Halloween Costume ideas 2015

इस्लाम एक मुक्तिमार्ग

- फेरोजा तस्बीह, चिपळून
यात मुळीच शंका नाही की इस्लाम एक यशस्वी जीवन जगण्याची व मुक्ती मिळविण्याची एकमेव पद्धत आहे. याचा आधार पवित्र ग्रंथ कुरआन आहे. अल्लाह एकमेव सत्ताधीश आहे. जमीन आणि आकाश या दरम्यान जे काही आहे, सर्व त्याचेच आहे. एकदा का या तत्वावर विश्‍वास बसला की, माणसाचे जीवन योग्य दिशेने मार्गक्रमण सुरू करते. अल्लाहने जेव्हा पहिल्या मानवाची म्हणजेच आदम आणि हव्वा अलै. यांना पृथ्वीवर पाठविले, त्यांना मुस्लिम म्हणून पाठविले. त्यांच्यापासून वंश वाढला, तो वंश म्हणजेच पृथ्वीतलावरील सर्व मानवजात होय. वेगवेगळे रंग, वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृती या तर फक्त एकमेकांची ओळख पटविण्यासाठी आहे. बाकी सर्व आदम आणि हव्वा अलै. यांचीच लेकरे आहेत. त्यामुळे त्यांचा धर्म एक, त्यांची जीवन व्यवस्था एक आणि त्यांच्या मुक्तीचा मार्गही एक, म्हणजेच इस्लाम होय. या तत्त्वाचा ज्यांनी अव्हेर केला त्यांनी पृथ्वीवर आपली मर्जी गाजविली, आपले स्वतःचे कायदे बनिवले, गरीबांना पिळले, महिलांवर अत्याचार केले. माणसाच्या या पतभ्रष्ट जीवन क्रमाला मूळ पदावर म्हणजे इस्लामवर आणण्यासाठी अल्लाहने 1 लाख 24 हजार प्रेषित पाठविले. जेव्हा अरबस्थानामध्ये सामाजिक अनागोंदीची परिसिमा झाली तेव्हा अंतिम प्रेषित मुहम्मद सल्ल. यांना पाठविण्यात आले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने समाजाला योग्य म्हणजे इस्लामी दिशा दिली. व 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी समग्र अरबस्थानाचे सामाजिक वातावरणच बदलून टाकले. वाईट लोक चांगले झाले. प्रेषितांनी हे सगळे त्यांच्यावर अवतरित झालेल्या कुरआनच्या आदेशानुसार केले. हेच आदेश राहत्या जगापर्यंत अंतिम आदेश आहेत. या प्रमाणे जो समाज जीवन जगेल तोच मुक्ती मिळवेल.
    पृथ्वीवर अनेक व्यवस्था अस्तित्वात असून, त्यांचा अन्याय आणि अत्याचार टिपेला पोहोचलेला आहे. सहाव्या शतकात प्रेषित सल्ल. यांच्या पूर्वी जी जहालत होती तीच आज अस्तित्वात आहे. महिलांवर अत्याचार होत आहेत. कन्याभ्रुणहत्या होत आहेत. दारू आणि ड्रग्स यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. विश्‍वासघात, खोटारडेपणा, अश्‍लीलता, अनैतिकता इत्यादी अवगुणांनी अवघी पृथ्वी व्यापून राहिली आहे. हीच परिस्थिती सहाव्या शतकात असतांना प्रेषितांनी अल्लाहचा संदेश कळविला की, ”हे इमानधारकांनो तुमच्यासाठी योग्य नाही की तुम्ही महिलांचे मालक बनाल” (संदर्भ : सुरे निसा आयत नं. 19). ही आयत अवतरित झाल्यानंतर अरबांमध्ये महिलांची परिस्थिती एकदम बदलली. जे अरब मुलींना जीवंत पुरत होते ते आपल्या मुलींना आपल्या संपत्तीमधून त्यांना वाटा द्यायला लागले. याशिवाय, दारूच्या विरूद्ध जेव्हा आयत नाजील झाली तेव्हा न भुतो न भविष्यती असा बदल अरबस्थानात झाला. जुन्या दारूचे शौकीन अरबांनी दारूचा असा नायनाट केला की आजपर्यंत मक्का मदिना आणि आसपासच्या क्षेत्रात दारूचा लवलेशसुद्धा मिळत नाही. एकंदरित असाच बदल आजही शक्य आहे, फक्त इस्लामची वाट चोखाळावी लागेल.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget