Halloween Costume ideas 2015

माणुसकी म्हणजे काय?

प्रेम, दया, प्रामाणिकपणा, चांगुलपणा, करुणा हे सर्व आपले गुण आहेत. हे आपले खरे व्यक्तिमत्त्व आहे, हेच खरे आपले वैशिष्ट्य आहे आणि हीच माणुसकी आहे! म्हणजे फक्त स्वतःच्या बाबतीत विचार न करता इतरांच्या बाबतची विचार करणे. परंतु आज चिंताही होत आहे, आपण मनुष्यच माणुसकीला संपवतोय. जगातील आपण ज्या घडामोडी बघत आहोत आणि जे चालले आहे आणि समोर असे दिसते की, माणुसकी संपत चाललेली आहे आणि आपल्या मनुष्याचे

कॅरेक्टर इतके अधोगतीला पोहोचले आहे की कधी तर खरंच असे वाटते जनावर आपल्या पेक्षा बऱ्याच पटीनी चांगले आहेत.

आपण कधी सेल्फ रीयलायझेशन केले आहे? जर तुम्ही सेल्फ रीयलायझेशन केले तर, नक्कीच एक गोष्ट जाणवेल की, आपण, मी, तुम्ही सर्व मनुष्य आहे आणि आपण सर्व माणुसकीने भरलेले आहोत.

प्रेम, दया, प्रामाणिक पणा, चांगुलपणा, करुणा हे सर्व आपले गुण आहेत. हे आपले खरे व्यक्तिमत्व आहे हेच खरे आपले वैशिष्ट्य आहे आणि हीच माणुसकी आहे! म्हणजे फक्त स्वतःच्या बाबतीत विचार न करता इतरांच्या बाबतची विचार करणे. परंतु, आज चिंता ही होत आहे आपण मनुष्यच माणुसकी ला संपवतोय. जगातील आपण ज्या घडामोडी बघत आहोत आणि जे चालले आहे आणि समोर असे दिसते की, माणुसकी संपत चाललेली आहे आणि आपल्या मनुष्याचे कॅरेक्टर इतके तळाला चालले कधी तर खरंच असे वाटते जनावर आपल्या पेक्षा बऱ्याच पटीनी चांगले आहेत.

कधी आपण हे ऐकले आहे का की, वाघाने वाघाची शिकार केली? वाघ वाघापासूनच घाबरत आहे? तर, नाही! शिकार करायला जनावर निघतो परंतु, त्यांच्याकडे बुद्धी आहे की, तो वेगवेगळ्या प्रजातींवर हल्ला करतो स्वतःच्या प्रजातीवर हल्ला करत नाही. तो जनावर आहे तरी त्याच्यात बुद्धी आहे तर, मनुष्याच्या बुद्धीला काय झाले हे खरंच कधी कधी कळत नाही.

एका मनुष्याला सर्वात जास्त भीती कशाची आहे? जर आपण रात्री एकटे घरी जातो तेव्हा ही भीती असते का की, वाघ येईल मला खाऊन जाईल? साप किंवा विंचू येतील आणि आपल्याला चावतील? नाही! आपल्याला भीती याची वाटते की, कुणी दुसरा मनुष्य येऊन आपल्याला नुकसान नको करायला. मनुष्याची शिकारच मनुष्य करतो मनुष्याची सर्वात मोठी भीतीच मनुष्य आहे. खोटे मनुष्यच बोलतो, एकमेकांना दुःख मनुष्यच करतो, मन मनुष्यच दुखावते, चोरी ही मनुष्यच करतो, दरोडा ही मनुष्यच टाकतो, मर्डर करतो, रेप करतो, आतंकवादी ही मनुष्यच बनतो तर, अश्या गोष्टी असलेल्या व्यक्तीला आपण मनुष्य म्हणतो? की, कदाचित जनावर ही आपल्यापेक्षा अधिक उत्तम जगतोय.

जर वरती ईश्वर, देव, अल्लाह, जीजस जे नाव आपण देवाला देतो तो खरंच असेल आणि तो आपल्याला ह्या परिस्थितीत बघत असेल तर, तुम्हाला काय वाटते ते आनंदी होतील ते गर्व करतील? त्यांना किती दुःख होत असेल त्यांनी किती प्रेमाने या जगाला बनवले असेल आणि जगातील सर्वश्रेष्ठ जीव मनुष्य जेव्हा त्यांनी बनवले असेल तेव्हा त्यांनी किती स्वप्न पाहिले असतील आणि आज आपण काय करत आहोत?

बऱ्याच वेळा अश्या बातम्या आपण ऐकतो की, आपली झोप उडून जाते कधी बातमी येते छोटीशी ८ वर्षाच्या मुलीवर रेप केला कधी बातमी येते मुलाने आईचा खून केला अश्या बातम्या ऐकून तर खरंच वाटते जगाला माणुसकीची खूप आवश्यकता आहे. देवाने आपल्याला ज्या स्वरूपात आपल्या बनवून पाठवले होते ना तेच स्वरूप परत निर्माण झाले तर, असे वाटते जगातील सर्व दुःख आणि समस्या दूर होतील.

माणुसकी [1]ही या जगासाठी सगळ्यात मोठी गरज आणि आवश्यकता आहे आणि मानवतेपेक्षा मोठा धर्म नाही….

- डॉ. समीना अन्सारी

खामगाव


Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget