Halloween Costume ideas 2015

मुस्लिम समाजात महिलांचे स्थान


जगातील सर्वच धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञानामध्ये महिलांना मानवाधिकारापासून वंचित केले गेलेले आहे आणि त्यांच्याबद्दल नकारात्मक गोष्टी बोलल्या आहेत. इस्लाम असा एकमेव धर्म आहे ज्यामध्ये महिलांना अत्यंत सन्मानाच्या नजरेने पाहिले गेलेले आहे आणि पुरूषांच्या बरोबरीने त्यांचे मुलभूत अधिकारसुद्धा स्विकारले गेलेले आहेत. मात्र दुर्दैव असे की, इस्लामला माननाऱ्यांनीसुद्धा आपल्या संस्कृती आणि चालीरितींवर इतरांचा प्रभाव स्विकारून मुस्लिम महिलांना त्यांच्या अनेक ह्नकांपासून वंचित ठेवलेले आहे. उदा. घरातून बाहेर पडण्याच्या बाबतीत त्यांच्यावर अनावश्यक प्रतिबंध लादले आहेत. त्यांच्या आवाजाला सुद्धा परद्याच्या शर्ती लागू केल्या गेल्या आहेत. अज्ञात आणि अस्पष्ट संकटांचे कारण पुढे करून त्यांचा दाखला मस्जिदींमध्ये प्रतिबंधित केलेला आहे. महिलांना मोठ्या प्रमाणात शिक्षणापासूनही वंचित ठेवले गेले आहे. फार तर त्यांना घरेलू गोष्टींचे शिक्षण दिले गेले आहे. इस्लामच्या सुरूवातीच्या काळामध्ये मुस्लिम महिला ह्या सामाजिक गतीविधींमध्ये सहभागी होत होत्या. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी त्यांच्या शिक्षण आणि प्रशिक्षणाची खास व्यवस्था केली होती. त्यांनी पुरूषांना ताकीद केली होती की, ज्या महिला मस्जिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी येऊ इच्छितात त्यांनी त्यांना प्रतिबंध करू नये. प्रेषितांच्या काळात मस्जिदी ह्या फक्त नमाजचीच नव्हे तर शिक्षणाची केंद्र होती. त्यांच्यामध्ये हदीसचे ज्ञान असणाऱ्या महिला होत्या ज्या सामान्य महिलांना हदीसचे शिक्षण देत होत्या. अशा तज्ज्ञ महिलांच्या वर्गामध्ये महिलाच नव्हे तर पुरूषसुद्धा मोठ्या संख्येने हदीसचे शिक्षण घेत होते. माहित नाही कसे पण एका हदीसमध्ये महिलांसंबंधी ’अल्पबुद्धीच्या’ या शब्दाचा अर्थ असा लावला गेला की, महिला या पुरूषांच्या तुुलनेमध्ये कमी बुद्धीमान असतात. जर मुलींना शिक्षणाच्या योग्य संधी मिळाल्या तर त्या मुलांच्या बरोबर किंबहुना अनेकवेळा त्यांच्यापेक्षा जास्त सरस पद्धतीने शैक्षणिक प्रगती करू शकतात. आणि असे इस्लामच्या सुरूवातीच्या काळात घडलेले सुद्धा आहे. प्रसिद्ध इस्लामी विद्वान मौलाना मुहम्मद शफी यांनी मारेफुल कुरआन नावाचे भाष्य लिहिलेले आहे त्यात सुरे अनआम आयत क्र. 151 च्या संबंधी भाष्य करताना त्यांनी लिहिलेले आहे की,‘‘ या आयातींमध्ये गुन्ह्याचा जो उल्लेख केला गेलेला आहे तो सकृतदर्शनी हत्येसंबंधी आहे. मात्र यासंबंधी अधिक विचार केला तर आपल्या पाल्यांना योग्य शिक्षण आणि प्रशिक्षण न देणे ज्याच्या परिणामास्वरूप मुलं ईश्वर आणि प्रेषित मुहम्मद सल्ल. तसेच मृत्यूपरांत जीवनासंबंधी गाफिल राहिलीत किंवा ते वाईट मार्गाला लागतील किंवा अश्लिलतेमध्ये लिप्त होतील, तर हे सुद्धा स्वतः स्वतःच्या मुलांची हत्या करण्यापेक्षा कमी गंभीर कृत्य नाही. जे पालक आपल्या पाल्यांना चांगल्या सवयी आणि चांगली वर्तणूक ठेवण्यासाठी प्रोत्साहित करत नाहीत आणि त्यांना मोकळे सोडून देतात किंवा अशा चुकीच्या सवयी त्यांना लावतात, ज्याच्या परिणाम स्वरूप इस्लामी चारित्र्य त्यांच्यात निर्माणच होत नाही. पालकांचे हे कृत्य सुद्धा मुलांच्या हत्येपेक्षा कमी नाही. आणि स्पष्ट आहे हत्येचा परिणाम फक्त जगातील जीवनावरच नाही तर पारलौकिक जीवनावर सुद्धा होतो. (संदर्भ : तफसिल मारेफुल कुरआन, खंड 3, पान क्रं.484).

मुलींचे शिक्षण आणि विशेष करून इस्लामी शिक्षण सध्याच्या काळात आवश्यक आहे. मुलींवरच या समाजाचे भविष्य अवलंबून आहे. अनेक कारणं आहेत ज्यामुळे मुस्लिमांची नवीन पीढि इस्लामपासून दूर होत आहे. आज इस्लामी शिक्षण घेणाऱ्या मुली उद्या आई बनतील आणि त्यांच्या कुशीत मुलं लहानाची मोठी होतील. तेव्हा त्या मुलांचा इस्लामशी संबंध दृढ होईल आणि बाहेरील जगातील अपरिचित गोष्टींचा त्यांच्यावर वाईट परिणाम होणार नाही.


- डॉ. रजिउल इस्लाम नदवी

दिल्ली


पुस्तक : मेमारे जहाँ तू है

भाषांतर : डॉ. सिमीन शहापुरे


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget