Halloween Costume ideas 2015

भारताचे विभाजन आणि काश्मीर प्रश्नासाठी जबाबदार कोण?

- राम पुनियानी
राजकीय शक्ती आपला अजेंडा रेटण्यासाठी इतिहासाचा नेहमीच दुरूपयोग करित असते. हे लोक भुतकाळात घडलेल्या घटनांसंबंधी आपला स्वार्थ साधण्यासाठी चक्क खोटं बोलण्यासही मागे पुढे पहात नाहीत. जिथपर्यंत इतिहासाचा संबंध आहे त्यावर हा सिद्धांत लागू होत नाही की, ’सत्य पवित्र आहे, मत स्वतंत्र आहे’ तुम्ही सत्याची प्रताडना करू शकत नाही मात्र त्याचा अर्थ लावण्यात तुम्ही स्वतंत्र असता. मोदी आणि त्यांच्यासारख्या विचाराच्या अन्य लोकांसाठी, ’ प्रेम आणि युद्धात सर्व क्षम्य आहे.’ आपल्या व्यक्तिगत महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या राजनैतिक अजेंड्याला लागू करण्यासाठी मोदींनी अनेक सीमांचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सरदार पटेल यांचे उदात्तीकरण करण्यासाठी ते जवाहरलाल नेहरूंची उंची कमी करण्याचा प्रयत्न करित आलेले आहेत. या दोन्ही नेत्यांना एकमेकाचे प्रतिद्वंद्वी सिद्ध करण्यासाठी ते सिद्ध झालेले आहेत. त्यांच्या या प्रयत्नांची दोन कारणे आहेत. पहिले कारण हे की, ’ मोदी परिवाराने’ कधीही भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग नोंदविलेला नाही. म्हणून ते पटेलांना आपलेसे करून ती उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतात. तर दूसरे हे की, मोदी हे जाणून आहेत की, पटेल यांचे मत होते की, मोदींचे ’वैचारिक पितामह (हिंदू महासभा-आरएसएस) महात्मा गांधीच्या हत्येसाठी जबाबदार होते. या दोन्ही संस्थांच्या हालचालीमुळे देशात एक असे वातावरण बनले होते की ही मोठी घटना घडून गेली. आरएसएसच्या हालचाली सरकार आणि राज्याच्या अस्तित्वासाठी एक संकट आहे.’
    राहता राहिला प्रश्न देशाच्या विभाजनाचा तर त्यासंबंधी अनेक विद्वत्तापूर्ण पुस्तके आणि लेख उपलब्ध आहेत. जे वाचकांना फक्त विभाजनाच्या पार्श्वभूमीशीच परिचित करत नाहीत तर हे ही सांगतात की, विभाजन अनेक किचकट प्रक्रिया आणि कारणांमुळे झाले. तुम्ही तुमच्या सोयीने त्यातील एखादे कारण वेचून आपल्या मनाप्रमाणे चित्र तयार करू शकता. मुहम्मद अली जीन्नांच्या समर्थकांच्या दृष्टीकोनातून देशाच्या विभाजनासाठी काँग्रेस जबाबदार होती. मोदीही जीन्नांच्या समर्थकांप्रमाणे काँग्रेसलाच विभाजनासाठी जबाबदार धरतात. वास्तविक पाहता विभाजनामागे तीन प्रमुख कारणे होती. एक - इंग्रजांची फूट पाडा आणि राज्य करा निती. याबाबतीत असे म्हणता येईल की, इंग्रज भारतीयांना चांगल्या प्रकारे जाणून होते. त्यांना हे माहित होते की, भारतीय राजकीय नेतृत्वाचा कल समाजवादाकडे आहे आणि त्यांना भिती होती की स्वातंत्र्यानंतर भारत आंतरराष्ट्रीय समाजवादी नेतृत्व असणार्या रशियाकडे झुकेल. आपल्या साम्राज्यवादी हितांच्या रक्षणासाठी इंग्रजांची अशी इच्छा होती दक्षिण आशियातील एक देश कायम त्यांच्या पाठीमागे रहावा आणि पाकिस्तानने ही भूमिका चांगल्या प्रकारे वठविली. पाकिस्तानमुळे ब्रिटिशांना आपले उद्देशपुर्ती करणे सहज शक्य झाले. दूसरे कारण असे की,  सावरकर जे की, मोदीच्या विचारधारेचे मूळ प्रतिपादक होते. त्यांनी द्विराष्ट्राच्या सिद्धांताची मांडणी केली होती. तीसरे कारण असे की, जीन्नांचीसुद्धा हीच भूमिका होती की मुस्लिम एक वेगळे राष्ट्र आहे. म्हणून त्यांचा एक वेगळा देश असावयास हवा.
    ’गिल्ट मेन ऑफ इंडियाज पार्टीशन’ या पुस्तकाचे लेखक लोहिया लिहितात की, ’ हिंदू कट्टरवाद त्या शक्तींमध्ये सामील होता ज्यांनी देशाचे विभाजन केले. जे लोक आज ओरडून अखंड भारताची मागणी करीत आहेत. अर्थात जनसंघ (भाजपचा पूर्व अवतार) आणि त्यांच्या पूर्ववर्तीयांनी जे हिंदू धर्मातील बिगर हिंदू परंपरेचे वाहक होते यांनी भारताच्या विभाजनासाठी इंग्रज आणि मुस्लिम लीगची मदत केली होती. त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांना एकत्र आणून देश एकसंघ ठेवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. उलट त्यांनी हिंदू आणि मुस्लिमांचे परस्पर संबंध खराब करण्यासाठी शक्यतो सगळे प्रयत्न केले आणि दोन समुदायातील हेच मतभेद विभाजनाचे मूळ कारण ठरले. वेळेबरोबर जीन्नांनीही मग पाकिस्तानच्या आपल्या मागणीवर ठाम राहत आपली आडमुठी भूमिका कायम ठेवली. नेहरूंनी कॅबिनेट मिशन योजनेला ते बांधिल नाहीत हे स्पष्ट केल्यानंतर तर जीन्नांनी पाकिस्तान निर्मितीसाठी स्पष्ट भूमिका घेतली. आणि आपल्या या भूमिकेपासून मागे हटणार नसल्याचे स्पष्ट केले.
    ज्यावेळेस इंग्रज हे कुटिल डाव खेळत होते त्यावेळेस महात्मा गांधी हिंदू आणि मुस्लिमांच्या मध्ये पेटलेल्या हिंसेच्या आगीला शमविण्यात व्यस्त होते. त्यांनी विभाजनाचा मुद्दा हाताळण्यासाठी आपले दोन विश्वस्त सहकारी सरदार पटेल आणि नेहरू यांना नेमले होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी आपले विद्वत्तापूर्ण पुस्तक, ’ इंडिया विन्स फ्रिडम’ मध्ये म्हटलेले आहे की, ”सरदार पटेल हे पहिले प्रमुख काँग्रेसी नेता होते ज्यांनी भारताच्या विभाजनाच्या इंग्रजांच्या योजनेचे समर्थन केले.” मौलाना आझाद यांनी विभाजनाच्या योजनेचा कधी स्विकार केला नाही. शेवटी गांधींनी मोठ्या खिन्न मनाने विभाजनाच्या योजनेला स्विकृती दिली. तरीसुद्धा त्यांना ही आशा होती की, भारत कधी ना कधी पुन्हा एक देश होईल. मोदींच्या मंत्रीमंडळातील एक मंत्री एम.जे. अकबर यांनी नेहरूवरील आपल्या पुस्तकात ज्याचे नाव ’ नेहरू-द मेकिंग ऑफ इंडिया’ (1988) आहे. मध्ये लिहिलेले आहे की,”भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रणयी नेहरूंच्या फारपूर्वी देशाच्या विभाजनाचा स्वीकार केला होता.” (पान क्रं. 406).
    आपल्या सर्वांना हे ही माहित आहे की, मोदींच्या पक्षाचेच एक मोठे नेते जसवंत सिंग यांनी आपले पुस्तक,’ जीन्नाह-पार्टीशन-इंडिपेन्डन्स’ मध्ये सरदार पटेलांच्या भूमिकेची चर्चा करताना लिहिले आहे की, ’पटेलांनी निर्माण झालेल्या परिस्थितीसमोर लवचिक भूमिका घेवून विभाजनाचा स्वीकार केला.’ हेच कारण आहे की, गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री मोदी यांंनी या पुस्तकावर आपल्या राज्यात बंदी घातली होती.
    काश्मीर खोर्याच्या प्रश्नाबाबत जेवढे कमी बोलले जाईल तेवढे चांगले. हा प्रश्न ऐतिहासिक परिस्थितीची देण आहे. काश्मीर एक मुस्लिम बहुल राज्य होते. परंतु, ते राज्य पाकिस्तानात जावू इच्छित नव्हते. पाकिस्तानी सेनेच्या सह्योगाने काही टोळ्यांद्वारा काश्मीरवर आक्रमण झाल्यानंतर महाराजा हरिसिंग यांनी भारताची मदत मागितली होती. शेख अब्दुल्ला यांना वाटत होते की, भारताने मदत करावी. या प्रश्नावर पटेल आणि नेहरू यांचाही विचार एकच होता. मात्र पटेल काश्मीर खोर्यावर भारताचा दावा सोडण्यासाठी तयार होते. राजमोहन गांधी यांनी पटेलांचे चरित्र ’पटेल-ए-लाईफ’ लिहिले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की, पटेलांची अशी भूमिका होती की, जीन्नाह जर हैद्राबाद आणि जुनागड यांना भारतात विलीन होण्यासाठी मान्यता देत असतील तर काश्मीरचे पाकिस्तानात विलय करण्यासाठी त्यांना कुठलीही आपत्ती नव्हती. त्यांनी जुनागडच्या बहाउद्दीन महाविद्यालयात दिलेल्या एका भाषणाचा दाखला देत म्हणतात की, ” हम कश्मीर पर राजी हो जाएंगे, अगर वो हैद्राबाद के बारे में हमारी बात मान ले” (पान क्र. 406-408). हे भाषण सरदार पटेल यांनी भारतामध्ये जुनागडच्या विलीनीकरणानंतर दिले होते.
    नेहरू आणि पटेल यांच्या संबंधाबाबतीत सर्वात महत्वपूर्ण कथन राष्ट्रपिताच्या महात्मा गांधींचे आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना एकदा त्यांनी म्हटले होते की, ”मोटे तौर पर कहें तो कश्मीर समेत सभी मामलों में पटेल और नेहरू की सोंच एक जैसी थी.’ मोदी एक खोटी गोष्ट पुन्हा-पुन्हा सांगून तिला खरी सिद्ध करू पहात आहेत. ते ही फक्त यासाठी की, त्यात त्यांना स्वतःचा लाभ दिसतो.
    (लेखातील काही संदर्भ सुधिंद्र कुलकर्णी लिखित पुस्तक ’मोदीज् डिसलाईक फॉर नेहरू कॅन नॉट ओब्लीटिरेट द फॅक्टस्’मधून साभार).
    (सदर लेखाचा इंग्रजीतीतून हिंदी अनुवाद अमरिश हरदेनिया व हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख यांनी केले.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget