राज्यस्तरीय दुसरे फातिमाबी शेख मराठी साहित्य संमेलन मोठ्या थाटाने संपन्न
सोलापूर
अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य परिषद, सोलापूर व ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था बोल्डा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ७ जानेवारी २०२४ रविवार रोजी राज्यस्तरीय ‘दुसरे फातिमाबी शेख मुस्लिम मराठी साहित्य संमेलन’ सोशल महाविद्यालयात मोठ्या थाटाने संपन्न झाले.
सचिव अय्यूब नल्लामंदू यांनी कुरआन पठण करून संमेलनाची सुरुवात केली. यानंतर डॉ. अजीज नदाफ यांच्या हस्ते वृक्षाला जल अर्पण करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील सुप्रसिध्द साहित्यिक, लेखिका प्रा. डॉ. अर्ज़िनबी युसुफ शेख हे होते.
या वेळी मंचावर स्वागताध्यक्षा सौ. सुरैय्या जहागीरदार, डॉ. अजीज नदाफ, मुख्य संजोक प्राचार्य इ जा तांबोळी, अय्यूब नल्लामंदू, प्राचार्य शकील शेख, अनिसा शेख, अॅड. हाशम पटेल, मुस्लीम कबीर, कवी मुबारक शेख, सय्यद अलाऊद्दीन (आष्टी), सायराबानू चौगुले (रत्नागीरी), खजीनदार हसीब नदाफ इ उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते इंतेखाब फराश संपादित “स्पंदन” आणि इ. जा. तांबोळी व अय्यूब नल्लामंदू संपादित काव्यसंग्रह “गुलदस्ता” व खाजाभाई बागबान लिखित “पाऊलखुणा”, सायराबानू चौगुले लिखित “वैचारिक कवडसे” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले.
यानंतर बेन्नूर फौडेशनच्यावतीने मुबारक शेख यांना ‘फखरुद्दीन बेन्नूर स्मृती पुरस्कार’ तर फराश फौंडेशन तर्फे प्राचार्य तांबोळी यांना ‘समाजरत्न पुरस्कार’ आणि शाहिदा सय्यद यांना ‘युगस्त्री फातीमाबी शेख साहित्य पुरस्कार’ सन्मानपूर्वक देण्यात आले.
शफी बोल्डेकर यांनी प्रास्ताविक केले. स्वागताध्यक्क्षा डाँ. सौ सुरैय्या जहागीरदार यांनी सर्वांचे स्वागत करत शाल बुके देऊन सत्कार केला व आपल्या स्वागताध्यक्ष भाषणचा सारांश सादर केला. दोन्ही संस्थांच्या वतीने प्रास्ताविक डॉ. तांबोळी व शफी बोल्डेकर यांनी केले.
यानंतर संमेलनाध्यक्ष अकोला येथील डॉ. अर्जिनबी शेख म्हणाल्या – साहित्य हे समाजाचा आरसा असतो, समाजात जे काही घडतं ते साहित्यात प्रतिबिंबिंत होते आणि साहित्यात ज्या घटना घडत नाहीत अर्थातच सत्य मांडण्यात येत नाही, ते साहित्य समाजाला वाचवू शकत नाही, समाजाला आरसा दाखवू शकत नाही, समाजात सकारात्मक बदल घडवू शकत नाही आणि असले साहित्य इतिहास घडवू शकत नाही.
डॉ. अर्जिनबी शेख पुढे म्हणाल्या की भारतातील मुख्य समस्या गरीबी दूर करणे आणि आर्थिक बळकटीकरिता योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याकारणाने याकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. पती आर्थिक स्वरूपात सक्षम नसल्याने उद्भवणारी आर्थिक तंगी व महिलांची होणारी तारेवरची कसरत चिंतेची बाब आहे. महिलाच्या हाताला काम मिळाले की आर्थिक तंगी दूर होण्यास मदत होते.
मुस्लिम महिलांना पुरुषांकडून पदोपदी मिळालेले सहकार्य मुस्लिम महिलाच्या जीवनात साफल्यपूर्ण आनंदी बहर आणू शकते आणि मुस्लिम समाजाच्या उत्कर्षात अखंड भर घालू शकते.
सूत्रसंचालन डॉ. महंमद शेख यांनी केले तर आभार अय्यूब नल्लामंदू यांनी मानले.
दुपारच्या परिसंवाद प्राचार्य शकील शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या सत्रात नसीम जमादार (कोल्हापुर), हसीब नदाफ, अय्युब नल्लामंदू, तहसीन सय्यद (पुणे), निलोफर फणीबंद, रजिया जमादार (अक्कलकोट) इत्यादी मान्यवर सहभागी झाले होते. ”स्त्री मुस्लिम मराठी साहित्यिकांची दिशा” या विषयवर त्यांनी आपले प्रकट विचार मांडले. सूत्रसंचलन प्रा. सौ. रईसा मिर्जा यानी केले.
मुबारक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात, साबीर सोलापूरी, साईनाथ राहटकर (नांदेड), मोहिदीन नदाफ, शेख जाफर अ हमीद शेख, जमील अन्सारी (नागपूर), शैंलेंद्र पाटील, कल्याण राऊत, शाहीदा सयद, अॅड. इकबाल, अनिता वलांडे, सय्यद तहसीन (सर्व लातूर). रामचंद्र गुरव, अॅड. रामचंद्र पाचुनकर (पुणे), सारिका देशमुख (उस्मानाबाद) मोहिदीन नदाफ (बार्शी), राणी धनवे (मंगळवेढा), सिकंदर मुजावर (मोहोळ), इम्तियाज तांबोळी (फलटण), जाकीर तांबोळी, सफुरा तांबोळी (वैराग ), एम ए रहीम (चंद्रपुर) राहुल राजारामपुरे (इचलकरंजी), सुमीत हजारे (ठाणे), गौस पाक शेख (पालघर, ठाणे) प्रकाश सनपुरकर, डॉ. रेशमां पाटील, आनंद घोडके (सोलापुर), गौसपाक मुलाणी, सुर्वणा तेली (सांगोला), शेख चिकतीकर नांदेड, निलोफर फणीबंद, सौ रजिया जमादार (अक्कलकोट), सौ महमूदा शेख (देहू), भुपेंद्र आल्हाट (तळेगांव दाभोडे) या कवींनी आपल्य रचना सादर करून वाह – वाह मिळविली याचे सूत्रसंचालन अँड उमाकांत आदमाने (पुणे) व सौ नसीमा जमादारनी उत्तमरित्या केले.
ॲड. हाशम पटेल लातूर यांच्या अध्यक्षतेखाली समारोप झाला यात मुस्लिम कबीर लातूर, कवी शफी बोल्डेकर यांनी आपले विचार व्यक्त केले सूत्रसंचालन खाजाभाई बागवान यांनी केले तर आभार इंतेखाब फराश मानले.
Post a Comment