Halloween Costume ideas 2015

माहे रमजान सबसे महान!

सुमारे शंभर वर्षांपूर्वी येऊन गेलेल्या प्लेगची माहिती बालपणी ऐकताना भीती वाटत असे. कोरोना प्रत्यक्ष अनुभवताना जीवनच भेसूर होऊन बसले आहे. एका बाजूने जीवित हानी तर दुसऱ्या बाजुने वित्तहानी अशा दुहेरी संकटात सकल जग सापडले आहे. कोरोना विषाणू आहे असे मानले जात आहे. मात्र याची उत्पत्ती व त्यावरील उपाय काय याचा अद्याप तपास लागलेला नाही. अशातच तो स्थलपरत्वे कमी-अधिक होत आहे. तर काही ठिकाणी तो संपला असल्याचीही बातमी कानी पडत आहे. त्यातच हा लोक मानवनिर्मित की दैवी अशी चर्चाही ठिकठिकाणी होत आहे. अशा स्थितीत तो मानवनिर्मित नाही असे अनुमान उचित वाटते. कारण यावर अद्याप औषधच नाही.
उगवतो तो मावळण्यासाठी. तसेच येतो तो जाण्यासाठी या नियमास अनुसरून कोरोना केव्हा तरी जाणार तर आहेच. कारण तो आलेला आहे. मात्र त्याने आर्थिक संकट निर्माण केले आहे ते आम्हालाच घालवून लावावे लागणार आहे. हे संकट महाकाय असून ते महाकाळ टिकणारेही आहे. कोरोनाने कित्येक कुटुंबे बळी घेतली. अशातच अशा कुटुंबांतील निराधार, अनाथ, विधवा स्त्रिया, निराश्रित अशा सर्वांप्रती प्रत्येकाच्या मनी सहानुभूती आहेच. मात्र प्रत्येक जण या आर्थिक संकटाने चिंतातूर होऊन बसला आहे.
तूर्तास आपल्या शासनाने लोकांचे जीव कसे वाचतील इकडे लक्ष वेंâद्रित केले आहे आणि ते योग्यच आहे. याकरिता पुढील मार्गदर्शन केले आहे-
१) स्वच्छता राखा, २) शिस्त पाळा (नियम पाळा), ३) संयम राखा आणि ४) सहकार्य करा.
शासनाच्या या मार्गदर्शनाचा विचार करू लागलो तेव्हा यात काही अवघड आहे असे वाटले नाही. कारण या मार्गदर्शनाची महती इस्लामने १४५० वर्षांपूर्वीच जगाला विहीत केली आहे, ती अशी-

स्वच्छता
पाच वेळच्या नमाजच्या वेळी करावी लागणारी वुजू. लघुशंकेनंतर केला जाणारा पाण्याचा वापर तसेच लघुशंका बसून करण्याचे मार्गदर्शन जेणेकरून त्याचा एक थेंबही शरीरावर राहू नये वा कपड्यांवर पडू नये.

शिस्तपालन (नियमांचे पालन)
रोजाची सहरी आणि इफ्तारी या दोहोंची वेळ सूर्यास्तानुसार निश्चित ठरलेली असते. यात फरक केल्यास रोजा अपूर्ण किंवा निरर्थक ठरतो. तसेच सामूहिक नमाज इमामच्या सूचनांनुसार अदा न केल्यास ती अपूर्ण किंवा निरर्थक ठरते. यातून नियम पाळण्याचे मार्गदर्शन आहे.

संयम
रमजान मास उन्हाळ्यात आल्यास रोजे १६/१६ तासांचे किंवा स्थलपरत्वे अधिक तासांचे असतात. अशा वेळी भूक-तहान सहन करावी लागते आणि ती सहन करण्याकरिता मनावर ताबा केवळ संयमानेच मिळवता येतो. अशा तNहेने संकटसमयी संयम पाळता यावा म्हणून हे एक प्रकारचे प्रशिक्षण होय. हजयात्रेच्या वेळीदेखील आपल्या आप्तेष्टांपासून दूर राहण्यासाठी अशाच संयमाची गरज असते.

सहकार्य
जकात आणि सदका याद्वारे सहकार्याचे मार्गदर्शन आहे. शिवाय या दोहोंद्वारे आर्थिक नियोजनाचेही मार्गदर्शन केलेले आहे.
कोरोना जाईल, त्यानंतर मात्र यक्षप्रश्न उभा ठाकलेला असेल तो आर्थिक संकटाचा. अशा वेळी शिस्तपालन, संयम आणि सहकार्य याबाबींची नितांत गरज असेल. शिवाय स्वीकारलेला पाश्चिमात्य अमर्याद आणि बेलगाम भौतिकवाद, चंगळवाद यास तत्वर कायमस्वरूपी घालवून लावणेही खरे तर काळाची गरज आहे.याचे एखादे उदाहरण विचारात घ्यायचे म्हटले तर लग्नकार्यातील पत्रिका. लग्नाच्या या आमंत्रणपत्रिकेसाठी शेकडो रुपये खर्च केले जातात. भरीला अहमत असतोच.
कुरआनने अनाठायी व अनावश्यक खर्चास मनाई तर केलीच आहे, शिवाय अहमला इस्लाममध्ये कोठे स्थानच दिलेले नाही. कारण अहम आणि सैतान एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे मानवास सजदा करण्याच्या अल्लाहच्या आदेशासमयी दिसून आले आहे.
या महाकाय आणि महाकाळ टिकणाNया आर्थिक संकटास सामोरे जायचे असेल तर अनावश्यक खर्च टाळण्याबरोबरच निकडीच्या गरजांवर खर्च होईल हे कटाक्षाने पाहणे उपयुक्त ठरेल. तसेच काही वर्षांपूर्वी अन्नधान्याच्या दुष्काळाला सामोरे जाता यावे म्हणून शासनाकडून आलेच तर देशाचा विचार करून शासनास सहकार्य करणे मोलाचे ठरेल तेव्हाच हळूहळू का होईना या आर्थिक संकटातून पार पडणे शक्य होईल. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर आहेच. तसेच पवित्र रमजानमध्ये प्राप्त असलेल्या शबे कद्रची सुवर्णसंधी साधून अल्लाहकडे या महामारीव आर्थिक संकटातून लवकरात लवकर मुक्त करण्यासाठी दुआ करणे उपयुक्त ठरेल.
कोरोना व त्याने उभे केलेले आर्थिक संकट या दोहोंच्या कात्रीत सापडले असताना रमजान मासाचे आगमन नेहमीप्रमाणे आनंदाबरोबरच दिसाला देणारेही आहे. कारण रमजानने जगाला जे दिले आहे ते अनमोल आणि अतुलनीय आहे.
सर्वश्रुत पवित्र महिन्याभराचे रोजे दिले. याच महिन्याभराच्या रोजांमुळे आरोग्य लाभते, भूक-तहान सहन करण्यासाठी आवश्यक असलेला संयम लाभतो. हाच संयम कोणत्याही संकटसमयी उपयुक्त ठरतो. रोजाद्वारे इतरांच्या उपाशी असण्याच्या स्थितीची जाणीव होऊन मदत, सहकार्य अशा मानवतावादी भावनांना उत्तेजन मिळते. इतरांची गरिबी दूर करण्यासाठी स्वत:चे आर्थिक नियोजन याच पवित्र महिन्यातील जकात व सदका यांची मदत होत असते. रोजासाठी सहरी व इफ्तारीद्वारे जे आदानप्रदान होत असते त्याद्वारे प्रेम व बंधुभाववाढीस मदत होते. अल्लाहला प्रिय असलेले चारित्र रोजाद्वारे प्राप्त होत असते ते त्यातील तकवामुळे. (तकवा म्हणजे अल्लाह सर्वश्रेष्ठ आहे आणि हजरत मुहम्मद (स.) हे त्याचे पैगंबर व रसूल आहेत. हे ईमान आणि त्याचबरोबर सकल सृष्टीचा निर्माता, पालक व चालक, नियंता अल्लाहच. तो सृष्टीतील प्रत्येक घडामोड घडवीत असतो. प्रत्येक घडामोडीची त्याला माहिती असते आणि त्यानुसार त्याचा निवाडा अंतिम निवाड्याच्या दिवशी असेल. थोडक्यात त्याच्याप्रती प्रेम व भय हाच तकवा होय.)
रमजानने कुरआन हा अल्लाहचा अंतिम धर्मग्रंथ दिला ज्याने वर उल्लेखित मौल्यवान मार्गदर्शन केले. अल्लाहबाबतच्या ज्या अयोग्य कल्पना प्रचलित होत्या त्या दूर करून त्याचे वास्तव रूप सूरह इख्लासमध्ये तर आपल्याला सन्मार्ग  मिळावा म्हणून सूरह फातिहाद्वारे दुआ मिळाली. हे सर्व कुरआनमुळेच, ज्याचे अवतरण पवित्र रमजानमध्ये झाले. कुरआन प्रस्तुत होण्यास सुरूवात झाली रमजानमध्येच. अशी सुरूवात करणारे मुहम्मद बनि अब्दुल्ला अर्थात हजरत मुहम्मद (स.) पैगंबर दिले ते रमजानने. त्यांची गणना पहिल्या १०० महान व्यक्तींमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे हे विशेष!
इस्लामी वर्षातील सर्वोत्तम रात्र बहाल करणारा रमजान आणि लोकांनी ज्या प्रेमानने या रमजान मासाचे स्वागत केले, संयमी रोजे ठेवले त्याचा आनंदही ईदे रमजान.
अशा या महान रमजानप्रती-
‘‘सबसे अच्छा मेहमान हमारा तू ऐ माहे रमजान
तूने दिया हमें कुरआन, बनाया जिसने हमें इन्सान
कितने व वैâसे अदा, हम करे तेरे अहसान,
हो सभीं को तू मुबारक, यही एक अरमान।’’

-बशीर अमीन मोडक, रत्नागिरी, मो.: ९९३०९८६९६४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget