Halloween Costume ideas 2015

ईशमार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी आपल्यामध्ये कोण-कोणते गुण असायला हवेत : भाग ३

नमाज कायम करणे
    आपण आणि मी कोणते गुण बळगले पाहीजेत जेणे करुन ईश्वराचे मार्गदर्शन आणि पाठींबा प्राप्त करु व त्यास पुढे चालू ठेऊ. आता पाहूया तिसरी  गुणवत्ता ‘ नमाज कायम करणे’ ज्याची कुरआनात ईश्वर वारंवार आपणास आठवण करुन देत आहे.  नमाज कायम करणे म्हणजे आपल्या मनाला वाटेल तेव्हा अदा करणे नव्हे तर ती वेळेवर अदा करणे आवश्यक आहे. म्हणजे जेव्हा अजान होते तेव्हा एका मुस्लिम पुरुषाने आपले सर्व काम बाजूला सारून मस्जिदीकडे प्रस्थान करावे व त्याचबरोबर एका मुस्लिम स्त्रीने घरची सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या मुलाबाळांना सोबत घेवून नमाज अदा करावी. असे का? कारण ही एक अशी प्रार्थना आहे जी आपल्यासाठी  ईश्वर आणि आपल्यामधे संबंध ठेवण्याचे काम करते. आणि आपल्यासाठी ईश्वराविषयी प्रेम, निष्ठा आणि नम्रता व्यक्त करण्याचे हे साधन आहे. हे नाते कधीही तुटू नये हीच अल्लाहची इच्छा आहे. म्हणून अल्लाहने आपल्याला सर्व परिस्थितीत दररोज प्रार्थना चालू ठेवण्याचा आदेश दिला आहे. आपण उभे राहून आपली प्रार्थना करण्यास असमर्थ असल्यास, अल्लाह तुम्हाला खाली बसून प्रार्थना करण्यास सांगतो. आपण तसे करण्यास असमर्थ असल्यास, आपण अंथरूणावर पडल्या-पडल्या प्रार्थना करावी, किंवा आवश्यक असल्यास डोळ्यांच्या हालचालीने देखील प्रार्थना करावी. जर तुम्हाला ईश्वराचे विशेष मार्गदर्शन पाहिजे असेल आणि ऐहिक जीवन व परलोक जीवनात यश हवे असेल तर जोपर्यंत आपण मृत्यूच्या पुढे जात नाही तोपर्यंत दररोजच्या प्रार्थनांचे पालन करण्याच्या कर्तव्यातून मुक्त होऊ शकत नाही. अल्लाहला तुमच्या प्रार्थनेची गरज नाही तर तुम्हाला त्याची गरज आहे जेणेकरून तुम्ही सरळ मार्गाने चालावे. परिणामत: आज काही मुस्लिम पाच वेळेची नमाज कायम करतात परंतु आजही ते अशांत का? का त्यांच्या कामात यश येत नाही? का तो अल्लाहचा गुलाम न बनता दुनियावी पशाचा गुलाम बनला आहे? कारण तो मस्जिदमध्ये नमाज तर पढतो परंतु  घरच्यांशी व बाहेरच्यांशी चांगली वर्तणूक ठेवत नाही, गोरगरिबांना दान करत नाही, कधी जकात दिली तर बँकेत ठेवलेल्या पैशाच्या व्याजाला जकातचे नाव देवून मनाची समजूत घालतो की मी ईश्वराच्या आज्ञेेचे पालन करतो पण एवढे  असून त्याच्या  कामात यश नाही. असे का?कधी डोळसपणे मनाशी खोलवर जाऊन विचार केला का? आपण नमाजमधे ईश्वराशी काय संवाद करतो? त्याला काय मागतो?  त्याचबरोबर  काही मुस्लिमांची विचारधारणा अशी  आहे की जुम्मा ते जुम्मा नमाज पडायची. कारण त्याना आज नमाज दुय्यम दर्जाची वाटते व पैसा प्रथम दर्जाचा वाटतो. मग तो कसाही येवो. मग तो हलाल असो वा हराम; त्यांना काही फरक पडत नाही. मुस्लिमांना हे समजत नाही आहे की जो संपत्ती देणारा आहे, जो खऱ्या यशाच्या मार्गाकडे अजानद्वारे आपणास वारंवार बोलावत आहे, त्या पालनकर्त्याची वाट ठोकरून तो नकळतपणे मनुष्याचा गुलाम बनत आहे. कारण त्याला भीती असते की मी नमाज कायम केली तर ह्या दुनियावी स्थान मला गमवावे लागेन आणि अगदी कहर म्हणजे घरातील कुणी व्यक्ती  कुरआनचे नियम सांगत असेल तर त्या व्यक्तीला कुरआन वाचण्यास प्रवृत्त करत नाही. आज तर बोटावर मोजण्याचे इतके  मुस्लिम पुरुष पाच वेळा नमाज पढत असतील व त्यातूनही तुरळक स्त्रीया नमाज पढत असतील. कारण त्यांचे प्रमुख कर्तव्य टीव्ही पाहणे, एकमेकांना जेवण्याची दावत देणे व लग्नात अगदी जोराने स्पर्धा लावून नटणे-थटणे ,एकमेकांची निंदा करणे हे समजून बसलेल्या आहेत. त्यांचे हे विचार आचरण कळत-नकळत पणे हेच सांगत आहेत की नमाज ने काहीच होत नाही. बरं मग पैशातूनच आपण सर्वकाही प्राप्त करु शकतो तर आज मुस्लिम समाज अधोगतीवर का? जेव्हा की पैगंबरांनी सगळीकडे  इस्लाम संबंधी जागृती केली होती तेव्हा मुस्लीम समाजाने सर्वात जास्त राज्य प्रस्थापित केले होते व ते पैगंबरानंतर सतत 600-800 वर्ष कायमही राहीले होते. पण तो आज प्रत्येक क्षेत्रात मागे का? जसे शैक्षणिक क्षेत्रात जेव्हा तुम्ही  नजर टाकाल तर तुम्हाला तिथे खालच्या दर्जाचे शिक्षण घेणारे मुस्लिमच दिसतील. आज परिस्थिती थोडीफार सुधारलेली आहे परंतु ती आधीच सुधारायला हवी होती. मुस्लिमांनी मुलांना शिक्षणात पुढे आणनाऱ्या स्त्रीला कधी शिकविलेच नाही! जेव्हा की फक्त इस्लामम सर्वप्रथम शिक्षणाचा हक्क स्त्रीलाच देण्यात आला. पण आचरणात याउलट आहे. कारण तिचे कमी वयात लग्न करुन द्यायचे मग शिकवायचेही नाही. कारण तिला सांगण्यात आले चुल आणि मुल हेच तिचे जीवन आहे. परिणामत: आज आईला मुलाला ळलीश इेरीव चा अभ्यासक्रम शिकविता येत नाही म्हणून ती त्यांना ीील बोर्ड च्या शाळेत टाकते. आणि मग ती या भौतिक दुनियेला आकर्षित होवून फक्त त्याला पैसा कमविण्याचे शिकविते. जर मुले बिघडली तर इंग्रजी भाषेला नाव ठेऊन स्वत:च्या चुकांना आवरण घालते पण खरे कारण तिच्यामधील धार्मिक शिक्षण व तांत्रिक शिक्षणाच्या कमतरतेमुळे ही परिस्थिती निर्माण होते. म्हणूनच मुस्लिम समाज शिक्षण क्षेत्रात मागासलेला आहे . तसेच सामाजिकरित्या पाहिले तर मुस्लिम आचरणात सर्वात  कमी दर्जाचे आहेत असे इतर समाजातील लोकांचा दृष्टीकोण आहे म्हणूनच इतर कुठल्याही समाजात त्यांचे विशेष स्थान नाही. सतत स्वार्थ, बंडखोरी, एकमेकांना शिविगाळ, पैशाचे लोभी हे  त्यांचे गुणविशेष सांगण्यात येतात. जेव्हा की याउलट इस्लाम न्यायाची शिकवण देतो व प्रत्येक मनुष्याला नैतिक कर्माने माणूस बनायला शिकवितो. बाकी समाजात सोडा त्यांनी स्वत: मध्येच विघटन केले आहे जसे सुन्नी, शिया, अहले हदीस, दर्गेवाले अजून बरेच काही. ते इस्लामची एकात्मता आचरणात आणण्याऐवजी ते एकमेकांना खाली खेचण्यामधे व्यस्त आहेत. अगदी तसेच आज अरब देश दुसऱ्या अरब देशाशी भांडण्यात व्यस्त आहेत. मात्र कधी देशाच्या पंतप्रधानाने यांच्यावर अत्याचार दर्शविला असता तेव्हा मात्र काही क्षणाला मुस्लिम संघटित असल्याचा दावा करतात. त्याशिवाय अगदी कहर म्हणजे मुस्लिम समाजाने ईश्वराच्या प्रार्थनेमधे (नमाज) विघटन केले आहे जसे ते एकदम गुर्मीने म्हणतात जमातनुसार नमाज पडायची असते . काय खरंच ईश्वराने तुम्हाला वेगवेगळी नमाज पडण्याची आदेश दिला आहे? काय पैगंबराने तशी शिकवण दिली? सत्याची पडताळणी करण्यासाठी कधी कुरआन वाचन्याचे धाडस केले आहे का? ही प्रश्‍नावली ऐकून तुमचे मन अगदी सहज उत्तर देते- नाही! !!! याचे कारण म्हणजे आपणास यासाठी मौलाना/इमाम  यांनी कधीच प्रोत्साहित केलेच नाही. कुरान सामान्य मुस्लिमांनी वाचले व समजले तर  त्यांची मक्तेदारी कमी होईल. मौलाना/इमाम यांचा हा विचार आणि  मंदिरातल्या  पुरोहितांच्या विचारांमधे फारसा फरक दिसून येत नाही. तसे असले असते तर प्रत्येक मुस्लिमाला अरेबी भाषा समजली असती व कुरान समजून घेण्यात गोडी निर्माण झाली असती आणि मुस्लिम पुरुष मस्जिदीमध्ये मोमिन व मस्जिदीबाहेर आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनला असता. त्याचबरोबर मुस्लिम स्त्री घरामध्ये आचरणात बंडखोर न बनता मोमिन बनली असती. तुम्ही पहाल कोणताही मनुष्य जेव्हा पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांचे जेव्हा जीवन चरित्र वाचतो तेव्हा अगदी मनातून उद्गारतो मनुष्य असावा तर असा. मी जेव्हा-जेव्हा इस्लामची सत्यता मुस्लिमेत्तर लोकांना सांगते तेव्हा ते एकच प्रश्‍न घेवून बसतात इस्लाम एवढा सुंदर असताना मुसलमान वागणुकीत खराब का? मित्रांनो! मी इथे आपण किती खराब झालो हे सांगत नाही आहे तर मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की आपण असे का झालो?  आपणच अधोगतीवर का? आपल्यासोबतच अन्याय का? याचे कारण म्हणजे तुम्ही दिवसा पाचवेळा जेव्हा ईश्वराला प्रार्थना करता तेव्हा त्याच्याशी काय संवाद करता? त्याला काय मागता?  तो तुम्हाला काय देतो आहे आणि तुम्हाला काय करायचे आहे? हे कधी समजून घेतले आहे का? जसे आपण ईश्वराला नमाजमधे सरळ मार्गदर्शन (हिदायत) मागतो तेव्हा ईश्वर म्हणतो तुला माझे मार्गदर्शन पाहिजे असेल तर ते कुराणात आहे मग त्यातून आत्मसात कर व आचरणात आण. मग पुन्हा अजानद्वारे यशाकडे ये. पुन्हा मला माग. मी तुला विशेष मार्गदर्शन (तौफिक) देईन. विचार बदला परिस्थिती बदलेल. पहा आपण विचार उत्पन्न करु शकत नाही तर ते अल्लाहच आपल्या मनामध्ये  उत्पन्न करतो मात्र ते निवडण्याचे स्वातंत्र्य त्याने आपणास दिले आहे. मग कोणता विचार निवडायचा? कुठल्या मार्गावर ठाम राहिल्यास माझे कर्म आचरण सात्विक बनेल. ते समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहुया . एकदा जर आपणासमोर दारू  पिण्याची परिस्थिती निर्माण झाली असता आपल्या मनात तीन विचार येतात पहिला दारु पिली तर या दुनियेत उच्च स्थान मिळते  दुसरे आज पिऊन घेवुया उद्यापासून पिणार नाही आणि तिसरे मी पिणार नाही. कारण मला माझ्या ईश्वराने सांगितले आहे. मग दुनियेतील स्थान माझ्यासाठी दुय्यम दर्जाचे  आहे.  तुम्ही तिसऱ्या विचारावर तेव्हाच ठाम राहाल जेव्हा तुम्ही कुराण वाचाल आणि कुराण तेव्हाच वाचाल जेव्हा याचे मार्गदर्शन तुम्ही ईश्वराला मागाल. जेणेकरून तुम्ही तोच मार्ग निवडाल ज्याने तुमचे आचरण सात्विक बनेल आणि या दुनियेतील तुमचे यश जणूकाही एका वाळवंटात गुलाबाचे फुल उमलल्यासारखे असेल. आणि परलोकातील यश तुमची वाट पाहत असेल. कारण ही सात्विकता नैतिक आचरण व यश हे तुम्हाला ईश्वराने दिलेले असेल. मग तिथून तुम्हाला कोणीही खाली खेचू शकत नाही. पण तुमची श्रद्धा चुकली तर विचार चुकतात आणि विचार चुकले तर आचार चुकतात मग निश्चितच अधोगाती, अन्याय, अत्याचार याचा सामना या दुनियेत व मृत्युनंतरही करावा लागेल. यावरुन तुम्ही म्हणाल इतर लोक तर ईशमार्गावर नसून यश प्राप्त करत आहेत मग आम्हीच अपयशी का? याचे उत्तर अगदी सोपे आहे, असे की, अल्लाह आपल्याला या दुनियेत व परलोकात कायमस्वरूपी यश देऊ इच्छित आहे. मात्र ईश्वराने आपणास यशाचा मार्ग सांगूनही आपण जाणूनबुजून  अपयशी मार्ग स्वीकारतो आहे. या यशाची चव तुम्हाला तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही ईश्वराच्या जवळ जाल आणि ती वाट दुसरी कुठलीही नाही तर नमाज आहे. ती समजून पठण केली तर तुमचे ईश्वराशी नाते अतूट बनेल. तुमच्यात कुराणविषयी गोडी निर्माण होईल. ईश्वराच्या प्रेमापोटी तुमचे आचरण सात्विक बनेल त्याच्या विशेष मार्गदर्शनाने तुम्हांला ईशमार्गावर ठाम राहण्यास मदत होईल.”श्रद्धावंत पुरुष व श्रद्धावंत स्त्रिया हे सर्व एकमेकांचे मित्र आहेत, भलेपणाचा आदेश देतात व वाईट गोष्टीपासून रोखतात, नमाज कायम करतात, जकात देतात आणि अल्लाह व त्याच्या पैगंबराचे आज्ञाधारक आहेत, हे ते लोक आहेत ज्यांच्यावर अल्लाहचा कृपावर्षाव होणारच. खचितच अल्लाह सर्वांवर प्रभावी आणि चतूर व बुद्धिमान आहे.”(कुरआन 9:71-72). ”या श्रद्धावंत पुरुष आणि स्त्रियांसाठी अल्लाहचा वायदा आहे की त्यांना अशा बागा प्रदान करील ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील, आणि ते त्याच्यात सदैव राहतील, त्या सदाबहार बागांत त्यांच्याकरिता स्वच्छ निवासस्थाने असतील, आणि सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे अल्लाहची प्रसन्नता त्यांना प्राप्त होईल. हेच मोठे यश आहे.  (कुरआन 9:71-72). हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही नमाजमधील प्रत्येक श्लोकाचा अर्थ समजून घ्याल. चलातर नमाजमधील प्रत्येक श्‍लोकाचा सविस्तर अर्थ पाहूया पुढील भागात

- सीमा देशपांडे
7798981535

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget