Halloween Costume ideas 2015

धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज – प्रा. सलीम इंजिनीयर


 - नजराना दरवेश, गोवा

जमाअत-ए-इस्लामी हिंद, गोवा यांनी देशात वाढत्या धार्मिक तणावांसदर्भात नुकतीच एक पत्रकार परिषद घेतली. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष प्रा. मुहम्मद सलीम इंजिनियर आणि जमाअत-ए-इस्लामी हिंद गोवा चे अध्यक्ष आसिफ हुसेन ह्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले.

प्रा. सलीम इंजिनीयर आपल्या भाषणात म्हणाले की भारत आपल्या सांस्कृतिक विविधतेसाठी प्रसिद्ध आहे. जेथे विविध धर्माचे लोक भिन्न आचार आणि विचार पद्धतीसह एकत्र राहतात. विविध श्रद्धा आणि विरोधाभासी जीवनशैली असलेल्या ह्या लोकांनी मिळून भारताच्या स्वातंत्र्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. देशाच्या स्वातंत्रासाठी त्यांनी एकमेकांबरोबर दृढ विश्वास आणि आदर दाखविला आणि हातात हात घालून ते सर्व एकत्र लढले. ही गोष्ट ह्या देशाला विशिष्ट बनवते.

सामाजिक विसंगती आणि जातीय हिंसाचारात वाढ होण्यास काही बाबी कारणीभूत आहेत. द्वेष आणि विभाजन घडवून आणण्यात काही पक्षांचा वाढता प्रभाव धोकादायक परिस्थिती निर्माण करत आहेत. हे राजकीय पक्ष किंवा राजकारणी लोक देशाच्या खऱ्या मुद्यांपासून किंवा आवश्यक असलेल्या गंभीर समस्यांपासून लोकांचे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते त्यांना शुल्लक मुद्द्यांवर आपापसात लढवण्यासाठी बाध्य करत आहेत आणि ह्या त्यांच्या अजेंड्यासाठी धर्माचा आधार घेतला जात आहे. हे सर्व विशेषत: निवडणुकीच्या वेळी घडते. 

जमाअत-ए-इस्लामी हिंद लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना समजाविते की धर्म हा एकमेकांमध्ये झगडण्याचा विषय नाही आहे. लोकांमध्ये विभागणी निर्माण करण्यासाठी आणि एकमेकांमध्ये भांडणे लावून देशाच्या विविधतेचे सौंदर्य दूषित करण्यासाठी धर्माचा उपयोग केला जातो. त्यामुळे लोकांना आणि धार्मिक नेत्यांना या समस्येबाबत शिक्षित व जागृत करण्याच्या उद्देशाने आमच्या संस्थेने हा पुढाकार घेतला असल्याचे प्रा. सलीम इंजिनीयर यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की राजकीय फायदा मिळवण्यासाठी धर्माचा गैरवापर करू नये, हा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यात आणि एकमेकांबरोबर शांततेत आणि सुसंवादाने जगण्यासाठी प्रोत्साहित करण्यात धर्मगुरू महत्त्वाची भूमिका बजावतात, हा संदेश देण्यासाठी जमाअत-ए-इस्लामी हिंद कार्यरत आहे.

प्रा. सलीम इजिनीयर पुढे म्हणाले की बंधुभावाने एकत्र काम करणे आणि फूट पाडणाऱ्या अशा प्रचाराला बळी न पडता एकमेकांचा आदर करणे हा भारताच्या लोकांमध्ये द्वेष आणि गैरसमज नष्ट करण्याचा एकमेव मार्ग आहे. धार्मिक सलोख्याचे वातावरण निर्माण करणे ही काळाची गरज आहे. द्वेष आणि गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांकडून आपली दिशाभूल करून न घेता प्रत्येक व्यक्तीने शांतता वाढवण्यासाठी आणि एकमेकांचा आदर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget