Halloween Costume ideas 2015

माता-पिता : प्रेषितवाणी (हदीस)

हजरत अबू उमामा (रजि.) म्हणतात की, एका व्यक्तीने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘हे प्रेषिता! माता-पित्यांचे संततीवर काय हक्क आहेत?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले,  ‘‘माता-पिताच तुमची जन्नत (स्वर्ग) आहेत आणि माता-पिताच तुमची जहन्नुम (नरक).’’ (इब्ने माजा)
निरुपण
माता-पित्यांशी सद्वर्तन करणारेच जन्नतमध्ये (स्वर्गात) जातील. माता-पित्यांशी दुर्वर्तन करणारे कदापि स्वर्गात जाऊ शकत नाहीत. असे लोक जहन्नुममध्ये (नरकात) टाकले जातील. कुटुंब हे मानवी समाजाचा एक घटक आहे. समाजातील सारे कुटुंब आदर्श असतील तरच समाजही आदर्श होईल. प्रत्येक कुटुंबामध्ये माता-पिता हे महत्त्वाचे घटक असतात. ज्या  कुटुंबात माता-पित्यांचा सन्मान होत असेल, त्यांच्याशी सद्वर्तन होत असेल व त्यांची सेवा घडत असेल तेच कुटुंब सुखी-समाधानी व आदर्श कुटुंब म्हणता येईल. उलटपक्षी ज्या घरात  माता-पिता उपेक्षित असतील, त्यांचा सन्मान होत नसेल, त्यांची सेवा होत नसेल त्या घराला सुखी-समाधानी म्हणता येणार नाही.
आपल्या राज्यात गेल्या आठवड्यात घडलेल्या दोन घटना यासंबंधी अतिशय गांभीर्याने चिंतन करण्यास बाध्य करणाऱ्या आहेत. पहिली घटना आहे नांदेडचे सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ.  अरुण गोधमगावकरांची. अहमदपूरमधील रुक्मिनी वृद्धाश्रमात दि. १८ ऑगस्ट २०१८ रोजी त्यांचे दु:खद निधन झाले. अमेरिकेत असणाऱ्या डॉ. मुलाला व डॉ. मुलीला कळल्यावर त्यांनी  अंत्यविधी उरकून घ्या, आमचा काहीएक आक्षेप नाही व आम्ही येऊ शकत नाही, असे उत्तर दिले. अखेर वृद्धाश्रमाच्या चालकांनी त्यांचा विधी पूर्ण केला.
दुसरी घटना नीराबाई पटेल या वृद्ध महिलेची आहे. पालघर जिल्ह्यातील मधोर येथे या वृद्ध मातेचे निधन झाले. वृद्ध पिता धीरज पटेल यांनी अहमदाबादमध्ये राहणाऱ्या आपल्या  एकुलत्या एक मुलीला फोन करून कळवलं. ती आली नाही. गावातील हिंदू-मुस्लिम ग्रामस्थांनी या वृद्धेचा अंत्यविधी केला. नंतर गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तीने त्या मुलीला  अस्थिविसर्जनासंबंधी विचारल्यावर ती फोनवर म्हणाली, ‘अस्थी कुरिअरने मला पाठवून द्या.’ मुलीचे असे वागण्याने बापाच्या काळजाचे पाणी केले. आजचा समाज कुठे चाललाय आणि  कुटुंब व्यवस्थेची कशी वाट लागली आहे त्याची ही दोन बपोलकी उदाहरणे आहेत. ज्यांना मातापित्यांचीच ओळख नाही ते इतर कुणाची ओळख ठेवणार? समस्या गंभीर आहे. त्यावर  वेळीच उपचार करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी घरात आणि शालेय जीवनातही मुलांवर योग्य संस्कार महत्त्वाचे आहेत.
इस्लामची माता-पित्यांसंबंधी काय भूमिका आहे ते पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या उपरोक्त उपदेशावरून आपल्या लक्षात येईल. ते म्हणाले, ‘माता-पिताच तुझा स्वर्ग आणि माता-पिताच  तुझा नरक.’ म्हणजे त्यांच्याशी सद्वर्तन कर आणि स्वर्गात जा अन्यथा त्यांच्याशी दुर्वर्तन कर आणि खुशाल नरकात जा!

- संकलन : डॉ. सय्यद रफीक

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget