Halloween Costume ideas 2015

मोक्ष प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य

: संकलन :
 प्रा. अब्दुलरहेमान शेख
9511208946
आमच्यापैकी असा कोण आहे जो या जीवनात सफल होऊ इच्छित नाही? सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सर्व याच एकमेव प्रयत्नात असतो की स्वत:चे आणि स्वत:च्या कुटुंबाचे जीवन सफल व्हावे. यासाठी आम्ही सर्वांनी जीवनाचे काही उद्देश ठरविले आहेत. ज्यांना प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. जेव्हा आम्ही उद्देश प्राप्त करतो तेव्हा आमच्या आनंदाला सीमा राहत नाही, सफलताप्राप्तीनंतर आम्ही आनंदविभोर होतो. परंतु, जेव्हा काही कारणांमुळे उद्देश प्राप्त होऊ शकत नाही, तेव्हा या असफलतेमुळे आम्ही अति दु:खी होतो आणि कधी-कधी ईश्वराला यासाठी दोषी ठरवितो.
       मनुष्य जीवन त्याच्या मृत्यूपश्चात समाप्त होत नाही तर त्यानंतरसुद्धा जीवन आहे. सफलतेची ही सर्व धडपड याच जगातील जीवनाला सफल बनविण्यात आणि भौतिक सुखसुविधांना प्राप्त करण्यापर्यंतच सीमित आहे. मृत्यूपश्चात काय होणार आहे? याकडे आमचे लक्ष कमीच जाते. खरे तर संपूर्ण जीवनाला सफल बनविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे.
-धर्माची भूमिका-
    उपासनाविधीच्या ज्ञानासह मनुष्याला पूर्ण मार्गदर्शन करणे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणे धर्माचे दायित्व आहे. सर्व धर्मांनी आणि विचारप्रणालींनी ही दायित्वपूर्ती करताना मनुष्यासमोर मोक्ष आणि मुक्तीचा उद्देश प्रस्तुत केला आहे. मानवी इतिहास यावर साक्षी आहे की मुक्तीला मनुष्य जीवनाच्या सफलतेसाठी मापदंड म्हणून वेगवेगळ्या रूपात सांगितले गेले आहे. मुक्तीविषयी प्रत्येक धर्मात मतभेद आणि विरोधाभास आढळून येतो.
- हिंदू धर्म-
हिंदू धर्मात मरणोत्तर जीवन आणि पुनर्जन्म अशा दोन वेगवेगळ्या धारणा आढळतात. एकीकडे वेदांमध्ये स्वर्ग व नरकाचे वर्णन सापडते ज्याद्वारे मरणोत्तर जीवनात पुन्हा जन्म होण्याची पुष्टी होते तर दुसरीकडे अन्य ग्रंथांत आवागमनीय पुनर्जन्माचे वर्णनसुद्धा सापडते ज्यात मनुष्य आत्मा विभिन्न योनितून अनेकदा जन्म घेऊन आवागमनीय (पुनर्जन्म) उन्नत होऊन ईश आत्म्यामध्ये विलीन होतो आणि हीच मनुष्याची मुक्ती आहे. या दोन्ही धारणांव्यतिरिक्त श्रीमद्भगवदगीतेमध्ये मोक्षप्राप्तीचा एक मार्ग संन्यास घेऊन आणि सत्यज्ञानप्राप्तीसाठी स्वत:ला पूर्णत: समर्पित करणे आहे. तसेच दुसरीकडे या जगाच्या जीवनकर्तव्यांना पूर्ण करताना तुच्छ स्व-इच्छांना त्यागणेसुद्धा मोक्ष आहे, असे सांगितले आहे. वेदांमध्ये आवागमनीय पुनर्जन्म संकल्पना आढळत नाही. वेद अध्ययनाने स्पष्ट होते की वास्तवता दोनच लोक आहेत. एक वर्तमान लोक आणि दुसरे परलोक. परलोकात मनुष्याला उच्च स्थान प्राप्त होणे म्हणजेच मुक्ती होय. जिथे सर्व कामनापूर्ती, प्रत्येक प्रकारचा आनंद व सुख असेल आणि तिथे ईश्वराचे राज्य असेल. वेदांमध्ये स्वर्गाचे अति सुंदर व आकर्षक वर्णन सापडते आणि नरकाचे अति दु:खदायक वर्णन आहे. वेदांनुसार परलोक सफलताच वास्तविक सफलता आणि मुक्ती आहे.
- बौद्ध धर्म-
बौद्ध मतानुसार मुक्ती अथवा निर्वाण म्हणजे मनुष्याने स्वत:च्या इच्छा-आकांक्षांना स्वनियंत्रित करावे किंवा त्यांच्यापासून मुक्ती मिळवावी. बुद्धांच्या दृष्टीने स्वर्ग किंवा नरकाचे लौकिक अस्तित्व नाही आणि मनुष्य याच जीवनात त्याच्या चांगल्या व वाईट कर्मांनी स्वर्ग अथवा नरकास प्राप्त करू शकतो. गौतम बुद्धांनी ईश्वराच्या अस्तित्वाला स्वीकारले किंवा अस्वीकारलेले नाही. त्याच्यानुसार मनुष्याच्या मुक्तीसाठी कोणत्याही ईश्वराची किंवा देवीदेवतांची कृपा व अनुग्रहाची आवश्यकता मुळीच नाही. बुद्धांनी आत्म्याच्या अस्तित्वाचासुद्धा अस्वीकार केला आहे. बुद्धमतानुसार मुक्ती व निर्वाणाचा संबंध मनुष्याच्या भौतिक जीवनाशीच सीमित आहे. मरणोत्तर जीवनाविषयी बौद्धमत काहीच मार्गदर्शन करत नाही. धर्मात नैतिकता जर ईश्वराच्या अस्तित्वाला नाकारण्यावर आधारित असेल तर त्याचे पालन करणे जास्त काळापर्यंत अशक्य होते आणि हेच बौद्ध धम्माविषयी घडले आहे.
-जैन धर्म-
जैन मतानुसार आत्मा मनुष्य शरीरात कैद आहे आणि या भौतिक शरीरापासून त्याची मुक्तीच मनुष्याची खरी मुक्ती आहे. यासाठी शरीराला इतके काही कष्ट देणे आवश्यक आहे की, ज्यामुळे आत्मा शरीरातून निघून जाईल. कठोर तपश्येनेसुद्धा हे साध्य होते. या मतानुसार श्रेष्ठ व प्रशंसनीय मृत्यू तो आहे ज्यात मनुष्य भुकेने व्याकूळ होऊन मरतो. जैन मत ईश्वराला सृष्टीनिर्माता म्हणून स्वीकारत नाही, परंतु एका मुक्त आत्म्याला मात्र समस्त ईशगुणांनी संपन्न करतो. या मतानुसार प्रत्येक सजीव ही स्थिती प्राप्त करू शकतो आणि करतसुद्धा आहे. अशा प्रकारे जैन मत अगणित ईश्वरांना स्वीकारतो. यांचा विश्वास आहे की प्रत्येक आत्मा कर्माशी जोडलेला आहे आणि यापासून सुटका होणे म्हणजेच आत्म्याला मुक्ती मिळणे आहे.
-शीख धर्म-
शीख धर्म ईश्वरात विलीन होण्यास मुक्ती मानतो. यासाठी जगातील सुखसुविधांना त्यागणे, उपवास करणे व तपस्या करणे आवश्यक नाही. फक्त ईश्वरावर आस्था ठेवून त्याचे चिंतन मनन करून सत्यमय जीवन व्यतीत करणे आहे. शीख धर्म एकेश्वरत्वाचा समर्थक आहे.
”जे लोक ईश्वराचे चिंतनमनन करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो. अशा लोकांना जीवनमृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते.” (गुरुग्रंथसाहिब-11)
- ख्रिश्चन धर्म-
ख्रिश्चन धर्मसुद्धा एकेश्वरत्वाचा समर्थक आहे, परंतु याविषयीची परिभाषा यात स्पष्ट सांगितली नाही. प्रेषित इसा मसीह (अ.) यांना ईश्वरसुद्धा मानले गेले आहे. तसेच ईश्वराचा पुत्रसुद्धा आणि पवित्र आत्मासुद्धा. ख्रिश्चन धर्मानुसार पापांपासूुन पूर्णत: मुक्ती खरी मुक्ती आहे. पाप मनुष्याच्या जन्मापासून त्याच्याशी निगडीत आहे. या पापांपासून मुक्तीचा एकमेव मार्ग इसा मसीह (अ.) यांच्यावर आस्था ठेवणे आहे. या धर्मानुसार दोन हजार वर्षांपूर्वी ईश्वरपुत्र ईसामसीह यांनी सुळावर स्वत:चा बळी देऊन सर्व मानवांच्या पापांचे प्रायश्चित्त केले आहे. पाप आणि जीवनाच्या मुक्तीचा एकच मार्ग इसा मसीह (अ.) वर आस्था बाळगणे आहे. ख्रिश्चन धर्माच्या ग्रंथांत प्रेषित इसा मसीह (अ.) यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांच्या मुक्तीविषयीचा उल्लेख मात्र सापडत नाही. तसेच इसा मसीह (अ.) वर आस्था बाळगूनसुद्धा मनुष्य जर पापी कृत्य करीत गेला तरी त्याची मुक्ती होणारच काय? याविषयीचे स्पष्टीकरणसुद्धा सापडत नाही.
- यहुदी धर्म-
यहुदी लोक समजतात की जगात ईश्वराने निवडलेला सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ एकमेव वंश त्यांचाच आहे आणि ईश्वराशी त्यांचा विशेष संबंध आहे. यहुदी म्हणून जन्माला आलेल्या प्रत्येकाचा मोक्ष जन्मापासूनच सुनिश्चित झालेला असतो. त्यांची मान्यता आहे की नरक अन्य धर्मियांसाठी आहे आणि यहुदींना नरकात टाकले जाणार नाही. हे यहुदीमत साडेतीन हजार वर्षांपासून प्रचलित आहे. येथेसुद्धा हे स्पष्टीकरण मिळत नाही की एखाद्या वंशात जन्म घेणेच मुक्ती आहे तर या वंशाबाहेर जन्मलेल्या लोकांचे काय होईल?
- इस्लाम धर्म-
इस्लाममध्ये मुक्तीची धारणा सहज, सरळ, स्पष्ट व विवेकपूर्ण अशी आहे. इस्लामनुसार मोक्ष व मुक्ती प्राप्त करण्यासाठी भौतिक जगाचा त्याग करून संन्यास घ्यावे लागत नाही की या जगातील सुखसुविधांना त्यागावेसुद्धा लागत नाही. तसेच स्वत:च्या शरीरालासुद्धा त्रास (इंद्रिय दमन) द्यावे लागत नाही. इस्लामनुसार जन्माच्या आधारावर सर्व मानव समान आहेत आणि स्वर्ग एखाद्या वर्गविशेषासाठी आरक्षित नाही. इस्लाम मानवांना ऊच-नीचतेच्या आधारावर विभाजित करीत नाही, ज्यानुसार उच्चवर्णियांसाठी स्वर्ग आणि दुसर्यांसाठी नरक आहे. इस्लाम एक परिपूर्ण जीवनव्यवस्था आहे. यात जगातील सर्व मानवी समस्याची उकल व मुक्ती आहे. या जीवनात व पारलौकिक जीवनात सफलताप्राप्तीचे संपूर्ण मार्गदर्शन इस्लाम करतो, ज्याचे जीवंत उदाहरण पैगंबर मुहम्मद (स.) यांचे पवित्र जीवन आहे.
    इस्लाम आवागमनीय पुनर्जन्माला पूर्णत: नाकारतो आणि त्यास अस्वाभाविक व अविश्वसनीय मानतो. इस्लामची मौलिक धारणा आहे की मोक्ष व मुक्ती प्राप्त करणे प्रत्येकाला शक्य आहे. मग तो कोणत्याही देशाचा, वंशाचा अथवा कोणत्याही काळात जन्मलेला असो, अट फक्त ही आहे की त्याने ईशमार्गदर्शनानुसार जीवन व्यतीत केले असावे. ईश्वराने पूर्वी अवतरित ग्रंथांचे अवशेष आजसुद्धा उपलब्ध आहेत परंतु त्यांच्यापैकी कोणताच ग्रंथ आज मूळ रूपात उपलब्ध नाही. या सत्याला कोणीही नाकारू शकत नाही की लोकांनी त्या ग्रंथांना स्वत:च्या इच्छेनुसार बनविण्यासाठी त्यांच्यामध्ये अतोनात फेरबदल केले आणि त्यामुळे त्या ग्रंथांची मूळ शिकवण आज लुप्त झाली आहे. आज पवित्र कुरआनच तो अंतिम व सुरक्षित ईशग्रंथ आहे जो ईश्वराच्या वास्तविक व मूळ शिकवणी मानवांपर्यंत प्रस्तुत करत आहे. या ग्रंथाचे 1450 वर्षांपासून पूर्णत: सुरक्षित असणे त्याच्या सत्यतेचे सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. यावरून हेच स्पष्ट होते की इस्लाम हाच मानवतेच्या सफलतेचा, शांती, प्रगती व मुक्तीचा एकमेव मार्ग आहे. याव्यतिरिक्त इतर सर्व शिकवणी मनुष्यनिर्मित आहेत आणि त्यांचा ईशमार्गदर्शनाशी काहीएक संबंध नाही. ईश्वराला केवळ पूजेसाठी सीमित करून आपल्या जीवनाला ईशमार्गदर्शनापासून पूर्णत: अलिप्त ठेवणे मनुष्याची एक घोडचूक आहे. याच कारणाने आज पूर्ण व्यवस्था अस्तव्यस्त झालेली दिसून येत आहे आणि मनुष्य शांती, प्रगती व मुक्तीच्या मार्गापासून दूर भरकटला गेला आहे.
    जीवन व जीवनाच्या प्रश्नांचा विचार करणारे आणि आपल्या वास्तविक स्वरूपाचे ज्ञान प्राप्त करण्याची जिज्ञासा बाळगणार्या विचारवंतांचे हे कर्तव्य आहे की त्यांनी इस्लाम धर्माच्या ज्ञानापासून अपरिचित राहू नये.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget