लातूर : आयुष्य एकदाच मिळते आणि ते ही नीट जगता येत नसेल तर दुर्देव आहे. आम्हाला जीवन कसं जगावं याचं ईश्वरीय मार्गदर्शन उपलब्ध असून देखील आम्ही ते समजून वाचत नाही. आपल्याजवळ सर्वकाही असून देखील असमाधानी आहोत. याचा अर्थ आमच्याकडं भौतिक सुविधांतून आम्ही समाधानी होण्याचा प्रयत्न करतो मात्र ते खरं यशस्वी जीवन नाही. त्यासाठी आम्हाला शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग समजून घेणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठ उपकेंद्राचे प्रमुख बी.एन. मिश्रा यांनी येथे केले.
जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र द्वारा 12 ते 21 जानेवारी या कालावधीत इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी मोहिम राबविली जात आहे. यामध्ये कॉर्नर बैठका, वयक्तिक भेटी, सभा घेतल्या जात आहेत. या मोहिमेच्या समारंभ सोहळ्यात हॉटेल अॅम्बेसीच्या सभागृहात रविवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अबरार मोहसीन होते. मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून लातूर मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर,मुफ्ती युनूस यांची प्रमुख उपस्थिती होती. बी.एन. मिश्रा पुढे म्हणाले, माणसातही हिंस्त्रता आढळून येते. तो जर बेलगाम वागला तर हैवानाचं रूप धारण करतो. त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याला नियंत्रित करणे आपल्या हातात असते, त्याचे समुपदेशन वेळेवर झाले तर तो नक्कीच यशस्वी माणूस बनू शकतो. मात्र हे करण्यासाठी आमच्याकडे त्या प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ईश्वरीय मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य मोहिमेद्वारा सुरू केले आहे, ते स्तुत्य आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे अशोक गोविंदपूरकर म्हणाले, देशात जाणून बुजून काही लोक अस्थिरता निर्माण करीत आहेत. त्यामाध्यमातून ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला अशा स्थितीत शांती कायम राखणे गरजेचे आहे. तरच आमची प्रगती होईल. शांती शिवाय प्रगती ही अशक्य आहे. शहराध्यक्ष अबरार मोहसीन म्हणाले, आम्ही सर्व एकाच आई-वडिलांची संतान आहोत. आम्हाला एकमेकांच्या भल्यासाठी जेवढं काही करता येईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आम्ही सर्व एकमेकांचे भाऊ-बहिण आहोत. इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग या मोहिमेत सहभागी होवून आमचं जीवन कसं सुखी, संपन्न होईल हे जाणून घेणं गरजेच आहे. प्रास्ताविकात मुहम्मद युनूस पटेल यांनी मोहिमेची रूपरेषा, उद्देश सांगितला. सुत्रसंचालन सलीम शेख यांनी केले.
जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्र द्वारा 12 ते 21 जानेवारी या कालावधीत इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी मोहिम राबविली जात आहे. यामध्ये कॉर्नर बैठका, वयक्तिक भेटी, सभा घेतल्या जात आहेत. या मोहिमेच्या समारंभ सोहळ्यात हॉटेल अॅम्बेसीच्या सभागृहात रविवारी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष अबरार मोहसीन होते. मंचावर प्रमुख पाहूणे म्हणून लातूर मनपाचे स्थायी समिती सभापती अशोक गोविंदपूरकर,मुफ्ती युनूस यांची प्रमुख उपस्थिती होती. बी.एन. मिश्रा पुढे म्हणाले, माणसातही हिंस्त्रता आढळून येते. तो जर बेलगाम वागला तर हैवानाचं रूप धारण करतो. त्यामुळे त्याच्या सभोवतालच्या सर्वांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्याला नियंत्रित करणे आपल्या हातात असते, त्याचे समुपदेशन वेळेवर झाले तर तो नक्कीच यशस्वी माणूस बनू शकतो. मात्र हे करण्यासाठी आमच्याकडे त्या प्रकारचे ज्ञान असणे आवश्यक आहे. जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्राने ईश्वरीय मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य मोहिमेद्वारा सुरू केले आहे, ते स्तुत्य आहे. या मोहिमेचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा, असेही ते म्हणाले.
प्रमुख पाहुणे अशोक गोविंदपूरकर म्हणाले, देशात जाणून बुजून काही लोक अस्थिरता निर्माण करीत आहेत. त्यामाध्यमातून ते आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहेत. आम्हाला अशा स्थितीत शांती कायम राखणे गरजेचे आहे. तरच आमची प्रगती होईल. शांती शिवाय प्रगती ही अशक्य आहे. शहराध्यक्ष अबरार मोहसीन म्हणाले, आम्ही सर्व एकाच आई-वडिलांची संतान आहोत. आम्हाला एकमेकांच्या भल्यासाठी जेवढं काही करता येईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण आम्ही सर्व एकमेकांचे भाऊ-बहिण आहोत. इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग या मोहिमेत सहभागी होवून आमचं जीवन कसं सुखी, संपन्न होईल हे जाणून घेणं गरजेच आहे. प्रास्ताविकात मुहम्मद युनूस पटेल यांनी मोहिमेची रूपरेषा, उद्देश सांगितला. सुत्रसंचालन सलीम शेख यांनी केले.
Post a Comment