Halloween Costume ideas 2015

शरद पवारांना नेमके काय हवे?


दिवसापासून राष्ट्रवादीत विभागणी झाली आणि भलामोठा गट आपल्या बरोबर घेऊन अजीत पवार सरकारमध्ये सहभागी झाले. त्याच दिवसांपासून शरद पवारांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह लावले जात होते. राष्ट्रवादीत फुट पडण्यात शरद पवार स्वतः जबाबदार आहेत का हा प्रश्न जो तो विचारत होता. शरद पवारांनी दोन तीन वेळा आपली भूमिका स्पष्टही केली पण त्यांच्या बोलण्यात ती धमक नव्हती ज्याची अपेक्षा महाराष्ट्रातील जनता विशेषतः मराठा समाज,काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांना होती.

शरद पवार त्यावरच थांबले असते तरी त्यांच्या विषयी संशय घेण्याचे कारण नव्हते पण नंतरच्या काळात अजीत पवार आणि शरद पवारांमध्ये ज्या खुल्या-छुप्या भेटी होत आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचेच नव्हे तर इंडियामधील विरोधी -(उर्वरित पान 2 वर)

पक्षाच्या नेत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जर विरोधी पक्षाच्या आघाडीला तडे गेले तर यासाठी ते स्वतः जबाबदार राहणार आहेत यासाठी देशाची जनता त्यांना कधी माफ करणार नाही. एवढेच नव्हे तर शरद पवारांनी महाराष्ट्रात मराठी माणसांच्या सत्तेसाठी जो पक्ष स्थापन केला आणि तो संपला तर मराठी माणसांचा जो राजकीय वर्चस्व संपणार त्याला मराठी लोकही माफ करणार नाहीत. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनी तर पवारांची आशा सोडून दिली. काही बातम्यांनुसार त्यांना केंद्रात नीती आयोगाच्या अध्यक्षतेचे किंवा मंत्री मंडळात घेण्याचे आमिश दाखवले गेले. शरद पवार हे स्विकारतात का? स्वीकारले तर त्यांना गेल्या 50-60 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला ते शोभणार आहे का? जर ते विरोधी पक्षातच राहिले आणि दैवाने ते निवडणुकीत विजयी झाले तर पंतप्रधान पदाच्या यादीत त्यांचे नाव येऊ शकेल. आता हे पवार साहेबांनाच ठरवायचे आहे. ते मराठी माणसाचे स्वप्न भंग करणार का? जर पवार साहेबांचे मराठा राजकारण राज्यातून हद्दपार झाले तर सर्वांत अगोदर मुंबई राज्याच्या हातून निसटणार हे नक्की.

- सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget