औषधांचा तुटवडा, सुविधांचा अभाव, डॉ्नटर, कर्मचाऱ्यांची वाणवा
महाराष्ट्रातील शासकीय दवाखाने आजघडीला सलाईनवर असल्याचे पहावयास मिळत आहेत. त्यामुळेच औषधांच्या तुटवडा, वैद्यकीय सुविधांअभावी गत पंधरवाड्यात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय दवाखाने व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयांत डॉ्नटर व कर्मचाऱ्यांचीही वाणवा आहे. शिवाय, रूग्णांची संख्या अधिक असून, त्यापटीने खाटांची संख्याही फार कमी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाची घडीच सध्या विस्कटली असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने रूग्ण, नातेवाईक, नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीसने जून महिन्यात ’रूग्णांच्या हक्कासाठी मोहिम 2023’ राबविली होती. यावेळी शासकीय दवाखान्यांतील स्थिती जाणून घेतली. तेव्हा लक्षात आले की, परिस्थिती फार नाजूक आहे. एमपीजेने याबाबत राज्याच्या सार्वजनिक (पान 8 वर) आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्र्यांना निवेदन देऊन परिस्थितीची जाणीव निवेदनाद्वारे केली होती. 16 ऑ्नटोबर 2023 रोजी नागपूर, ठाणे, औरंगाबाद, नागपूर येथील शासकीय रूग्णालयांतील अलिकडील मृत्यूतांडवाच्या पार्श्वभूमीवर’लोकमत’ने रिअॅलिटी चेक केला. यामध्ये शासकीय रूग्णालयांमधील परिस्थितीचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे राज्याच्या आरोग्य विभाग नेमका कुठे जात आहे व काय करत आहे हे समजते.
सोलापुरातील शासकीय दवाखान्यात 400 पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील दवाखान्यात कर्मचाऱ्यांअभावी रूग्णांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. सातारा येथे सुविधा अन्् कर्मचाऱ्यांअभावी आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसते. येथे 13 तज्ञ डॉ्नटरांची पदे रिक्त आहेत. औषधांचा तुटवडा आहे. ग्रामीण भागातही आरोग्य सेवक अपुरे आहेत. येथील जिल्हा परिषदेअंतर्गतच्या आरोग्य विभागात 940 विविध पदे रिक्त आहेत. वर्धा येथे तर 15 दिवस पुरेल एवढाच औषधपुरवठा असल्याचे समोर आले. अकोला येथे 292 खाटांची गरज आहे. येथेही सुविधांचा अभाव आहे. पालघरमध्येही 24 वर्षानंतरही खाटा आणि पदे वाढविली नाहीत. येथे 46 प्रा.आ.केंद्रे व 306 उपकेंद्रे आहेत. येथेही रात्रीचे डॉ्नटर नसणे, अद्ययावत यंत्रसामुग्रीचा अभाव, औषधांचा तुटवडा, तज्ञ डॉ्नटरांच्या कमतरता आणि रिक्त जागांमुळे यंत्रणा ढेपाळली आहे. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुविधांअभावी सलाईनवर आहे. येथे 292 खाटांची कमतरता आहे. औषधांचाही तुटवडा असल्याने रूग्णांची हेळसांड होत आहे. वाशिम येथे जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील 9 रूग्णालयांत रिक्त पदांचा प्रश्न कायम आहे. 1ते 3 वर्गाची 100 पदे रिक्त आहेत. येथे महिनाकाठी 4500 रूग्ण दाखल होतात. बुलढाण्यातही 35 टक्के पदे रिक्त असल्याने यंत्रणेवर ताण पडत आहे. यवतमाळ येथील जिल्हा रूग्णालयावर 16 तालुक्यांच्या आरोग्याची जबाबदारी आहे. 610 पदे रिक्त असून, 250 खाटांची येथे आवश्यकता आहे. मराठवाड्याचीही स्थिती गंभीर आहे. लातूरमध्ये 1100 पदांचा बॅकलॉग आहे. जालना स्त्री रूग्णालयात महत्त्वाची 18 पदे रिक्त आहेत. 80 हून अधिक बेडची येथे गरज आहे. औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात 897 पदे रिक्त आहेत. जिल्हा रूग्णालय उपजिल्हा रूग्णालयात 97 पदे रिक्त आहेत. बीडच्या जिल्हा रूग्णालयात सरासरी 700 वर रूग्ण दाखल होतात येथे 320 खाटा आहेत. येथे औषधांचाही तुटवडा आहे. परभणी येथे 200 खाटांची गरज आहे तर 21 महत्वाची पदे रिक्त आहेत. उस्मानाबाद वैद्यकीय व महाविद्यालयात 30 टक्के प्राध्यापकांच्या जागा रिक्त आहेत. स्त्री रूग्णालयाचीही बिकट अवस्था आहे.
एकंदर राज्याची आरोग्य व्यवस्था सलाईनवर आहे म्हटले तरी वावंग ठरणार नाही. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देवून राज्यातील रूग्ण, नातेवाईकांची होत असलेली होरपळ थांबवावी, अशी मागणी जनता, सामाजिक संस्थांनी केली आहे.
Post a Comment