Halloween Costume ideas 2015

महामारीत जगात दर 30 तासात एका अरबपतीची भर


जेव्हा जगातली 98 टक्के लोकसंख्या लॉकडाऊनच्या खाली होती, आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडला होता. पर्यटनचे क्षेत्र बंद पडले होते. अशा काळात दररोज एक ना एक व्यक्ती अब्जाधीश होत राहिला आणि याच काळात जगातील 160 दशलक्ष लोक गरीबीच्या खाईत गेली. 

कोरोना महामारीनंतर दोन वर्षात पहिल्यांदाच जागतिक आर्थिक फोरमच्या अधिवेशनात संस्थेच्या सदस्यांनी वैयक्तिक भाग घेतला. यावेळी ऑ्नसफॅम या संस्थेने आपला अहवाल सादर केला. या अहवालानुसर कोरोना महामारीच्या काळात जगामध्ये दर 30 तासाला एक अरबपतीची भर पडली म्हणजेच महामारीच्या काळात एकूण 573 नवे अरबपती उदयास आले. या अगोदर या धनवानांची संपत्ती 23 वर्षाच्या काळात जेवढी वाढली होती तितकीच संपत्ती या लोकांना कोरोनाच्या 24 महिन्यात जमविली. या काळात गोरगरीबांचे किती प्रमाणात शोषण झाले याचा अंदाज लावला जाऊ शकतो. 2000 साली साऱ्या धनवानांची एकूण संपत्ती जागतिक जीडीपीच्या 4.4 टक्के होती. ही टक्केवारी आता 13.9 टक्के पर्यंत पोहोचली आहे. यामागचे कारण हे की जे गोरगरीब कष्टकरी कामगार होते त्यांनी विवश होऊन कमी मजुरीत काम करायला तयार झाले. त्याचबरोबर खाजगीकरण आणि मोनोपली देखील एक कारण आहे. महामारीच्या काळात जनतेने निवडून दिलेल्या सरकारांनी नागरिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करून उद्योगपतींना विविध प्रकारच्या करांमध्ये सूट दिली. जागतिक स्तरावर ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या पाच सर्वात मोठ्या भारतीय कंपन्यांनी दर सेकंदाला 2600 डॉलर्सची कमाई केली आणि अन्न (फुड) च्या क्षेत्रात व्यापार करणारे 62 नवीन अरबपती बनले. यानंतर औषध उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी 20 नव्या अरबपतींना जन्म दिला. लशीचे उत्पादन करणाऱ्या मॉडेरना आणि फाईजर कंपन्यांनी 20 हजार डॉलर प्रतिसेकंदर इतकी कमाई केली.

दुसरीकडे दर 33 तासामध्ये दहा लाख लोक गरीबीच्या खाईत लोटले गेले. त्यांच्या संख्येत या वर्षी 26.3 कोटींची भर पडली आहे. आपल्या देशात निवडणुकीचा हंगाम संपल्यानंतर ज्या 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले जात होते त्यातून गहू वगळले गेले आहेत आणि अशा बातम्या ऐकायला आल्या आहेत की रेशनकार्ड परत घेतले जाणार आहेत. भारतात गेल्या 48 वर्षामध्ये महागाईत कमालीची वाढ झालेली दिसते आणि त्याच वेळेला अन्न आणि उर्जाच्या क्षेत्रात दर दोन दिवसात 100 कोटी उद्योगपती कमवत आहेत. लाखो लोका या पुढील काळात काय होणार या चिंतेने ग्रस्त आहेत. ह्या आर्थिक विषमतेने मानवतेला छिन्नविछिन्न करून टाकले आहे. 

ह्या आर्थिक विषमतेमुळे श्रीलंका आणि सुदानमध्ये महागाई इतकी वाढली की त्या देशात यादवी माजण्याची चिन्हे आहेत. ज्या देशाची उत्पन्न क्षमता इतकी खालावली आहे की त्या देशाचे अखंडत्व पणाला लागले आहे. यावेळी गरीब देशाचे लोक श्रीमंत लोकांपेक्षा दोन पटीने भाव देऊन अन्नधान्य खरेदी करत आहेत. याचा परिणाम असा होत आहे की जगातील गरीबातले गरीब लोक 112 वर्षात जितकी कमाई करू शकतात तितकी कमाई जगात एक टक्के श्रीमंत लोक एका वर्षात कमवत आहेत. ऑक्सफॅम या संस्थेने लोकशाही देशांना या करोडपती अरबपती लोकांशी 2 ते 5 टक्के कर आकारण्याची शिफारस केली आहे. ज्यामुळे दरवर्षी 2520 अरब रूपये जमा होतील. ज्याद्वारे 2.3 अरब लोकांना गरीबीच्या खाईतून वर उचलण्यात मदत होऊ शकते. पण पूर्वीप्रमाणेच ऑ्नसफॅमच्या अहवालाला नाकारून लोकांना जसे मंदिर-मस्जिद वादात गुंतवले गेले तसेच काही आताही होणार. कोरोना महामारीच्या पहिल्या सहा महिन्यातच याचा अंदाज आला होता की, मानवतेसमोर किती गंभीर समस्या येणार आहे. कोरोना विषाणू विषयी संशोधन करणाऱ्या तज्ञांनी असे म्हटले होते की, नायजेरिया आणि भारतासारख्या गरीब देशांना या महामारीचा जास्त फटका बसणार आहे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली पुढे जाऊन जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या अहवालात असे म्हटले होते की, भारतात या महामारीने मरण पावलेल्यांची संख्या शासनाच्या आकडेवारीपेक्षा दहा पटीने जास्त आहे. इम्पिरियल कॉलेजचे संशोधक पीटर व्हिन्स्कल श्रीमंत लोकांच्या रूग्णाच्या तुलनेत गरीब रूग्णांना मृत्यूचा धोका 32 टक्के जास्त होता. कारण रूग्णालयात जाणे अवघड झाले होते. जर दवाखान्यात प्रवेश मिळालाच तर अतिदक्षता विभागात प्रवेश मिळेल याची खात्री नव्हती. ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा नसल्याने कित्येक लोकांचे प्राण गेले. 

कोरोना महामारीचा नकारात्मक प्रभाव लोकांवर झाला. त्याचवेळी लोकशाही राष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या 10 अति श्रीमंत लोकांची संपत्ती दुपटीने वाढली. त्यांची संपत्ती 700 अब्ज डॉलरवरून एक 1.5 खरब डॉलरपर्यंत पोहोचली म्हणजे दर दिवशी सरासरी 1.3 अब्ज डॉलरची वृद्धी झाली. या काळात सत्ता व्यवस्था या लुटीचा दुरून तमाशाच पाहत नव्हत्या तर या प्रक्रियेत त्यांची मदतही करत होत्या. महामारीच्या काळात गेल्या 14 वर्षांच्या तुलनेत अब्जाधीश श्रीमंतांची संख्या सर्वात जास्त वाढलेली आहे. जागतिक संपत्तीत त्यांचा वाटा जलद गतीने वाढत गेला. ऑक्सफॅम संस्थेने जगात लसीच्या उत्पादनाबरोबरच्या पर्यावरण आणि हिंसा रोखण्यासाठी देखील निधी पुरवून लोकांचे प्राण वाचविण्यासाठी कर व्यवस्थेत सुधारणा करण्याचीही शिफारस केली आहे. पण सर्व राष्ट्रांनी त्याला धुडकावून लावले. 

ही परिस्थिती केवळ युरोप आणि अमेरिकेपर्यंत सीमित नव्हती तर अब्जाधीश श्रीमंतांच्या यादीत बीजिंग पहिल्या क्रमांकावरच होता. त्याच बरोबर ऑस्ट्रेलियामध्ये देखील 47 अब्जाधीश श्रीमंतांच्या संपत्तीत दररोज 205 दशलक्ष डॉलरची वाढ होत होती. कोरोनाच्या पहिल्या दोन वर्षात त्यांनी आपल्या संपत्तीमध्ये वाढ करून 255 बिलियन डॉलरपर्यंत वाढविली याचा अर्थ असा की हे लोक दर सेकंदाला 2300 डॉलरची कमाई करत होते. या लोकांच्या संपत्तीचा 1 टक्का जगातील 99 टक्के लोकांपेक्षा जास्त होता आणि म्हणूनच ऑक्सफॅम संस्थेने ऑस्ट्रेलिया सहित जगातल्या विविध सत्ताधाऱ्यांना अशी विनंती केली आहे की, श्रीमंतांवर जास्तीत जास्त कर आकारावा. पण ह्या श्रीमंतांनी कर देण्याऐवजी निधी गोळा करून निवडणुका लढवण्यास प्राधान्य दिले. आस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटी संचालित क्रॉफर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक पीटर वॉल्टफर्ड ने वयस्कर नागरिकांच्या देखरेखीसाठीच्या संस्थांना निधी पुरवण्यावर दुजोरा दिला. पण त्यांना ऐकणार कोण?

ऑक्सफॉमचे प्रमुख कार्यकारी डेन्टी सरसिकंद यांनी आश्चर्य व्यक्त केले की जेव्हा जगातली 98 टक्के लोकसंख्या लॉकडाऊनच्या खाली होती, आंतरराष्ट्रीय व्यापार बंद पडला होता. पर्यटनचे क्षेत्र बंद पडले होते. अशा काळात दररोज एक ना एक व्यक्ती अब्जाधीश होत राहिला आणि याच काळात जगातील 160 दशलक्ष लोक गरीबीच्या खाईत गेली. 

याचा अर्थ असा की त्यांची दररोजची कमाई 9.90 डॉलरपेक्षाही कमी होती. त्यांनी हे मान्य केले की अन्यायी अर्थव्यवस्थेत बऱ्याच चुका आहेत. कारण जागतिक टंचाईच्या काळात देखील ही व्यवस्था श्रीमंतातील अधिक श्रीमंत आणि गरीबाला अधिक गरीब बनवत होती. ते पुढे म्हणत की राजकीय नेत्यांना ही ऐतिहासिक संधी प्राप्त आहे की आम्ही ज्या धोकादायक मार्गावर जात आहोत त्यात त्यांनी बदलून टाकण्याचे धाडस करणे आणि भांडवलदारी लोकशाही व्यवस्थेत राजकीय निधीचा वाटप करून माध्यमांना विकत घेऊन सत्ता करणाऱ्यांशी ही अपेक्षा अशी केली जाऊ शकते. डेनीसर सिकेंद्रा संपत्तीवर जास्तीचा कर आकारणी करून यातून होणाऱ्या उत्पन्नातून आरोग्य आणि सामाजिक सुरक्षासाठी खर्च करण्याची शिफारस देखील केली आहे.                

- सय्यद इफ्तेखार अहमद


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget