मीना नलवार
9822936603
तुमची परीक्षा घेतली जाईल
तुम्हाला आव्हान दिलं जाईल
तुमचा अगदी कडेलोट होण्याची वेळ येईल
ह्या म्हणी शेतकऱ्यांना किती तंतोतंत लागू होतात ते पहा. मागच्या शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसात महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामाचे गणितच बदलून टाकलेले आहे. आकाशातून दगडासारख्या गारा पडल्या. त्यात हरभरा, गहू, ऊस, केळी, ज्वारी, कांदा, द्राक्ष, टमाटे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर कधी आसमानी तर कधी सुलतानी अशी संकटांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे शेती व्यवस्थाच उसवत चाललेली आहे. आधीच खचलेला शेतकरी या अवकाळी गारपीटीने अधिक खचून जाईल, यात शंका नाही. अगोदर तर जाहीर झालेली कर्जमाफी पूर्णपणे मिळालेली नाही. त्यात गुलाबी बोंड अळीने कापूस गिळून टाकला. आता ही गारपीट. पिकं गेली, जनावरं मेली, घर पडली, आता पुढे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. महाराष्ट्रातील जवळपास 10 जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी हैरान झाला आहे.
मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे. शेतकरी कसा सुखी होईल यावर एकीकडे राजकारण सुरू असून दुसरीकडे मात्र सरकारकडून शेतीचे मूळ दुखणे दूर केले जात नाही. नुकसानीचे पंचनामे केले जातात आणि थातूर-मातूर मदत शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकली जाते. या पलिकडे सरकार गंभीर नाही. सरकारच्या या बेमुर्वत वागणुकीच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचा हा तडाखा शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्येच्या दिशेने नेतो की काय? अशी भीती मनात येवून जीवाचा नुसता थरकाप उडाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्याचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. सोमवारी रात्री निसर्ग कोपला अन् बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. अनेक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम अवकाळी पावसाने केले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे मातेरे झाले आणि बळीराजाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. या गारपीटीने आलेल्या सामुहिक वैफल्यातून बळीराजा जीवनयात्रा संपविणार नाही यासाठी तात्काळ राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
पाऊस हा शेतकऱ्यांना आपला सखा वाटायचा. मदतीला धावून येणारा, हिरवे स्वप्न फुलविणारा, शेतकऱ्यांचा जीवलगच. जून महिन्याची सुरूवात झाली की शेतकऱ्याला मृग नक्षत्राचे वेध लागायचे, चातकाने वर्षा ऋतूची वाट पहावी तसा बळीराजा निरभ्र आकाशाकडे डोळे लावून बसतो. ज्येष्ठाच्या मध्यावर आकाशात कृष्ण मेघाची दाटी होवू लागली की बळीराजाचा मनात आशेची पल्लवी फुटायची. तप्त धरतीच्या कुशीमध्ये विसावणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबामुळे मृदुगंधाचा दरवळ पसरायचा. हा दरवळ काही क्षणात वातावरण भरून टाकत असे. मग काळ्या आईच्या कुशीत श्रम करताना दिवस कसा जायचा याचे शेतकऱ्याला भानही राहत नसे.
जन्मावर आणि जगण्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या या जगाच्या पोशिंद्याच्या मनाला स्वतःची जीवनयात्रा संपविण्याचा विचारही कधी स्पर्श करीत नसे. हे दृश्य मागच्या शतकाचे नाही तर मागील काही वर्षापुर्वीचे आहे. परंतु, आता शेतकरी आणि कर्जाचा भार, बदललेले ऋतूचक्र, लहरी पावसाचा अवेळी होणारा कहर यामुळे शेतकऱ्याचे मन विष्ण झालेले आहे. वेळकाळ सोडून कधीही शेतशिवारात कोसळणारा पाऊस त्याला दरोडेखोरापेक्षाही भयानक वाटू लागला आहे. कधी काळी प्राणासारखा वाटणारा पाऊस हे परमेश्वराकडून मिळालेले वरदान वाटत असे. परंतु, आता अवेळी दाखल होणारा अन् सोबत गारपीटीसारखे हत्यारे आणणारा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना दहशतवादी वाटू लागला आहे.
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी याच्या ऐवजी उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी व्यवस्था समाजामध्ये जवळ-जवळ दृढ झाली आहे. औद्योगीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतल्यानंतर आणि विशेषतः त्या क्षेत्रात उत्पादकता वाढविण्यासाठी दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निसर्गचक्रात बदल होणे अपरिहार्य होते. त्याच बदलाचा फटका शेतीला सातत्याने बसत आहे. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अर्थात असे असले तरी अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनकर्त्यांनी शेती वाचविण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे ठरते. शेतीचा बळी देऊन औद्योगिक विकास आपल्याला परवडणार नाही, याची जाणीव सरकार आणि उद्योगपती या दोघांनाही हवी. अन्यथा भारतासारख्या खंडप्राय आकाराच्या व प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये एकूण अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल.
एकंदरित भारतीय शेतकरी व भारतीय अर्थव्यवस्था वाचविणे हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचा संकल्प बनला पाहिजे, हेच सत्य आहे.
9822936603
तुमची परीक्षा घेतली जाईल
तुम्हाला आव्हान दिलं जाईल
तुमचा अगदी कडेलोट होण्याची वेळ येईल
ह्या म्हणी शेतकऱ्यांना किती तंतोतंत लागू होतात ते पहा. मागच्या शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसात महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसाने रबी हंगामाचे गणितच बदलून टाकलेले आहे. आकाशातून दगडासारख्या गारा पडल्या. त्यात हरभरा, गहू, ऊस, केळी, ज्वारी, कांदा, द्राक्ष, टमाटे आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांवर कधी आसमानी तर कधी सुलतानी अशी संकटांची मालिका सुरूच आहे. त्यामुळे शेती व्यवस्थाच उसवत चाललेली आहे. आधीच खचलेला शेतकरी या अवकाळी गारपीटीने अधिक खचून जाईल, यात शंका नाही. अगोदर तर जाहीर झालेली कर्जमाफी पूर्णपणे मिळालेली नाही. त्यात गुलाबी बोंड अळीने कापूस गिळून टाकला. आता ही गारपीट. पिकं गेली, जनावरं मेली, घर पडली, आता पुढे काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. महाराष्ट्रातील जवळपास 10 जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकरी हैरान झाला आहे.
मराठवाड्यात अनेक जिल्ह्यात पिकांचे जबरदस्त नुकसान झाले आहे. शेतकरी कसा सुखी होईल यावर एकीकडे राजकारण सुरू असून दुसरीकडे मात्र सरकारकडून शेतीचे मूळ दुखणे दूर केले जात नाही. नुकसानीचे पंचनामे केले जातात आणि थातूर-मातूर मदत शेतकऱ्यांच्या तोंडावर फेकली जाते. या पलिकडे सरकार गंभीर नाही. सरकारच्या या बेमुर्वत वागणुकीच्या पार्श्वभूमीवर निसर्गाचा हा तडाखा शेतकऱ्याला पुन्हा आत्महत्येच्या दिशेने नेतो की काय? अशी भीती मनात येवून जीवाचा नुसता थरकाप उडाला आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्याचे पुन्हा एकदा कंबरडे मोडले आहे. सोमवारी रात्री निसर्ग कोपला अन् बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला. अनेक संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचे काम अवकाळी पावसाने केले. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकांचे मातेरे झाले आणि बळीराजाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला. या गारपीटीने आलेल्या सामुहिक वैफल्यातून बळीराजा जीवनयात्रा संपविणार नाही यासाठी तात्काळ राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
पाऊस हा शेतकऱ्यांना आपला सखा वाटायचा. मदतीला धावून येणारा, हिरवे स्वप्न फुलविणारा, शेतकऱ्यांचा जीवलगच. जून महिन्याची सुरूवात झाली की शेतकऱ्याला मृग नक्षत्राचे वेध लागायचे, चातकाने वर्षा ऋतूची वाट पहावी तसा बळीराजा निरभ्र आकाशाकडे डोळे लावून बसतो. ज्येष्ठाच्या मध्यावर आकाशात कृष्ण मेघाची दाटी होवू लागली की बळीराजाचा मनात आशेची पल्लवी फुटायची. तप्त धरतीच्या कुशीमध्ये विसावणाऱ्या पावसाच्या टपोऱ्या थेंबामुळे मृदुगंधाचा दरवळ पसरायचा. हा दरवळ काही क्षणात वातावरण भरून टाकत असे. मग काळ्या आईच्या कुशीत श्रम करताना दिवस कसा जायचा याचे शेतकऱ्याला भानही राहत नसे.
जन्मावर आणि जगण्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या या जगाच्या पोशिंद्याच्या मनाला स्वतःची जीवनयात्रा संपविण्याचा विचारही कधी स्पर्श करीत नसे. हे दृश्य मागच्या शतकाचे नाही तर मागील काही वर्षापुर्वीचे आहे. परंतु, आता शेतकरी आणि कर्जाचा भार, बदललेले ऋतूचक्र, लहरी पावसाचा अवेळी होणारा कहर यामुळे शेतकऱ्याचे मन विष्ण झालेले आहे. वेळकाळ सोडून कधीही शेतशिवारात कोसळणारा पाऊस त्याला दरोडेखोरापेक्षाही भयानक वाटू लागला आहे. कधी काळी प्राणासारखा वाटणारा पाऊस हे परमेश्वराकडून मिळालेले वरदान वाटत असे. परंतु, आता अवेळी दाखल होणारा अन् सोबत गारपीटीसारखे हत्यारे आणणारा अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना दहशतवादी वाटू लागला आहे.
उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी याच्या ऐवजी उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी व्यवस्था समाजामध्ये जवळ-जवळ दृढ झाली आहे. औद्योगीकरणाच्या प्रक्रियेने वेग घेतल्यानंतर आणि विशेषतः त्या क्षेत्रात उत्पादकता वाढविण्यासाठी दररोज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर निसर्गचक्रात बदल होणे अपरिहार्य होते. त्याच बदलाचा फटका शेतीला सातत्याने बसत आहे. ही स्वाभाविक प्रक्रिया आहे. अर्थात असे असले तरी अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनकर्त्यांनी शेती वाचविण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे ठरते. शेतीचा बळी देऊन औद्योगिक विकास आपल्याला परवडणार नाही, याची जाणीव सरकार आणि उद्योगपती या दोघांनाही हवी. अन्यथा भारतासारख्या खंडप्राय आकाराच्या व प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये एकूण अर्थव्यवस्थाच धोक्यात येईल.
एकंदरित भारतीय शेतकरी व भारतीय अर्थव्यवस्था वाचविणे हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचा संकल्प बनला पाहिजे, हेच सत्य आहे.
Post a Comment