शाळांच्या फी वाढीबद्दल सरकारचा महत्त्वाचा निर्णय
मुंबई
येत्या ३ तारखेला देशव्यापी लॉक डाऊन संपणार आहे. पुढे गोष्टी कशा प्रकारे आकार घेणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह आहे. अशात येत्या काळात भारतात मोठी आर्थिक मंदी देखील येणार असल्याचं बोललं जातंय. या पार्श्वभूमीवर महिन्याचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे पगारात होणारी कपात किंवा कोरोनामुळे गमवावी लागलेली नोकरी. अशातच नवीन शैक्षणिक वर्ष देखील सुरु होत असल्याने पालकांच्या मनात दरवर्षी वाढणारी फी कशी भरायची अशी चिंता होती. यावर शिक्षण विभागामार्फत मोठा निर्णय घेतला गेलाय.
कोरोनाच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर दरवर्षी वाढणाऱ्या फी वाढीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. यंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री आणि अधिकारी यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मिटिंग पार पडली. या बैठकीत सर्व पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला गेलाय. याबाबतच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतच्या सूचना सर्व शाळांना देखील दिल्या आहेत.
दरवर्षी शाळेच्या 'फी'मध्ये वाढ होत असते. अशात यंदा कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशात फीवाढीची चिंता पालकांमध्ये होती. याच पार्श्वभूवर महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वाचं निर्णय घेण्यात आलाय.
कोरोनाच्या संवेदनशील पार्श्वभूमीवर दरवर्षी वाढणाऱ्या फी वाढीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतलाय. यंदा राज्यातील कोणत्याच शाळेमध्ये फी वाढ होणार नाहीये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री आणि अधिकारी यांची आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मिटिंग पार पडली. या बैठकीत सर्व पालकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला गेलाय. याबाबतच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतच्या सूचना सर्व शाळांना देखील दिल्या आहेत.
दरवर्षी शाळेच्या 'फी'मध्ये वाढ होत असते. अशात यंदा कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशात फीवाढीची चिंता पालकांमध्ये होती. याच पार्श्वभूवर महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वाचं निर्णय घेण्यात आलाय.
Post a Comment