Halloween Costume ideas 2015

‘एनआरसी’चे पहिले पाऊल ‘एनपीआर’!

‘एनआरसी’ व ‘सीएए’च्या विरोधात देशभर आक्रमक आंदोलने सुरू असतानाच मोदी सरकारने देशात अखेर राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) केली जाईल अशी गेल्या मंगळवारी  घोषणा केली. एनपीआर अंतर्गत नागरिकांची सर्व माहिती गोळा केली जाईल. यात प्रत्येक व्यक्ती नाव, त्याच्या पालकांची जन्मतारीख व ठिकाण यांची नोंद घेतली जाईल. पण यासाठी  कोणतेही कागदपत्र वा बायोमेट्रिक पुरावे देण्याची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. प्रत्येक व्यक्ती स्वत:ची जी माहिती देईल ती ग्राह्य धरली जाईल व त्यावरच विश्वास ठेवला जाईल. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीचे काम पुढील वर्षी एप्रिलपासून सुरू होईल व ते सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल. एकूणच सरकार एनआरसी आणिसीएए बद्दलचे अनेक मुद्दे  जाणूनबुजून स्पष्ट करीत नसल्याचे दिसते. हे कायदे एकत्र लागू झाले तर भारतीय मुस्लिमांना अधिक छळवादी कायदेशीर प्रक्रियांना सामोरे जावे लागेल. परदेशी मुस्लिम आणि इतर  नागरिक जे भारतात आले आहेत त्यांना कोणत्या पद्धतीने बाहेर घालवले जाईल याचे स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही. त्याचप्रमाणे इतर राजकीयदृष्ट्या नको असलेले समाज,  माणसे, संघटना ते अनेक इतर जातीधर्माचे लोकांना भविष्यात निश्चितच झळ बसेल. कारण कायद्यात तसा काहीही उल्लेख नाही. या निर्णयामुळे मुस्लिमांना दुय्यम नागरिक  ठरविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू होईल. म्हणूनच संविधानाच्या कलम १४ च्या आणि इतर मूलभूत अधिकारांच्या बाबतीत जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यांची पायमल्ली  झाल्याशिवाय राहाणार नाही. एकापाठोपाठ एक बदलाचे वादग्रस्त निर्णय घेऊन त्रस्त असलेल्या जनतेला आर्थिक आणीबाणीमध्ये लोटणाऱ्याया काळात सरकार भीती आणि  असुरक्षिततेचा धुरळा देशभरात उडवू पाहात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच दिल्लीच्या रामलीला मैदानावर ‘बेकायदेशीर नागरिकांना डिटेंशन सेंटरमध्ये डांबणार असल्याच्या  अफवा काँग्रेस आणि शहरी नक्षलवादी पसरवताहेत. मात्र देशात एकही डिटेंशन सेंटर उघडलं गेलेलं नाही,’ असा दावा केला होता. तरी प्रत्यक्षात देशभरात ४ राज्यांमध्ये डिटेंशन सेंटरर्सचे  बांधकाम सुरु झाले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भात सर्व राज्यांना नोटीस बजावल्या होत्या. बंगळुरु आणि गुवाहाटी शहरात डिटेंशन सेंटरचे बांधकाम पूर्ण झाले असून बंगळुरुचे  सेंटर बेकायदेशीर नागरिकांना डांबण्यासाठी सज्ज आहे. कोलकात्याजवळ डिटेंशन वॅâम्पसाठी जागा शोधल्याची माहिती पश्चिम बंगालचे मंत्री उन्मल बिसारा यांनी पीटीआयशी बोलतांना   दिली आहे. महाराष्ट्रात नवी मुंबईतल्या नेरुळ इथे डिटेंशन सेंटरसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आले होते. प्रधान गृह सचिव अमिताभ गुप्ता यांनी ही माहिती  दिली आहे. या भाषणाने नोटबंदीच्या काळात मोदींनी केलेल्या भाषणांची आठवण झाली. त्या वेळी त्यांनी ज्या पोटतिडकीने आणि आक्रमकपणे भाषणे केली, तसेच त्यांचे हेही भाषण  झाले. नोटबंदीच्या काळात देशभर अत्यंत अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले होते. बँकांपुढे पैशांसाठी पहाटेपासून लोकांच्या रांगा लागायच्या. या रांगांमुळे अनेकांना आपले प्राणही  गमवावे लागले होते. लोकांच्या संयमाची परिसीमा झाली होती. त्यावेळी मोदींनी जो भरवसा दिला होता किंवा जे जे दावे केले होते, ते तद्दन बोगस होते हे नंतर प्रत्येकाने अनुभवले.  नोटबंदीच्या काळातील त्यांच्या भाषणाचा फोलपणा सिद्ध व्हायला काही महिन्यांचा अवधी जावा लागला. पण रामलीला मैदानावरील त्यांच्या भाषणातील खोटेपणा जागच्याजागी आणि  लगोलग लक्षात आला आहे. त्यामुळे एनआरसी व नागरिकत्व विधेयकाविषयीचा लोकांच्या मनातील संशय दूर होण्याऐवजी तो आणखीनच बळावला आहे. मोदींचे दावे त्याच दिवशी काँग्रेस व अन्य कार्यकत्र्यांनी मोदी-शहांच्याच पूर्वीच्या भाषणांच्या व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर टाकून खोटे असल्याचे दाखवून दिले. अक्षरश: डझनाहून जास्त वेळा अमित शहा  यांनी संसदेसह विविध ठिकाणी देशभर एनआरसी लागू केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. पश्चिम बंगालमध्ये त्यांच्या प्रत्येक भाषणात एनआरसीचा मुद्दा आहेच. सुधारित  नागरिकत्व कायदा आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन या दोन मुद्द्यांवरून देशात सुरू असलेला गोंधळ अजूनही शमलेला नाही. दोन्हींच्या विरोधात मोर्चे, जाळपोळ, हिंसाचार होत  असतानाच दुसऱ्या बाजूने समर्थन मोर्चे सुरू झाले आहेत. दोन्ही घटक समोरासमोर आल्यास त्यास आणखी गंभीर वळण लागू शकते. विशेषत: पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश,  आसाममध्ये ती शक्यता अधिक दिसते. हिंसाचाराने २० पेक्षा जास्त बळी घेतले. ते न वाढण्याची जबाबदारी केंद्र व राज्य सरकारांची आहे. हिंसाचाराला प्रारंभ झाल्यानंतर भारतातील  लोकशाहीची परंपरा व भवितव्य याबद्दल परदेशातही बोलले जाते. देशात आजही उमटणारी मत-मतांतरे गंभीर आणि महत्त्वाची आहेत की, ज्याचा विचार सरकारने भविष्यात असे  महत्त्वाचे निर्णय घेताना केलाच पाहिजे.

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget