विवाह केला. तय्यबजी बार-एट-लॉ शिकण्यासाठी लंडनला गेले. ते भारतात परतले आणि बॉम्बेमध्ये कायदेशीर प्रॅक्टिस सुरू केली आणि बॉम्बेमधील त्या काळातील उच्च पगाराच्या बॅरिस्टरपैकी एक बनले. त्यांचे मित्र फिरोजशाह मेहता आणि काशिनाथ तेलंग यांच्यासोबत त्यांनी १८७१ मध्ये लोककल्याणासाठी आंदोलन सुरू केले. हे तीन मित्र ‘थ्री स्टार’ या नावाने प्रसिद्ध होते. १८७३ मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक झाले आणि नंतर मुंबई विधान परिषदेचे सदस्य झाले. इंग्रजांच्या भेदभावपूर्ण धोरणांना त्यांनी विरोध केला. 

डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संस्थापक सदस्यांपैकी एक म्हणून त्यांनी स्वतःला भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांच्या धोरणात्मक निर्णयामध्ये त्यांचा प्रभाव होता. त्यांनी सर सय्यद अहमद खान, सय्यद अमीर अली आणि नवाब अब्दुल लतीफ यांच्या युक्तिवादांचे खंडन केले, ज्यांनी मुस्लिमांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसपासून दूर करण्याचा प्रयत्न केला होता. 

१८८७ मध्ये मद्रास येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी यांनी भूषवले होते. १८९५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होईपर्यंत त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला बळकट करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले. 

त्यांनी मुस्लिमांच्या विकासासाठी सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक सुधारणांची मागणी केली. मुलींच्या विकासासाठीच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाच्या विकासासाठी आधुनिक शिक्षण आवश्यक आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता. त्यामुळे त्यांनी अनेक सामाजिक सेवा आणि शैक्षणिक संस्था स्थापन केल्या. ते १९०२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश झाले, नंतर १९०६ मध्ये सक्रीय मुख्य न्यायाधीश झाले. 

न्यायशास्त्रज्ञ आणि राष्ट्रवादी म्हणून देशाची सेवा करणारे ते पहिले भारतीय होते. न्यायमूर्ती बदरुद्दीन तय्यबजी, ज्यांना ‘प्रथम भारतीय, नंतर मुस्लिम आणि शेवटी एक सर्वसामान्य मानव’ म्हणून वागणूक दिली गेली. त्यांचे १९ ऑगस्ट १९०६ रोजी इंग्लंडमध्ये निधन झाले.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget