Halloween Costume ideas 2015

इजराईलच्या स्थापनेमागील मुस्लिमांची भूमिका


बनी इसराईल  

इजराईल या शब्दाचा अर्थ ’ईश्वराचा भक्त’ (अल्लाह का बंदा) असा आहे. एका ईश्वराला मानणारे तीन धर्म ज्यू, ख्रिस्ती आणि मुस्लिम या तिघांचे ही प्रमुख पुरुष हजरत इब्राहीम अलै. यांना दोन बायका होत्या. पहिल्या पत्नी हजरत सारा  यांच्या पासून हजरत इसहाक अलै. नावाचे प्रेषित जन्माला आले. ह. इस्हाक अलै. यांच्या पत्नीच्या पोटी हजरत याकूब अलै. जन्माला आले. हजरत याकूब अलै. यांचे टोपन नाव ’इजराईल’ होते. त्यांना 12 मुले होती. 1. रूबीन 2. लावी 3. शाकून 4. यहुदा 5.यसकर 6. जबुलुन 7. युसूफ 8. बेंजामिन 9. जाद 10. आशर 10. दान 11. नफ्ताली या 12 भावांच्या वंशाला बनी इसराईल म्हणतात. यांच्यापासून वाढलेल्या वंशाला यहुदी अर्थात ज्यू असे म्हणतात. बनी इसराईलमध्ये अनेक पैगंबर जन्माला आले. त्यापैकी युसूफ अलै, मुसा अलै., हारून अलै., दाऊद अलै., सुलेमान अलै. आणि कडीतले शेवटचे प्रेषित ईसा अलै. हे महत्त्वाचे प्रेषित होत. ह. ईसा यांना इंग्रजीमध्ये जीजस क्राईस्ट असे म्हणतात. यांच्या अनुयायांना ख्रिश्चन संबोधले जाते. ही सर्व प्रेषितांची शृंखला पॅलिस्टीनमधील येरूशलम आणि जवळपासच्या क्षेत्रात जन्माली आली.

बनी इस्माईल

इस्माईल हा शब्द इबरानी किंवा सिरियानी या मध्यपुर्वेतील प्राचीन भाषेमधील असून, इतिहाकारांच्या मते या शब्दाचा अर्थ ’ईश्वराचा पाईक’ (अल्लाहक के मुती) असा आहे. बनी इस्माईल म्हणजे हजरत इस्माईल अलै. यांच्यापासून वाढलेला वंश होय. हा वंश हिजाज (सध्याचा सऊदी अरब आणि त्याच्या आसपासचा इलाका) मध्ये वाढला. याचाही एक रोचक इतिहास आहे. हजरत इब्राहिम अलै. यांच्या दोन पत्नींपैकी हजरत सारा  यांच्यापासून  वाढलेला वंश बनी इसराईल म्हणविला गेला आणि हा वंश कनान (पॅलेस्टिन)मध्ये वाढला. दूसरी पत्नी हजरत हाजरा आणि त्यांच्या पोटी जन्माला आलेले प्रेषित अहरत इस्माईल हे अत्यंत लहान असताना त्यांना व त्यांची आई हजरत हाजरा यांना इब्राहीम अलै.यानी (आज जेथे मक्का शहर वसलेले आहे) त्या ठिकाणी असलेल्या 2 टेकड्या (सफा आणि मरवाह) यामध्ये सोडून निघून गेले होते. कालौघात या ठिकाणी मक्का नावाची वस्ती अस्तित्वात आली. आणि याच ठिकाणी  हजरत इस्माईल यांच्यापासून जो वंश वाढला तो वंश बनी इस्माईल होय. यांच्यामध्ये अनेक कबिले झाले. त्यापैकी एक कुरैश होय.  याच कबिल्यातील एक उपकबिला ’बनी हाशम’ मध्ये प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला. बनी इसराईलमध्ये जी प्रेषितांची शृंखला जन्माला आणि त्यावरून त्यांचा असा ठाम विश्वास झाला की, अंतिम प्रेषित सुद्धा आमच्या वंशातच येईल. पण झाले वेगळेच. शेवटचे प्रेषित मुहम्मद सल्ल. हे बनी इस्माईलमध्ये जन्माला आहे. म्हणून बनी इसराईल व त्यांच्यातीलच अस्तीत्वात असलेला एक वंश (ज्यू) यांनी प्रेषित मुहम्मद सल्ल्. यांच्या प्रेशित्वत्वाला नाकारले आणि हेच कारण बनी इसराईल आणि बनी इस्माईल. हेच ज्यू आणि मुस्लिम यांच्यातील वैराचे कारण ठरले. विशेष म्हणज हे वैर ज्यू लोकानी धरलेले आहे मुस्लिमांनी नव्हे. मुस्लिम तर बनी इसराईलमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक प्रेषिताला प्रेषित मानतात. मात्र ज्यू लोक प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना प्रेषित मानत नाहीत. 

पॅलेस्टाईनचा वाद

हजरत याकूब अलै. यांनी कनान (फलस्तीन) मध्ये सर्वप्रथम ईश्वराची भक्ती करण्यासाठी एक इमारत उभारली. कालौघात ही इमारत जीर्ण झाली. जेव्हा हजरत दाऊद अलै. यांनी तिचे पुननिर्माण केले. अनेकवर्षानंतर ती जीर्ण झाल्यानंतर हजरत सुलैमान रजि.यांनी या इमारतचीे जिर्णोद्धार केेले. यालाच ज्यू लोक ’हैकल-ए-सुलेमानी’ अर्थात आपले धार्मिक स्थळ समजतात. या धार्मिक स्थळाला कालौघात रूमी आणि बाबिल वंशाच्या लोकांनी जेव्हा जेरूसलेमवर ताबा मिळविला तेव्हा उध्वस्त करून टाकले होते. मात्र या इमारतीची एक भींत कायम राहिली होती जिला ’विपींग वॉल’ असे म्हणतात. आणि ती येरूशलम येथील मस्जिद-ए-अक्साच्या बाजूला आज ही आहे. जिथे ज्यू लोक भींतीला हात लावून रडतात. त्यांची अधी धारणा आहे की त्यांचे धार्मिक स्थळ पाडले गेले आणि त्याच्या जागी मस्जिद ए अक्सा बाधंली. ज्यू लोक भींतीला हात लावून रडतात आणि मस्जिद-ए-अकसा उध्वस्त करून त्या ठिकाणी पुन्हा हैकल-ए- सुलेमानी निर्माण करण्याचा निश्चय करतात. याच धार्मीक स्थळाच्या अनुषंगाने ज्यू लोक, जेरूसलेम वर आपला दावा ठोकतात. याच ठिकाणी जेरूसलेममध्ये एक नीळ्या गुंबदची मस्जिद असून, तिला मस्जिद-ए-अक्सा असे म्हणतात. प्रेषित महम्मद सल्ल. यांनी मेराजच्या यात्रेपूर्वीच सर्व प्रेषितांना नमाज पढविली होती, असा मुस्लिमांचा विश्वास आहे. मक्का शहराच्या काबागृहाकडे तोंड करून नमाज अदा करण्यापूर्वी मुस्लिम समाज याच निळया गुंबदीच्या मस्जिद कडे तोंड करून नमाज अदाकरत होता. येरूशलम शहराला इतिहासामध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चनांनी आळीपाळीने जिंकलेले आहे. हजरत उमर रजि. (खलीफा दुव्वम) यांच्या काळात हे शहर जिंकल्यावर ख्रिश्चनांनी शहर खलीफांना सुपूर्द करतांना एक अट घातली होती की, जेरूसलेम मधून ज्यूंना हद्दपार करण्यात यावे. तेव्हा खलीफा उमर रजि. यांनी ख्रिश्चनांची ही मागणी फेटाळून लावली आणि त्यांनाही या शहरात राहून इबादत करण्याचा हक्क बहाल केला. कालौघात तुर्क यौद्धा अर्तगुल गाजी यांचा मुलगा उस्मान याने इस्तांबुल (तुर्कीये) येथे इस्लामी खिलाफतीची स्थापना केली तेव्हा येरूशलम आणि कुद्स (येरूशलमच्या आसपासचा प्रदेश) त्याच्या ताब्यात आला. 13 व्या शतकाच्या शेवटच्या कालावधीमध्ये ही खिलाफत कायम झाली. ती 1924 पर्यंत चालली. तो पर्यंत हा प्रदेश उस्मानिया खिलाफती च्या ताब्यात होता. पहिल्या महायुद्धामध्ये (18 जुलै 1914 ते 11 नोव्हेंबर 1918) उस्मानी खलीफा अब्दुल हमीद सानी ’द्वितीय’ याने जर्मनीची बाजू घेतली होती. ज्यात जर्मनीचा पराभव झाला आणि त्याचबरोबर उस्मानीया खिलाफतीचाही पाडाव झाला. उस्मानी खिलाफतीच्या अधिपत्याखाली येणार्या तीन खंडातील भूप्रदेशाचे जवळपास 40 तुकडे करण्यात आले आणि त्यातूनच 40 नवीन मुस्लिम देश तयार झाले. पहिल्या महायुद्धाला जिंकणार्या प्रमुख देशांमध्ये ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्सचा समावेश होता. हे 40 ही मुस्लिम देश या तिघांच्या अधिपत्याखाली कॉलनीज बनून राहू लागले. पॅलेस्टीनचा भाग ब्रिटनच्या अधिपत्याखाली आला. 

इजराईलच्या स्थापनेची सुरूवात

18 व्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटन आणि युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीला सुरूवात झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारखानदारी अस्तित्वात आली. कारखान्यांमधून पक्क्या मालाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात सुरू झाले. ब्रिटिश कॉलनीजमूधन कच्चा माल आणायचा आणि कारखान्यात तो पक्का करायचा आणि जगभर तो विकायचा. यातून पाश्चीमात्य देशांमध्ये विशेषकरून ब्रिटन, अमेरिका आणि फ्रान्समध्ये पैशाचा प्रचंड ओघ सुरू झाला. त्यामुळे या देशात तांत्रिक, सामजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक बदलाव मोठ्या प्रमाणता झाले. लोकशाहीची संकल्पना मजबूत झाली. सहशिक्षणाला सुरूवात झाली. दारू पिण्याला सामाजिक मान्यता मिळाली. कामाच्या ठिकाणी महिलांचा समावेश सुरू झाला. स्त्री पुरूषांना अनेक कारणांमुळे एकत्र वावरण्याची संधी मिळाली. त्यातून मुक्त लैंगिक संबंधांना उत्तेजन मिळाले. श्रीमंतीमुळे या संबंधांना वैधता मिळाली आणि याला व्यक्तीस्वातंत्र्य असे नाव दिले गेले. शेकडो वर्षांपासून इस्लामी शरीयतीच्या बंधनांमध्ये राहिल्यामुळे तुर्कीयेमधील तरूण पीढि या व्यक्तीस्वातंत्र्याच्या आकर्षणाला भुलली. स्वतः खलीफा अब्दुल हमीद (द्वितीय) यांचा मुलगा अब्दुल कदीर याने या व्यक्तीस्वातंत्र्याच्या पाश्चिमात्य संकल्पनेला भुलून खिलाफ व्यवस्थेविरूद्ध बंड पुकारले. त्याला अब्दुल हमीदच्या बहिणीचा नवरा महेमूद पाशा याची साथ मिळाली. पाशा हा तुर्की शब्द असून, खिलाफते उस्मानियामधील मंत्र्यांना ’पाशा’ नावाने संबोधले जात असे.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीला ऑस्ट्रेलियाचा राहणारा एक ज्यू बँकर थिओडोल हर्जल हा इस्तांबुलमध्ये येऊन राहिला. त्याने अब्दुल हमीद याला भेटून कुद्समध्ये जमीनी विकत घेण्याची परवानगी मागितली व त्याच्या मोबदल्यात उस्मानी खिलाफतीवरचे सर्व आंतरराष्ट्रीय कर्ज फेडण्याचा प्रस्ताव दिला. परंतु, अ.हमीद याने त्याचा प्रस्ताव धुडकारला. तेव्हा त्याने त्याचा मुलगा अ. कदीर आणि मेहुणा मेहमूदपाशा यांच्या मदतीने तुर्की ते हिजाज रेल्वे प्रकल्पालगतच्या जमिनी गुप्तपणे खरेदी करायला सुरूवात केली. जेरूशलम मधील मुस्लिमांची घरे प्रचंड किमती देऊन खरेदी करून घेतली व तेथे ज्यूंना वसविले. 1918 साली खलीफा अ.हमीद याचा 75 व्या वर्षी मृत्यू झाला. त्यानंतर थिओडोर हर्जलने येरूशलममधील घरे आणि आसपासच्या जमीनी उघडपणे खरेदी करण्यास सुरूवात केली. ज्यू लोकांकडे व्याजावर आधारित बँका असल्यामुळे त्यातून येणार्या हरामच्या व्याजावर ही खरेदी सुरू होती. 1918 ते 1930 च्या कालावधीत मुसलमांनांच्या जमीनी आणि घरे इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या गेल्या की त्या ठिकाणी ज्यूंची लोकसंख्या जास्त आणि मुस्लिमांची कमी झाली. तेव्हा ज्यू लोकांनी ब्रिटिश प्रशासकांवर गनीमी हल्ले करून त्यांना सळो की पळो करून सोडले. तसेच मुस्लिमांना शहर सोडण्याच्या धमक्या दिल्या. पैसे घेऊन जमिनी द्या अन्यथा जिवे मारू अशी भूमिका घेतली. त्यामुळे अनेक मध्यमवर्गीय मुसलमान आपली घरे विकून सीरिया, लेबनान, जॉर्डन आणि इजिप्तमध्ये स्थायिक झाले. जेव्हा पॅलेस्टिनच्या बदललेल्या डेमोग्राफीमुळे तेथे नियंत्रण ठेवणे अशक्य झाले तेव्हा ब्रिटिशांनी तो प्रदेश युनायटेड नेशनला सुपूर्द करून टाकला. युनोमध्ये यावर सविस्तर चर्चा झाली आणि ’टू नेशन थिअरी’ जन्माला आली. युनोने पॅलेस्टाईनचे दोन भाग केले. एक ज्यूंना तर दुसरा पॅलेस्टिनी मुस्लिमांना दिला. येणेप्रमाणे 14 मे 1948 ला युनोच्या आदेशाने विधीवत इजराईलची स्थापना झाली. परंतु, येरूशलम शहराचे नियंत्रण युनोने आपल्याकडे ठेवले. त्यातल्या त्यात मस्जिद-ए- अक्साच्या देखरेखीची जबाबदारी जॉर्डनवर टाकण्यात आली व आजतागायत ती जॉर्डनकडेच आहे. परंतु, इजराईली सैन्यांनी कधी जॉर्डनचे स्वामीत्वाची पर्वा केली नाही व मनाला येईल तेव्हा मस्जिदीमध्ये बुटासह प्रवेश केला. येणेप्रमाणे पॅलेस्टाईनमध्ये ज्यूंना वसविण्यामध्ये उस्मानी खलीफा अ.हमीदचा मुलगा आणि पैशासाठी हपापलेले मुसलमान जबाबदार आहेत. 

इजराईल एवढा प्रबळ कसा झाला?

इजराइलच्या प्रबळ होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण त्याचे लष्करीकरण आहे. इजराइल मध्ये सर्व नागरिकांना लष्करी प्रशिक्षण आणि सेवा अनिवार्य करण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता हा पाहता ही प्रेषितांची सल्लम यांची पद्धत आहे. प्रेषित सल्लम यांच्या काळात वेगळी लष्करी व्यवस्था नव्हती सर्व युद्धास पात्र असलेले लोक सैनिक म्हणून युद्धात सामील होत असत. ह्या गोष्टीचा मुस्लिमांना विसर पडला मात्र इजराईल ने ही पद्धत उचलली. शिवाय तिन्ही बाजूने अरब राष्ट्रांनी वेढलेले असल्यामुळे इजराइलला अत्यंत सतर्क राहण्याची सवय लागलेली आहे या उलट अरब राष्ट्र बेफिकिर प्रवृत्तीने जगताना दिसतात. एवढेच नव्हे तर इसराइल मध्ये लहानपणापासून मुलांना व्यावसायिक शिक्षण दिले जाते त्यामुळे इजरायली मुळे पुढे येऊन तंत्रज्ञ व्यापारी बँकर आणि उद्योगपती बनतात. याच गोष्टी इजराईल ला बळकट करण्यासाठी कारणीभूत आहेत.

इजराईलची दंडेलशाही

इजराईली ज्यूंचा प्रमुख व्यवसाय व्याजाधारित बँका असल्यामुळे व त्यातून त्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केल्यामुळे ही एक श्रीमंत कम्युनिटी मानली जाते. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि युरोपच्या अधिकांश देशांमध्ये बँकिंगचा व्यवसाय ज्यूंच्याच हातात आहे. 2008 च्या मंदीच्या लाटेत अमेरिकेत बुडालेली लेहमन ब्रदर्स ही जागतिक स्तरावरील मोठी बँक लेहमन या ज्यू बंधूंचीच होती. त्यानंतर क्रमाक्रमाने बुडालेल्या अनेक बँका या ज्यूंच्याच होत्या. आजही ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेमधील अनेक बँका त्यांच्या ताब्यात आहेत. आयएमएफ आणि वर्ल्ड बँक सारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था ज्यूंच्या ताब्यात आहेत. अमेरिका आणि युरोपची भरभराट ही तिसर्या जगतातील गरीब देशांना दिलेल्या भरमसाठ व्याजाच्या येणार्या उत्त्पन्नातून झालेली आहे. व्याजातून होत असलेल्या शोषणामुळे म्हणून कदाचित पहिल्या महायुद्धानंतर व दुसर्या महायुद्धाच्या पूर्वी जर्मनीमध्ये हिटलरने ज्यूंची मोठ्या प्रमाणात कत्तल केली. ज्याला ’होलोकास्ट’ असेे म्हणतात. या अत्याचारामुळे या लोकांविषयी मोठ्या प्रमाणात सहानुभूतीची लाट उसळली व यांना एक स्वतंत्र देश द्यावा, ही कल्पना पुढे आली. थिओडोर हर्जल याच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीला त्यामुळे वैधता प्राप्त झाली. ज्यूंना देश द्यायचाच असता तर अमेरिकेमध्ये एवढा मोठा भूभाग रिकामा आहे. कॅनडामध्ये तर 70 टक्के जमीन मानवविरहित आहे. अशा कुठल्याही ठिकाणी ज्यूंचे पुनर्वसन करून त्यांना एक देश म्हणून घोषित केले असते तर मुस्लिम जगाने सुद्धा त्याला मान्यता दिली असती. परंतु, कुुटिल कारस्थाने करून मुस्लिमांच्या इलाक्यामध्ये मुद्दामहून ज्यूंना वसवून मुस्लिम राष्ट्रांना आपल्याअंकित करण्याची व्यवस्था करण्यात आली. 1936 मध्ये सऊदी अरबमध्ये तेलाचा मोठा साठा असल्याचा शोध लागला. तेव्हा तर इजराईलचे अस्तित्व ब्रिटन आणि अमेरिकेसाठी महत्त्वाचे ठरले आहे.

अरबांचा इस्राएलला विरोध

अरबांनी अगदी स्थापनेच्या काळापासूनच इजराईलच्या स्थापनेला विरोध केला. त्यातूनच स्थापनेनंतर 1948मध्यचे एक छोटे युद्ध झाले. जे युद्ध अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने इजराईलने जिंकले. त्यानंतर 1967 साली एक युद्ध झाले. ज्याला ’सिक्स डेज वॉर’ असे संबोधले जाते. तेही या दोघांच्या मदतीने इजराईलने जिंकले नव्हे आजूबाजूंच्या देशांचा भूभाग आपल्या ताब्यात घेतले. 1973 ला युद्ध झाले तेही इजराईलने जिंकले. तेव्हा थकून अरबांनी इजराईलचा नाद सोडला. मात्र इजराईलची दादागिरी सुरूच राहिली तेव्हा 1987 मध्ये हमास या सशस्त्र चळवळीची सुरूवात झाली. पॅलेस्टिनमध्ये जो अर्धा भाग युनोने पॅलिस्टीनी मुस्लिमांना दिला होता तो हळूहळू इजराईलने बळकावला. आज गाझा ही 6 ते 12 किलोमीटर रूंद आणि 41 किलोमीटर लांब अर्थात 365 स्क्वेअर किलोमीटरची एक पट्टी आणि 5 हजार 860 स्क्वे. किलोमीटरचा वेस्ट बँकचा पट्टा एवढीच भूमी मुस्लिमांकडे आहे. त्यातही गाझा रिकामा करण्याचे आदेश पंतप्रधान नेतन्याहू यांनी मुस्लिमांना दिले आहेत आणि जगभरातील देश व युनो शांतपणे हे सर्व पाहत आहे. इजराईलला तर अनाधिकृतपणे अमेरिकेने अण्वस्त्रसंपन्न केले आहे त्यामुळे त्याची ही दादागिरी सुरू आहे. 

उपसंहार

जगात 57 मुस्लिम देश असून, वैज्ञानिक, तांत्रिक आणि लष्करी दृष्ट्या त्यापैकी एकाही देशाने एवढी शक्ती प्राप्त केलेली नाही जेवढी इजराईलने केलेली आहे. इजराईलने हत्यार निर्मितीमध्ये अमेरिकेनंतर जगात दूसरे स्थान मिळविलेले आहे. इजराईल हत्यार बनवत राहिला आणि अरब देश इमारती बनवत राहिले. त्यांनी बांधलेल्या इमारतींची एका इजराईली मिजाईलमध्ये काय अवस्था होते हे गाझामधील नुकत्या झालेल्या हल्ल्यात जगाने पाहिलेले आहे. मुस्लिम हे इजराईलच्या बाबतीत दांभिक भूमिका घेतात. ते वारंवार सिद्ध झालेले आहे. ज्या ज्या वेळेस इजराईलने दंडेलशाही केली आणि पॅलेस्टिनवर हल्ला केला त्या त्या वेळेस जगातील मुस्लिमांनी इजराईली प्रोडक्टचा बहिष्कार केला. मात्र त्या घोषणेवर ते कधीच प्रामाणिकपणे अंमल करू शकले नाहीत. मुस्लिम लोक इजराईल विषयी घृणा बाळगतात पण इजराईलचे मित्र असलेल्या ब्रिटन आणि अमेरिका यांच्याविषयी प्रचंड प्रेम त्यांच्या मनात आहे. ते तेथे जाऊन वास्तव्य करण्याचा ते स्वप्न पाहत असतात. यापेक्षा दांभिकपणा तो कोणता? इजराईलविषयी माध्यमांनीही दुटप्पी भूमिका घेतलेली आहे. इजराईलचा राज्य पुरस्कृत आतंकवाद (स्टेट टेरेरिझम) त्यांना दिसत नाही. मात्र गाझा पट्टीतील मुस्लिमांनी आत्मरक्षेसाठी केलेला हिंसेचा वापर त्यांना आतंकवाद वाटतो. 

इजराईलला ’बिचारा’ ठरविण्यामागे माध्यमांचाच मोठा सहभाग आहे. आपल्या देशात तर या प्रश्नावर काही लोकांची तर विचित्र स्थिती झालेली आहे. ते हिटलरला आपला आदर्श मानतात आणि हिटलर ज्यांना आपला कट्टर शत्रू समजत होता त्या इजराईली ज्यूंना सुद्धा ते आदर्श मानतात. एकंदरित इजराईलवर जागतिक मत दुभंगलेले असून, गाझावरील हल्ले बंद झाले नाहीत तर जाणकार यातून तिसरे महायुद्ध सुद्धा होवू शकेल, अशी भीती व्यक्त करीत आहेत. अमेरिकेनेही हमासला नष्ट करा पण गाझा पट्टीवर ताबा मिळवू नका अशा शब्दात इजराईलला बजावले आहे. इजराईलवर या आव्हानाचा कितपत परिणाम होईल हे लवकरच दिसून येईल.


- एम आय. शेख


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget