-
बशीर शेख
डिसेंबरला राजस्थानच्या
राजसंमंदमध्ये मुहम्मद अफराजुल या मजुराला शंभुलाल रेगर यांनी ज्या निघृणपणे मारून,
त्याला जाळल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकला होता, त्याची आठवण यावी अशी घटना महाराष्ट्रातील
वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कुर्हा नावाच्या गावामध्ये मागच्या आठवड्यात
घडली. पवन बांगर (25) याने नमाजची टोपी डोक्यावर परिधान करून एका वानराला काठीने बेदम
मारहाण केली. वानराला चने फुटाणे दाखवून जवळ बोलाविले आणि पहिला वार त्याच्या पायावर
केला. त्यामुळे तो जायबंदी झाला आणि त्याला पळता आले नाही आणि त्यानंतर एकानंतर एक
अनेक घातक वार त्याच्या शरिरावर केले. एवढेच नव्हे तर त्या मारहाणीत त्याचा मृत्यू
झाल्यानंतर त्याला झाडाला टांगले व -(उर्वरित लेख पान 7 वर)
परत मारहाण केली.
विशेष म्हणजे या सगळ्या घटनेचे चित्रीकरण त्याने आपले दोन मित्र पवन रामा राठोड
(16) व समीर शाह (15) यांच्या साह्याने करून तो व्हिडीओ समाजमाध्यमांवर अपलोड केला.
पवन बांगर याने डोक्यावर घातलेली टोपी, नमाजाच्या वेळेस घालावयाची टोपी असल्यामुळे
लोकांचा प्रथमदृष्ट्या गैरसमज झाला की वानराला मारहाण करणारे तरूण मुस्लिम असावेत.
लगेच या व्हिडीओवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आणि मुस्लिम समाजाविषयी घृणात्मक टिका-टिप्पणी
सुरू झाली. पण वनप्रशासनाचे धन्यवाद की वनपाल मोहन भोसले, वनरक्षक जी.वाय. ढोले, फुलसांवगे,
शिंदे, महाले, महादेव आघाव यांनी तातडीने हालचाली करून पवन बांगर, पवन राठोड आणि समीर
शहा या तिघांनाही अटक करून वन्यजीवन अधिनियम 1972 च्या कलम 9 व 39 अंतर्गत गुन्हा दाखल
केला.
मुस्लिम समाजाविषयी युवकांमध्ये घृणेने एवढे
टोक कसे गाठले यासंबंधी सुज्ञांनी विचार करायची वेळ आलेली आहे. केवळ मुस्लिमांना बदनाम
केल्याने देशहित होणार आहे का? अजिबात नाही उलट असे कृत्य करणारी तरूण पिढी गुन्हेगार
होत आहे. दुसर्याला बदनाम करण्यासाठी स्वतः मुक्या जनावराला ज्याला की हिंदू धर्मामध्ये
हनुमानाचा अवतार मानतात. त्याला निघृणपणे मारण्यात आले. मुस्लिमांविषयी विशिष्ट वाहिन्यांवर
ओरडून-ओरडून चुकीचा जो प्रचार केला जातोय. त्याचे परिणाम दिसू लागलेले आहेत.
तिकडे राजसमंद मधील घटनेनंतर मुस्लिम समाजाने उदयपूरमध्ये मोठा मोर्चा काढून
आपल्या नाराजीचे प्रदर्शन केले. त्या मोर्चाच्या 10 आयोजकांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याविरूद्ध
गुन्हा देखील दाखल केला. मात्र त्या मोर्चाचा व्हिडीओ समाज माध्यमांतून व्हायरल झाल्यावर
14 डिसेंबरला शंभुलालच्या समर्थकांनी उदयपूर कोर्टासमोर उग्र प्रदर्शन केले. तसेच कोर्टाच्या
इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारावर चढून भगवा ध्वज फडकाविला. तर इकडे मुक्या जनावराला
काठिने मारून-मारून त्याची हत्या करण्याइतपत गुन्हेगारी प्रवृत्ती तीन तरूणांमध्ये
निर्माण झाली. ही घृणेची राजनीति देशाला कोणत्या दिशेला नेत आहे? याचा विचार वेळेवर
नाही केला तर मात्र भविष्यात कठिण परिस्थिती निर्माण होईल, यात वाद नाही.
शिवाय, समाज माध्यमांवर नियंत्रण जरी नाही आणले
तरी त्यांचे नियमन करण्यासाठी एखादा कायदा करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. याकडे
लक्ष दिले नाही तर खोट्या- नाटया घटनांचा वापर करून समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे
काम अविरतपणे केले जाईल, यात शंका नाही. अगोदरच तरूणांच्या हातांना काम नाही, रिकामे
डोके सैतानाचे घर असते. त्यामुळे या रिकाम्या डोक्यांची फौज देशामध्ये कधी काय करील,
याा नेम नाही. वानराला मारतानाचा व्हिडीओ उघड्या डोळ्यांनी पाहवत नाही, त्या मुक्या
जनावराच्या किंकाळ्या ऐकवत नाही. या उलट्या काळजाच्या तरूणांनी त्याची अमानुष हत्या
का केली? याला एकच उत्तर आहे की आपली तरूण पिढीवर चुकीचे संस्कार होत आहेत. कल्पना
करा जर वनअधिकार्यांनी तात्काळ कारवाई करून या तिघांना अटक केली नसती तर केवढा मोठा
गैरसमज झाला असता? कोर्टा समोर उग्र प्रदर्शन करून इमारतीवर धार्मिक ध्वज फडकाविण्या
इतपत धाडस जेव्हा झुंडीमध्ये येते तेव्हा त्याचा परिणाम कोर्टावर होणार नाही का? याचाही
विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपणच आपल्या कोर्टाचा सन्मान नाही केला तर कोण करील?
एवढी साधी समज या युवकांना नाही यावरून यांची मानसिक जडण घडण किती चुकीच्या पद्धतीने
झालेली आहे, याचा अंदाज यावा.
राजस्थानमध्ये एकापाठोपाठ एक मॉबलिंचिंगच्या
घटना घडल्या असून, आता तर कोर्टाच्या इमारतीचाच ताबा झुंड घेत असेल तर राज्यसरकार काय
करतेय? असा सवाल विचारून राज्यसरकार बरखास्त करावे, अशी मागणी जनतेतून होत आहे. विशेष
म्हणजे राजसमंदच्या घटनेनंतर तसेच कोर्टावर भगवा ध्वज फडकविल्याच्या घटनेनंतर केंद्र
किंवा राज्य सरकारतर्फे कुठलीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. किंवा न्यायालयानेही
या घटनेची स्वतःहून दखल घेतली असल्याचे दिसून येत नाही. या बाबी मूळ घटनेपेक्षा जास्त
चिंताजनक आहेत. म्हणून म्हणावेसे वाटते खरोखरच ’मेरा देश बदल रहा है’. एनडीटीव्हीच्या
प्राईम टाईममध्ये कार्यक्रमाचे संयोजक रविश कुमार यांच्याशी बोलताना खालील प्रतिक्रिया
व्यक्त करण्यात आल्या.
”फेसबुकपर, ट्युटरपर भद्दी-भद्दी गालियां देना, रेप की धमकी
देना, मारने की धमकी देना, लोगों से मारपीट करना सबकुछ हो रहा है लेकिन इन लोगों के
खिलाफ कुछ नहीं होता. इस कारण इन लोगों में ये फिलिंग आ गई है के, सरकार हमारी है,
सारा तंत्र हमारा है, पोलीस हमारी है, कोर्ट हमारा है, ये जो इन्होंने किया कोर्ट पर
भगवा झेंडा फहरा दिया ये तो क्रिमीनल ट्रेस पास भी है और समाज में फूट डालने की कोशिश
भी है. साथ में कंटेम्प्ट ऑफ कोर्ट भी है. लेकिन इन लोगों के खिलाफ कोई अॅक्शन नहीं
हो रहा. खासकर जहाँ भाजपा की सरकारे हैं, ये दुर्भाग्य की बात है के कोर्ट ने भी इसपर
कोई अॅक्शन नहीं लिया.”
- अॅड. प्रशांत भूषन, सर्वोच्च न्यायालय.
- आर. एस. सोढी, पूर्व न्यायाधिश, दिल्ली हायकोर्ट.
Post a Comment