
माननीय नुअमान बिन बशीर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो मनुष्य अल्लाहच्या आदेशांची अवज्ञा करतो आणि जो अल्लाहचे आदेशांची अवज्ञा करताना पाहतो मात्र त्याला विरोध करीत नाही, त्याच्याशी सहिष्णुतेने वागतो. त्या दोघांचे उदाहरण असे आहे की काही लोकांनी एक नौका घेतली आणि फासे फेकले, त्या नौकेत अनेक स्तर होते, वर व खाली. काही लोक वरच्या भागात बसले आणि काही खालच्या भागात. जे लोक खालच्या भागात बसले होते, ते पाण्यासाठी वरच्या लोकांजवळून जात होते जेणेकरून समुद्राचे पाणी भरता यावे, तेव्हा वरच्या लोकांना त्याचा त्रास होत होता. शेवटी खालच्या लोकांनी कुऱ्हाडी घेतली आणि नौकेचा तळ फोडू लागले. वरचे लोक खाली आहे आणि म्हणाले तुम्ही हे काय करीत आहात? ते म्हणाले की आम्हाला पाण्याची आवश्यकता आहे आणि समुद्राचे पाणी वर जाऊनच भरले जाऊ शकते आणि आमच्या ये-जामुळे तुम्हाला त्रास होतो. म्हणून आम्ही नौकेचा तळ फोडून समुद्रातून पाणी प्राप्त करू.’’ पैगंबर मुहम्मद (स.) यांनी हे उदाहरण देऊन म्हटले, ‘‘जर वरच्यांनी खालच्यांचा हात धरला असता आणि छिद्र पाडू दिले नसते तर त्यांनाही बुडण्यापासून वाचविले असते आणि स्वत:लाही वाचविले असते. जर त्यांना तसे करण्यापासून रोखले नाही तर त्यांनाही बुडवतील आणि स्वत:ही बुडतील.’’ (हदीस : बुखारी)
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी एकेदिवशी प्रवचन दिले आणि त्यात काही मुस्लिमांची प्रशंसा केली आणि म्हणाले, ‘‘असे का आहे की काही लोक आपल्या शेजाऱ्यांमध्ये धार्मिक (दीनी) समज निर्माण करीत नाहीत आणि त्यांना शिकवण देत नाहीत आणि धर्म जाणून न घेण्याचे अद्दल घडविणारे परिणाम त्यांना सांगत नाहीत आणि त्यांना वाईट कामांपासून रोखत नाहीत? आणि असे का की काही लोक आपल्या शेजाऱ्यांकडून धर्म शिकत नाहीत आणि धार्मिक समज निर्माण करीत नाहीत आणि धर्म जाणून न घेण्याचे अद्दल घडविणारे परिणाम माहीत करून घेत नाहीत? अल्लाह शपथ! लोकांनी आपल्या शेजाऱ्यांना अवश्य शिक्षण द्यावी, त्यांच्यात धार्मिक समज निर्माण करावी, त्यांना उपदेश द्यावा, त्यांना चांगल्या गोष्टी सांगाव्यात आणि त्यांना वाईट गोष्टींपासून रोखावे. तसेच लोकांनी आपल्या शेजाऱ्यांकडून दीन (धर्म) शिकायला हवा, धर्माची समज निर्माण करावयास हवी आणि त्यांचे धर्मोपदेश मान्य करावे लागतील अन्यथा मी लवकरच शिक्षा देईन.’’ मग पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचनपीठावरून खाली उतरले आणि प्रवचन समाप्त केले. श्रोत्यांमधून काही लोकांनी विचारले, ‘‘कोणत्या लोकांविरूद्ध पैगंबरांनी भाषण दिले?’’ दुसऱ्या लोकांनी सांगितले, ‘‘पैगंबरांचा इशारा अशअर कबिल्याच्या लोकांकडे होता. या लोकांना ‘दीन’ची समज आहे, त्याच्या शेजारी नदीकाठी राहणारे ग्रामीण उजड्ड लोक आहेत.’’ जेव्हा या प्रवचनाची बातमी अशअरी लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा ते पैगंबरांपाशी आले. ते म्हणाले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आपण आपल्या प्रवचनात काही लोकांची प्रशंसा केली आणि आमच्यावर रागवलात. आमच्याकडून काय गुन्हा घडला?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘लोकांनी आपल्या शेजाऱ्यांना अवश्य शिक्षण द्यावे, त्यांना उपदेश द्यावा, चांगल्या गोष्टींचा सल्ला द्यावा आणि वाईट गोष्टींची मनाई करावी. अशाचप्रकारे लोकांनी आपल्या शेजाऱ्यांकडून ‘दीन’ शिकला पाहिजे, सल्ला व उपदेश मान्य करावा लागेल आणि आपल्यामध्ये धार्मिक समज निर्माण करायला हवी, अन्यथा त्या लोकांना लवकरच या जगात मी शिक्षा देईन.’’ तेव्हा अशअरीन यांनी म्हटले, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर! आम्ही दुसऱ्यांमध्ये समज निर्माण करावी काय? (शिक्षण व प्रशिक्षणाचीदेखील आमचीच जबाबदारी आहे?)’’ तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘होय, हीदेखील तुमचीच जबाबदारी आहे.’’ त्यानंतर ते लोक म्हणाले, ‘‘आम्हाला एका वर्षाची मुदत द्या.’’ पैगंबरांनी त्यांना एक वर्षाची मुदत दिली. या मुदतीत त्यांनी आपल्या शेजाऱ्यांमध्ये धार्मिक समज निर्माण करावी आणि आज्ञा सांगाव्यात. यानंतर पैगंबरांनी या आयतीचे पठण केले– ‘‘लुईनल्ल़जीना क़फरू मिम बनी इस्राईला.’’ (हदीस : तिबरानी)
Post a Comment