Halloween Costume ideas 2015

पर्यावरण संरक्षण आणि नैतिक मूल्ये (भाग १)

इस्लाम हा निसर्गाचा धर्म आहे. इस्लामने मानवतेला नैसर्गिक गरजा आणि उद्दिष्टांमध्ये मूलभूत तत्त्वांद्वारे मार्गदर्शन केले आहे. त्याच जीवनावश्यक गरजांमध्ये पर्यावरण हेदेखील आहे, ज्यावर जैवविविधतेचे अस्तित्व अवलंबून आहे. मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्तीच्या विनाशामुळे पर्यावरण प्रदूषित होते. यामागील प्रमुख कारण म्हणजे अज्ञान आणि ईश्वराची भीती नसणे होय. अज्ञानामुळे पर्यावरणाला हानिकारक बाबींची ओळख पटत नाही, पर्यावरणाचा Nहास झाल्याने कोणती हान्ी होते हे माहीत होत नाही, याची कारणमीमांसा करून त्यावर उपाययोजना करणे अतिशय आवश्यक आहे. स्वार्थ आणि मनात ईशभय नसल्याकारणाने एखादी व्यक्ती समाजहितापेक्षा स्वहिताला प्राधान्य देतो. जे काही तो करीत आहे त्यामुळे जैवविविधता आणि पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे माहीत असूनसुद्धा वैयक्तिक हितांचा पाठलाग करताना तो त्यांच्यावर खूश असतो, अशी परिस्थिती आहे.
जर मनामध्ये ईशभय असते तर स्वार्थापोटी इतरांना हानी पोहोचविली नसती. खरे तर दुदैवाने प्रदूषणाला लोकांनी वायू प्रदूषण, जल प्रदूषण, जमीन प्रदूषण, माती प्रदूषण आणि घाणेरडेपणापर्यंतच मर्यादित करून ठेवले आहे. नैतिक प्रदूषण, धार्मिक प्रदूषण, आर्थिक प्रदूषण, राजकीय प्रदूषण, शैक्षणिक प्रदूषण आणि सामाजिक प्रदूषण याकडे फारच थोड्या लोकांचे लक्ष आहे. विशेषत: काही लोकांनी त्यात फक्त पहिल्या भागाचाच समावेश केला आहे, मात्र ते तसे नाही. पर्यावरणावरणाला हानी मानसिक व नैतिक आणि दुसरा शारीरिक. जेव्हा आर्थिक परिस्थिती प्रतिकूल आणि असमान असते, घरची परिस्थिती चांगली नसते, मानवाला मूलभूत गरजांची पूर्तता होत नसते, समाजाची नैतिक स्थिती ढासळते तेव्हा मानसिक आणि नैतिकदृष्ट्या मनुष्यावर वातावरणाचा नकारात्मक परिणाम होतो. चोहीकडे आढळणाऱ्या घाण व प्रदूषणामुळे माणसाला जीवन असह्य होऊन बसते. जेथे योग्य आहार उपलब्ध नाही, जेथे योग्य अशा कपड्यांची उपलब्धता नाही, राहाण्यासाठी छत उपलब्ध नाही, स्वच्छतेची व्यवस्था नाही, सर्वत्र घाणीचे ढीगच ढीग आढळतात आणि दुर्गंधयुक्त पाण्याचे तलाव आणि घाणीने भरलेले नाले दिसतात अशा परिस्थितीत मानवावर शारीरिक व मानसिकदृष्ट्या वाईट परिणाम होतो.
म्हणूनच इस्लामने सर्व प्रकारचे वातावरण स्वच्छ व निर्मळ ठेवण्याचा आदेश दिला आहे, जेणेकरून माणूस त्यात मानसिक, नैतिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी दिसू शकेल आणि ही काही वर्षे सुखात जगेल.
इस्लाम (जो स्वाभाविक स्वरूपात कुरआन आहे आणि व्यावहारिकदृष्ट्या पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या आचरणपद्धतींचा आहे) ने मानवास एक शांत आणि सुखमय वातावरण प्रदान करण्याची संपूर्ण व्यवस्था केली आहे. परंतु इस्लामने आंतिरक आणि मानसिक शुद्धतेसह पर्यावरणाच्या स्वच्छतेची सुरूवात केली आहे. त्याला प्रथम मनुष्याचे हृदय आणि मन सर्व प्रकारच्या अशुद्धतेपासून मुक्त पाहू इच्छितो आणि त्यातील महत्त्वाची बाब म्हणजे मानवी हृदय आणि मन सकारात्मक व नकारात्मक विचारांचे मिश्रण आहे. जर हे चांगल्या कल्पाना व सद्विचारांचे पालन करीत असतील तर चांगले आणि सत्कर्म मनुष्यांच्या हातून होत राहातील, परिणामत: हृदयाची व मनाची शांतता लाभेल. म्हणूनच इस्लामने मानवी मन व हृदय चांगल्या व पवित्र विचार आणि कल्पनांमध्ये व्यस्त ठेवण्यासाठी योग्य अशी व्यवस्था केली आहे आणि असे करण्यासाठी श्रद्धा आणि विश्वासाची आवश्यकता असते. जी माणूस खरी श्रद्धा व विश्वास योग्यरित्या बाळगतो त्याला ‘मोमीन’ (श्रद्धावंत) म्हणतात. आणि जो एकमेव अल्लाहवर श्रद्धा व विश्वास बाळगतो तोच खरोखरच श्रद्धावंत असतो. अर्थात तो एकच ईश्वर आहे, संपूर्ण सृष्टीचा तो निर्माणकर्ता, मालक आणि पालनकर्ता आहे. मृत्यू आणि जीवन त्याच्याच हातात आहे. तो मान आणि अपमान देतो. ज्याला एक कठीण गरज आहे. तोच इच्छा पूर्ण करणारा ईश्वर आहे.
(भाग १) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
मो. : ८९७६५३३४०४

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget