Halloween Costume ideas 2015

अशांत व अस्वस्थ वातावरणात मानवता व राष्ट्रीयता फुलत नसते - श्रीपाल सबनीस

पुणे (शोधन सेवा) 
बहुधार्मिकता हे आमच्या जगाचे वास्तव आहे. त्यामुळे अर्थपूर्ण सहजीवनच विश्‍वात्मक समुदायास लाभदायक ठरेल. अशांत व अस्वस्थ वातावरणात मानवता व राष्ट्रीयता फुलत नसते, विकसितही होत नसते. सर्व धर्मात मानवतावादी विचार आहेत, पण आंधळे अनुयायीच खर्‍या धर्माचा पराभव करतात. धर्माचे शुद्ध स्वरूप सर्वांनी समजून घेऊन चांगल्या विचारांची बेरीज करावी. प्रत्येक धर्म प्रेमाचा व शांततेचा संदेश देतो. विश्‍वशांतीसाठी बहुसांस्कृतिक संवाद आवश्यक असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी येथे केले.
    मराठी साहित्य परिषद, सदाशिव पेठ पुणे येथे गुरूवार, जमाअत-ए-इस्लामी हिंद पुणे (कॅम्प)द्वारा आयोजित बहुसांस्कृतिक सद्भाव जागरण सोहळ्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सकाळ मीडिया ग्रुपचे अध्यक्ष प्रतापराव पवार होते. मंचावर प्रा.अजीज मोहियोद्दीन, डॉ. सय्यद रफिक पारनेरकर, सचिन पवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरूवात कुरआन पठणाने झाली.
    यावेळी प्रतापराव पवार म्हणाले, ”लोक एकत्र येतात तेव्हा एखादा समाज अथवा धर्म वाढत असतो. मात्र त्याच्या उलट परिस्थिती निर्माण झाली तर समाज किंवा धर्माचा र्‍हास होतो. संघटित झालो तर विचारशक्ती वाढते. प्रत्येक धर्मातील व्यक्तीलादेखील त्याचे आयुष्य चांगले असावे, असे वाटते. म्हणूनच भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याची जबाबदारी समाजातील सर्व घटकांची आहे. सर्वधर्मीय एकोपा हा समाजाच्या व देशाच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे. कारण जगभरातील कोणत्याही धर्माचा सर्वसामान्य माणूस असो, तो चांगला आहे. त्याच्या मनात पाप नाही. मात्र, सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेवली तर सर्वांचेच भले होईल. समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी ज्या कोणी व्यक्ती व संस्था झटत आहेत, त्या सर्वांना माझा मनापासून पाठिंबा आहे. त्याच भूमिकेतून मी येथे आलो आहे, असे पवार म्हणाले.”
    डॉ. पारनेरकर म्हणाले, संतांनी व पैगंबरांनी आपल्या वचनांतून मानव जातींचे रक्ताचे नाते वर्णिले आहे; परंतु, माणसे संस्कृती व धर्माला विसरली असून, चंगळवाद बोकाळला आहे. प्रा. अजीज मोहियोद्दीन म्हणाले, ” धर्मा-धर्मातील वादविवाद मिटविण्यासाठी प्रेमाची भाषा उपयुक्त ठरेल.” सचिन पवार म्हणाले, धर्म एकमेकांप्रती बंधुता शिकवितो. म्हणून अल्लाह व ईश्‍वरासमोर आपण समान आहोत, हीच भावना नागरिकांमध्ये असावयास हवी.
    प्रास्ताविक इम्तियाज शेख यांनी केले. सुत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले. आभार फरजाना सय्यद यांनी मानले. यावेळी पुणेकरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget