Halloween Costume ideas 2015

मुस्लिम उम्माह राष्ट्रवादाच्या विळख्यात


कौम मजहब से है मजहब जो नहीं तुम भी नहीं

जज्बा-ए-बाहम जो नहीं महेफिले अंजूम भी नहीं

अपनी मिल्लत पर कयास अक्वामे मगरीब से न कर

खास है तरकीब में कौम-ए-रसुले हाश्मी

दामन-ए-दीं हाथ से छुटा तो जमियत कहां

और जमियत हुई रूख्सत तो मिल्लत भी गई

नोव्हेंबर 2023 रोजी सऊदी अरबच्या रियाद शहरामध्ये 57 मुस्लिम देशाचे शिखर संमेलन संपन्न झाले. विषय होता अर्थातच गझामधील इजराईली आक्रमणाचा. ज्यात आतापावेतो 11000 हून अधिक निरपराध पॅलेस्टिनी नागरिक, ज्यामध्ये 4500 हून अधिक बालकंमारली गेली. 

एका स्वतंत्र राष्ट्राकडून दुसऱ्या स्वतंत्र धार्मिक समुहावर 21 व्या शतकात एवढी मोठी एकतर्फी दंडात्मक कारवाई होवू शकते आणि अवघ्या जगाबरोबर मुस्लिम जगही ती कारवाई मुकदर्शक बणून पाहू शकते. यावर नाईलाजाने आज विश्वास ठेवावा लागत आहे. या बैठकीत इजराईलची नाकेबंदी करून त्यावर आर्थिक प्रतिबंध लादण्याची मागणी करण्यात आली. ज्यात इजराईली विमानांना मुस्लिम देशातून अवकाशबंदी, तेलपुरवठा बंद करणे, राजकीय संबंध तोडणे इत्यादी मागण्या करण्यात आल्या. परंतु सऊदी अरब, युएई, बहरीन, सुडान, मोरक्को, मॉरीटेनिया, जीबूती, जॉर्डन आणि इजिप्त यांनी या प्रस्तावाला विरोध केला. म्हणून शेवटी गझामध्ये हल्ले रोखण्याची किमान जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्याची परवानगी द्यावी अशी केविलवाणी मागणी इजराईलकडे करण्यात आली. आणि याच अर्थाचा ठराव पास झाला. 

57 मुस्लिम देश आणि 200 कोटी लोकसंख्या असलेला आंतरराष्ट्रीय मुस्लिम समाज (उम्माह) शेवटी  इजराईलच्या 80 लाख ज्यू समाजासमोर एवढा विवश का आहे? तर याचे उत्तर आहे मुस्लिम देशांमध्ये फोफावलेला राष्ट्रवाद. वाचकांना आश्चर्य वाटेल परंतु हेच उत्तर बरोबर आहे. जगाची एक चतुर्थांश संख्या असलेले मुस्लिम जग  राष्ट्रवादाच्या विळख्यामध्ये असे अडकलेले आहेत की, मात्र 1 लाख 60 हजार जागतिक लोकसंख्या असलेल्या ज्यूं समोर ते अगदी हतबल झालेले आहेत. ते कसे? हाच या आठवड्यात चर्चेचा विषय आहे. 

राष्ट्रवाद

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त इस्लामिक स्कॉलर सय्यद अबुल आला मौदुदी यांनी कौम आणि कौमियत (राष्ट्रीयता)ची व्याख्या करताना म्हटलेले आहे की, ’’कौम, कौमियत और कौम परस्ती के अल्फाज आजकल बकसरत लोगों की जबानों पर चढे हुए हैं. लेकिन कम लोग हैं जिनके जहेन में इनके मफहूम (अर्थ) का कोई सही तसव्वुर (संकल्पना) मौजूद है. और इससे भी कम लोग ऐसे हैं जो कौम, कौमियत और कौमपरस्ती के बाब में इस्लाम के नुक्ता-ए-नजर को समझते हों. वहेशियत (रानटीपणा) से मदनियत (संस्कृती) की तरफ इन्सान का पहला कदम उठतेही जरूरी हो जाता है की, कसरत में वहेदत (अनेकता में एकता) की एक शान पैदा हो और मुश्तरका अगराज (सामुहिक जरूरते) व मसालेह के लिए मुत्तद्दीद अफराद (अलग-अलग लोग) आपस में मिलकर तआवून (सहकार्य) और इश्तेराके अमल (सामुहिक कार्य करें), तमद्दुन (संस्कृती) के तरक्की के साथ-साथ इस इज्तेमाई वहेदत का दायरा भी वसी होता चला जाता है. यहां तक के इन्सानों की एक बडी तादाद इसमें दाखिल हो जाती है. इसी मजमूए अफराद (जनसमुह) का नाम ’कौम’ है. अगरचे लफ्जे कौम और कौमियत अपने मख्सूस इस्तेलाही (विशिष्ट व्याख्या) के मानों में हदीसुल अहद (एक ही बात) है. कौम और कौमियत जिस हैसियत का नाम है वो बाबील, मिस्त्र, रोम, और युनान में भी वैसीही थी जैसी आज फ्रान्स, ब्रिटन, जर्मनी और इटली मे है.’’(संदर्भ : मसला-ए-कौमियत, पान क्र.5)

वरील परिच्छेदामध्ये राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती या संबंधी उर्दूमध्ये भाष्य करण्यात आलेले आहे. समान उद्देशाच्या प्राप्तीसाठी काम करणाऱ्या एखाद्या विशिष्ट भूभागातील लोकांच्या समूहाला कौम अर्थात राष्ट्र किंवा राष्ट्रवाद असे ते म्हणतात. ही संकुचित संकल्पना पाश्चात्य देशातून आलेली आहे. यात आपल्या देशातील लोकांचे वाईट गुण लपविण्याची तयारी असते तर दुसऱ्या देशातील लोकांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करण्याएवढेही औदार्य दाखविता येत नाही. राष्ट्र-राष्ट्रांमध्ये ज्या कृत्रिम सीमा लोकांनी आखून घेतल्या आहेत त्यामुळे ईश्वराने निर्माण केलेल्या जगात मुक्तपणे वावरण्याचा लोकांचा नैसर्गिक अधिकारही राष्ट्रवादामुळे लोप पावला आहे. राष्ट्रवादामुळे आपल्या सारख्या रक्तमांसाच्या दुसऱ्या देशाच्या माणसाचा द्वेष करण्याची प्रवृत्ती बळावते. इस्लामखेरीज करून इतर कोणत्याही जीवनशैलीमध्ये राष्ट्रवाद सर्वोच्च पवित्र भावना मानली जाते. या उलट इस्लाममध्ये पॅन इस्लामीजम (जागतिक मुस्लिम समाज एक असल्याची भावना अर्थात मुस्लिम उम्माह) व ह्युमॅनिटेरिज्म (मानवतावाद) ही सर्वात पवित्र भावना मानली जाते. मानवतावाद आज लेखाचा विषय नसल्यामुळे यावर भाष्य टाळून पॅन इस्लामिजम (मुस्लिम उम्माह) यावर भाष्य करूया. 

अ्नवामे जहां मे है रकाबत तो इसीसे

तख्सीर है मक्सूद तिजारत तो इसीसे

खाली है सदाकत से सियासत तो इसीसे

कमजोर का घर होता है गारत तो इसीसे

अ्नवाम में मख्लूक-ए-खुदा बंटती है इसीसे

कौमियते इस्लाम की जड कटती है इसीसे

इस्लामला संकुचित राष्ट्रवादाची संकल्पना मान्य नाही

इस्लामला राष्ट्रवादाची संकल्पना मान्य नाही याचा अर्थ असा नाही की मुसलमान ज्या देशात राहतात त्या देशाशी त्यांची बांधलिकी नसते. ’वतन से मोहब्बत ईमान का जूज है’ असे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी फर्माविले आहे. 

एका ठिकाणी प्रेषित मुहम्मद सल्ल. फरमावितात, ’’ मखलूक अल्लाह का कुणबा है और वो शख्स अल्लाह को ज्यादा महेबूब जो उसके कुणबे के लिए ज्यादा मुफीद (लाभदायक) है (हदीस संग्रह : मुस्लिम) हीच संकल्पना भारतामध्ये ’’वसुदैव कुटुंबकम’’ या तत्वातून ध्वनीत होत असते. 

इस्लामला राष्ट्रवादाची संकुचित संकल्पना मान्य नाही. कोणत्याही देशाचा, कोणत्याही रंगाचा, कोणतीही भाषा बोलणारा, कोणताही इसम कलमा पढून इस्लाममध्ये प्रवेश केल्याबरोबर आंतरराष्ट्रीय मुस्लिम उम्माहचा आपोआप सदस्य बनतो. म्हणूनच हज आणि उमराहमध्ये जगातील प्रत्येक देशातील मुसलमान खांद्याला खांदा लावून इबादत करत असतात. 

मनफियत एक है इस कौम के नुकसान भी एक 

एक ही सबका नबी, दीन भी, इमान भी एक

हरम पाक भी अल्लाह भी कुरआन भी एक

कुछ बडी बात थी होते जो मुसलमान भी एक

दुसऱ्या राष्ट्राच्या लोकांना परके समजण्याच्या प्रवृत्तीमुळेच माणसं एकमेकांच्या जीवावर उठतात. दुसऱ्या देशाच्या लोकांना शत्रू राष्ट्रातील नागरिक समजतात व त्यांच्यावर हल्ला योग्य ठरविण्याची प्रवृत्ती या राष्ट्रवादामुळेच बळावते. याची ताजी उदाहरणे युक्रेन आणि गझावरील हल्ले आहेत. 

इस्लाम पूर्व काळामध्ये अरबस्थानामध्ये टोळी व्यवस्था होती. टोळ्यांची अस्मिता अरबांना आपल्या जीवापेक्षा अधिक प्रिय होती. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी आपल्या 23 वर्षाच्या प्रेषितत्वाच्या काळामध्ये रात्रंदिवस मेहनत करून ही ’टोळी-अस्मिता’ संपवून सर्व टोळ्यातील आपल्या समर्थकांना एक मुस्लिम उम्माह बनवून सोडले. आपल्या हज्जतुल विदाच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्या टोळ्यांची स्वतंत्र ओळख मिटवून सर्वांना एक उम्मत बणून राहण्याची ताकीद केली. अनेक वर्षे मुसलमान या ताकीदीला बांधिल राहिले. पण हिजाज (सऊदी अरब)च्या मुसलमानांनी हिजाजवर सत्ता मिळविण्यासाठी खिलाफते उस्मानिया (मुस्लिमांच्या) विरूद्ध इंग्रजांना मदत करून राष्ट्रवादाचे बीज त्याच भूमीमध्ये लावण्याचे पाप केले ज्या भूमीमध्ये अहोरात्र कष्ट करून टोळ्यांची अस्मिता प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी संपविली होती. अरबांच्या या आत्मघाती निर्णयामुळे 1924 साली खिलाफते उस्मानियाची शकले उडाली व 42 नवीन मुस्लिम देश अस्तित्वात आले. कालौघात या प्रत्येक देशाची स्वतःची एक राष्ट्रीय अस्मिता वृद्धींगत होत गेली आणि आज या मुस्लिम देशांमध्येच नव्हे तर पृथ्वीवरील सर्व मुस्लिम देशांमध्ये तेवढेच अंतर आहे जेवढे बिगर इस्लामी देश आणि त्यांच्यामध्ये अंतर आहे. बरे ! 42 नवीन देश अस्तित्वात आल्यावर त्यांचा एक नाटोसारखा समूहदेखील तयार झाला नाही. तसा समूह जरी अस्तित्वात असता तर आज गझामध्ये जेवढी हतबल परिस्थिती निर्माण झालेली आहे तेवढी झाली नसती. 

राष्ट्रवादामुळे मुस्लिम उम्माहची झालेली हानी

रब्ते मिल्लत व जब्ते मिल्लत बैजा है मश्रीक की निजात

एशियावाले हैं इस नुक्ते से अबतक बेखबर

एक हों मुस्लिम हरम की पासबानी के लिए 

नील के साहील से लेकर ताबखाके काशगर

नस्लगर मुस्लिम की मजहब पर मुकद्दम हो गई 

उड गया दुनिया से तू मानिंदे खाके रहेगुजर

मुस्लिम राष्ट्रांमध्ये पाश्चिमात्य राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा जो विळखा पडलेला आहे त्यामुळे मुस्लिम उम्माहाची अपरिमित हानी झालेली आहे. इराक आणि इराणमध्ये 1980 ते 1988 दरम्यान सीमाविवादावरून चाललेल्या 8 वर्षाच्या युद्धामध्ये लाखो लोक मारले गेले. सऊदी अरब आणि यमनच्या हुती विद्रोहींमध्ये चाललेल्या 8 वर्षांच्या युद्धामध्ये 3 लाखांपेक्षा जास्त यमनी नागरिक मारले गेले. आज गझावर इजराईलकडून केल्या जाणाऱ्या इस्पीतळावरील बॉम्ब हल्ल्यामुळे सारे जग इजराईलवर टिका करत आहे. पण सऊदी अरबने सुद्धा युद्धा दरम्यान यमनच्या इस्पितळ आणि शाळांवर बॉम्बहल्ले केले होते. यमनची नाकेबंदी केली होती. ज्यामुळे जीवनावश्यक औषधांच्या तुटवड्यांमुळे हजारो लहान मुलं मरण पावली होती. इराण आणि सऊदी अरबमध्ये चीनने मध्यस्थी केली नसती तर यमन आणि सऊदी अरबमधील युद्ध अजूनही सुरूच राहिले असते. एवढेच नव्हे तर सुडानमध्ये दोन मुस्लिमांच्या गटांमध्ये झालेल्या गृहयुद्धात 3 लाख मुसलमान मारले गेले. सीरियामध्ये शिया बशरूल असद याने आपली सत्ता टिकविण्यासाठी रशियाच्या मदतीने आपल्याच देशातील 4 लाख सुन्नी मुस्लिम नागरिकांची हत्या घडवून आणली. गेल्या 10 वर्षात मुस्लिम देशांमध्ये आपसात झालेल्या युद्धांमुळे 10 लाखांपेक्षा जास्त नागरिक मारले गेले आहेत. हे केवळ मुस्लिम देशांमधील बळावलेल्या राष्ट्रवादाच्या भावनेमुळे झालेले आहे. 

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, असे कवी इ्नबालने म्हटलेले आहे. परंतु मुस्लिम देशांनी आपसात रक्तरंजित लढाया करून इ्नबालला खोटे ठरविलेले आहे. 

इन ताजा खुदाओंमे बडा सबसे वतन है,

जो पैरहन इसका है वो मजहब का कफन है

ये बुत की तराशिदा तहेजीब नवी है 

गारदगरेकाशाना दीने नबवी है

बाजू तेरा तौहिद की कुव्वत से कवी है

इस्लाम तेरा देस तू मुस्तफवी है

इस्लामच्या शिकवणीचा पाया मानवतेवर रचलेला आहे राष्ट्रवादावर नाही. कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे, 

’’लोकहो, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जीवापासून निर्माण केले आणि त्याच जीवापासून त्याची सहचारिणी बनविली आणि या एकाच जोडप्यापासून समस्त पुरुष व स्त्रिया जगात पसरविल्या. त्या अल्लाहचे भय बाळगा ज्याचा वास्ता देऊन तुम्ही एक दुसऱ्यांकडून आपल्या हक्काची मागणी करता आणि नातेसंबंध विच्छेद करण्यापासून दूर रहा. खात्री बाळगा की अल्लाह तुम्हावर लक्ष ठेवून आहे.’’ (कुरआन : अन्निसा (4) : आयत नं.1).

सय्यद अबुल आला मौदूदी यांनी राष्ट्रवादामुळे होत असलेल्या मानवतेच्या हानीबदद्ल खालील मत व्यक्त केले आहे. ’’आप पुरे कुरआन को देख लीजिए, उसमें एक लफ्ज भी आपको नस्लीयत (वंशवाद) और वतनीयत (राष्ट्रवाद) की ताईद में न मिलेगा. उसकी दावत का खिताब पूरे नौइन्सानी (अखिल मानवजात) से है. तमाम रू-ए-जमीन की इन्सानी मख्लूक को वो खैर (कल्याण) व इस्लाह (सुधारणा) की तरफ बुलाता है. उसमें न किसी कौम की तख्सीस (विशेषतः) है और न किसी सरजमीन की. उसने अगर किसी जमीन के साथ खास तआल्लुक पैदा किया है तो वो सिर्फ मक्का की जमीन है. उसके मुताल्लिक भी साफ कह दिया गया के, मक्का के असली बाशिंदे और बाहरवाले मुसलमान बराबर हैं.’’ (सुरे हज आयत नं. 25). 

सारांश

इस्लाम रंग, वंश, भाषा किंवा मातृभूमीवर आधारित राष्ट्रीयत्वाच्या संकल्पनेच्या विरूद्ध आहेत. कारण या संकल्पना मानवी समुदायाच्या कल्याणाच्या आड येतात. राष्ट्रीयतेचे घटक, समान संस्कृती, समान इतिहास, समान भाषा, समान भूतकाळ व समान आशादायक भविष्यकाळावर अवलंबून असतो. यात दुसऱ्या धर्माच्या आणि दुसऱ्या राष्ट्राच्या लोकांना स्थान नसते. इस्लाममध्ये तौहिद म्हणजे इश्वर एकात्मतेचा हामीदार आहे. प्राचीन काळात धर्म हा राष्ट्रीय होता. इस्लामने ती संकल्पना नाकारीत आंतरराष्ट्रीय मानवी कल्याणाच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. याचाच विसर मुस्लिम राष्ट्रांना पडल्यामुळे त्यांच्यात इस्लामला अपेक्षित उम्माह बनण्याची क्षमता राहिलेली नाही. म्हणून 200 कोटी आणि 57 देश असून देखील ते शक्तीविहीन आहेत. जोपर्यंत जागतिक मुस्लिम समुदाय (जो की) धार्मिकरित्या एक उम्माह है तो राजकीय आणि  सामरिकदृष्ट्या एक उम्माह होणार नाही तोपर्यंत असे अनेक गझा होत राहतील. आणि रडत बसण्यापेक्षा हा 200 कोटींचा तेलाच्या शक्तीने नटलेला आंतरराष्ट्रीय एकजिन्सी समूह शक्तीहीनच राहील.


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget