Halloween Costume ideas 2015

सीएए, एनआरसी, एनपीआरचा 30 टक्के हिंदूंना फटका

शिवसेना तुमच्या पाठीशी : देशभक्ती एका जातीची किंवा पक्षाची मक्तेदारी नाही - संजय राऊत

मुंबई (प्रतिनिधी)
नागरिकत्व संशोधन कायदा, नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी (एनआरसी) आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) चा फटका केवळ मुस्लिम समाजालाच नाही तर सर्वांनाच बसणार आहे. कित्येक लोकांकडे जुने पुरावे नाहीत. देशातील 30 टक्के हिंदूंचे यामुळे नुकसान होईल. देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची मक्तेदारी नाही. आम्ही सर्व देशभक्त आहोत. आमची देशभक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला.
    सीएए, एनसीआर, एनपीआर विरोधात जमात-ए- इस्लामी हिंदच्या वतीने चर्चासत्रात मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मंचावर न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, एपीसीआरचे अध्यक्ष युसूफ मुछला आदी मान्यवर उपस्थित होते.
    यावेळी राऊत म्हणाले की, देशात भीती पसरवली जात आहे, परंतु कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. घाबरविणारे येतात आणि जातात. हा देशाचा इतिहास आहे. महाराष्ट्राने भीती संपविण्याचे काम केले आहे, देशाला दिशा देण्याचे काम केले आहे, ते पुढे म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांवर बंदूक रोखली जात आहे, हल्ले होत आहेत, असे असताना पंतप्रधान विद्यार्थ्यांना केवळ शिकण्याचे काम करावे असे सांगत आहेत. परंतु, विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून, याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्याच्यामुळे परिवर्तन घडले, असेही ते म्हणाले. आपल्याला सर्वांना मिळून देश वाचवायचा आहे. सर्वांनी याविरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगितले. केंद्र सरकारच्या या जाचक कायद्याविरूद्ध सर्वांनी एकत्र येण्याचा सूरही यावेळी निघाला. यावेळी जमाअतचे पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदू-मुस्लिमांचे रक्त एकच
कोणताही कायदा आणताना सहजतेने त्याची अंमलबजावणी होईल, असा कायदा असायला हवा. ज्या कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही ते आपल्यावर लादले जात आहेत. हे 2024 च्या निवडणुकीसाठी सरकारचे षडयंत्र आहे. हिंदू आणि मुस्लिम या दोघांचेही रक्त एकच असून सर्वांनी याविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन माजी न्या. बी.जी. कोळसे पाटील यांनी केले. तर सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे गरीबांच्या विरोधात आहेत. धर्मावर आधारित नागरिकत्व देऊन सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे, असे मिहीर देसाई म्हणाले.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget