Halloween Costume ideas 2015
July 2020

कर लो दुनिया मुठ्ठी में’चा नारा लगावत भारतातील उद्योगपती श्रीमंत धिरुभाई अंबानी यांनी लावलेल्या ‘रिलायन्स’च्या रोपट्याचे आता वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्यांचे सुपूत्र मुकेश अंबानी यांनी तर उद्योग जगतात गरुडभरारी घेतली आहे. आशिया खंडातील एक नंबरचे श्रीमंत उद्योगपती म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रिलायन्स जिओ भारत ही त्यांची देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. गुगल, फेसबूक या कंपन्या रिलायन्सच्या ‘जिओ’ बरोबर एकत्र येत आहेत. या पार्श्वभूमीवर  माहितीवहन करणाऱ्या, माहितीवर मालकी सांगणाऱ्या कंपन्या भारतात येत असताना, वैयक्तिक ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा आपल्याकडे नाही. ऊर्जा क्षेत्रात ’ऐन्रॉन’च्या गुंतवणुकीचे स्वागत करताना आपल्याकडे जसा त्या क्षेत्रातील नियमनाचा कायदेशीर आराखडाच नव्हता, तशीच आपली स्थिती आता आहे. त्यातच, आपली माहिती-तंत्रज्ञान बाजारपेठ तुलनेने नवथर आणि ’मोफत’, ’फुकट’, स्वस्त’ अशा्नलूप्त्यांना भुलणारी आहे! गूगल, फेसबुक, अ‍ॅमेझॉन वगैरेंनी भारतात काही करतो म्हटले की हुरळून जायची प्रथाच सध्या पडलेली दिसते. याबाबत माध्यमांत स्तुतिसुमने ओंजळीत घेऊन टपलेले अनेक असतात. आताही गूगलचे सुंदर पिलाई आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील चर्चेनंतर आणि मुख्य म्हणजे गूगलच्या भारतातील गुंतवणूक निर्णयांनंतर अनेकांच्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या आनंदलहरी अचंबित करणाऱ्या आहेत. अचंबित अशासाठी की ’आत्मनिर्भर’तेच्या घोषणेवरही हे आनंदी होणार आणि गूगलसारखी संपूर्ण आत्मकेंद्री कंपनी आपल्या देशात गुंतवणूक करणार असल्याच्या केवळ सुगाव्यानेही ते खूश होणार. हे दोन्हीही एकाच वेळी कसे असा प्रश्न पाडून घेण्याचा हा काळ नाही, हे लक्षात घेऊन या निर्णयाची चिकित्सा करायला हवी. कारण पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत डिजिटलायझेशन मोहिमेसाठी भारतात 75 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गूगल आपल्या सूचिबद्धदेखील नसलेल्या ’जिओ’ टेलिकॉममध्ये 33 हजार 700 कोटी रु. गुंतवणार असल्याची घोषणा मुकेशभाई अंबानी यांनी केली. ही बाब पुढे काय वाढून ठेवले आहे यासाठी पुरेशी सूचक ठरते.यात जाणवणारा पहिला मुद्दा म्हणजे गूगल, फेसबुक आदींची आताची गुंतवणूक आणि नरसिंह राव यांच्या पंतप्रधानकीच्या काळात झालेली एन्रॉन कंपनीची ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक यात एक साम्य आहे. ते असे की एन्रॉनच्या निमित्ताने आपल्या ऊर्जा क्षेत्रात परदेशी गुंतवणूक आली. परंतु ती आल्यानंतरही आपल्याकडे या गुंतवणुकीचे नियमन करणारी चौकट नव्हती. म्हणजे एन्रॉन  कंपनी आपल्या गुंतवणुकीचा परतावा ग्राहकांकडून कसा, कोणत्या दराने वसूल करणार वगैरे काहीही नियम आपल्याकडे त्या वेळी तयार नव्हते. एन्रॉन  आल्यानंतर पाच वर्षांनी हे नियम तयार करण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर तितक्याच वर्षांनी ते अमलात आले. तोपर्यंत एजॉन कंपनीवर गाशा गुंडाळायची वेळ आली होती. हे असे काही गूगल वा फेसबुक यांच्याबाबत होणार नाही. या कंपन्या तेव्हाच्या एनॉनपेक्षा किती तरी प्रबळ आहेत. पण हे साम्य या कंपन्यांपेक्षा आपल्याबाबत आहे. म्हणजे असे की गूगल, फेसबुक वगैरे माहितीवहन करणाऱ्या आणि माहितीवर मालकी सांगणाऱ्या कंपन्या भारतात येत असल्या तरी अद्यापही माहिती महाजालातील वैयक्तिक ग्राहकांच्या माहितीवरील मालकीच्या संरक्षणाचा कायदा आपल्याकडे अजूनही तयार नाही. गूगल, फेसबुक या कंपन्या आणि आता बरोबरीला रिलायन्स समूहाची ’ जिओ’ एकत्र येत असल्याने याचा समग्र विचार हवा. याचे कारण असे की खासगी किंवा व्यक्तिगत माहिती अधिकाराचा कायदा इतक्या वर्षांनंतरही आपल्याकडे तयार होऊ शकलेला नाही. या संदर्भात समित्या आदी नेमल्या गेल्या. त्यावर संसदेत चर्चाही झाली. पण सरकार गोळीबंद कायदा करण्यास अनुकूल नाही. तसा तो केल्यास या कंपन्यांकडील माहितीसाठ्यावर दावा सांगून घुसखोरी आणि नागरिकांवर पाळत ठेवण्याची सोय सरकारला राहणार नाही. याउलट या कंपन्या ज्या प्रदेशांतून भारतात येऊ इच्छितात त्या अमेरिका, युरोपीय देश आदींत नागरिकांचे हितरक्षण करणारे चोख व्यक्तिगत माहिती अधिकार आहेत. त्यामुळे या कंपन्यांवर त्या देश/ प्रदेशांत निबंध येतात. त्या मानाने भारतात त्यांना चांगलीच मोकळीक असेल. त्यात रिलायन्सची साथ असेल तर या कंपन्यांना अडवण्याची समस्त भारतवर्षांत कोणाची हिंमत होणार नाही. गूगल आगामी पाच-सात वर्षांत भारतात 75 हजार कोटी
गुंतवू इच्छितो. त्यानंतर बुधवारी ती कंपनी एकटया ’ जिओ’त 33 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार असल्याचे मुकेश अंबानी यांनी जाहीर केले. काही महिन्यांपूर्वी ’फेसबुक’नेदेखील याच कंपनीत साधारण अशाच काही रकमेच्या गुंतवणुकीची घोषणा केली. सध्या मोबाइलच्या माध्यमातून पैसे/बिले देण्याच्या सेवांमध्ये गूगल पे आघाडीवर आहे. या मोबाइल पेमेंटच्या बाजारपेठेत रांगेत आहे व्हॉट्सअ‍ॅप. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सअ‍ॅप या माहितीवहन सेवेलाही आपल्याकडे पैसे/बिले आदी देण्याची सुविधा हवी आहे.

- सुनीलकुमार सरनाईक
मो.: ७०२८१५१३५२
(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्टीय युवा पुरस्काराने व आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार साहित्यिक पुरस्काराने सन्मानित असून पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)

Students
शाळेतील लहान मुलांना काही ठराविक काळात जडणघडण विषयी चांगल्या सवयी किंवा चांगले संस्कार देणे अतिशय गरजेचे असते.साधारणपणे ५ ते १० वर्षातील शालेय मुलांना चांगल्यासवयी लवकर लागतात.
लहान मुलांचे मन अतिशय चंचल असते. लहानमुलं लगेच कृती, नक्कल किंवा खोड करायला शिकतात. कारण जे सवयी किंवा संस्कार लहान वयात होतात तेच त्यांच्या भविष्यात तरुणपणी दिसुन येतात. शाळेतील लहान मुलांवर करण्यात येणारा एक अतिशय महत्वाचा संस्कार म्हणजे त्यांना‘वाचन सवय संस्कार’लावणे. वाचन केल्यामुळे मुलांमधील जडणघडण उत्तम प्रकारे होते. वाचन केल्याने व्यक्तिमत्व विकास होते. वाचन केल्याने शब्द साठा वाढते, विचार करण्याची शक्ती मिळते, नवनवीन माहिती/ज्ञान मिळते, समाजातील चालूघडामोडी समजते, संभाषण कौशल्य वाढते, अभ्यास करायला मदत होते, समाजात उत्तम नागरिक बनते असे विविध फायदे फक्त आणि फक्त वाचन केल्यानेच होते. त्यामुळे मुलांच व्यक्तिमत्व अधिक खुलून येते. पालकांनी मुलांना हुशार, बुद्धिमान, विचारिक, चंचल व्हावं असं जर वाटत असेल तर अगदी लहानपणा पासूनच त्यांना वाचनाची सवय लावणे. आजकाल मात्र पालक व घरातील ईतर मंडळी सुध्दा वाचनापासून दुरावतांना दिसत आहे. त्यांना वाचनाची सवय राहिलेली नाही असे दिसुन येत आहे. समाजातील लोकांन बरोबर घरातील पालकवर्ग सुध्दा वाचायला वेळच मिळत नाही असं रोक ठोक उत्तर देतांना दिसत आहे. खंरतर पालकांनी घरातच मुलांना वाचनाची सवय लावू शकतात उदा. मुलांना वाचून दाखवणे, मुलांन कडून वाचून घेणे, एकत्र बसुन वाचन करणे, वाचतांना त्यांना काही अडचणी येत असल्यास ते सोडवणे, पुस्तकाबद्दल माहिती देणे, वर्तमानपत्र वाचून दाखवणे, मुलांन कडून वर्तमानपत्रातील हास्य लेख, बाललेख, विनोदी लेख, संपादकीय लेख वाचून घेणे, मुलांना घरात नवनवीन पुस्तके वाचनासाठी उपलब्द करून देणे, मुलांना ग्रंथालय भेटी साठी घेऊन जाणे, वाचनाचं महत्व सांगणे, वाचनाबद्दलची आवड जाणुन घेणे व त्याप्रमाणे वाचून घेणे-देणे, अभ्यास करतांना त्यांना मदत करणे, घरात मोठ्याने वाचून घेणे किंवा आपणच स्वत: मोठ्याने वाचणे इत्यादी उपक्रम पालकवर्ग घरात करू शकतात. त्यामुळे मुलांना वाचनाची सवय तर लागेलच पण वाचनाची संस्कृती किंवा गरज समाजात किती आहे हे पण समजतील. शेवटी मुलं स्वत:हून वाचन करायला लागतील व पालकांना पण वाचून दाखवतील. खंरतर वाचनामुळे माणसाचं विचार करण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, बौद्धिक विकास, मानसिक
विकास किंवा हाव-भाव खऱ्या अर्थाने बदल तर होतेच पण स्वत:मध्ये विकास पण होत असतो. यासाठी फक्त आणि फक्त एकच पर्याय आहे तो म्हणजे वाचन सवय व वाचन संस्कृती टिकून ठेवण अतिशय गरजेचे असते.
लहानमुलाचं खंर मित्र जर कोणी असेल तर ते पुस्तक आहे. अशी भावना किंवा विचार मुलांच्या मनात राबविल्या पाहिजे. माणसाच्या प्रत्येक क्षणी पुस्तक सोबतच असते. वाचन हे एक कौशल्य आहे; आणि ते कौशल्य लहान पणा पासूनच मुलांच्या अंगी असायला पाहिजे. खंरतर वाचनाची सवय किंवा आवड असलेल्या व्यक्तीला कधीच नैराश्य येत नाही. वाचनाने मानसिक ताण किंवा तणाव कमी होत. कारण वाचन केल्याने त्यांच्या जवळ शब्दाचा साठा भरमसाठ असतो. त्यामुळे विचार करण्याची शक्ती आपोआपच प्राप्त होत जाते. वाचन करण्यासाठी घरात किंवा ग्रंथालय मध्ये विविध वाचन साहित्य उपलब्द असतात. त्याचप्रमाणे लहान मुलांन साठी पण घरात एक छोटस ग्रंथालय असायला पाहिजे. जेणेकरून लहान मुल कधीही आणि केव्हाही वाचन करू शकेल. घरात वाचन साहित्य असेल तर मुलांच्या सवयी प्रमाणे किंवा गोडीप्रमाणे लहान मुलं वाचन करतील. घरातील ग्रंथालय मध्ये लहान मुलांच्या आवडी किंवा सवयीप्रमाणे वाचन साहित्य होम ग्रंथालयमध्ये उपलब्ध करणे. उदा. हास्यकथा, हास्यलेख, बालकथा, बाललेख, विनोदीकथा, विनोदीलेख, प्रवासवर्णन, संपादकीय लेख, विशेष लेख, कथा-कादंबरी, वर्तमानपत्र, मासिके,. उदा. कथा, कादंबरी, लेख, लघु-लेख, लघु-कथा, आत्म-कथा, आत्म-चरित्र, प्रवासवर्णन, बाल-कथा, बाल-लेख, कविता, निबंध, पत्र, गोष्टीचे पुस्तके, संशोधक-लेख, वर्तमानपत्र, मासिके, दिवाळी अंक, माहितीचे-लेख, वर्तमानपत्रातील लेख, संपादकीय लेख, ऐतिहासिक, आवांतर वाचनाचे पुस्तके, आनंददायात्मक पुस्तके, प्रोत्साहनपरक पुस्तके, हस्तलिखित पुस्तके, गमंतीदार पुस्तके, हास्यकारक पुस्तके, विनोदी कथा, स्वयंपाकशास्त्रवरील पुस्तके, काल्पनिक कथा, काल्पनिक पुस्तके, रहस्य कथा, रहस्यमय पुस्तके, इत्यादी. याचबरोबर ज्ञान वाढवणाऱ्यावाचन साहित्याचा संग्रह करणे. उदा. स्पर्धा परीक्षेवरील वाचन साहित्य, सामान्यज्ञान, भौगोलिक-ऐतिहासिक पुस्तके इत्यादी. शिवाय वाचन साहित्य हि माणसाची एक उत्तम संगत असु शकते. मुलांना वाचण्याची सवय जर असेल तर त्यांना शैक्षणिक जीवनातदेखील चांगला फायदा होऊ शकते. वाचन केल्याने स्मरणशक्तीत वाढ होते, एकग्रता वाढते, स्वत:च निणNय स्वत:च घेऊ शकते, चांगला-वाईट मधील फरक कळायला लागते, एकाद्या गोष्टी बद्दल तर्क लावू शकते, कौशल्य विकसीत होते, संवेदनशीलता वाढते, समाजाबद्दल – आणि देशाबद्दल प्रेमाची भावना वाढते, बौद्धिक आणि मानसिक विकास होते अशा विविध कारणांसाठी वाचन उपयुक्त आहे.
शाळेतील लहान मुलांमध्ये वाचनाची सवय लावण्यासाठी अगदी सहज आणि सोपे उपाय:
  • बाळ जेव्हा गर्भात असते तेव्हा जर आईने उत्तम चरित्रकथा, कादंबरी, लघुकथा, बालकथा, बाललेख, आत्मकथा, आत्मचरित्र, प्रेरणादायी कथा इत्यादी पुस्तके वाचली तर त्यांच्या गर्भावर उत्तम परिणाम होतो. त्यामुळे लहान बाळाला देखील पुढे चालू न वाचनाची सवय लागू शकते.
  • पालकांकडून घरातील पारंपरिक कथा, वाचन संस्कृती अशी जोपावी, बालकथा, चरित्रकथा, आत्मकथा, आत्मचरित्र, पोथी-पुराण इत्यादी वाचन साहित्य सांगून शाळेतील लहान मुलांच्या मनात पुस्तकं वाचण्याबाबत कुतूहल निर्माण करणे.
  • लहान मुलांना चांदोमामा, कासव-सशाची कहाणी, इत्यादी पुस्तकांवरती मोठ-मोठी चित्रे असलेली पुस्तके मुलांना वाचायला भेट देणे.
  • घरातील लहान मुलं पालकांचे अनुकरण करतात. खरं तर लहान मुलं ना पालकांचे आदर्श असतात. पालकांनी दैनदिन जीवनात नियमित मुलांसोबत वाचन करायला पाहिजे. घरात पालकवर्ग मुलांसमोर दररोज वाचन केल्याने मुलांना आपोआप वाचनाची सवय लागू शकते.  
  • पालकांनी घरात छोटंसं ग्रंथालय सुरु करावे. ज्यात मुलांसाठी अवांतर वाचनाची पुस्तके असतील. जेणेकरून पालकांबरोबर लहान मुलांना पण वाचनाची सवय लागेल. मुलांना सवयीप्रमाणे स्वत:च पुस्तकं निवडायला लावणे किंवा मुलांच्या सवयीप्रमाणे घरातील ग्रंथालयमध्ये पुस्तके घेऊन येणे.
  • १ ते ५ वयोगटातील लहान बाळांना गोष्टीची पुस्तके उपलब्ध करून देणे. उदा. ज्या पुस्तकांत मोठ-मोठी चित्रं असतील म्हणजेच हे चित्र पाहून वाचन सवय लागेल.
  • लहान मुलांना मोबाईल, संगणकवर गेम खेळायला देण्यापेक्षा त्यांना ई-साहित्य वाचण्याची सवय लावणे.
  • दरवर्षी २३ एप्रिलला मोठ्या उत्साहात ‘विश्व ग्रंथ दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या दिवशी लहान मुलांना एखादा विषय देऊन त्याविषयी माहिती गोळा करायला सांगणे.
  • मुलांच्या शाळेतील गृहपाठ करण्यासाठी तुम्ही फक्त त्यांना मदत करण्याऐवजी मार्गदर्शनच करावे. जेणेकरून स्वशिक्षणाची किंवा विचार करून लिहण्याची सवय लागेल.
  • मुलांना शाळेत वाचन तासात वाचन कार्यक्रम राबवणे. शिक्षकाकडून वर्ग तासिकेत मोठ-मोठ्याने वाचन करायला लावणे. शाळेत उत्तम वाचन केल्यामुळे शाबासकी म्हणून पुस्तक भेट देणे. मुलांना शाळेत जन्मदिवसानिमित्त शिक्षकाकडून पुस्तक भेट देणे. मुलांना ग्रंथापालांकडून ग्रंथालयची ओळख करून देणे.
  • घरातील सगळ्यांनी एकाच वेळी वाचन करावे. म्हणजे लहान मुलांना वाचन करण्याचे वळण लागेल. मुलांना एकदा प्रश्न किंवा काही संकेत असेल तर त्यांना पुस्तकं वाचनातून उत्तर मिळू शकते हे शिकवणे.
  • मुलांनी वाचलेल्या पुस्तकाबद्दल सारांश लिहायला सांगणे, शब्द लिहायला सांगणे, शब्द पाठ करायला सांगणे, पुस्तकांची नोंद करायला सांगणे. त्यामुळे मुलांना अभ्यास करायला मदत होऊ शकते.
  • अभ्यासाबरोबर इतर वाचन साहित्य वाचण्याची सवय लावणे. मुलांना अभ्यास करता-करता कंठाळा येत असेल तर त्यांना अवांतर वाचण्याची सवय लावणे. पुस्तकाबद्दल मुलांसोबत चर्चा करणे. मुलांच्या वाचण्याच्या सवयीबद्दल त्यांचे पालकांकडून कौतुक, शाबासकी, गुणगौरव करणे. त्यामुळे मुलांमध्ये वाचण्याबद्दल सवय निर्माण होईल.

(१२४) जेव्हा त्यांच्यासमोर एखादे वचन येते तेव्हा ते सांगतात, ‘‘आम्ही मान्य करणार नाही जोपर्यंत ती गोष्ट स्वत: आम्हाला दिली जात नाही जी अल्लाहच्या पैगंबरांना दिली गेली आहे.’’९१ अल्लाह अधिक चांगल्याप्रकारे जाणतो की आपल्या पैगंबरत्वाचे काम कोणाकडून घ्यावे व कसे घ्यावे? जवळच आहे तो काळ, जेव्हा या अपराधींना आपल्या कुटिलतेपायी अल्लाहपाशी, अपमान आणि कठोर यातनेला सामोरे जावे लागेल. 
(१२५) म्हणून (ही वस्तुस्थिती आहे की) ज्याला अल्लाह मार्गदर्शन प्रदान करण्याची इच्छा करतो त्याचे मन इस्लामकरिता मोकळे करतो९२ आणि ज्याला पथभ्रष्टतेत गुरफटविण्याची इच्छा करतो त्याच्या मनाला संकुचित बनवितो आणि अशाप्रकारे बनवितो की (इस्लामचा विचार येताच) त्याला असे वाटू लागते जणू त्याचा आत्मा वर आकाशाकडे गमन करत आहे. (अशाप्रकारे अल्लाह सत्यापासून पलायन व त्याच्या द्वेषाची) अपवित्रता त्या लोकांवर प्रस्थापित करतो जे श्रद्धा ठेवीत नाहीत.९२-अ 
(१२६) वास्तविकत: हा मार्ग तुमच्या पालनकत्र्याचा  सरळमार्ग  आहे आणि त्याची चिन्हे त्या लोकांकरिता स्पष्ट केली आहेत जे उपदेश आत्मसात करतात. 
(१२७) त्यांच्या पालनकत्र्याजवळ त्यांच्याकरिता शांतीचे निवासस्थान आहे.९३ आणि तो त्यांचा वाली आहे, त्या उचित कार्यप्रणालीमुळे जी त्यांनी अंगीकारली. 
(१२८) ज्या दिवशी अल्लाह या सर्वांना वेढून एकत्र करील त्या दिवशी तो जिन्न९४ (जिन्नरूपी शैतान) यांना संबोधून फर्मावील, ‘‘हे जिन्नसमुदाय! तुम्ही तर मानवजातीचा खूपच उपयोग करून घेतला,’’
प्रत्येकाने एकमेकांचा खूपच उपयोग करून घेतला.९५ आणि आम्ही त्या घटकेपर्यंत येऊन पोहचलो आहोत जी तू आम्हासाठी निश्चित केली होती.’’ अल्लाह फर्मावील, ‘‘बरे तर अग्नी तुमचे निवासस्थान आहे, त्यांत तुम्ही सदैव राहाल.’’ यापासून तेच लोक वाचतील ज्यांना अल्लाह वाचवू इच्छील, नि:संशय तुमचा पालनकर्ता बुद्धिमान व सर्वज्ञ आहे.९६ 
(१२९) पाहा, अशा प्रकारे आम्ही (परलोकात) अत्याचाऱ्यांना एकमेकाचे सोबती बनवू, हे त्या कर्मामुळे जे ते (जगात एक दुसऱ्याच्या सहकार्याने) करीत होते.९७


९१)    म्हणजे आम्ही पैगंबरांच्या त्या विवेचनावर विश्वास ठेवणार नाही की त्यांच्याजवळ देवदूत (फरिश्ता) अल्लाहचा संदेश घेऊन आला. किंबहुना आम्ही त्यांच्यावर तेव्हाच श्रद्धा ठेवू जेव्हा फरिश्ता स्वत: आमच्याजवळ येईन आणि प्रत्यक्ष आम्हाला म्हणेल की हा अल्लाहचा संदेश आहे.
९२)    मन मोकळे करणे म्हणजे इस्लामच्या सत्यतेवर पूर्ण संतुष्ट करणे तसेच शंकाकुशंका, गैरसमज, दुविधा यांना दूर करणे आहे.
९२अ) या वाक्याने हे स्पष्ट झाले की जे लोक ईमान धारण करीत नाहीत अशा लोकांचेच हृदय
अल्लाह संकुचित करून टाकतो आणि अशा लोकांना सद्बुद्धी देण्याचा इरादा करीत नाही.
९३)    (`सलामतीचे घर') शांतीभुवन म्हणजे स्वर्ग जेथे मनुष्य प्रत्येक आपदेपासून सुरक्षित आणि प्रत्येक वाईटापासून वाचलेला असेल.
९४)    येथे जिन्न म्हणजे शैतान जिन्न आहे.
९५)    म्हणजे आम्हापैकी प्रत्येकाने दुसऱ्यापासून अनुचित लाभ घेतला आहे. प्रत्येकजण दुसऱ्याला धोक्यात टाकून आपल्या इच्छा पूर्ण करीत राहिला आहे.
९६)    म्हणजे यद्यपि अल्लाहला अधिकार आहे की इच्छिल त्याला शिक्षा द्यावी आणि हवे त्याला माफ करावे. परंतु ही शिक्षा आणि माफी निष्कारण निव्वळ इच्छेवर अवलंबून नसेल तर ज्ञान आणि तत्त्वदर्शितेवर अवलंबून असेल. अल्लाह त्याच अपराधीला माफ करील ज्याच्याविषयी तो जाणतो की तो स्वत: आपल्या अपराधाला जबाबदार नाही आणि ज्याच्या बाबतीत अल्लाहची तत्त्वदर्शिता हा निर्णय करील की त्याला शिक्षा दिली जाऊ नये.
९७)    म्हणजे ज्याप्रमाणे ते जगात गुन्हे करण्यात आणि वाईट कमविण्यात एकदुसऱ्याचे भागीदार होते त्याचप्रमाणे परलोकात शिक्षा भोगण्यातही एकदुसऱ्याचे भागीदार असतील.

प्रति,
माननीय, आदरणीय, प्रातःस्मरणीय (हे आपलं लिहिण्यापूरतं झालं, तसं तर २४ तास तुमचंच स्मरण सुरू असतं.), तारणहार! (काही नतद्रष्ट म्हणतात की आम्ही सत्तेसाठी आमचा स्वाभिमान तुमच्याकडे तारण ठेवला आहे आणि तुम्ही त्याचं हरण केलं आहे. जाऊ द्या. आपण दुर्लक्ष करावं, त्या काँग्रेसवाल्यांकडे करतो तसं.)
तिर्थस्वरूप काकासाहेब बारामतीकर यांच्या चरणांशी
(खरं म्हणजे चरणकमळांशी असं लिहिणार होतो, पण उगाच आपला गैरसमज नको म्हणून टाळलं.) बालक उधोजीचा शिरसाष्टांग नमस्कार. पत्रास कारणे अनेक आहेत, पण थोडक्यात कैफियत मांडतो. खरं म्हणजे मी स्वतःच आपल्याला भेटून सर्व सांगणार होतो, पण लगेच त्याची ‘ब्रेकींग न्युज' झाली असती. आता मी घरातच बसतो हे सर्वांनाच माहिती आहे. एकदा त्याची बातमीही झाली आहे. परत परत ती बातमी होऊ शकत नाही. उगाच आपण घरातून बाहेर पडा आणि त्यांना आयती बातमी द्या, असं होऊ नये म्हणून हा पत्र प्रपंच.
परवा ती राजा मानसिंग बनावट चकमक प्रकरणी अकरा पोलिसांना जन्मठेप झाल्याची बातमी वाचली आणि अंगाचा थरकाप उडाला. पोलीस राजाचाही फेक एन्काऊंटर करू शकतात? ताबडतोब आमच्या दैनिक हमरीतुमरीच्या संपादकांना बोलावून घेतलं. ते पूर्वी कुठेशी तरी क्राइम रिपोर्टर होते ना, त्यामुळे त्यांना पोलीस डिपार्टमेंटची बरीचशी माहिती आहे. त्यांनीही  सांगितलं की गृहमंत्र्यांनी इशारा केला की डिपार्टमेंटवाले कोणाचाही गेम करू शकतात! ते बदल्या रद्द प्रकरण फार सिरियसली घेऊ नये असं आपण आपल्या गृहमंत्र्यांना सांगाल का? हवं तर आपण त्यांना आयएएसच्या बदल्यांचेसुद्धा अधिकार देऊन टाकू. बाळासाहेब तसे आपल्या (म्हणजे माझ्या नव्हे, तुमच्या) ऐकण्यातले आहेत. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
परवा देवा नानांचा वाढदिवस होता. मी ट्विटरवर मुद्दामच ते मुख्यमंत्री असतांनाचा आमचा दोघांचा जुना फोटो टाकून शुभेच्छा दिल्या. त्यामागे त्यांना
अप्रत्यक्षपणे ते आता फक्त फोटोतलेच मुख्यमंत्री राहिले आहेत हे दाखविण्याचा उद्देश होता, पण त्यांनी ताबडतोब उत्तर पाठविले की तुम्ही टाकलेल्या फोटोतली परिस्थिती लवकरच प्रत्यक्षात येणार आहे म्हणून. हा माणूस असा नेहमी मला का घाबरवत असतो काय माहीत?मला तर या माणसाचा अजिबात भरवसा वाटत नाही. आपण दादांवर लक्ष असू द्यावे. दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी असावा हा योगायोग कसा वाटतो? दादांशी सलगी करण्यासाठी देवा नानांनी आपली जन्म तारीख तर बदलून घेतली नसावी? आमच्या संपादकांना तपास करायला सांगतो. बाकी आपण समर्थ आहातच. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
शेवटला आणि थोडा नाजूक मुद्दा म्हणजे येत्या पाच ऑगस्टला अयोध्येला जावं म्हणतोय. तुमच्या सूनबाईंनी तर बॅगाही भरून
ठेवल्या आहेत. आपण मोठ्या मनाने परवानगी द्याल याची खात्री आहे. सुरवातीपासूनच आमच्या पिताश्रींनी राम मंदिराचा प्रश्न लावून धरला होता हे आपण जाणताच. मी जर त्या
कार्यक्रमाला गेलो नाही तर त्यांचा आत्मा नक्कीच दुखावेल. आता सहा आठ महिन्यांपूर्वीच असंगाशी संग करून त्यांचा आत्मा दुखावला होता. आता परत परत त्यांच्या आत्म्याला क्लेश नको म्हणून जावं म्हणतोय. श्रीरामाची शपथ घेऊन सांगतो की तिथला कार्यक्रम आटोपला की कोणालाही भेटणार नाही. सरळ घरी परत येईन. आपल्याशी दगाफटका करणार नाही.
लपवाछपवी आपल्याला आवडत नाही. आपलं जे असतं ते उघड उघड असतं. हवं तर बाळ राजेंना आपल्यापाशी ठेऊन जातो. समय कठीण आला आहे. सांभाळून घ्या म्हणजे झालं!
आपला आज्ञाधारक
उधोजी बांद्रेकर

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.: ७८७५०७७७२८

वर्षभर ‘ईद उल अजहा’ (बकरी ईद) या सणाची वाट पाहणाऱ्या शेळीपालकांवर कोरोनामुळे संकट आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मुंबई, पुणे यांसारख्या प्रमुख शहरांत बोकडांची खरेदी-विक्री होत नसल्यामुळे सणाच्या दृष्टीने तयार केलेले बोकड ठेवायचे की कवडीमोल दराने विक्री करायचे, हा प्रश्न उभा राहिला आहे. एकूणच शेळीपालक शेतकऱ्यांनी कोणताही मार्ग स्वीकारला तरी आर्थिक हानी निश्चित होणार आहे. शेतीला पूरक म्हणून शेळीपालनाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यामध्ये खास करून उच्चशिक्षित तरुणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. मटण व्यवसायात बोकडांची मागणी असते. मात्र, सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमध्ये मटण व्यवसायास जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातल्याने व त्यानंतर स्थानिक बाजार बंद ठेवल्याने बोकाडांची खरेदी-विक्री ठप्प झाली होती. मागील राज्य आणि केंद्राच्या लॉकडाउनमध्ये मटण विक्रीस परवानगी दिल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला होता. मात्र, शेळीपालन व्यवसाय हा ‘ईद उल अजहा’च्या दृष्टिकोनातून केला जातो. मात्र, कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सुरू असलेला लॉकडाउन व शेळी-मेंढ्यांचे विस्कळित बाजार तसेच जिल्हाबंदीमुळे शहरी मुस्लिम बांधव येऊ शकत नसल्यामुळे बोकडांचे व्यवहार जवळपास ठप्प झालेले आहेत. तसेच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने ईद उल अजहा साध्या पध्दतीने साजरी करण्याचे आवाहन केले आहे. या सर्व गोष्टींचा शेळीपालकांच्या अर्थकारणावर अनिष्ट परिणाम झाला आहे. वर्षभर ‘ईदुल अजहा’च्या आशेवर वजनदार तयार केलेल्या बोकाडांचे करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वजनदार केलेली बोकडे भविष्यात कमी किमतीने अथवा पुढील सणापर्यंत या बोकडांचा सांभाळ करण्याचा पर्याय शोधावा लागणार आहे. मात्र, या दोन्हीतील कोणताही पर्याय स्वीकारला तरी नुकसान नक्कीच होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे. यामुळे या प्रकल्पासाठी काढलेले कर्ज थकणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील जवळपास ५०० गोटफार्ममध्ये दहा महिन्यांपासून ‘ईद उल अजहा’च्या कुर्बानीसाठी तयार होत असलेले राजस्थानमधील सोजन जातीचे अडीच लाख बोकड पडून आहेत. कुरबानीसाठी ४० ते ५० हजारांचा बोकड घेण्याची आर्थिक परिस्थिती नाही. त्यामुळे गोटफार्ममध्ये शेळीपालन करणाऱ्या शेकडो तरुण शेतकऱ्यांना किमान दहा कोटी रुपयांचा फटका बसू शकतो. एका गोटफार्ममध्ये ४० ते १०० बोकडांचे संगोपन केले जाते. ‘ईद उल अजहा’च्या महिन्यापूर्वीच या बोकडांची खरेदी-विक्री सुरू होते. यंदा कोरोनामुळे मुंबईत बोकडांची खरेदी-विक्री दिसत नाही. अशा परिस्थितीत एवढे बोकड विकावेत कुठे, अशा विवंचनेत शेतकरी आहेत. देवनार पशुवधगृहात दरवर्षी भारताच्या विविध राज्यांमधून दोन ते अडीच लाख बकरे विक्रीसाठी आणले जातात आणि कुर्बानीसाठी मुस्लिम बांधव मोठमोठ्या रकमेच्या बोली लावून या बकऱ्यांची खरेदी करतात. परंतु कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर यंदा ‘ईद उल अजहा’ही साधेपणाने साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. कुरबानी देण्याच्या संदर्भात राज्य सरकारच्या निर्णयाच्या व्यावहारिक अडचणींमुळे लोकांना प्रचंड अस्वस्थता जाणवली. फोन किंवा इंटरनेटद्वारे शेळ्या मिळविणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य होते. म्हणूनच मुस्लिम भागातील छोट्या बाजारपेठा सरकारने आयोजित केल्या असत्या तर लोकांनी सामाजिक अंतर राखून कुरबानीच्या जनावरांची खरेदी-विक्री केली असती आणि शेळीपालक शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर उभा राहिला नसता आणि मुस्लिम त्यागातून आपली धार्मिक कर्तव्ये पार पाडतील आणि ही क्रिया बिघडलेल्या अर्थव्यवस्थेसाठीही फायदेशीर आहे. याचा फायदा समाजातील सर्व घटकांना होईल. दरवर्षी हजची सुरुवात आणि ‘ईदुल अजहा’ हा सण साजरा होत असताना जनावरांच्या कुरबानीचा मुद्दा आणि त्यानंतर मुस्लिमांच्या मांसाहाराचा मुद्दा जगभरात उपस्थित होतो त्याला आपला देश अपवाद नाही. या वेळी मात्र नेहमीच्या मुद्द्याबरोबरच मुस्लिम समाजावर आपले धार्मिक विधी पार पाडताना आणि सण साजरे करताना कोरोना या महामारीच्या मुद्द्याची भर पडली आहे. इस्लामच्या दृष्टिकोनातून जनावराची अनिवार्य कुरबानी हीच एक प्रतीकात्मक परंपरा असल्याकारणाने पुन्हा तोच विधी प्रतीकात्मक पद्धतीने करणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य ठरतो. इस्लाममध्ये क्रोधित देवाला प्रसन्न करण्यासाठी कुरबानीच्या विधीची परंपरा नसून वैयक्तिक त्याग आणि अल्लाहच्या पैगंबरांनी सादर केलेल्या बलिदानाची ही परंपरा आहे. अल्लाहचे आभार मानण्याचे एक प्रतीक आहे. बलिदानाच्या स्वरूपात एखाद्याची वैयक्तिक इच्छारूपी त्याग अल्लाहलाकरिता सादर करणे आहे. म्हणूनच आतापर्यंत या घटनेचे पालन करण्याच्या वार्षिक परंपरेचे कुरआनातील शिकवणींनुसार अनुसरण करणे क्रमप्राप्त ठरते. तद्वतच मुस्लिम बांधव प्रतीकात्मक कुरबानीच्या मांसाचे समाजातील गरीब व गरजवंतांना वाटप करून ईदच्या हर्षोल्हासात त्यांना सहभागी करून घेतात. अल्लाह आपल्या अंत:करणाचे समर्पण स्वीकारतो. एकात्मकतेचा भाग म्हणून आध्यात्मिक आयाम आणि सर्व सजीवांबद्दलचा आदर समाविष्ट करण्यासाठी लोकांचे जीवन समजून घेणेदेखील विस्तृत करतो. ज्याद्वारे अपरिहार्य वास्तवाचा सामना न करता त्यागाचा उच्च आदर्श जपता येतो.   

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

इस्लाम, शाकाहार आणि पर्यावरण

Earth
ज्या वेळी पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पुत्र इब्राहीम दीड वर्षाचे असताना निधन पावले तेव्हा पैगंबरांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. या गोष्टीचे त्यांच्या साथीदारांना आश्चर्य वाटले. त्यांच्यापैकी एकाने पैगंबरांना विचारले, ‘‘आपण तर ईश्वराचे संदेशवाहक (पैगंबर) आहात, मग का रडत आहात?’’ पैगंबरांनी उत्तर दिले, ‘‘ज्याच्या मनात दयाभाव नाही, तो चांगला मनुष्य होऊ शकत नाही.’’
म्हणून दया आणि सहानुभूती एका सच्चा मुस्लिमासाठी आवश्यक असते. इस्लाममध्ये जमिनीवर फिरणारी मुंगीदेखील अकारण मारणे पाप ठरविण्यात आले आहे. जर एखादे मूल पशुपक्ष्यांना त्रास देत असेल विंâवा त्यांना दु:ख असेल तर त्याने अल्लाहकडे माफी मागावी आणि इतर मुलांनाही असे करण्यापासून रोखावे. पैगंबर मुहम्मद (स.) यांनी खरोखरच लोकांना प्रेम आणि शांततेने जीवन व्यतीत करण्यास शिकविले.
इस्लामी दर्शनशास्त्राचा सखोल अभ्यास केल्यास त्याच्या पाया दया व करुणेवर उभारल्याचे आढळून येतो. पैगंबरांनी स्पष्टपणे म्हटले आहे की तुम्ही या पृथ्वीतलावरील सर्व जीवजंतुंवर दया करा, ईश्वर तुमच्यावर दया करील. याचाच अर्थ इस्लाम मनुष्याबरोबरच समस्त जीवजंतुंवरदेखील दया करण्यास शिकवितो. मग असा प्रश्न उपस्थित
होतो की जर इस्लाम जीवजंतुंवर दया व कृपा करण्यास शिकवितो तर मग मुस्लिम लोक जनावरांची हत्या करून त्यांचे मांस का खातात?ते शाकाहारी का बनत नाहीत? त्यांनादेखील जीवन जगण्याचा अधिकार आहे.
इस्लामनुसार प्रत्येक मुस्लिमाने मांसाहार करण्याची आवश्यक नाही. जर एखादी व्यक्ती स्वेच्छेने शाकाहार घेत असेल तर काही हरकत नाही, तो मुस्लिमच राहील, इस्लाममधून त्याला बाहेर काढले जाणार नाही. परंतु त्याचबरोबर इस्लाम हेदेखील मानतो की मनुष्य सुरुवातीपासूनच मांसाहारी आणि शाकाहारी आहे. कोट्यवधी-अब्जोवधी मासे, पक्षी, शेळ्यामेंढ्या, उंट, घोडे या सर्वांची कोणत्या न् कोणत्या कामासाठी ईश्वराने निर्मिती केली आहे. जसे ते आम्हाला दूध, अंडे, लोकर, कातडी देतात तसेच ते आहारदेखील देतात. त्यांचा उचित उपयोग केला गेला नाही तर पर्यावरणाचे संतुलन नष्ट होईल.
इस्लामनुसार मानवांच्या एका फार मोठ्या लोकसंख्येच्या आहारासाठी अन्न आणि फळांऐवजी हेच उपलब्ध आहे. एस्कीमो आणि समुद्रकिनाऱ्यावर वास्तव्य करणाऱ्या शेकडो लोकसमुदायांचा आहार मासे आणि इतर जलचर प्राणी आहेत. अनेक ठिकाणी कसलाही भाजीपाला पिकत नाही आणि लोकांना जीवंत राहण्यासाठी जनावरांच्या मांसावरच अवलंबून राहावे लागते. अशा प्रकारे अरबस्थानच्या वाळवंटात उंट व शेळ्यामेंढ्यांचे दूध आणि मांसाबरोबरच तंबू आणि पादत्राणे बनविण्यासाठी कातडीदेखील प्राप्त केली जात होती. अरबांची अर्थव्यवस्था पूर्णत: याच पशुंवर अवलंबून होती. म्हणून इस्लाम आवश्यकतेनुसार नियोजनाची मनाई करत नसून तो व्रूâर वर्तणुकीचा कट्टर विरोधक आहे.
इस्लाम एखाद्या सजीवास आगीत जीवंत जाळणे, करमणुकीसाठी मारून टाकणे, त्यांच्यावर आवश्यकतेपेक्षा अधिक ओझे टाकणे, दूध पाजणाऱ्या मादीची हत्या करणे, पक्ष्यांची अंडी अथवा घरटी तोडून टाकणे अथवा एखाद्या सजीवास अतोनात त्रास देऊन मारणे यास धर्मविरोधी काय मानतो. पैगंबर मुहम्मद (स.) एक असा समाज स्थापित करू इच्छित होते की ज्यात अस्पृश्यता नसावी, गरीब-श्रीमंताचा भेद नसावा, स्त्री-पुरुषांमध्ये असमानता नसावी. पैगंबरांनी गुलामांना (सेवकांना) सन्मान व आत्मविश्वास प्रदान केला. त्यांना मुक्त करविले, जन्मत:च मुलींना ठार मारण्याची प्रथा बंद केली. त्यांनी समस्त प्राणीमात्रांप्रती प्रेमाचा संदेश दिला आणि वृक्षांच्या संरक्षणाचा आदेश दिला.
मानव एक सामाजिक प्राणी आहे आणि समाजात राहाण्यासाठी धर्माचा मुख्य आधार असतो. धर्माचा शाब्दिक अर्थ होतो ज्यास धारण केले जाते तो धर्म. सर्व धर्माच्या मर्यादांमध्ये बंदिस्त असतात. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्राणीमात्रांचे समस्त कार्य व व्यवहार धार्मिक मर्यादांनुसारच घडत असतात. शांतता आणि स्थिर चित्तातून लोकहितात स्वहित स्वत:च बनते. या चिंतनाचा प्रत्येक व्यक्तीने अवलंब केल्यास समाजातील सामाजिक, आर्थिक,नैतिक प्रदूषणाच्या समस्येवरदेखील तोडगा निघू शकतो. पर्यावरणाच्या लोकानुभवानुसार १९९० ते २०२० च्या दरम्यान दररोज ५० जीव आणि वनस्पतींच्या प्रजाती नष्ट होतात. जर जंगलतोड आणि औद्योगिक वायूंपासून निर्माण होणाऱ्या तापमानवृद्धीवर नियंत्रण मिळविले गेले नाही तर भयंकर परिणाम होतील.
पर्यावरण आणि प्रदूषण नियंत्रित करणे आम्हा सर्वांची आवश्यकता आहे. यासाठी आम्हाला अगदी मनापासून आपल्या संस्कृतीच्या रक्षणासह नैतिक मूल्यांना महत्त्व देऊन एकत्रित प्रयत्न करायला हवेत. नैतिक मूल्यांच्या संरक्षणासाठी वैयक्तिक, सामाजिक पातळीवर आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आम्हाला नैतिक प्रदूषणावर नियंत्रण मिळविले पाहिजे.
(भाग ५) - क्रमश:

- शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

राज्याच्या गृहमंत्रालयाने येत्या ईद ऊल अज़हाच्या पार्श्‍वभूमीवर काही मार्गदर्शक निर्देश जारी केले आहेत. त्यापैकी एक निर्देश असादेखील आहे की, शक्यतोवर प्रतिकात्मक कुरबानी करावी. ती प्रतिकात्मक पशु कुरबानी कशी करावी, याचं स्पष्टीकरण मात्र शासनाच्या पत्रात केलेलं नाहिये. काही मुस्लिम नेत्यांनी याबाबत विचारणाही केल्यावर शासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाहिये. त्यामुळे जनतेत अनेक संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण खरं म्हणजे पशुंना हलाल करून दरवर्षी एकप्रकारे प्रतिकात्मकच कुरबानी केली जात असते. ती कशी? ते खालीलप्रमाणे -
    चार हज़ारवर्षापूर्वी इराकमध्ये अंधश्रद्धा निर्मुलनासाठी सर्वात तीव्रतेने कुणी पावलं उचलली असतील तर ते परिवर्तनवादी चळवळ चालवणारे आदरणीय प्रेषित इब्राहिम (अलै.) यांनी. आपल्याच बापाच्या उपास्यगृहातल्या मुर्त्याफोडून त्यांनी फक्त एक मोठी मुर्ती शाबूत ठेवली. हे काम कोण केलं अशी विचारणा जेंव्हा लोकं करू लागले, तेंव्हा त्यांना चिकित्सा करायला लावण्यासाठी प्रतिप्रश्‍न केला की, त्या मोठ्या (मुर्ती)ला विचारा. लोकांनी म्हटलं की, ती मुर्ती कसं काय बोलेल? यावर आदरणीय इब्राहिम अलै. यांनी त्यांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की, एवढं तर कळते की, ’हे तुमचे उपास्य बोलू शकत नाही तर मग हे तुमचे कल्याण कसे काय करू शकतात अन् मग यांची उपासना करून काय फायदा!’ यावर चिडून तिथल्या अंधश्रद्ध लोकांनी भयंकर मोठा जाळ करून त्यात प्रेषित इब्राहिम यांना ढकलून एकप्रकारे मॉब लिंचिंग करण्याचा प्रयत्न केला. पण अल्लाहकृपेने ते त्यातून सुखरूप वाचले आणि नंतर ते तिथून स्थलांतर करून दुसर्‍या देशाकडे निघून गेले. पण दुसर्‍या देशातही त्यांनी सामाजिक परिवर्तनाद्वारे व्यवस्था परिवर्तनाची चळवळ मात्र सुरूच ठेवली.
    चळवळीत अनेकवेळा मोठा त्याग करावा लागतो. वेळप्रसंगी स्वतःचाच नव्हे तर स्वतःच्या लेकरांचाही जीव धोक्यात घालावा लागतो. यासाठी प्रेषित इब्राहिम अलै. यांचा एक आदर्श समोर राहावा म्हणून अल्लाहने त्यांची परीक्षा घेतली. स्वतःच्या मुलाची कुरबानी करण्याचे संकेत दिल्यावर खरंच प्रेषित इब्राहिम अलै. हे डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांच्या मुलाच्या गळ्यावर सुरी चालविण्यासाठी सरसावले, तेंव्हा अल्लाहने जीब्रील फरीश्त्याद्वारे त्यांच्या मुलाऐवजी तिथं एक जनावर ठेऊन दिला. मुलाऐवजी जनावराची कुरबानी झाली. ईद ऊल अज़हानिमित्त होणारी पशु कुरबानी ही त्याच परिवर्तनवादी चळवळ राबविणार्‍या प्रेषित इब्राहिम यांची परंपरा आहे. पशु कुरबानी प्रतिकात्मकच असते. इराक, पॅलेस्टिन व पूर्ण अरबस्तानात प्रेषित इब्राहिम यांच्या अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीचं प्रतिक म्हणजे पशु कुरबानी! चळवळीच्या ध्येयपूर्तीसाठी कोणत्याही कुरबानीसाठी तयार राहण्यासाठीचा हा एक प्रतिकात्मक संस्कारच ! मागील रमज़ान महिन्यात देशभरातील इमानवंतांनी मोठ्या प्रमाणात प्रगल्भतेचा आदर्श समोर ठेवला. सर्वांनी घरातच नमाज अदा केली. याचं स्वतः शरद पवारांनीही कौतूक केलं. पण लॉकडाऊन 1 पेक्षा अनलॉक-1 मध्ये तुलनात्मकदृष्टीने ज्याप्रमाणे काहीप्रमाणात जास्त सवलती दिल्या, त्याचप्रमाणे नमाज पठणाच्या बाबतीतही थोडी सवलत सरकारने देण्याची गरज आहे, अर्थातच नमाजींची मर्यादित संख्या, फिजीकल डिस्टन्स, मास्क वगैरेच्या खबरदारी घेणार्‍या अटींसह. हे तर झालं सार्वजनिक नमाजबाबत, पण कुरबानी ही प्रत्येक जन सहसा आपापल्या घरातच वैयक्तिकरित्या करतो. कोरोना संकट काळाचं निमित्त करून किमान यावर्षी मटन वाटप करू नका म्हणणार्‍यांना प्रश्‍न विचारावासा वाटतो की, गरीबांना राशन किट वाटल्यानं कोरोना पसरत नाही पण काही जन म्हणतात तसं ईदच्या दिवशी गरीबांना मटन किट वाटल्यानंच कसा काय कोरोना पसरतो? म्हणून पशुंच्या कुरबानी करण्यावर कोणत्याही मर्यादा आणू नयेत. कारण पशुंची कुरबानी करणे हे प्रत्येक सक्षम इमानवंतावर वाजीब (आवश्यक) आहे. याविषयी प्रेषित मुहम्मद सल्लम यांची हदिस (वचन) आहे -
काला रसुल्लाही (स.) - मन् काना लहू सआता वलम् युज़बाह फलाह यकरबना मुसल्लाना. (संदर्भ : इब्न ए माजा) अर्थात - प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी म्हटलं आहे - सक्षम असूनही जो कुणी पशु ज़ुबाह (युज़बाह) करणार नाही, त्याने नमाज पढण्याकरिता आमच्या ईदगाहच्या जवळपासही फिरकू नये. (- संदर्भ: हदिस इब्ने माजा शरीफ). प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दुसर्‍या एका हदिसमध्ये म्हटलं आहे -
धर्मात बिदअत ( त्या नवनवीन गोष्टी ज्यामुळे एखादी सुन्नत म्हणजे प्रेषित परंपरा रोखली जाते) सुरू करणे, हे सर्वात वाईट कृत्य आहे. (संदर्भ: हदिस बुखारी शरीफ). त्यामुळे सरकार म्हणते तसं प्रतिकात्मक कुरबानी किंवा काही लोकं पशु कुरबानीऐवजी गरीबांना रोख पैसे देऊन तथाकथित आर्थिक कुरबानी वगैरे करण्याचे दिलेलेे सल्ले कुचकामी तर आहेतच शिवाय ती धर्मात एकप्रकारची ढवळाढवळ आहे.
    सरकारने लोकांच्या धर्म परंपरेत अशी ढवळाढवळ करण्यापेक्षा दवाखान्यातील सोयी सुविधा, कमी दरात वीज, पाणी व इतर सोयी सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे, प्रतिकात्मक कुरबानी वगैरेचे सल्ले देण्याच्या भानगडीत कृपया पडू नये.

ये मत कहो खुदा से मेरी मुश्किले बडी है
इन मुश्किलो से कहे दो मेरा खुदा बडा है

सकारात्मक विचाराने कोणत्याही नकारात्मक गोष्टी वर मात करता येते हा माझा स्वतः चा अनुभव मी इथे नमूद करत आहे. मित्रांनो, माझ्या परिसरात एक पेशंट कोरोनाचा मिळाला होता म्हणून मी आणि माझ्या सोबत 16 लोकांना क्वारंटाइनसाठी नेण्यात आले होते. आता घरातून  जेव्हा अश्याअनोळख्या ठिकाणी नेण्यात येते तेव्हा सहाजिकच अनेक विचार येतात आणि माणूस स्वतः डिप्रेशन मध्ये जातो. आमच्या सोबतच्या लोकांमध्ये नकारात्मक विचार येत  होते. त्यांना वाटत होते आता काय होणार? अश्या खूप सार्‍या गैरसमजुती झाल्या होत्या या मध्ये मी फक्त त्यांना सकारात्मक बोलून धीर दिला. सर्वांना रोज सकारात्मक गोष्टी सांगत होतो आणि मला कुरआन वाचण्याची सवय आहे त्या मुळे  मी त्यांना मराठीतील  कुरआन  वाचून त्याना त्यांतील धीर देणारे आणि सकारात्मक आयातींचा सार सांगत होतो. तसेच महापुरुषांच्या जीवना मधील कठीण प्रसंगी त्यांनी कश्या प्रकारे  सकारात्मक राहून परिस्थिती वर कशी मात केली ? हे ही सांगत होतो. त्यामुळे सर्व मंडळी आनंदीत असायची आणि मग दुसर्‍या दिवशी आमची टेस्ट होती. तर त्या पूर्वी सुद्धा मी त्याना हेच सांगितलं की आम्ही फिट आहोत. अहो आम्हाला काही होऊच शकत नाही या विचारानेच टेस्ट द्या. सर्व लोक आनंदीत आणि सकारात्मक झाले त्याचा परिणाम असा झाला की आमच्या सर्व लोकांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही आणि आम्ही सर्व सुखरूप घरी आलो.
    मित्रांनो आज आपण पाहत आहोत की , आज जिथे पहावे  तिथे फक्त एवढीच चर्चा आहे  की, तिथे एवढे पॉझिटिव्ह पेशंट मिळाले आणि अमक्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अश्या नकारात्मक बातम्यांमुळे समाजामध्ये नकारात्मक विचारांची लहर आली आहे. त्याचा परिणाम म्हणजे आज लोक कोरोनामुळे कमी पण त्याच्या भीतीमुळे जास्त मृत्यू पावत आहे. मित्रांनो! करोना ही एक महामारी आहे हे सत्य परंतु या मध्ये जगण्या मरण्याचा  काही संबध  नाही. त्याचा  संबध आहे तो  आपल्या रोग प्रतिकारक शक्तीशी. ज्या व्यक्ती ची रोगप्रतिकारक शक्ती जितकी जास्त त्याला या करोनाचा धोका तेवढा कमी. परंतु ज्यांना पूर्वीचे आजार आहेत आणि त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी आहे. अश्या लोकांना थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. कारण लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यामध्ये रोग- प्रतिकारक शक्ती कमी असण्याचे प्रमाण जास्त असते. परंतु मित्रांनो कोरोना आजार हा आपल्या विचारावर सुद्धा अवलंबून आहे. आपला दृष्टिकोन कोणत्या प्रकारचा आहे यावर ही आपले आरोग्य अवलंबून असते, कारण जर आपण या आजाराला आपल्या जिवा पेक्षा मोठं समजून भीतीने समाजामध्ये या आजाराबद्दल भ्रामक गोष्टी पसरल्या आहे त्यामुळे जर नकारात्मक विचार केला तर तुम्ही तुमचे स्वतःचे आयुष्य सुद्धा संपवू शकता. आपल्या विचारांवर आपले सर्व काही अवलंबून असते. जर आपण काळजी  केली  की माझे काय होईल ? मला तर आजार आहे अश्या नकारात्मक विचाराने ग्रस्त असाल तर मग त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती आपोआप कमी होईल आणि मग जे नाही ह्यायचं ते होईल. परंतु आपण सर्वांनी जर हा  विचार केला की मी खूप फिट आहे आणि मला काहीच होणार नाही. कोरोना एक सर्दी सारखा सामान्य आजार आहे. हा आजार  जर झाला तरी 14 दिवसात बरा होतो आणि पुन्हा आपण आपले जीवन सुखकर  बनवू  शकतो. असा जर सकारात्मक विचार केला तर मी आपल्याला साक्ष देतो की हा आजार कधीच जीवघेणा ठरणार नाही. माणसाच्या विचाराने काहीही होऊ शकते.

- प्रा. सलमान सय्यद शेरू,
पुसद
9158949409

BJP Congress
राजस्थानातील सत्तानाट्य दिवसेंदिवस नवनवीन वळणे घेत आहे. अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील हा लढा अनेक पातळ्यांवर लढला जात आहे. पायलटांची राजकीय  महत्वकांक्षा आणि त्याला आळा घालण्याचे गहलोतांचे राजकीय डावपेच यातून निर्माण झालेल्या राजकीय संघर्षाचे स्वरुप असे वरवर दिसणारे हे सत्तानाट्य याहूनही अनेक अंगानी निराळे आहे. ते समजून घेणे त्यामुळेच महत्वाचे ठरते.आधी कर्नाटक, त्यानंतर मध्यप्रदेशातील तत्कालीन काँग्रेस सरकारे आमदारांना राजकीय  लाभाचे वेगवेगळ्या  प्रकारचे अमीष दाखवून पायउतार करण्यात भारतीय जनता पक्षाला यश मिळाले. हे यश मिळवणे तितकेसे कठीण नव्हते याचे कारण या राज्यात असलेले काठावरचे बहुमत, ते राखणे काँग्रेससारख्या पक्षाला कठीण झाले. त्याचा पुरेपूर फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला यात कुठलेच दुमत नाही.
    भारतासारख्या बहुपक्षीय राजकीय  प्रणालीत फोडाफोडीचे राजकारण हे काही नवे नाही. याआधी हेच काम अगदी प्रामाणिकपणे काँग्रेस नेतृत्वाने केले आता त्यांची कार्यपध्दती भाजपाने पुरेपुर आत्मसात केलेली आहे. काहीही करुन सत्ताधारी कसे होता येईल हीच या पक्षाची राजकीय निती राहीलेली आहे. आधी जनसंघ त्यानंतर जनता पक्ष आणि त्याचीच सुधारीत आवृत्ती म्हणजे आजचा भाजपा. असे असले तरी आजच्या भाजपात आणि पूर्वीच्या भाजपात खूप फरक आहे. तथ्यात्मक राजकारण आणि सैध्दांतीक मुल्यांची जपवणूक करीत अडवाणी आणी वाजपेयी यांनी या पक्षांची रुजवणूक केली. त्याला आता अभूतपूर्व यश मिळाले असले तरी मुळच्या भाजपापेक्षा आजची भाजपा फार वेगळी आहे. शहा हे आजच्या भाजपाचे शिर्ष नेतृत्व आहे. आधी गुजरात आणि आता केंद्र  स्तरावर कार्य करताना संपूर्णपणे  हुकुमशाही आणि राजकीय सत्तेचा सुडासाठी होणारा वापर, प्रसंगी राजकीय विरोधकांना संपूर्णपणे नामोहरम करुन विरोधी विचार, पक्ष संपूर्णपणे चिरडून टाकून एकहाती निरंकुश सत्ता उपभोगणे ही या नेतृत्वाची कार्यपध्दती आहे. त्याचा प्रयोग आता देशपातळीवर सुरु आहे.
    ममता बँनर्जी, शरद पवार अशी देशपातळीवरील मोजकी राजकीय नेतेमंडळी वगळता अन्य कुठल्याही  नेत्यांकडे भाजपाला कडवे आव्हान  देण्याचे सामर्थ्य  राहीलेले नाही हे उघड सत्य आहे. मायावती, लालुप्रसाद यादव, यांसारख्या  डझनभर मंडळीना राजकीय अवकाश मिळू नये याचीच पुरेपूर तजवीज भाजपाने घेतली आहे. हे यश अभूतपूर्व आहे यात कुठलेही दुमत नाही. निम्याहून अधिक राज्यात सत्तास्थानी पोहचण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. आता तीन राज्यातील  सत्तेकडे भाजपाचे लक्ष लागून आहे. ते म्हणजे राजस्थान, महाराष्ट्र आणि पश्‍चिम बंगाल. यापैकी राजस्थानातील सरकार अस्थिर करण्याचे पुरेपुर प्रयत्न सचिन पायलटकरवी अद्यापही सुरु आहेत. त्याला अजूनतरी यश मिळालेले नसले तरी राजस्थानातील गहलोत सरकारवर राजकीय  अस्थिरतेची तलवार अद्यापही  टांगती आहे. सलग तिन वेळेस राजस्थान उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर काँग्रेस आमदारांवर कुठलीही कार्यवाही करु नये असा आदेश दिला आहे. दुसरीकडे मायावतींनी आपल्या आमदारांनी सभागृहात काँग्रेसविरोधी मतदान करावे, असा पक्षादेश काढला आहे. तर गहलोत यांना बहुमत सिध्द करण्यासाठी राज्यपाल वेळ देत नाहीत. अशात गहलोत समर्थकांवर प्राप्तीकर विभागाचे छापे पडण्यास सुरुवात झाली आहे. यात भाजपा नसेल असे क्षणभर गृहीत धरले तरी नेमके याच वेळी विशिष्ट नेतृत्वाशी संबधीतावर हे छापे पडणे या मागचा अर्थ कोणतेही विवेकी मतदार समजू शकतात. हे सगळे पडद्याआडून सचिन पायलटांकरवी भाजपा करवून घेत आहे. हे आता लपून राहिलेले नाही. यात सचिन पायलटांचे राजकीय भवितव्य संपुष्टात येण्याची चिन्हे  निर्माण झाली आहेत. आपण भाजपामध्ये प्रवेश करणार नाही असे सुतोवाच त्यांनी याआधी केले आहे. काँग्रेसने तर सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे आता नवीन पक्ष स्थापन करुन आपले राजकीय भवितव्य आजमावून पाहणे हा एकमेव पर्याय पायलटांपुढे उरतो. असे असले तरी राजस्थानच्या राजकारणात काँग्रेस आणि भाजपा वगळता इतर पक्षाला जनाधार नाही. तेव्हा हे बंड यशस्वी झाले तरी पायलटांचा रस्ता आव्हानात्मक आणि तितकाच खडतर आहे. राहीला प्रश्‍न गहलोतांचा तर ते मुरब्बी आणि कसलेले राजकारणी आहेत. भाजपाने कितीही शिरा ताणल्या तरी ते सत्ता सहजासहजी हातून जाऊ देणार नाहीत हे उघड आहे. बरेचसे बंडखोर आमदार परतले असल्याने आपल्याकडे अद्यापही बहुमत शाबूत आहे अशी ग्वाही गहलोतांनी दिली आहे. प्रत्यक्ष सभागृहाच्या पटलावर विश्‍वासदर्शक ठरावावेळी काय होते यावर गहलोताचे भवितव्य अवलंबून आहे. असे असले तरी याप्रकरणी काँग्रेसच्या केंद्र स्तरावरील नेत्यांनी जी निष्क्रियता दर्शवली ती नजरेत भरणारी आहे. 2014 च्या राजकीय पराभवाच्या छायेतून काँग्रेस पक्ष अजूनही  बाहेर आलेला नाही. राहुल गांधीना राष्ट्रीय राजकारणात यशस्वी करण्याची सोनीया गांधीची राजकीय मनिषा अद्यापही कायम आहे. काँग्रेस पक्षावर गांधी घराण्याची राजकीय मक्तेदारी असावी हे अवघड दुखणे काँग्रेस पक्षाला रसातळाला नेत आहे. नव्या दमाचे नेते अजूनही या पक्षात  सक्रीय नाहीत. केवळ सत्तेच्या राजकारणापलीकडे  जाऊन देशहितासाठी आम्ही प्रामाणिकपणे काम करीत राहू असा आशावाद नेत्यांमध्ये दिसून येत नाही परिणामी सत्तेसाठी आसुसुलेले नेते वेळप्रसंगी विरोधी गटामध्ये सहभागी होत आहेत. आजच्या भाजपामध्ये निवडून आलेली बरेचशी मंडळी ही काँग्रेस वा अन्य राजकीय पक्षातून आयात झालेली आहे. भाजपाच्या वाढीसाठी खस्ता खाललेल्या अनेक नेत्यांना वयाचा निकष लावून घरी बसवले गेल्याने, अप्रत्यक्षपणे भाजपाचे एकाअर्थाने काँग्रेसीकरण झालेले आहे. भाजपा कितीही पार्टी विथ डिफरन्सचा नारा देत असली तरी पार्टी विथ काँग्रेस अशीच तिची आजची स्थिती आहे. सत्तेच्या राजकीय सारीपाटात काँग्रेसची सगळी कार्यपध्दती अगदी तंतोतंतपणे भाजपाने आत्मसात केलेली आहे. अपवाद मुस्लिमा आणि दलीतांचा अनुनय. तो काहीही केले तरी भाजपाला करता येणार नाही हे तितकेच उघड सत्य आहे. म्हणून काँग्रेसने जे केले तेच आज भाजपा करीत आहे. त्यामुळे भाजपाविरोधी अधिक आक्रमक होणे काँग्रेसला दिवसेंदिवस कठीण आणि तितकेच आव्हानात्मक झाले आहे. त्यातच राहुल गांधीची कार्यपध्दती आणी त्यांना सतत येत असलेले राजकीय अपयश यामुळे काही नेतेमंडळी अद्याप शांत दिसत असली तरी ती सुप्तपणे काँग्रेसविरोधी गटांना पोषक होईल अशी कामे करण्यात धन्यता मानत आहे. अशा स्थितीत काँग्रेसच्या पदरी अपयश येत असेत तर त्यात काही नवल नाही. मुळात राष्ट्रीय लढ्याचा प्रदीर्घ  वारसा असलेल्या पक्षावर ही वेळ का यावी हे पहाणे उद्बोधक आहे. स्वातंत्र्यानंतर अगदी इंदिरा गांधीच्या पहिल्या कार्यकाळापर्यत काँग्रेसच्या एकहाती बहुमताला टाच आणू शकेल असा एकही पक्ष नव्हता. पुढील काळात इंदिरा गांधीच्या चुकीच्या कार्यपध्दतीमुळे विशेषतः आणिबाणीमुळे विरोधी विचारांच्या पक्षाला बाळसे मिळाले. अतिहुकुमशाहीमुळे दुखावलेले अनेक सुप्तघटक एकाचवेळी जनता पक्षाच्या रुपाने एकत्र झाले आणि त्यांनी  इंदिरा गांधीची सत्ता घालवली. त्यानंतर त्यांना फार काळ सत्ता यशस्वीपणे चालवता न आल्यामुळे ते सरकार कोसळले. पुन्हा  इंदिरा  गांधी सत्तेत आल्या. असे असले तरी यादरम्यान काँग्रेस मधून बाहेर पडलेल्या प्रादेशीक नेतृत्वानी नवे पक्ष स्थापन करुन काँग्रेसला शह दिला. काळ आणि स्थितीचा विचार करुन सत्तेसाठी आघाड्यांशी युती करुन पुढील काळात काँग्रेसने आपली राजकीय वाटचाल सुरु ठेवली. या वाटचालीत वरवर धर्मनिरपेक्षतेचा झेंडा मिरवून आतून मात्र हिंदुत्ववादी विचारसरणीला पोषक अशी स्थिती  उपलब्ध करुन दिली. यामुळे  अति उजव्या विचारसरणीची यशस्वीपणे पायाभरणी झाली. तर दुसरीकडे काँग्रेसने आपल्या पारंपारीक दलीत,मुस्लिम  मतदारांसाठी फार काही करीत आहोत असा भास दाखवला.त्यामुळे दलीत, मुस्लिमांना काँग्रेससोबत राहून अन्यायापलीकडे काहीही मिळाले नाही तर हे दोन घटक वगळता अन्य घटक याला विरोध म्हणून उजव्या विचारसरणीत सहभागी झाले. त्यात नव्याने उदयाला आलेल्या ओबीसींचा मोठा भरणा होता. यामुळे काँग्रेसकडून आपली फसवणूक झाल्याची भावना दलीत मुस्लिमांमध्ये निर्माण झाल्यानंतर आपसुकच काँग्रेसला राजकीय यश मिळणे दुरापास्त झाले. कालांतराने या दोन्हीही  घटकाला समर्थ राजकीय पर्याय निर्माण झाले. आणि काँग्रेसला ओहटी लागली ती आजतागायत सुरु आहे.
     गत साठ वर्षात काँग्रेसने खूप काही देशहितासाठी केले परंतू ज्या गतीने ते व्हायला पाहिजे होते ते न झाल्यामुळे आणि त्याची आकर्षक मुद्देसुद जाहीरातबाजी न झाल्यामुळे काँग्रेस म्हणजे भष्टाचाराची वाळवी अशी मांडणी करुन ती जनतेच्या मनात ठसवण्यात विरोधी पक्षाला यश आले. त्यामुळेच 2014 साली नरेंद्र मोदींना अभूतपूर्व  यश मिळाले. ते मिळवताना कुठेही हिंदुत्वाचा गवगवा नव्हता तर धर्माच्या पलीकडे जाऊन विकासासाठी राजकारण ही आशावादी मांडणी होती हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यानंतर मात्र गत सहा वर्षात हिंदुत्वाची पुरेपुर पायाभरणी झाली. संपूर्ण देश कोरोनासारख्या आजाराशी झुंजत असताना,स्थलांतरीत शेतमजूर पायपीट करताना, चहावाल्याचा मुलगा ठिकठिकाणची सरकारे पाडून सत्तास्थानी कसे येता येईल हे पहाण्यात मश्गूल होता. आता तर देशभरात कोरोनाने थैमान घातल्यावरही प्रधानसेवक राम मंदीराची उभारणी करण्यात मश्गूल झाले आहेत. तेव्हा कुठे गेले ते विकासाचे स्वप्न, कुठे गेली ईमानदारीची भाषा, हे विचारायचे धारीष्ट्य एकाही विरोधी पक्षाकडे नाही. सगळे जण मूग गिळून गप्प आहेत. तेव्हा आता त्यांचे पुढील लक्ष महाराष्ट्रातील सत्ता कशी खिळखिळी करता येईल, महाराष्ट्रात नव्या सचिन पायलटच्या भूमीकेत कोण असेल याकडे लागले आहे.
     फडणवीस तर अक्षरशः वेडेपिसे झाले आहेत. अगदी भान आणि परस्थितीशी विसंगत अशी राजकीय  टिका करणे सोडून त्यांना कुठलाही दुसरा उद्योग नाही. आपल्या  कार्यकाळात  शेतकर्‍यांना कर्जमाफी न देता केवळ पारदर्शकतेचा ढोल पिटून अब्जावधींच्या जाहीराती वर्तमानपत्रात देऊन आम्ही ऐतीहासीक कर्जमाफी केली अशी खोटी आरोळी ठोकली. एवढेच कशाला टोकाचा भष्टाचार आणि बेबंदशाही माजवून महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री  म्हणून नोंद होईल अशी  स्वतःची कामगीरी असतानाही  उद्धव ठाकरेसारख्या संयत आणि तितक्याच कसदार,निष्कलंक नेत्याला कसे बदनाम करता येईल ह्या हेतूने प्रेरीत राजकीय सुडाचे राजकारण देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत. अगदी कोरोनाच्या संकटातही भाजपाचे मनसुबे कायम आहेत.असे असले तरी भाजपाचे आँपरेशन कमळ महाराष्ट्रात  कदापीही यशस्वी  होणार नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ती भाजपाचा राजकीय आलेख आणि सत्ताकारण पुरेपूर जाणून आहे. महाराष्ट्रातील  महाविकास आघाडीचे सरकार हे जनतेच्या प्रश्‍नांप्रती संवेदनशील आहे. मुख्यमंत्री  संयमी आणि तितकेच प्रगल्भ आहेत. तेव्हा अजून  पाच वर्ष तरी फडणवीसांना विरोधी बाकावर बसावे लागेल. एकणूच काय तर 2014 साली भाजपाने काँग्रेसमुक्त भारताची घोषणा दिली होती कालौघात मात्र भारत काँग्रेसमुक्त झाला का याहीपेक्षा भाजपा काँग्रेसयुक्त झाली.हे लक्षात घेतल्यानंतर भाजपाचे आँपरेशन कमळ आता आँपरेशन काँग्रेसयुक्त भाजपामध्ये परीवर्तीत झाले आहे यात कुणाचेही दुमत नाही. (लेखक सामाजीक राजकीय प्रश्‍नांचे अभ्यासक व विश्‍लेषक आहेत)

- हर्षवर्धन घाटे,
नांदेड 9823146648

ancient Makkah
ह. इब्राहीम अलै. यांचा जन्म 2000 वर्षे इ.स.पूर्वी इराकच्या उर शहरात झाला. त्यांचे वडील इराकचे सर्वात मोठे मूर्तीकार व पुरोहित होते. इराकमध्ये त्यावेळेस मूर्तीपूजा सामान्यबाब होती. मात्र अगदी लहानपणापासूनच इब्राहीम अलै. यांना मूर्तीपूजेचे आकर्षण नव्हते. त्यांची गणना अतिशय मोठ्या पैगंबरांमध्ये केली जाते. कुरआनमध्ये ह. इब्राहीम अलै. यांच्या अनेक गुणांची चर्चा केलेली आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे त्यांचा अल्लाहवर दृढ विश्‍वास असणे हा होय. त्या विश्‍वासामुळेच अल्लाहच्या कृपेने आयुष्यात येणार्‍या सर्व संकटांना पुरून उरण्याची त्यांच्यात धमक निर्माण झाली होती. म्हणून अल्लाहने त्यांना हनीफ (अल्लाहचा आज्ञाधारक) ही पदवी दिली होती. आणि अल्लाहने इब्राहीम अलै. यांना स्वतःचा मित्र म्हणूनही संबोधित केलेले आहे. त्यांना पृथ्वीवरील सर्व लोकांचा इमाम (नेता) बनविले आहे. आपण जर त्यांच्या दैदिप्यमान जीवनाचा काळजीपूर्वक अभ्यास केला तर त्यांचे जीवन एकापेक्षा एक मोठ्या आव्हानांनी भरलेले होते, हे लक्षात येईल.
    इब्राहीम अलै. जेव्हा आपल्या वडिलांना देवी-देवितांच्या मूर्त्या घडवतांना पाहत तेव्हा त्यांच्याकडे पाहून विचार करत की आम्हाला जन्माला घालणारा, पोसणारा आणि मृत्यू देणारा कोण असेल? या मूर्त्या तर असूच शकत नाही. ते विचार करत की, जमीन, आकाश आणि त्या दरम्यान जेवढ्या गोष्टी अस्तित्वात आहेत त्या सर्वांना काही ना काही गरजा आहेत. माझा पालनकर्ता असा गरजवंत असू शकत नाही. त्याने तर सर्वांना निर्माण केलेले आहे. तेव्हा त्यांनी सर्वांसमक्ष लोक आराधना करत असलेल्या सर्व देवी देवतांचा इन्कार केला. आणि अल्लाह एक असल्याचा निर्धार व्यक्त केला. एकेश्‍वरवादाची ही घोषणा केल्याबरोबर घरातील आणि बाहेरील लोकांनी त्यांची परीक्षा घ्यायला सुरूवात केली. पहिली परीक्षा सुरह मरियम मधील आयत क्र. 42 मध्ये वर्णन केलेली आहे,        
” (यांना जरा त्या प्रसंगाची आठवण करून द्या) जेव्हा त्याने आपल्या पित्याला सांगितले की, ”हे पित्या, आपण का त्या वस्तूंची उपासना करता ज्या ऐकतही नाहीत आणि पहातही नाहीत आणि आपले कोणतेही काम पार पाडू शकत नाहीत?”
    प्रिय बाबा ! माझ्याकडे एक असे ज्ञान आले आहे जे की तुमच्याकडे नाही. तुम्ही माझ्या मागे चला मी तुम्हाला सरळ मार्ग दाखवीन. तेव्हा वडिलांनी उत्तर दिले तू माझ्या देवी देवतांचा इन्कार करतोयस की काय? तू असे करण्यापासून थांबला नाही तर तुला दगडाने ठेचून मारण्यात येईल. तू मला तोंड दाखवू नकोस. नेहमी करता घरातून निघून जा. आणि जेव्हा इराकचा राजा नमरूद याने इब्राहीम अलै. यांना जीवंत जाळण्याची शिक्षा फरमावली तेव्हा मोठा अग्नीकुंड पेटविण्यात आला. तो अग्नी तांडव बघूनही इब्राहीम अलै. हे आपल्या निश्‍चयापासून तुसभरही ढळले नाहीत. त्यांचा हा दृढ विश्‍वास पाहूनच अल्लाहने त्या अग्नीकुंडाला थंड होण्याचा आदेश फरमाविला आणि जेव्हा इब्राहीम अलै. यांना शिपायांनी अग्नीकुंडात फेकले तेव्हा अग्नी मंद झाला. इतका की विझून गेला आणि इब्राहीम अलै. यांना जरासुद्धा जखम झाली नाही.
    दूसरी परीक्षा यापेक्षा कठीण होती. उतारवयात झालेल्या बाळाला आणि आपल्या प्रिय पत्नीला अरबस्थानाच्या मक्का येथील मरूस्थलामध्ये, जिथे जीवनाची कोणतीच निशाणी दिसत नव्हती, सोडून निघून जाण्याबद्दल अल्लाहने त्यांना आजमावले. या संबंधी कुरआनमध्ये सुरे इब्राहीमच्या आयत क्र. 37 मध्ये तपशील उपलब्ध आहे. तो खालीलप्रमाणे - ” हे पालनकर्ता ! मी एका निर्जल व आसोड खोर्‍यात आपल्या संततीपैकी काहींना तुझ्या आदरणीय घराजवळ आणून वसविले आहे, हे पालकनर्ता ! असे मी अशासाठी केले आहे की या लोकांनी येथे नमाज कायम करावी, म्हणून तू लोकांच्या हृदयांना यांच्याकडे आकर्षित कर व यांना खावयास फळे दे, कदाचित हे कृतज्ञ होतील.” सदरील नमूद आयातीप्रमाणे केलेल्या प्रार्थनेप्रमाणे अल्लाहने त्या मरूस्थलामध्ये जमजम नावाचा एक गोड पाण्याचा झरा निर्माण केला व हेच स्थान पुढे मक्का शहरामध्ये रूपांतरित झाले व जगातील सर्व उत्कृष्ट जिन्नसा आजही तेथे उपलब्ध होतात. प्रार्थना स्वीकारली जावी तर अशी.
    तीसरी परीक्षा अल्लाहने अशी घेतली की त्यांना तीन दिवस सारखे स्वप्न पडत होते की ते आपल्या तरूण मुलाला म्हणजे इस्माईल अलै. यांचा अल्लाहच्या हुजूरमध्ये बळी देत आहेत. प्रेषितांना पडलेले स्वप्न हे खरे असते. याबाबत त्यांनी आपल्या मुलाला विचारले असता त्या मुलानेही आपण बळी जाण्यास तयार असल्याचे कळविल्याने इब्राहीम अलै. यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून त्याला खाली पाडून त्याच्या मानेवर सुरी चलविली. पण विद्युत गतीने हालचाल करत एक देवदूत त्या ठिकाणी आला आणि इस्माईल अलै. यांच्या जागी त्याने एक मेंढा ठेऊन दिला. इब्राहीम अलै. यांच्या सुरीने क्षणार्धात त्या मेंढ्याच्या मानेचा वेध घेतला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. इब्राहीम अलै. यांनी    जेव्हा बळी पूर्ण झाल्याची जाणीव झाली तेव्हा त्यांनी आपल्या डोळ्याची पट्टी काढली तेव्हा पाहिले की इस्माईल मंद मंद हसत उभा आहे आणि मेंढ्याचा बळी गेलेला आहे. या घटनेचे वर्णन सुरे अस्सफातच्या आयात नं. 104 ते 108 मध्ये खालीलप्रमाणे आलेला आहे.
    ”आणि आम्ही पुकारले, ” हे इब्राहीम, तू स्वप्न साकार केलेस, आम्ही सत्कर्म करणार्‍यांना असाच मोबदला देत असतो. निश्‍चितच ही एक उघड परीक्षा होती. आम्ही एक मोठे बलिदान प्रतिदानात देऊन त्या मुलाची सुटका केली. आणि त्याची प्रशंसा व गुणगान भावी पिढ्यांत सदैव ठेवले.”
    याशिवाय, सुरे बकरामध्ये अल्लाह तआला फरमावितो की, ” आणि आठवण करा इब्राहीम आणि इस्माईल जेव्हा काबागृहाची निर्मिती करत होते तेव्हा प्रार्थना करत होते की, हे आमच्या पालनकर्त्या आमची ही सेवा स्वीकार कर, तू सर्वांच्या प्रार्थना ऐकणारा आहेस. तू सर्वांची गार्‍हाणी ऐकणारा आहेस, तुला सर्व काही ठाऊक आहे. हे अल्लाह! आम्हा दोघांना आपला आज्ञाधारक बनव. आमच्या पिढ्यांमधून एक असा समाज निर्माण कर जो तुझी उपासना करणारा असेल. आम्हाला तुझी प्रार्थना कशा पद्धतीने करावी? याचे ज्ञान दे. आमच्या चुकांकडे दुर्लक्ष कर. तू मोठा क्षमा करणारा आणि दयावान आहेस. आणि हे आमच्या पालकनकर्त्या त्या समाजामधून एक असा प्रेषित जन्माला घाल जो त्यांना तुझे आदेश ऐकवेल. त्यांना ईश्‍वरीय ग्रंथ आणि त्यातील आयातींचा अर्थ समजावून सांगेल आणि त्यांचे जीवन सुंदर बनव. इब्राहीम अलै. यांच्या जीवनातून जी सर्वात महत्त्वाची बाब शिकण्याची आहे ती अल्लाहवर अढळ विश्‍वास. शेवटी अल्लाहच्या हुजूरमध्ये प्रार्थना करते की, हे अल्लाह ! आम्हाला तुझा आज्ञाधारक बनव. तू आमच्या ज्या परीक्षा घेशील त्यात उत्तीर्ण होण्याची योग्यता आमच्यामध्ये निर्माण कर. आणि तुझ्या आज्ञा पालन करण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण करा.  (आमीन.)

- खान अर्शिया शकील,
मुंबई 9867377180

Hilal Ahmed
एअर कमोडोर हिलाल अहमद राठेर हे नाव अलिकडे राष्ट्रीय मीडियामध्ये झळकत आहे. विशेष करून कश्मीरमध्ये त्यांच्यामुळे एक वेगळेच उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहे. त्याचे कारण असे आहे की, हे नाव राफेल विमानाशी जोडले गेलेले आहे.
    हिलाल अहेमद राठेर हे गेल्या एक वर्षापासून फ्रान्समध्ये असून, फ्रान्सकडून भारताला मिळणार्‍या  राफेल विमानामध्ये कोणकोणते फिचर्स आणि हत्यारे लावायची आहेत, याचा तपशील दसा अ‍ॅव्हीएशन या कंपनीला सांगत आहेत. आणि भारताच्या संरक्षण गरजेप्रमाणे कोणते मिजाईल या फायटर जेटमध्ये बसवायचे याबद्दल एक तज्ज्ञ म्हणून भारतातर्फे तेच निर्णय घेत आहेत. पाच विमानांची पहिली खेप जेव्हा फ्रान्समधून निघण्यासाठी तयार झाली तेव्हा हिलाल राठेर आणि भारताचे फ्रान्समधील राजदूत जावेद अश्रफ हे दोघेही दसा एव्हीएशनचे चेअरमन एरिक ट्रॅपियर यांच्यासोबत तेथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमामध्ये हजर होते. येणेप्रमाणे त्यांचे नाव राफेल विमानाशी कायमचे जोडले गेलेले आहे. हिलाल यांनी भारतीय वर्जनच्या राफेलमध्ये 13 नवीन कॅपिसटींनाही सामील करवून घेतलेले आहे. शिवाय, भारतीय वातावरणात या विमानाला अधिक घातक बनविण्यासाठी अनेक प्रकारचे हत्यार त्यांनी यात जोडून घेतलेले आहेत. एअर कमोडोर हिलाल अहेमद यांचा जन्म एका मध्यमवर्गीय परिवारामध्ये झाला  होता. त्यांचे वडील मयत दिवंगत मोहम्मद अब्दुल्लाह जम्मू कश्मीर पोलीस विभागामध्ये डिवायएसपी म्हणून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या परिवारात तीन बहिणी आहेत. हिलाल राठेर यांनी जम्मू जिल्ह्याच्या नगरोता टाऊन येथील सैनिक शाळेतून प्रारंभिक शिक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी डिफेन्स सर्विस स्टाफ कॉलेज मधून वैमानिकाची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी एअर वॉर कॉलेज अमेरिकेमधून अधिक नैपुन्याची पदवी प्राप्त केली. आपल्या प्रशिक्षण काळात त्यांनी आपल्या तुकडीमधून प्रथम येऊन सोअर्ड ऑफ ऑनरचा मान मिळविला होता.
    17 डिसेंबर 1988 मध्ये ते फायटर पायलटच्या रूपाने भारतीय वायुसेनेत दाखल झाले. 1993 मध्ये फ्लाईट लेफ्टनंट, 2004 मध्ये विंग कमांडर, 2016 मध्ये ग्रुप कॅप्टन आणि 2019 मध्ये एअर कमोडोर या पदावर पदोन्नत झाले. त्यांच्याकडे तीन हजार तासाचा मिग 21 तर 2000 तासाचा मिराज उडविण्याचा अनुभव असून, किरण एअरक्राफ्ट उडविण्यामध्येही ते तज्ज्ञ मानले जातात.
    भारतीय वायुसेनेच्या संकेत स्थळावर त्यांच्या गुणवत्तेबद्दल, ” जगातील सर्वोत्तम फ्लाईंग ऑफिसर” असे म्हटलेले आहे. त्यांना 2010 मध्ये वायुसेना मेडलने सन्मानित करण्यात आले होते. तसेच 2016 मध्ये विशिष्ट सेना मेडलनेही गौरविण्यात आले आहे. त्यांच्या सोबत एअर कमोडोर मनिष सिंह, विंग कमांडर अभिषेक त्रिपाठी व अन्य दोन पायलट असून, दिनांक 29 जुलै रोजी अंबाला एअरपोर्ट येथे राफेल घेऊन उतरण्याचा किर्तीमान या सर्वांच्या नावावर जमा झालेला आहे. यासाठी त्यांनी फ्रान्स ते भारत 7000 किलोमीटरचे हवाई अंतर पार केले.


Arab Israel
1914 ते 1918 दरम्यान लढल्या गेलेल्या पहिल्या महायुद्धामध्ये ऒटोमन साम्राज्य (सल्तनते उस्मानिया) ने जर्मनीच्या बाजूने युद्धात भाग घेतला होता. या युद्धात जर्मनीचा पराजय झाल्यामुळे ऒटोमन साम्राज्याचाही पराभव झाला व ऒटोमन साम्राज्य ब्रिटनच्या ताब्यात आले. त्यानंतर 1917 मध्ये ब्रिटनने बेलफोर्ड डिक्लेरेशनच्या अंतर्गत ऒटोमन साम्राज्याचे तुकडे करून टाकले. ज्यामुळे 40 नवीन देश अस्तित्वात आले. या युद्धामध्ये ब्रिटनसोबत असणारे ज्यू आणि अरब या दोघांनाही बक्षिस म्हणून इजराईल आणि सऊदी अरब ही दोन राष्ट्रे नव्याने जन्माला घालण्यात आली.
    1918 मध्ये इजराईलमध्ये ज्यू लोकांची संख्या फक्त 3 टक्के होती. पहिले महायुद्ध जिंकल्यानंतर जगभरातून विशेषतः पूर्वी युरोपमधून ब्रिटनने ज्यू लोकांना बोलावून जेरूसलम आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वतःच्या देखरेखीखाली त्यांचे पुनर्वसन केले व 1948 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानुसार 15 मे 1948 साली स्वतंत्र इजराईलची निर्मिती करून त्याला ज्यू धर्मियांचे होमलंड म्हणून जाहीर करण्यात आले. अरबांनी सुरूवातीला इजराईलच्या निर्मितीचा मोठा विरोध केला. 1937 मध्ये सशस्त्र विरोध सुद्धा करण्यात आला, परंतु अमेरिका आणि ब्रिटनने लष्करी कारवाई करून पालिस्टीनियन मुस्लिमांचा इतका मोठा नरसंहार केला की, त्या काळी 10 टक्क्यांनी पालिस्टीनी पुरूषांची लोकसंख्या कमी झाली.
    ज्यूंचा मुख्य व्यवसाय व्याज होता आणि आजही आहे. अमेरिकेचे लेहमन ब्रदर्स ही सर्वात मोठी बंक जी 2008 साली वित्तीय घोटाळ्यामुळे बंद झाली ती ज्यूंचीच होती. चक्रव्याढ व्याजाचा व्यवसाय करून जुल्मी वसूली करत असल्यामुळे त्यांचा इतर धर्मियांकडून कायम दुस्वास केला जातो. आजही युरोप आणि अमेरिकेमधील प्रमुख बंकर्स हे ज्यूच आहेत. सुरूवातीला त्यांनी जेरूसलमधील पालिस्टीनी मुस्लिमांना मागतील ती रक्कम देऊन जमीनी आणि घरे खरेदी केली आणि हळूहळू जेरूसलम येथे आपले बस्तान बसविले. मात्र ज्या गतीने त्यांना आपली लोकसंख्या वाढवायची होती त्या गतीने ब्रिटिश शासन ज्यूंच्या वस्त्या वाढवित नसल्यामुळे नाराज होऊन त्यांनी ब्रिटीशांविरूद्धच सशस्त्र चळवळ सुरू केली. त्या अंतर्गत त्यांनी 1944 मध्ये जेरूसलमधील ’इन डेव्हिड हॊटेल’मध्ये पहिला बॊम्बस्फोट करून ब्रिटिशांना थेट आव्हान दिले. या स्फोटामध्ये 90 पेक्षा जास्त लोक मरण पावले होते व अनेक जखमी झाले होते. ज्यूंच्या आर्थिक शक्ती आणि सशस्त्र उठावामुळे लवकरच जेरूसलम आणि जवळपासचा परिसर ब्रिटनसाठी डोईजड झाला. अगोदरच पहिल्या महायुद्धात प्रचंड हानी सहन केलेल्या ब्रिटिशांनी हा प्रश्‍न युनोकडे सुपूर्द केला. युनोने यात एक प्रस्ताव तयार करून इजराईल आणि आसपासच्या पालिस्टीनी भूमीचे दोन भाग केले आणि पालेस्टिनी मुस्लिमांची संख्या जास्त असतांनासुद्धा त्यांच्यावर अन्याय करून 45 टक्के जमीन त्यांना तर 55 टक्के जमीन ज्यूंना देण्याचा प्रस्ताव दिला. त्यातही महत्त्वाची उपजावू जमीन ज्यूंना देऊ केली. जेरूसलमचे दोन भाग करून दोघांना दिले व धार्मिक स्थळे सर्वांसाठी खुली ठेवली. येणेप्रमाणे 14 मे 1948 ला युनोच्या एका कराराद्वारे इजराईल या देशाची स्थापना झाली.
    आपल्या हृदयस्थानामध्ये ज्यूंचे नवीन तयार झालेले राष्ट्र पालिस्टिनियन अरबांना मान्य होणारे नव्हते. म्हणून या देशाची स्थापना झाल्याबरोबर युद्धास तोंड फुटले. एकीकडे इजराईल आणि दूसरीकडे इजिप्त, इराक, लेबनान, सीरिया आणि जॊर्डन यांच्यात युद्ध झाले. या युद्धात इजराईलला ब्रिटन आणि अमेरिकेने प्रचंड मोठ्या प्रमाणात लष्करी मदत केली. त्या बळावर या पाच देशाविरूद्ध झालेले युद्ध चिमुकल्या इजराईलने लिलया जिंकले. एवढेच नव्हे तर या युद्धात पाचही देशांना सपाटून मार खावा लागला व प्रत्येकाला थोडी थोडी जमीन गमवावी लागली. इजराईलने त्यांची जमीन बळकावून ती इजराईलमध्ये सामील करून घेतली. युद्ध समाप्तीनंतर इजराईलच्या हातात फक्त गाझा आणि वेस्ट बंक एवढाच मुलूख ताब्यात राहिला. 
    हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे ही पाचही मुस्लिम राष्ट्र खडबडून जागी झाली आणि इजराईलला कसे नामोहरम करता येईल याचे मन्सूबे तयार करू लागली. त्यातूनच 1967 मध्ये इजराईलविरूद्ध इजिप्त, जॊर्डन आणि सीरियांनी पुन्हा युद्ध छेडले. याला सहा दिवसांचे युद्ध म्हणतात. या युद्धातही ब्रिटन आणि अमेरिकेच्या लष्करी मदतीच्या बळावर इजराईलने हेे युद्धही जिंकले आणि गाझा आणि वेस्टबंकची भूमी जी पालिस्टीनियन अरबांच्या ताब्यात होती ती सुद्धा इजराईलने बळकावून घेतली. या भूमीवर आपला प्राचीन काळापासून हक्क असल्याचा दावा इजराईलचा आहे. एवढेच नव्हे तर आजूबाजूंच्या सर्व अरब राष्ट्रांना जिंकून ग्रेटर इजराईल स्थापन करण्याची इजराईलचे स्वप्न आहे.
    वेस्ट बंक म्हणजे जॊर्डन नदीच्या पश्‍चिमेकडे असलेला 2400 स्क्वेअर किलोमीटरचा हरित इलाखा आहे. वेस्ट म्हणजे पश्‍चिम, बंक म्हणजे नदीचा किनारा. यावरून या इलाख्याला वेस्ट बंक असे नाव पडले. नदीमुळे ही जमीन सुपीक असून, काही डोंगर दर्‍यासुद्धा आहेत. या भागात 30 लाख पालिस्टीनी मुसलमान राहतात. या वेस्ट बंकच्या पूर्व सिमेला जॊर्डन देश असून, दक्षिण-उत्तर आणि पश्‍चिम सीमा ही इजराईलशी जोडली गेलेली आहे. सहा दिवसाच्या युद्धामध्ये हा प्रदेश जरी जिंकला तरी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जगातल्या बहुतेक देशांनी वेस्ट बंकवर इजराईलचा ताबा वैध मानला नाही. असे असले तरी दंडी मुडपी करून इजराईलने या वेस्ट बंकमध्ये 256 सेटलमेंट छावण्या निर्माण केल्या. तेथे 5 लाख यहूदी नागरिक राहतात. त्यांच्या रक्षणासाठी या इलाख्यामध्ये इजराईलने अनेक लष्करी पोस्ट उभारल्या आहेत. जे रात्रं-दिवस सेटलमेंट छावण्यामध्ये राहणार्‍या ज्यू नागरिकांचे संरक्षण करतात व त्यांच्या संरक्षणाच्या नावाखाली पालिस्टिनियन नागरिकांवर अत्याचार करतात. याच आठवड्यात ज्यू नागरिकांनी वेस्ट बंकमधील एका मस्जिदीवर हल्ला करून तिला नुकसान पोहोचविलेले आहे.
    सहा दिवसांच्या युद्धामध्ये जिंकलेल्या या वेस्ट बंक इलाक्यामध्ये आपली पकड अधिक मजबूत करावी, हे इजराईली पंतप्रधान बेंजामीन नेतनयाहू यांचे अनेक दिवसांचे स्वप्न आहे. त्यांनी एप्रिल 2019, सप्टेंबर 2019 आणि मार्च 2020 मध्ये झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांमध्ये वेस्ट बंकेला संप्रभू इजराईलमध्ये विलीन करण्याचा वायदा इजराईली जनतेशी केला होता. त्याला ते अनेक्झेशन प्लान (विस्तार योजना) म्हणून संबोधतात. त्यांच्या या विस्तारवादी धोरणाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्ण संमती आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी अरब - इजराईल प्रश्‍न सोडविण्यासाठी एका बृहद योजनेची घोषणा केली. ज्याला ते ’सेंच्युरी-डील’ म्हणून संबोधतात. ही योजना त्यांनी जानेवारी 2020 मध्ये जाहीर केली. या योजनेला नेतनयाहू हे ’अ‍ॅपॊर्च्युनिटी ऒफ द सेंच्यूरी टू पालिस्टेनियन्स’ असे म्हणतात. तर पालिस्टीनियन नागरिक याला ’स्लाप ऒफ द सेन्चुरी’ म्हणून संबोधतात. या सेंच्युरी डीलमध्ये प्रामुख्याने चार कलम सामिल करण्यात आलेली आहेत. 1. वेस्ट बंक हा इलाका इजराईलच्या पूर्ण नियंत्रणामध्ये देण्यात येईल. 2. वेस्ट बंकेचे विभाजन करण्यात येईल. 3. वेस्ट बंकमध्ये राहणार्‍या ज्यू लोकांच्या सेटलमेंट छावण्यांना संप्रभू इजराईलमध्ये सामील केले जाईल. आणि 4. इजराईलची राजधानी जेरूसलेम राहील. त्यावर कुठल्याही अन्य धर्मीयांचा अधिकार राहणार नाही. या बदल्यात 15 अब्ज डॊलरची लाच इजराईलने पालिस्टीनी लोकांचे प्रतिनिधी व हमासचे प्रमुख नेते इस्माईल हनिया यांना विकासनिधी म्हणून देऊ केली गेली होती. ज्या योगे ते आपल्या वस्त्यांमध्ये विकास कामे करू शकतील. ही सेंच्युरी डील 1 जुलैपासून लागू होणार होती. सुरूवातीला काही अरब राष्ट्रांनी अमेरिकेच्या दबावाखाली या डीलला मान्य करण्याचे संकेत दिले होते. मात्र अरब जनतेच्या संतापलेल्या भावना लक्षात घेऊन त्यांनी संघटितपणे या सेंच्युरी डीलचा विरोध केला. म्हणून ट्रम्प दबावामध्ये आले आणि 1 जुलैपासून लागू होणारी सेंच्युरी डील ही पुढे ढकलण्यात आली. इजराईली बुलडोजर या इलाक्यातून परत फिरलेले आहेत. असे असले तरी ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष असेपर्यंत म्हणजे नवंबर 2020 पर्यंत ही सेंच्युरी डील पुन्हा रेटण्याची नेतनयाहू यांची तीव्र इच्छा आहे. कारण ट्रम्प यांनी त्यांना जेवढी मदत केली तेवढी दूसरा कोणताही राष्ट्रपती करणार नाही, याची त्यांना खात्री आहे. दरम्यान, 6 जुलै रोजी वेबिनारच्या माध्यमातून झालेल्या एका बैठकीमध्ये जर्मनी, फ्रान्स, जॊर्डन आणि इजिप्त या देशांनी सेंच्युरी डील आणि इजराईलच्या अनेक्झर प्लानचा विरोध केला व 1967 साली इजराईलने जो विस्तार केला होता त्याचेच पुनर्समिक्षण करणे गरजेचा असल्याचे जारी केलेल्या एका संयुक्त निवेदनात म्हटलेले आहे. एवढेच नव्हे तर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीमधील पाच देशांपैकी अमेरिका वगळता फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि चीन यांनी इजराईलच्या या विस्तारवादी नीतिचा विरोध केलेला असून, सेंच्युरी डील कुठल्याही परिस्थितीत अस्तित्वात येणार नाही, असे म्हटले आहे.

- एम.आर.शेख

Rizwanur Rehman
मुंबई (नाजीम खान)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र सरकार या वर्षी मुस्लिम समाजातील ईद उल अझहा(बकरीद)या सणाच्या  सोपस्कारांना परवानगी देण्यास अनुकूल नाही. या संदर्भात जमात ए इस्लामी हिंद महाराष्ट्र चे अध्यक्ष रिझवान ऊर रहमान खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे.
       मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी लिहिले आहे की, महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी फक्त 9 जिल्हे कोरोनामुळे अति प्रभावित झाले आहेत. बाकीच्या जिल्ह्यात कोरोनाचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणून अशा अल्पप्रभावित भागात बकरा बाजाराला मान्यता मिळावी. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व संरक्षक उपाय करण्याची अट घालून ही परवानगी देण्यात यावी. रेडझोन मध्ये सुद्धा संरक्षणात्मक उपायांसह इतर आर्थिक घडामोडींना परवानगी देण्यात आली आहे. त्याप्रमाणे काही अतिरिक्त उपायांसाह बकरा बाजाराला परवानगी देण्यात यावी.
    यावर्षी  मुख्य शेळी बाजारातील गर्दी टाळण्यासाठी शहरातील इतर मोकळ्या ठिकाणी त्याचे विकेंद्रीकरण करावे, तसेच या विकेंद्रित बाजाराच्या ठिकाणी  कम्युनिटी सेंटर स्थापित करून तेथेच कुर्बानी करण्याची अनुमती देण्यात यावी जेणेकरून मुख्य बाजारामध्ये होणारी गर्दी टाळता येऊ शकते, असेही रिझवान ऊर रहमान खान यांनी सांगितले आहे. प्रत्येक जिल्ह्यातील वेगवेगळ्या खुल्या परिसरात तसेच क्रीडांगणे आणि इतर सोयीस्कर जागेत  तात्पुरत्या स्वरूपात मंडी भरवल्यास गर्दी होणार नाही. प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाला तेथील सर्व स्तरातील जबाबदार नागरिकांचे पाठबळ आहे. या संदर्भात कोरोनाविषयी मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात यावीत, असेही आवाहन रिजवानुर्रहेमान खान यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

इस्लाम हे जीवनाची मूल्ये सांगणारं तत्त्वज्ञान आहे. समाजातील शोषणाची दखल घेऊन त्याची सर्वकालीक कारणमिमांसा इस्लामने केली आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक शोषणाच्या व्यवस्थेला मूलभूत नकार देऊन, त्याला पर्यायी नैतिभ्क तत्त्वज्ञानाची उभारणी कुरआन आणि प्रेषितांच्या इस्लामी क्रांतीतून घडली. इस्लामच्या या मूल्यात्मक व्यवस्थेचे प्रतिनिधित्व सूफींनी उभ्या केलेल्या चळवळीने जगाच्या विभिन्न प्रदेशात केले. जी व्यवस्था प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरब समाजात निर्माण केली, त्या व्यवस्थेच्या निर्मितीसाठी सूफींनी अरबेतर अनेक देशांमध्ये संघर्ष केला. त्यांचा हा संघर्ष इस्लामच्या प्रसारासाठी जसा कारणीभूत आहे, तसा मानवी समाजात नव्या चिंतनाला जन्म देण्यासाठीदेखील उपकारक ठरला आहे.
सुफींच्या उदयाची कारणमिमांसा आणि त्याच्या उद्भवाच्या इतिहासाविषयी विविध मतांतरे आहेत. सूफिवादाच्या अर्थ विवेचनाविषयी देखील काही मतप्रवाह आणि प्रवाद आढळतात. या सर्व प्रवाहांनी सूफीवादाची व्याख्या केली आहे. त्यापैकी काही महत्त्वाच्या व्याख्या ‘तसव्वूफ’ या शब्दाशी निगडीत आहेत. तर काही व्याख्या सुफ्फा, सफ, सोफता, सोफानता, या शब्दांच्या आधारे मांडल्या जातात. प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या काळात मस्जिदीच्या दालनात राहणाऱ्यांना ‘अहले सुफ्फा’ म्हटले जात असे. त्यातून हा सूफी शब्द आल्याचे काहींचे मत आहे. वादांच्या आणि प्रवादांच्या गुंत्यामध्ये कोणतीही व्याख्या अंतिम मानता येत नाही. पण एक मात्र निश्चितपणे सांगता येईल की, इस्लामच्या तत्त्वचिंतनातून, सामाजिक शोषणाची दखल घेऊन परिवर्तनासाठी जीवनभर संघर्षरत राहण्यासाठी सूफींनी सर्व प्रकारचे समर्पण दिले. त्यांनी मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत इस्लामी सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक, राजकीय आणि जीवनविषयक मूल्यांच्या प्रस्थापनेचा प्रयत्न केला. भारतामध्ये इस्लामचा प्रसार हा तलवार आणि राज्याचा आधार घेऊन झाल्याचे मिथक मांडले जात असले तरी त्याची ऐतिहासिकता सिद्ध होऊ शकत नाही. कारण सूफी चळवळीच्या इतिहासाचे अनेक संदर्भ इतिहासाच्या साधनांमध्ये आढळतात. ज्यामध्ये त्यांच्या मैदानी मानवी कार्याची आणि त्याद्वारे झालेल्या इस्लामच्या प्रसाराची माहिती विस्ताराने आली आहे.
भारतीय समाजाच्या उत्पादन व्यवस्थेतील जातप्रेरित शोषणाला सूफींनी नाकारले. इस्लामी श्रमसंहीततेतील शोषणविरहीत तत्त्वज्ञानाच्या प्रात्यक्षिकेतून त्यांनी श्रममूल्याचा इस्लामी सिध्दान्त भारतातील जातसंरचनेसमोर समतेचा पर्याय म्हणून मांडला. श्रमाचे मूल्य हे जन्मावरून अथवा अनैसर्गिक वर्णावरून निर्धारीत न करता श्रमाच्या व त्यातून निर्माण झालेल्या उत्पादनाच्या आधारे निर्धारीत करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या शोषणाची कारणमिमांसा करून सूफींनी विशेषतः चिश्ती संतांनी त्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांनी सुलतानांना करप्रणालीतील दोष दाखवून दिले. शेतकऱ्यांच्या बाजूने त्यांच्याविरोधात आवाज उठवला. दुष्काळात शेतकऱ्यांच्या दुःखाचे प्रतिनिधित्व करत त्यांनी दरबारी राजकारणाला आव्हान दिले. सूफी आणि राज्यकत्र्यांचा संघर्ष सत्तेच्या राजकारणातून नाही तर सामाजिक समस्यांच्या प्रतिनिधित्वातून उदयाला आला. शेतकऱ्यांच्या जीवनातील दुःख व त्याचे निवारण हे सूफी आंदोलनातील सामाजकारणाची मुख्य प्रेरणा होती. इस्लामी समता व अर्थव्यवस्था हे त्यांच्या चळवळीचे मूलभूत तत्त्व आणि सद्भावना, प्रेम, संवाद हे त्याचे माध्यम होते.
भारतात सूफींचे आगमन
मॅक्झीम रॅन्डीन्सन हे इस्लामच्या आर्थिक संघर्षाचे टिकात्मक विश्लेषक मानले जातात. त्यांनी ‘इस्लाममुळे झालेले अर्थव्यवस्थेतील बदल, इस्लामची व्याजविषयक भूमिका, नफ्यातील श्रमाचा वाटा, गुंतवणुकीत श्रमिकांचे स्थान याविषयी सांगितलेल्या नियमांसंदर्भात विस्ताराने लिखाण केले आहे. इस्लामने अध्यात्मात केलेले बदल असतील अथवा अर्थव्यस्थेविषयी मांडलेले नवे तत्त्वज्ञान त्यामध्ये मानवी जीवनाच्या शोषणाविषयी त्याने घेतलेली भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. अर्थकारणातील नैतिक अध्यात्माधारीत क्रांती हे इस्लामचे वैशिष्ट्य आहे.’ भारतातदेखील इस्लामचा प्रवेश हा बाजारातील हस्तक्षेपातून झाला आहे. मुस्लिम विजेत्यांनी भारतात पाऊल टाकण्याआधी अरब व्यापाऱ्यांनी इथे इस्लामी आर्थिक प्रेरणांच्या माध्यमातून नवविचारांची कृतीशील मांडणी केली होती. त्यांच्यापश्चात सूफींनी भारताच्या सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात हस्तक्षेपास सुरुवात केली.
त्यांचा हा हस्तक्षेप विद्रोहात्मक जरी असला तरी त्या विद्रोहाला विध्वंसाची किनार नव्हती. विद्रोहाची कृतीशील प्रबोधनात्मक मांडणी हे सूफींचे वैशिष्ट्य होते. भारतातल्या सूफी समाजक्रांतीचे सामाजिक दुःखाचे निवारण हे मुख्य कार्य होते. सूफींनी शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक व आर्थिक क्षेत्रात दिलेले योगदान प्रचंड मोठे आहे. रिचर्ड इटन हे भारतातल्या सूफी चळवळीचे आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचे अभ्यासक आहेत. त्यांनी अनेक सूफी संताच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यावर संशोधन केले आहे. सूफींमधील चिश्ती पंथीय संताविषयीचे त्यांचे कार्य संशोधनशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या पध्दतीने मॅक्झीम रॅडीन्सन यांनी इस्लामी क्रांतीच्या आर्थिक परिणामाला आपल्या लेखनातील प्रमुख घटक मानले आहे. त्याच पध्दतीने रिचर्ड इटन यांनीदेखील सूफींच्या भारतातल्या जातसंरचनेतील अर्थकारणाची दिशा, त्यातून होणारे शोषण आणि सूफींच्या क्रांतीनंतर जातसंस्थेतील शोषणातून शेतकरी व श्रमिकांची झालेली मुक्ती याविषयी मांडणी केली आहे. पण त्यांचे हे संशोधन दखनेपुरते मर्यादित आहे.
दक्षिणेत आलेले सूफी हे मूलतः चिश्ती आणि कादरी पंथाचे होते. अपवादात्मक ठिकाणी अन्य पंथांचे संत व त्यांच्या कार्याचे दाखले आढळतात. दक्षिणेत मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या या चिश्ती संतांच्या आंदोलनाचे मुख्य केंद्र दिल्लीच होते. दिल्ली परिसरात ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती, नसिरुद्दीन चराग दहेलवी, ख्वाजा निजामुद्दीन औलीया यांनी या आंदोलनाचे विशेषत्वाने नेतृत्व केले. त्यामुळे चिश्ती आंदोलनाच्या भारतातील स्थापनेची भूमिका समजून घेण्यासाठी उत्तरेतला या चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे.
चिश्ती आंदोलनाची भारतात सुरुवात आणि त्याचा प्रसार ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्यामुळे झाला. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांनी भारतात आगमनानंतर इथले समाजवास्तव समजून घेऊन आपल्या कार्र्याची दिशा ठरवली. प्रस्थापित सामाजिक, सांस्कृतिक व्यवस्थेतील बदलासाठी त्यांनी समन्वय, संवाद आणि प्रबोधनातून विद्रोह अशी भूमिका घेतली. दिल्ली परिसरात त्यांनी उभ्या केलेल्या अनेक अन्नछत्र (लंगर), विद्यापीठे, वैद्यकीय केंद्रांमुळे सामान्य माणसाशी त्यांचा संवाद प्रबळ होत गेला. त्यामुळे समाजजीवनात क्रांतीकारक बदल घडून आले. या कारणानेच सूफी चळवळीत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांचा अभ्यास विशेषत्वाने केला जातो. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती सूफीवादातील चिश्ती शाखेची सुरुवात ख्वाजा अबू अहमद अब्दाल चिश्त (मृ. ९६५ इसवी) यांच्यापासून मानली जाते. ज्या चिश्तमधून चिश्ती विचारधारा जन्मली तिथे त्याचा प्रसार होऊ शकला नाही. सुरुवातीला चिश्ती परंपरेचे वैचारिक नेतृत्व (खिलाफत) ख्वाजा अहमद, ख्वाजा रुक्नुद्दीन, ख्वाजा हाजी शरीफ यांनी केले. पण त्यांच्यानंतर या विचारधारेचा विकास होऊ शकला नाही. काही काळ या शाखेच्या प्रसाराला मर्यादा आली असली तरी नंतरच्या काळात भारतीय उपखंडातून चिश्ती परंपरेला ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांचे सक्षम नेतृत्व मिळाले. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांचा जन्म अफगाणिस्तानात सिस्तान प्रांतातील संजर शहरात इसवी सन ११४२ साली पत्करले. खुरासानमध्ये असतानाच त्यांची भेट सूफी अवलिया इब्राहीम कन्दोजी यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांच्या सान्निध्याने युवावस्थेतील मैनुद्दीन यांच्यामध्ये मोठे परिवर्तन घडून आले. त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती विकली. आणि त्यातून मिळालेला पैसा गरीबांत वाटला. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी कधीही गरजेपेक्षा अतिरिक्त संपत्तीचा संचय केला नाही. रुबेन लेव्ही यांनी वरकड संपत्तीचा त्याग करण्याच्या प्रेषितांच्या धोरणाविषयी अत्यंत विस्ताराने लिखाण केले आहे. प्रेषित सातत्याने आपल्याकडे असणारा अतिरिक्त पैसा सायंकाळी घरी परतण्याआधी गरीब, वंचित, गरजूंमध्ये वाटत असत. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांनी प्रेषितांच्या जीवनविषयक धारणांना आपली जीवनमूल्ये म्हणून स्वीकारले होते. त्यांनी कधीही संपत्तीचा संचय केला नाही. कोणत्याही याचकाला त्याची गरज पूर्ण करण्याची साधने उपलब्ध असतील तर निराश करून परत पाठवले नाही. खुरासानमध्ये राहिल्यानंतर काही काळाने त्यांनी निशापूर येथून भारताकडे प्रस्थान केले. निशापूरवरून भारताला येत असताना त्यांना प्रवासात अनेक सूफी साधक भेटले. सुरुवातीला ते आपल्या साधकांसह बगदादला गेले. वैद्यकीय केंद्र आणि विद्यालयांची स्थापना
भारतात आल्यानंतर हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांनी सामान्य माणूस व त्याच्या नैसर्गिक हक्क अधिकारांसाठी काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी दिल्ली व अजमेर परिसरात आपल्या साधकांना या कार्यासाठी प्रेरीत केले. मक्तब, मदरसा आणि वेगवेगळ्या माध्यमातून शिक्षणासाठी प्रयत्न केले. तत्कालीन भारतीय शिक्षणव्यवस्थेत ही बदलांची नांदी होती. भारतीय शिक्षणपद्धतीमध्ये युनानी, अरबी तत्त्वज्ञानाचा प्रवेश या सूफी शिक्षणपद्धतीमुळे घडून आला. त्या काळात मदरसा आणि विद्यालयांमध्ये शिक्षणासाठी कोणालाही बंदी नव्हती. सूफींच्या कव्वाली या प्रबोधन काव्यातून जीवनाच्या हक्क, अधिकार आणि सामाजिक कर्तव्यांपासून गाफील असणाऱ्यांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करुन दिली जात असे. चिश्ती सूफींनी उभ्या केलेल्या मदरसा आणि विद्यालयांना तत्कालीन मुस्लिम शासकांनी कालांतराने प्रचंड मदत केली. मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांनुसार दिल्लीत १३ व्या शतकाच्या सुरुवातीला दिल्ली परिसरात शेकडो विद्यालये सुरु होती. त्यामध्ये तुर्कस्तान, बगदाद, अफगाणिस्तान इराण वगैरे भागातून आलेले शिक्षक सेवा बजावत होते. विद्याथ्र्यांना राहण्यासाठी वस्तीगृहांची सुविधादेखील करण्यात आली होती. दिल्ली व राजस्थानच्या काही भागांमध्ये शिक्षणांच्या प्रचंड सुविधा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळेच देशविदेशातील विद्यार्थी येथे शिक्षणसाठी येत असत. अल् बेरुनी, जियाउद्दीन बरनी, मिनहाजुल सिराज वगैरे इतिहासकारांनी दिलेल्या माहितीवरुन तत्वâालीन शिक्षणपद्धतीची माहिती मिळते. त्या वेळी तत्त्वज्ञान, युनानी विचारवंत, अरब साहित्य, अरबी भाषा, व्याकरण, कुरआन, कुरआन विश्लेषण, हदीस शास्त्र, मौखिक इतिहास कथन परंपरा व त्याच्या पद्धती यांसह अनेक भाषांचे शिक्षण दिले जात होते. मुहम्मद हबीब यांचे नसिरुद्दीन चराग दहेलवी यांच्याविषयचे संशोधन महत्त्वाचे आहे. त्यावरुन तत्वâालीन समाजजीवन व सूफी प्रणित बदलांच्या प्रक्रियेची माहिती मिळते.
हजरत ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्या साधकांमध्ये अनेक हकीमदेखील होते. त्या हकीमांच्या माध्यमातून सामान्य माणसांसाठी वैद्यकीय सुविधादेखील उपलब्ध करुन दिल्या होत्या. जहांगिरनामाच्या नोंदीवरुन या हकिमखान्यांमधल्या सुविधा व त्याविषयीच्या इतिहासाची माहिती मिळते. सामान्य माणसाला वैद्यकीय उपचार मोफत मिळावेत यासाठी सूफींनी प्रयत्न केले होते. ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांच्या खानकाह (सूफी केंद्र) मध्ये वैद्यकीय उपचारासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत. सामाजिक सुधारणा, अस्पृश्यतेविषयी भूमिका ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती हे अजमेर परिसरात येण्यापूर्वी पृथ्वीराजच्या दरबारात अनेक साधू आश्रयाला होते. मैनुद्दीन चिश्ती अजमेरमध्ये निवासास आल्याची बाब त्याला समजली. मैनुद्दीन चिश्ती यांच्या अजमेर निवासामुळे पृथ्वीराज नाराज होता. त्याने आपल्या दरबारातील राजगुरु रामदेव यांना मैनुद्दीन चिश्ती यांच्याशी शास्त्रार्थ करण्यासाठी पाठवले. शास्त्र, तत्त्वज्ञानविषयक चर्चेसाठी रामदेव आल्यानंतर मैनुद्दीन चिश्ती यांनी त्यांचे स्वागत केले. चर्चेच्या पहिल्याच टप्प्यात राजगुरु रामदेव यांनी पराभव स्वीकारला. आणि त्यानंतर त्यांनी आपल्या साधकांसह इस्लामचा स्वीकार केला. सूफी चळवळीचे अभ्यासक रामपूजन तिवारी यांनी या चर्चेची माहिती विस्ताराने दिली आहे. या घटनेनंतर जादूगार जयपाल योगी याला पृथ्वीराजने आपल्या जादूच्या प्रभावाने ख्वाजा मैनुद्दीन चिश्ती यांना नष्ट करण्याविषयी आदेश दिला. जयपाल योगी हा मैनुद्दीन चिश्ती यांच्याजवळ गेल्यानंतर त्यांनी आपल्या अलौकीकज्ञानाने त्याच्याकडून दृष्टिभ्रमाचा आधार घेऊन केल्या जाणाऱ्या जादूचा फोलपणा उघड केला. जयपाल योगीचा हा पराभवच होता. त्याच्या पराभवामुळे परिसरातील त्याची दहशत मोडीत निघाली व त्याने पसरवलेल्या अनेक अंधश्रद्धा दूर होण्यास मदत झाली. एके दिवशी मैनुद्दीन चिश्ती यांनी आपल्या आश्रमात स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. त्यांनी आश्रमातील प्रत्येक व्यक्तीला जेवणाच्या पंक्तीवर बसण्यासाठी बोलावण्याची सूचना साधकांना केली. साधक उठले आणि आश्रमात प्रत्येक व्यक्तीला त्यांनी बोलावले. पण एका अस्पृश्य जातीतील सफाई कामगाराला त्यांनी बोलावले नाही. हे पाहून मैनुद्दीन चिश्ती यांनी साधकांना त्याचे कारण विचारले तेव्हा साधकांनी तो अस्पृश्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मैनुद्दीन चिश्ती यांनी जोपर्यंत त्या अस्पृश्य समजलल्या जाणाऱ्या भावंडाला इथे बोलावले जात नाही तोपर्यंत आपण जेवण करणार नसल्याची भूमिका घेतली. त्यानंतर साधकांनी त्यांची क्षमा मागितली व त्या व्यक्तीस बोलावले. मग मैनुद्दीन चिश्ती यांनी त्याच्यासोबत जेवण केले. अस्पृश्यता व जातीय विषमतेच्या विरोधातील असे अनेक प्रसंग आपल्याला सांगता येऊ शकतील.
प्रेषित मुहम्मद (स.) यांनी वर्णवर्गस्त्री-दास्यांतासाठी जी भूमिका अरबस्तानात घेतली होती, त्यासाठी हजरत मैनुद्दीन चिश्ती यांनी भारतात संघर्ष केला. इस्लामच्या वर्णवर्ग स्त्रीदास्यांतविरोधी तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी त्यांनी इथे चिश्ती चळवळीची मूहुर्तमेढ रोवली. त्यांच्या प्रयत्नातून हजारोंच्या संख्येने वर्णशोषितांना मुक्ती मिळाली. भारतात त्यांनी चार दशकांहून अधिक काळापर्यंत हे मानवतावादी कार्य केले. पण दुर्दैवाने भक्ती आंदोलन, वारकरी चळवळीची भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक इतिहासात दखल घेतली जाते, तशी दखल सूफी चळवळीची घेतली जात नाही.

–सरफराज अहमद
मो.क्र.९५०३४२९०७६
(सदस्य गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर)

महाराज दरबारात म्हणजेच आपल्या दिवाणखान्यात व्याघ्रासनावर एकटेच बसले आहेत. तसे तर राजा ज्या आसनावर बसतो त्याला सिंहासन म्हणण्याची प्रथा आहे, पण महाराजांना अनेक जुन्या प्रथा आणि जुने संबंध मोडीत काढण्याची सवय असल्यामुळे तसेच सिंहापेक्षा त्यांना वाघोबा अधिक प्रिय असल्यामुळे त्यांनी आपण ज्या आसनावर बसतो त्याला ‘व्याघ्रासन’च म्हणावे असा आदेश काढलेला आहे. सध्या कोरोनामुळे ‘वर्वâ प्रâॉम होम’ सुरू असल्यामुळे महाराज घरातच असतात. घरातच दरबार भरतो. घरातूनच राज्यकारभार हाकला जातो. सध्या लॉकडाऊनच्या काळात आपणच घराबाहेर भटकायला लागलो तर प्रजेला कोणत्या तोंडाने सांगणार की घरात बसा म्हणून, असा सुज्ञ विचार करून महाराज घरातच बसतात. त्यामुळे अजून एक फायदा होतो, त्यांना लवकरात लवकर घरी बसवावं म्हणून टपून बसलेल्या देवा नानांना तशी संधीच मिळत नाही, कारण महाराज तर कायम घरीच बसलेले असतात!आता घरीच बसलेल्याला परत घरी कसं बसवणार बुवा, हे कोडं काही देवा नानांना सुटता सुटत नाही!
‘कोण आहे रे तिकडे?' महाराजांचा आवाज दुमदुमतो. क्षणार्धात दारावरचा सेवक हात बांधून समोर उभा राहतो.
‘जी. आदेश करावा.’
‘त्या आमच्या नारदला बोलव. ताबडतोब.' आदेश सुटतो.
‘जी.'
थोड्याच वेळात महाराजांचा नारद दोन्ही हात समोर बांधून, मान खाली घालून, चष्म्यातून वर पाहत महाराजांसमोर उभा असतो. त्याच वेळी पाश्र्वभूमीवर, ‘जिंदा रहने के लिए तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम.' हे गाणं वाजत असतं.
‘काय आदेश महाराज?' एरवी वाघासारखी डरकाळी फोडणाऱ्या गळ्यातून चिरका आवाज जेमतेम बाहेर पडतो. ‘आणि हे असं गाणं कसं ऐकताय आपण?'
‘नारदा, तुझा तर सर्वत्र संचार असतो ना? मग आम्हाला जी बातमी कळली ती तुला कशी कळली नाही अजून?' महाराज नेहमीप्रमाणे त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करीत विचारणा करतात. ‘कोणती बातमी महाराज?' आपल्या बोलण्याकडे महाराजांनी साफ दुर्लक्ष केलं आहे याची जराही खंत न बाळगता नारद विचारतो. ‘अरे, आम्ही या व्याघ्रासनावर ज्यांच्या कृपेने बसलो आहोत ते शरदरावच आमच्यावर नाराज आहेत म्हणे? असं कसं चालेल?चालणारच नाही. किंबहुना आम्ही ते चालवूनच घेणार नाही. काहीतरी कर ताबडतोब. कोणीतरी आमच्या पायाखालची सतरंजी ओढतोय असं वाटतंय आम्हाला. तूच गेला होतास ना शरदरावांकडे आपल्याला सत्ता मिळावी म्हणून? आता परत तूच जा त्यांच्याकडे, आपली सत्ता टिकावी म्हणून. इतक्या खटपटी लटपटी करून मिळवलेली सत्ता इतक्या सहजासहजी जायला नको. जायला नको म्हणजे काय जायलाच नको. ती आपल्यापासून दूर जायला तयार असेल, पण आपण आहोत का तयार तिच्यापासून दूर जायला?'
‘समजलो महाराज. काळजी करू नये. सतरंजी काही फक्त आपल्याच पायाखाली नाहीये. ती प्रत्येकाच्या पायाखाली असते आणि आपल्यालाही ती ओढता येते. लहान तोंडी मोठा घास झाला तर माफ करावे, पण शरदराव फार वेगळे आहेत. त्यांना समजायला दहा जन्म घ्यावे लागतील.'
‘खामोऽऽश! असं बोलतोस आम्हाला? जीभ छाटून हातात दिली जाईल. समजलास?'
‘माफी असावी महाराज. मी आपल्याला नाही त्या विरोधी पक्ष नेत्यांना बोलत होतो.'
‘ठीक आहे.'
‘महाराज, पण शरदराव तर सांगतात की ‘आमच्यात मतभेद नाहीत, सरकार पाच वर्षं टिकेल!’ म्हणून.'
‘ते सर्व ठीक आहे, पण आमचे पिताश्री त्यांच्याबद्दल जे काही बोलायचे ना ते आठवलं की त्यांच्याबद्दल विश्वासच वाटत नाही. आणि काल तर खुद्द वसंतदादासुद्धा स्वप्नात येऊन इशारा देऊन गेलेत.'
‘महाराज आजच बोलतो शरदरावांशी आणि खुंटा हलवून बळकट करून घेतो.'
‘नारदा, फोनवर बोलू नकोस त्यांच्याशी. मी जे गाणं ऐकतोय ना त्याचा अर्थ काळतोय का तुला?प्रत्यक्ष भेट त्यांना. मी तर म्हणेन की, तुझ्या त्या दैनिक हमरीतुमरीसाठी त्यांची एक
मॅरेथॉन मुलाखत घेऊन टाक. आठवडाभर आधीपासून रोज त्या मुलाखतीची जाहिरात कर. सर्वांनी ती मुलाखत वाचावी, ऐकावी आणि बघावी म्हणून जे जे करावं लागेल ते सर्व कर. तुझ्यातली
लांगुलचालनाची जन्मजात कला वापरून त्यांच्या तोंडून माझी स्तुती करवून घे आणि सरकारला, पक्षी माझ्या सत्तेला त्यांच्याकडून अभय मिळवून घे. समजलास? एकदा का ही मुलाखत वर्तमानपत्रांत आली, वाहिन्यांवर दिसली की आपले विरोधकच काय पण मित्रपक्षही गारद होतील. होतील म्हणजे काय होतीलच. किंबहुना मी तर म्हणेन की व्हायलाच हवेत सगळे गारद. निघ आता. कामाला लाग.'
‘निघतो महाराज, पण मुलाखतीची जाहिरात कशी करू?'
‘कर की, एक शरद, एक नारद बाकी सगळे गारद!'

-मुकुंद परदेशी
मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र.: ७८७५०७७७२८

Waterfall
धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन पर्यावरणीय विनाशाला धार्मिक निष्ठा जबाबदार असल्याचा ठपका ठेवतो. मात्र याउलट, भौतिक जगावरील विश्वासाचा दृष्टिकोन पारलौकिक निष्ठेच्या तुलनेत पर्यावरणीय विश्वासापेक्षा अधिक हानिकारक आहे. वैज्ञानिक भौतिकवाद आणि लौकिक निराशावाद पर्यावरणीय नैतिकतेशी सुसंगत नाहीत.
जॉन हॉट (John F. Haught - an American theologian) यांच्या मते :
‘‘जर प्रत्येक गोष्ट ‘निरपेक्ष शून्यते’साठी निश्चित असेल आणि भौतिकवाद विश्वाकडे अत्यंत क्षुल्लक आणि अंतिम शोकांतिकेच्या रूपात पाहात असेल तर खरोखरच आपण तिची कदर केली असती? अशा तत्त्वज्ञाद्वारे आपल्याला पृथ्वीच्या सुंदर खजिन्याची काळजी घेण्यासाठी कशा प्रकारे प्रेरित केले जाऊ शकते?हे शक्य आहे, असे आम्हाला वाटते.’’
परलोकावरील श्रद्धा आपल्याला निसर्गावर प्रेम करण्याचे आमंत्रण देते, कारण निसर्गाकडे स्वतःची अंतर्गत भावी इच्छा असते ज्यासाठी आपण इच्छित आहोत, म्हणूनच निसर्गाचा नाश म्हणजे खरोखरच स्वतःला व ब्रह्मांडाला आपल्या भविष्यापासून नष्ट करणे होय. जगातील अनेक वस्तूंच्या अस्तित्वाचे नाविन्य सध्याचे युग आणि जगाच्या समाप्ती दरम्यान सातत्य ठेवण्याची आशा निर्माण करते. सुंदर वातावरण, नैसर्गिक आकांक्षांचे समाधान व आनंद, सुख व शांतीची इच्छा ही स्वाभाविक बाब असली तरी याच्या पूर्ततेसाठी सध्याचे जग पुरेसे नाही. यासाठी धर्म नंदनवनाची (स्वर्गाची) संकल्पना देतो जेथे या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण केल्या जातात.
आपण पृथ्वी आणि नैसर्गिक जगाकडे नंदनवन म्हणून पाहू नये, अशी परलोकावरील श्रद्धेची अपेक्षा आहे. त्याकडून आपण परिपूर्णतेची अपेक्षा करू नये तर ते पूर्ण होण्याची (पारलौकिक जीवनात) आशा बाळगू शकतो. अशा प्रकारे आपण त्याचे दोषही उघड करू शकतो. खरं तर, अनेक पर्यावरणीय समस्या स्वत:साठी सुखकारक स्वर्ग निर्माण करण्याच्या मनुष्याच्या तीव्र इच्छेचा परिणाम आहेत आणि यासाठीच तो नैसर्गिक देणग्या आणि त्याच्या मौल्यवान स्रोतांचा अंधाधुंध वापर करू लागतो. या जगात नंदनवनाची प्राप्ती (स्वर्गप्राप्ती) शक्य नाही. तथापि, कुरआनात उल्लेखित धर्मशास्त्र आणि स्वर्गातील बोधकथा एक उच्च ध्येय ठेवतात जेणेकरून हे ऐहिक जीवन नेहमीच ईश्वराच्या मार्गदर्शनानुसार सर्वोच्च पूर्णतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते.
फक्त पारलौकिक संकल्पनेचा मानवी नैतिकतेशी जवळून संबंध आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. निवाड्याच्या दिवसाविषयी धार्मिक मान्यता अशी आहे की या दिवशी प्रत्येकाला त्याच्या कर्माचा हिशेब द्यावा लागेल कारण तो न्यायाचा दिवस आहे. हा विश्वास लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करतो.

पर्यावरणीय इतिहासकार सायमन (शिमोन) पारलौकिक जीवनाचे महत्त्व असे सांगतात -
‘‘पृथ्वी केवळ एक तात्पुरते निवासस्थान आहे या कल्पनेवर आधारित सर्व मानवी क्रियाकलाप असले पाहिजेत (मनुष्य एक श्रेष्ठ निर्मिती असला तरी) आणि आपली कृती विश्वासाचे प्रकटीकरण म्हणून योग्यरित्या प्रशासित केली जाणे आवश्यक आहे. यामध्ये न्याय आणि धार्मिकता तसेच पर्यावरणाच्या समस्यांचे योग्यज्ञान आणि आकलनाचा समावेश आहे.’’
या चर्चेमुळे आम्हाला असा निष्कर्ष काढण्यास मदत होते की पृथ्वीची पर्यावरण व्यवस्था नष्ट करण्याची परवानगी धर्माचा परिणाम नसून धार्मिक जागृतीच्या अभावाचा परिणाम आहे. जॉन हॉट (John Haught) यांनी याच मताचे समर्थन करताना धर्मनिरपेक्षतेला याच्या खऱ्या अपराधाबद्दल दोषी ठरवले. धर्मनिरपेक्षतेने ईश्वराला ब्रह्मांडापासून वेगळे करून बुद्धिप्रामाण्यवाद, मानवतावाद आणि विज्ञानवाद यांना ही पोकळी भरून काढण्याची संधी दिली. या मतांच्या प्रभावामुळे निसर्गावर मानवी वर्चस्वाची कल्पना नाहीशी झाली.
सर्व प्राणीमात्राची निर्मिती केल्यानंतर अल्लाहने त्यांना एकमेकांच्या सहकार्यावर अवलंबून ठेवले आणि याच आधारावर जगात संतुलन व समतोल राखला जातो. सर्व प्राणी, सजीव आणि निर्जीव, एक मौल्यवान संपत्ती आहे जी आपल्या अस्तित्वाचा हेतू पूर्ण करण्यात गुंतलेली आहे. जर मनुष्य हे संतुलन बिघडवितो, या नैसर्गिक स्रोतांचा गैरफायदा घेतो, त्यांचा गैरवापर करतो किंवा त्यांचा अपव्यय करतो, त्यांना प्रदूषित करतो तेव्हा त्याचा लौकिक संतुलन आणि न्यायावर परिणाम होईल, जो स्वतः मनुष्यासाठी धोकादायक आहे. म्हणूनच, आपण सर्वांनी या नैसर्गिक स्रोतांच्या संरक्षण आणि अस्तित्वासाठी कार्य करणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागेल. निसर्गाविरूद्धच्या लढाईत मनुष्याचा पराभव निश्चित आहे. परिणामस्वरूप असे म्हणता येईल की आधुनिक काळातील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आधुनिक शोधांचा दुरुपयोगामुळे पर्यावरणीय संकट ओढवले गेले आहे. त्याचा सामना करण्यासाठी धार्मिक शिकवण, नैतिक, मानसिक शुद्धतेला प्रोत्साहन देण्याची नितांत गरज आहे.

(भाग ४) - क्रमश:
- शाहजहान मगदुम
मो.: ८९७६५३३४०४

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget