Halloween Costume ideas 2015

गुणवत्ता आणि सेवा यामुळेच व्यवसाय वाढवता येतो

मुंबई (नाजीम खान) : गुणवत्ता आणि सेवा यांचा ज्यावेळी योग्य मिलाफ होतो त्यावेळी व्यवसाय वाढीस बळ मिळते. गुंतवणुकदार मार्केट पाहून त्याबाबतची गुंतवणूक करतो तर छोटा व्यापारी आपल्या गुणवत्तापूर्ण माल व विक्री पश्चात सेवेने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो. बाजारात अनेक लोक एकच माल विकतात परंतु, एखाद्याकडेच लोकांची अधिक गर्दी असते. त्याचे कारण हेच की त्याची सेवा, संवाद आणि मालाची गुणवत्ता उत्कृष्ट असते. त्यामुळे तो मोठ्या स्पर्धेतही टिकतो, असे मत अहेमदाबाद विद्यापीठ व इंडियन इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम)चे प्रा. अबरार अली सय्यद यांनी सांगितले.
    मुंबई येथे नुकतीच रिफा चेंबर्स ऑफ कॉमर्स तर्फे सिद्दीकी कॉलेज भायखळा येथील अल्लामा लतीफी हॉल मध्ये आयोजित एकदिवस व्यावसाय कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर रिफाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सलाउद्दीन अहमद, मोनिस खान, इम्तियाज शेख उपस्थित होते. यावेळी अबरार अली यांनी उपस्थित व्यावसायिकांना केस स्टडी द्वारे सखोल मार्गदर्शन केले. डिजीटल एक्स्पर्ट मार्केटिंग आणि ई-कॉमर्सचे तज्ज्ञ मोनिस खान म्हणाले, व्यापार्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास जास्तीस्त जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल, असे सांगितले. त्यांनी कशा पद्धतीने इंटरनेट व अन्य ई-कॉमर्सबद्दल सखोल मार्गदर्शन केले. इम्तीयाज शेख यांनी टीम वर्क आणि व्यावसायिकतेबद्दल मार्गदर्शन केले. तसेच काही प्रात्यक्षिकेही करून घेतली. रहेबर फायनान्शियल कन्सलटिंगचे संचालक एम.एच. खटखटे यांनी बिनव्याजी फायनान्स देणे आणि घेणे याबद्दल माहिती सांगितली. प्रास्ताविक रिफाचे कार्यकारी अधिकारी सलाहउद्दीन अहमद यांनी केले. त्यांनी रिफा द्वारा 2015 पासून सुरू असलेल्या कार्याची माहिती दिली. कार्यशाळेस मुंबई, पुणे, अहमदनगर, धुळे, लातूर, अकोला येथील व्यावसायिकांनी सहभाग नोंदविला होता.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget