Halloween Costume ideas 2015

शिवरायांचे निष्ठावंत मुस्लिम मावळे

–सुनीलकुमार सरनाईक
शिवरायांच्या पदरी अनेक मुस्लिम सरदार, वतनदार, चाकर, सैनिक होते. स्वराज्य उभारणीसाठी असंख्य मुस्लिम  सैनिकांनी शिवरायांना प्रामाणिकपणे मदत केली. त्यामध्ये स्वकीय मुस्लिम होते. तसेच शत्रूकडील मुास्लिम देखील होते. त्यांनी शिवरायांना युद्धात मदत केली. सुख-दु:खात मदत केली. शिवरायांचे नेतृत्व त्यांनी आनंदाने आणि निरपेक्ष भावनेने मानले. `शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरुद्ध होते.' `ते हिंदू धर्मरक्षक होते.' `हिंदू पदपातशहा होते.', `गोब्राह्मण प्रतिपालक होते'' अशी प्रतिमा रंगवून छत्रपती शिवरायांना एका ठराविक चौकटीत बसविण्याचा आजवर अनेकांनी प्रयत्न केला आहे. पण शिवरायांच्या पदरी असणारे निष्ठावंत व नेक दिलाचे इमानदार मुस्लिममावळे पाहिल्यावर तसेच तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केल्यावर उपरोक्त प्रतिमेचे खंडन होते.
१) सिद्दी अंबर वहाब : हे हवालदार असून १६४७ साली कोंडाणा किल्ला जकिंण्यास सिद्दी अंबरने राजास मदत केली.
२) नूरखान बेग : हे शिवरायांच्या सैन्याचे पहिले सरनोबत होते. त्यांनी स्वराज्य उभारणीसाठी शत्रूबरोबर प्राणपणानेला दिला.
३) सिद्दी इब्राहीम : हे शिवरायांचे अंगरक्षक होते. अंगरक्षक हे सर्वात महत्त्वाचे पद आहे. अशी महत्त्वाची जबाबदारी ज्या अंगरक्षकांकडे होती त्यामध्ये सिद्दी इब्राहीम एक होते. अफजल खान भेटीच्या प्रसंगी सिद्धी इब्राहीम यांनी राजांचे अंगरक्षण केले, तर कृष्णाजी कुलकर्णींने शिवरायांच्या कपाळावर तलवारीचा वार केला. १६७५ च्या एप्रिलात सिद्दी इब्राहीम यांनी सुरुंग लावून फोंड्याचा किल्ला जकिंला. तेव्हा राजांनी सिद्धी इब्राहीमचा सत्कार केला व त्यांची फोंड्याच्या किल्लेदारपदी नेमणूक केली.
४) सिद्दी हिलाल : हे शिवरायांच्या घोडदलात सेनापती होते. शिवाजीराजे पन्हाळा येथे अडकले असताना राजांच्या सुटकेसाठी सिद्धी हिलालने सिद्दी जौहर बरोबर लढा दिला. उमराणीजवळ प्रतापरावांच्या सोबत बेहलोलखानाशी लढा दिला.
५) सिद्दी वाहवाह : हे सिद्दी हिलालचे पुत्र असून वडिलांच्यासोबत ते शिवरायांच्या सैन्यात होते. सिद्दी जौहरशी लढताना ते जखमी झाले, त्यांना कैद करण्यात आले. शिवरायांची सुटका व्हावी, यासाठी या युवकाने प्राण गमावले, पण सिद्दी जौहरला शरण गेला नाही.
६) रुस्तुमेजमान : रुस्तुमेजमान हे शहाजीराजांचे जिवलग मित्र रनदुल्लाखान यांचे पुत्र होते. तसेच ते शिवाजीराजांचे आदिलशाही दरबारातील जिवलग मित्र होते. अफ जलखान ठार मारण्याच्या इराद्याने निघालेला आहे. ही खात्रीलायक बातमी राजांना प्रथम रुस्तुमेजमानने सांगितली. रुस्तुमेजमानने राजांना हुबळीच्या ल्यात मदत केली. तसेच सिद्दी मसऊदच्या संकटाची बातमी राजांना प्रथम रुस्तुमे जमाननेच सांगितली. रुस्तुमे जमानने राजांना प्रामाणिक मदत केली व स्वराज्य उभारणीस हातभार लावला.
७) मदारी मेहत्तर : मदारी मेहत्तर हे राजांचे विश्वासू मित्र होते. १७ ऑगस्ट १६६३ रोजी आग्राच्या सुटकेप्रसंगी मदारीने प्राण धोक्यात घालून राजांना मदत केली. त्यात मदारी पकडले गेले. औरंगजेबाच्या सैनिकांनी मदारीला पाट फुटेपर्यंत मारले पण मदारीने राजे कोठे गेले सांगितले नाही. अशा निष्ठावान मित्राला राजांनी स्वराज्यातील उच्चपद घेण्याचा आग्रह केला. तेव्हा मदारीने विनम्रपणे नकार दिला आणि सिंहासनावरची चादर बदलण्याचे काम घेतले.
८) काझी हैदर : हे शिवरायांचे १६७० ते ७३ पर्यंत वकील होते. त्यानंतर राजांचे खाजगी सचिव झाले. फारसी पत्रलेखनाची जबाबदारी राजांनी त्यांचेवर सोपविली. वकील, सचिव, पत्रलेखक इत्यादी महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळणारे काझी हैदर राजांचे किती विश्वासू मित्र असतील, याचा वाचकांनीच विचार करावा.
९) शखा खान : हे शिवरायांचे सरदार होते. मोगलांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी शखाखानने प्राणाची बाजी मारली.
१०) दौलतखान : हे शिवरायांच्या आरमारदलाचे प्रमुख होते. यांनी १६८० साली उंदेरीवर हल्ला केला. पराक्रम गाजविला. १६७४ साली सिद्धी संबुलचा पराभव केला.
११) दर्यासारंग : हे शिवरायांच्या आरमाराचे सुभेदार होते. यांनी खांदेरीवर विजय मिळविला. बसनूर जकिंण्यास मदत केली.
१२) हुसेनखा मियाना : हे शिवरायांच्या लष्करातील अधिकारी होते. यांनी मसौदखानाच्या अदोनी प्रांतावर हल्ला केला व १६७१ साली बिळगी, जमिंखड आणि धारवाड जिंकले.
१३) इब्राहीम खान : हे आरमारातील अधिकारी होते. दर्यासारंग यांच्याबरोबर शत्रूशी लढा दिला.
१४) सिद्धी मिस्त्री : हेदेखील शिवरायांच्या आरमारातील अधिकारी होते.
१५) सुलतान खान : हे आरमारात अधिकारी होते. तर १६८१ साली सुभेदार झाले.
१६) दाऊत खान : हेदेखील आरमारात सुलतान खानानंतर सुभेदार झाले. पोर्तुगीजांकडून दारुगोळा मिळविला.
१७) इब्राहीम खान : हे राजांचे तोफखानाप्रमुख होते. अनेक लायात तोफांचा वापर करुन शत्रूला पराभूत करण्यात इब्राहीम खानाचा मोठा वाटा आहे.
१८) चित्रकार मीर महंमद : हे शिवकालीन चित्रकार असून शिवाजीराजांचे जगातील पहिले आणि प्रत्यक्ष चित्र मीर महंमद यांनीच रेखाटले. मीर महंमद यांनी शिवाजीराजांचे चित्र नसते रेखाटले तर आज आपणाला राजांचे खरे चित्र उपलब्ध झाले नसते.
१९) मौनीबाबा आणि बाबा याकूत : पाटगावचे मौनीबाबा आणि केळशीचे बाबा याकूत हे मुस्लिमसंत शिवरायांचे हितिंचतक होते. त्यांच्या भेटीसाठी शिवाजीराजे पाटगावला आणि केळशीला अनेकवेळा गेले. त्यांनी शिवरायांना मोलाचे मार्गदर्शन केले होते.
    या सर्वांहून एक महत्त्वाचा अस्सल पुरावा आहे. त्यावरुन मुस्लिमधर्मीय शिपायांबद्दलचे शिवाजी महाराजांचे  धोरणच स्पष्ट होते. रियासतकार सरदेसाई यांच्या `शककर्ता शिवाजी' या पुस्तकातील हा उतारा पाहा,
    ``....सन १६४८ च्या सुमारास विजापूरच्या लष्करातले पाचसातशे पठाण शिवाजींकडे नोकरीस आले. तेव्हा गोमाजी नाईक पानसंबळ याने त्याला सल्ला दिला, तो फार चांगला म्हणून शिवाजीने मान्य केला व पुढे तेच धोरण ठेवले. नाईक म्हणाला,
    ``तुमचा लौकिक ऐकू न हे लोक आले आहेत त्यास विन्मुख जाऊ देणे योग्य नाही. हिंदूचाच संग्रह करु, इतरांची दरकार ठेवणार नाही अशी कल्पना धरिली तर राज्य प्राप्त होणार नाही. ज्यास राज्य करणे त्याने अठरा जाती, चारी वर्ण यांस आपापले धर्माप्रमाणे त्यांचा संग्रह करुन ठेवावे.'' १६४८ मध्ये अजून शिवाजीचं संपूर्ण राज्य स्थापन व्हावयाचं होतं. स्थापन करण्यासाठी काय धोरण होते हे वरील स्पष्ट आधारावरुन व्यक्त होतं.
    ग्रँड डफ नेसुद्धा त्यांच्या शिवाजीवरील चरित्र ग्रंथात पृष्ठ १२९ वर गोमाजी नायकाच्या सल्ल्याचा उल्लेख करुन म्हटले आहे की....
    ''शिवाजीचे सरदार व शिवाजीचे सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते. त्यात मुस्लिमधर्मीयांचासुद्धा भरणा होता. हे यावरुन स्पष्ट व्हावे. शिवाजी हा मुस्लिमधर्म नाहीसा करण्याचे कार्य करीत असता तर हे मुस्लिमशिवाजीच्या पदरी राहिले नसते. शिवाजी मुस्लिमराज्यकत्र्यांचे जुलमी राज्य नाहीसे करायला निघाला होता. रयतेची काळजी वाहणारे राज्य आणायला निघाला होता. म्हणून मुास्लिमसुद्धा त्याच्या या कार्यात सहभागी झाले होते.’’
    धर्माचा प्रश्न मुख्य नव्हता. राज्याचा प्रश्न मुख्य होता. धर्म मुख्य नव्हता. राज्य मुख्य होते. धर्मनिष्ठा मुख्य नव्हती. राज्यनिष्ठा व स्वामीनिष्ठा मुख्य होती. ज्याप्रमाणे शिवरायांच्या पदरी मुस्लिमसरदार व मावळे होते, तसेच मुस्लिमराजवटीत शहेनशहांच्या पदरी अगणित मराठे, हिंदू सरदार व सैन्य होते.
    प्राचीन व मध्ययुगीन भारतात धर्मामुळे किंवा धर्मासाठी लाया होत नव्हत्या, राज्य मिळविणे व ते टिकविणे हेच मुख्य कारण होते, अर्थात त्याकाळी `धर्मबुडवे', `धर्मकेष्टे' किंवा `मुास्लिमधार्जिणे' असे कुणी म्हणत नव्हते, धर्मनिष्ठेपेक्षा स्वामीनिष्ठेला फारच महत्त्व व मान्यता होती.
(लेखक भारत सरकारतर्फे  स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित असून  लोकसाहित्याचे अभ्यासक आहेत.)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget