Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(७५) इब्राहीम (अ.) ला आम्ही अशाप्रकारे पृथ्वी व आकाशांचे व्यवस्थापन दाखवीत होतो५१ आणि याकरिता की तो विश्वास राखणाऱ्यांपैकी व्हावा.५२
(७६) म्हणून जेव्हा रात्र त्याच्यावर पसरली तेव्हा त्याने एक नक्षत्र पाहिले, म्हणाला, ‘‘हा माझा पालनकर्ता आहे परंतु जेव्हा ते मावळला तेव्हा म्हणाला, अस्त पावणाऱ्यांवर तर मी   आकर्षित होत नाही.
(७७) मग जेव्हा चकाकणारा चंद्र पाहिला तेव्हा म्हणाला, हा माझा पालनकर्ता आहे. मग जेव्हा तोदेखील अस्त पावला तर म्हणाला, जर माझ्या पालनकर्त्याने माझे मार्गदर्शन केले नसते  तर मीसुद्धा मार्गभ्रष्ट लोकांत सामील झालो असतो.
(७८) मग जेव्हा सूर्याला दैदीप्यमान पाहिले तर म्हणाला, हा आहे माझा पालनकर्ता, हा सर्वात मोठा आहे....


५१) म्हणजे ज्याप्रमाणे तुमच्यासमोर विशाल विश्वाची व्यवस्था कार्यरत आहे आणि या अल्लाहच्या निशाण्या तुम्हासमोर ठेवल्या जात आहेत. त्याचप्रमाणे इब्राहीम (अ.)  यांच्यासमोरदेखील या विशाल निशाण्या आणि विशाल विश्वव्यवस्थापन होते. परंतु तुम्ही लोक त्यांना पाहूनसुद्धा आंधळयासारखे काहीच पहात नाही. इब्राहीम (अ.) यांनी या निशाण्या  डोळे उघडून पाहिल्या होत्या. याच निशाण्यांद्वारा ते वास्तविक सत्यापर्यंत पोहचले होते.
५२) हे ठिकाण आणि कुरआनच्या त्या दुसऱ्या ठिकानांना जेथे आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्याशी त्यांच्या समाजाचा विवाद झाला होता, चांगल्या प्रकारे समजण्यासाठी आवश्यक  आहे की आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या समाज व राष्ट्राच्या तत्कालीन धार्मिक व सांस्कृतिक परिस्थितीवर नजर टाकली जावी. आजच्या शोधकार्यानुसार पैगंबर इब्राहीमच्या  जन्मठिकाणाचे ते शहर शोधले गेले आणि त्या काळातील लोकांच्या समाजजीवनाविषयी सुद्धा माहिती उपलब्ध झाली आहे. सर लिओनार्ड वूली (Sir Leonard Woolley) यांनी आपले  पुस्तक 'Abraham', London - १९३५ मध्ये त्यांच्या शोधकार्याच्या परिणामांचा उल्लेख केला आहे. त्यानुसार माहीत होते की २१०० इ. स. पूर्वचा काळ म्हणजे शोधकर्ता (इतिहासकार)  नुसार इब्राहीम (अ.) यांचा काळ मानला जातो. त्या राज्याची राजधानी `उर' ची लोकसंख्या अडीच लाखांपर्यंत होती. असंभव नाही की पाच लाखसुद्धा असावी. `उर' शहर मोठे औद्योगिक  आणि व्यापारिक केंद्र होते. तेथील लोकांचा दृष्टिकोन पूर्णत: भौतिकवादी होता. धन कमविणे आणि अधिकाधिक सुखसामग्री गोळा करणे हाच त्यांच्या जीवनाचा सर्वश्रेष्ठ उद्देश होता.  व्याजबट्याचा धंदा सर्रास होता, लोकात तीन वर्ग पडले होते. प्रथम वर्ग अमिलु नावाचा होता. त्यास विशेष अधिकार प्राप्त् होते. यांचे फौजदारी आणि दिवाणी अधिकार इतरांपेक्षा वेगळे  होते. तसेच यांच्या जीव आणि वित्ताची किंमत इतरांपेक्षा अधिक होती.
अशा या `उर' शहरात आणि समाजात आदरणीय पैगंबर इब्राहीम (अ.) यांचा जन्म झाला होता. यांच्याविषयी आणि यांच्या कुटुंबाविषयी `तलमुद' ग्रंथात माहिती सापडते. त्यानुसार  माहीत होते की ते अमिलु समाजातील होता आणि त्यांचे वडील राज्याच्या उच्च् पदावर होते (पाहा अध्याय २, टीप २९०) `उर' च्या शिलालेखात जवळ जवळ पाच हजार देवतांची नावे   सापडतात. देशाच्या वेगवेगळया गावासाठी निरनिराळे देव होते. प्रत्येक गावाचा एक विशिष्ट रक्षक ईश्वर (ग्रामदैवत) असे. त्याला `रब्बुल बलद,' `महादेव' व `रईसुल आलिया' म्हटले  जात असे आणि या ग्रामदेवतेचा आदर इतर देवदेवतांपेक्षा जास्त होत असे. `उर' शहराचा `रब्बुल बलद' (महादेव) `नन्नार' (चंद्रदेव) होता. दुसऱ्या एका मोठ्या शहराचा (लरसा)  ग्रामदैवत `शमाश' (सूर्यदेव) होता.
या मोठ्या ईश्वरांच्या हाताखाली अनेक लहान सहान ईश्वर होते. या लहान सहान देवांची निवड आकाशातील ग्रहताऱ्यांपैकी जास्त व थोडेफार जमिनीवर निवडले गेले होते. `नन्नार' ची  मूर्ती उंच पर्वतावर एका भव्य मंदिरात होती. त्याच्याच जवळ `नन्नार'च्या पत्नीची मूर्ती शानदार मंदिरात होती. नन्नारच्या मंदिराची शान एखाद्या शाही महलासारखी होती. त्याच्या  शयनकक्षात प्रत्येक रात्री एक पुजारन त्याची पत्नी म्हणून जात असे. त्या मंदिरात अनेक स्त्रिया त्या देवाला वाहिलेल्या (देवदासी) होत्या. त्या सर्व स्त्रियांची परिस्थिती `धार्मिक वेश्या'  (Religious Prostitutes) सारखी होती. नन्नार फक्त देवच नव्हता तर देशाचा सर्वात मोठा जमीनदार, सर्वात मोठा व्यापारी व उद्योजक तसेच देशाचा सर्वात मोठा राजकीय  शासक होता. अनेक शेती, बागा, इमारती मंदिराला इनामी दिलेल्या होत्या. देशाचे सर्वात मोठे न्यायालय मंदिरातच होते. पुजारी लोक त्या न्यायालयाचे न्यायाधिश होते आणि त्यांचे  निर्णय देवाचे निर्णय समजले जात. असली बादशाह `नन्नार' होता आणि देशाचा शासक त्याच्यामार्फत राज्य करीत असे. म्हणून बादशाह स्वत: उपास्य गणला जाई आणि  ईश्वराप्रमाणे त्या बादशाहाची उपासना केली जात असे. अशाप्रकारे `उर' चा राजकीय परिवार पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या काळात शासक होता. त्या शहराच्या संस्थापकाचे नाव  `उरनमुव्व' होते. याचमुळे या शासक परिवाराचे नाव `नमुव्व' होते. नंतर अरबी बोली भाषेत `नमरुद' झाले. पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या हिजरतनंतर या परिवारावर आणि समाजावर  प्रकोप कोसळू लागला. या विनाशामुळे `नन्नार' विषयी `उर' शहरातील लोकांची श्रद्धा डळमळीत झाली, कारण त्यांच्या ग्रामदेवतेने त्यांचे रक्षण केले नाही. हे आधुनिक शोधकार्याचे परिणाम सत्य असेल तर यावरून हे स्पष्ट होते की पैगंबर इब्राहीम (अ.) यांच्या राष्ट्रात अनेकेश्वरत्व फक्त धार्मिक व आध्यात्मिक स्वरुपाचाच नव्हता तर या राष्ट्राची आर्थिक,  सांस्कृतिक, राजनैतिक आणि सामाजिक जीवनाचीव्यवस्था याच धारणेवर आधारित होती. याविरुद्ध पैगंबर इब्राहीम (अ.) एकेश्वरत्वाचा संदेश घेऊन उठले तेव्हा त्या आवाहनाचा  परिणाम फक्त मूर्तीपूजेपर्यंतच सीमित नव्हता तर त्या काळाचे संपूर्ण समाजजीवन व राष्ट्रजीवन प्रभावित झाले होते.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget