Halloween Costume ideas 2015

नशा करी दुर्दशा!

- मिनहाज शेख
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी सांगितले आहे की, ‘‘नशा आणणारी प्रत्येक वस्तू निषिद्ध आहे की जी तुमच्या अकलेला झाकून टाकते.’’
                                 (हदीस : इब्ने माजा)
प्रेषितांच्या या कथनातून हे सिद्ध होते की नशेच्या व व्यसनाच्या सर्व गोष्टी मनुष्यासाठी वाईट, पाप मानल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये पुढील सर्व गोष्टींचा समावेश होतो. जसे- दारू, चरस, गांजा, तंबाखू, विडी, सिगरेट, अफीम, गुटखा, ड्रग्ज इ.
    आज आपल्या समाजाला अधोगतीला नेणाऱ्या कारणांमध्ये ‘व्यसन’ एक प्रमुख कारण आढलते. विशेषत: तरुणवर्गामध्ये. म्हणजे अल्लाहने माणसाला जे काही कौशल्य, शक्ती, पैसा, वेळ, कार्यक्षमता या चांगल्या गोष्टी समाजकल्याणासाठी दिल्या, त्या सत्कारणी न लावता त्या व्यसननाच्या चक्रव्यूहात अडकून वाया जात आहेत. कारण कोणत्याही गोष्टीचे व्यसन हा एक आजार आहे. तो बाटलीमध्ये विकला जातो, टी.व्ही.वर दाखविला जातो आणि स्टंट्स सिंबॉल म्हणून मिरविला जातो.
वस्तुस्थिती दर्शविणारे काही मुद्दे-
 सर्वांत जास्त शिविगाळ करणारे – दारूडे.
 सर्वांत जास्त अपराध्यांचे प्रमाण – नशेच्या अंमलाखाली.
 खून, मारामारी, चोरी इ. घटना – नशेच्या अंमलाखाली
 नात्याच्या मुली व स्त्रियांवर बलात्कार – नशा करणारे नातेवाईक.
 आईवडिलांवर हात उचलणारे – नशेखोर मतीभ्रष्ट अपत्ये.
    या काही ठळक वस्तुस्थितींचे परीक्षण करा तेव्हा लक्षात येईल की एक सामान्य व्यक्ती नशेच्या प्रभावाखाली कशी शैतानी कृत्ये करतो. विज्ञानाच्या आधारेसुद्धा ही गोष्ट सिद्ध झाली आहे. त्यानुसार आपल्या मेंदूमध्ये ‘इनहिबिटरी सेंटर’ नावाचे एक केंद्र असते, जे आपल्या योग्य-अयोग्य गोष्टींची समज देत असते. उदा.: एका सामान्य माणसाला लघुशंकेची गरज निर्माण झाली तर तो सर्वांसमोर न करतो रोखून ठेवतो. परंतु नशेच्या अंमलाखाली असलेली व्यक्ती असे कृत्य कुठेही व कधीही करू शकते, कारण तिचा मेंदू सक्षम निर्णय घेऊ शकत नाही आणि याच अवस्थेमध्ये व्यसनी मनुष्य अति वाईट गोष्टी वा गंभीर गुन्हे सहज करीत असतो. उदा.: स्वत:च्या मूलीवर बलात्कार करणाऱ्या ९९ टक्के व्यक्ती नशेच्या अंमलाखाली असल्याचे आढळून आले आहे. अशा माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी आज होत आहेत, हे आमचे दुर्दैवच म्हणावे लागेल.
    एक कुटुंब दारूच्या व्यसनामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेले असल्याचे मनात आणा. पत्नी विधवा, मुले झोपडपट्टीत फिरणारी... वगैरे. निश्चितच क्षणार्धात अशी बरीच उदाहरणे आपल्या डोळ्यांसमोर तरळून गेली असतील! मग ती नात्यातील, मित्रांपैकी, शेजारी अथवा कामवालीच्या घरातील असो. आज तंबाखू, सिगारेटमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण इतर आजारांपेक्षा जास्त आहे. उलट अशा घटनांमध्ये मरणारी व्यक्ती आपल्या कुटुंबालादेखील मरणयातना देऊन जाते. पत्नीला मारहाण होते, मुलांचे शिक्षण सुटते. एका आदर्श समाजाचे भवितव्य बनू पाहणारी मुले मानसिकदृष्ट्या कमकुवत होतात.
    हदीसमध्ये एका प्रसंगाचा उल्लेख आला आहे तो असा,
    एकदा एका सदाचारी पुरुषाला एक स्त्री अनैतिक संबंधासाठी बोलविते, पण तो पुरुष त्यास नकार देतो. तेव्हा ती त्या पुरुषाला बळजबरीने घरात ओढते आणि त्याच्यासमोर तीन पर्याय ठेवते- एक तर तू माझ्याबरोबर शरीरसंबंध ठेव, दुसरा पर्याय तिच्याकडे एक लहान मूल असते त्याची हत्या कर किंवा तिसरा पर्याय म्हणजे तिच्याकडे जी मदिरा आहे तिचे प्राशन कर. तेव्हा तो भला माणूस विचार करतो की पहिल्या दोन पर्यायांपेक्षा तिसरा पर्याय कमी पापाचा आहे. म्हणून तो मदिरा पितो आणि पीतच जातो. मग त्या नशेच्या अवस्थेत तो तिच्याबरोबर संबंधदेखील ठेवतो आणि त्या लहान मुलाची हत्याही करतो. यावरून कळते की नशा कशा प्रकारे इतर गुन्ह्यांचे मूळ आहे.
    महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमची तरुण पिढी सिगारेट ओढण्यासारख्या सवयींना व्यसन मानत नाही. ते हे किरकोळ कृत्य असल्याचे समजते. त्यांना हे व्यसन हौस व मजा वाटते. हीच मजा फुप्फुस, हृदय, किटनी, लिव्हर सगळे काही नष्ट करून टाकते. तंबाखू आणि गुठख्यामुळे होणारे वॅâन्सर सर्वांत जास्त नोंदविले गेले आहेत.
    ‘मी फक्त सोशल ड्रकिंर आहे’ असे म्हणणाऱ्यांनी समजून घ्यावे की सर्वच पिणारे हे सुरूवातीला सोशल ड्रकिंर असतात किंवा चेन स्मोकिंग करणारेदेखील सुरूवातीला कधीतरी ओढवणारेच असतात.
    ‘‘आपल्या हातांनी आपला सत्यानाश करू नका.’’ (कुरआन, २:१९५)
    माणूस स्वत:हून स्वत:ला कधी हातोडा मारून घेतो का? सुरीवर पाय ठेवतो का? नाही ना... मग या नशेच्या सवयीच्या परिणामाची कल्पना असूनही तो या जाळ्यात कसा ओढला जातो? इथे जबाबदजारी सरकारचीसुद्धा आहे. दारूमुळे समाजाचे किती नुसान होत आहे हे सरकारला का दिसत नाही? दारूबंदी केल्याने समाजातील इतर बऱ्याच समस्या कमी होतील हे माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. कारण सरकारच्या तिजोरीत दारूवरील कर जमा होतो... अरे! जेवढ्या मोठ्याने ओरडून तुम्ही मांसाहाराचे तोटे सांगता, तेवढी मेहनत दारूसाठी लावाल तर खरेच समाजाचे भले होईल हो! इतर काही देशांत सरकारने दारूबंदी केलेली आहे. त्यांचे उदाहरण सरकारने घ्यावे. फक्त वर्षातून दोनदा ‘ड्राय डे’ साजरा करून काय पदरी पडणार?
    ‘दारू व सिगारेट हे तुमच्या तब्बेतीसाठी हानिकारक आहे.’ बस्स... फक्त एवढे लहानशा अक्षरांत छापायचे आणि जबाबदारीपासून हात झटकून मोकळे व्हायचे एवढीच आमच्या सरकारीच भूमिका!
    समाजाला नशेपासून मुक्त करण्यासाठी आम्ही काय करू शकतो?
१)    नशा किंवा व्यसन ही एक दलदल आहे. यातून बाहेर पडणे खूप अवघड असते. म्हणून मुलांना त्या दलदलीकडे जाण्यापूर्वीच रोखले पाहिजे. आपण त्यांना सर्व जगाचे शिक्षण देतो, पण कुरआनच्यिा शिकवणीकडे तितके लक्ष देत नाही. त्यांच्या कोवळ्या वयातच त्यांच्यावर सालेय शिक्षणासह त्यांना नैतिक शिक्षणही दिले जावे. नशेच्या गोष्टी वाईट आणि वाईटच आहेत हे संस्कार त्यांच्या मनावर बिंबविले पाहिजेत, जेणेकरून तरुण वयात जर का त्यांच्यासमोर या गोष्टी आल्या आणि येणारच, तर त्यांनी गंभीरतेने विचार करून यापासून दूर राहावे.
२)    मुलांना सतत रागविणे, दबाव टाकणे, अपेक्षा लादणे, त्यांना वेळ न देणे, या गोष्टी आजकाल खूप वाढल्या आहेत. पाल्य व पालक दोघांचाही संयमाचा आलेख खालावला आहे. अशा स्थितीत ज्या मुलांना, तरुणांना घरी परिपूर्ण वातावरण मिळत नाही ती मुले बाहेर भरकटण्याची, नशेच्या आहारी जाण्याची शक्यता जास्त असते. त्या उलट घरात एक सुरक्षित आनंदित वातावरण निर्माण करावे. मुलांना इतका वेळ व हिंमत द्यावी की उद्या जर एखाद्या वेळी त्यांच्या बाबतीत काही चूक घडलीच, जसे- नापास होणे, व्यवसायातील अपयश, इ. तर त्यांनी तुम्हाला ते सर्व मनमोकळेपणाने सांगावे. नाहीतर चुकीच्या मित्रांमध्ये या भावना ते व्यक्त करतात आणि नशेकडे ओढले जाऊ शकतात.
३)    सर्वांत महत्त्वाचे म्हणजे जर का पालकांना समजलेच की आपला मुलगा वा मुलगी नशेच्या आहारी गेले आहेत, तर मग पुढे काय? अशा बिकट परिस्थितीत संयमाने काम घेतले पाहिजे, द्वेषाने नव्हे.
हजरत उमर (रजि.) यांचे याबाबतीत खूप मोलाचे विचार हदीसच्या पुरस्तकात आढळतात. ते म्हणतात, अशा व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला समजविण्याचा प्रयत्न करा. त्याला अल्लाहची दया व शिक्षा दोन्ही गोष्टींचा भरवसा द्या आणि अल्लाहची क्षमा मागा आणि या उलट त्या व्यक्तीला तुम्ही भलेबुरे बोलू नका, त्याला संताप व राग देऊ नका. नाही तर तो दूर निघून जाईल आणि शैतानची मदत होईल आणि त्याचे काम जास्त सेपे होईल.
    अशा व्यक्तीसाठी ‘समुपदेषन केंद्र’ व ‘व्यसन मुक्ती केंद्र’ इत्यादी काही सामाजिक संस्था कार्य करत आहेत. त्यांची मदत घ्यावी. या सर्वांमध्ये आयुष्यातील काही महत्त्वाचा काळ खर्ची जातो, पण तोल गेलेला माणूस स्वत:ला सावरायला शिकतो.
४)    कुरआनच्या पहिल्याच अध्यायात अल्लाहकडे मनुष्य प्रार्थना करतो की ‘मला सरळमार्ग दाखव.’ (१:५)
    मग एकदा का हा सरळमार्ग आम्हाला मिळाला तर तिथे ठाम राहा आणि नुसते तिथे थांबू नका तर चालत राहा आणि आपल्या बरोबरच इतर सर्वांनाही या मार्गावर बोलवा. हेच कुरआन सांगतो.
    जागतिक आरोग्य संस्थेच्या सर्वेक्षणानुसार,
 प्रत्येक ९६ मिनिटाला एका भारतीयाचा मृत्यू दारूमुळे होतो.
 रोज ९० आत्महत्या नशेच्या अंमलाखाली भारतात होतात.
 ७२ टक्के अपघात दारू पिलेल्या चालकांमुळे होतात.
 ४० टक्के कर्करोग तंबाखू सेवनामुळे होतात, तोंडाचे, घशाचे कर्वâरोग.
 रोज ५०० नवीन मुले / तरुण अंमली पदार्थांच्या आहारी जातात.
 १० दशलक्ष भारतीय अंमली पदार्थांचे सेवन करतात. ही संख्या स्वीडन या देशाच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget