Halloween Costume ideas 2015

माता-पित्यांची सेवा स्वर्गाची हमी : प्रेषितवाणी (हदीस)

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी तीन वेळा उच्चारले, ‘‘तो भयंकर अपमानित आणि तिरस्कृत झाला.’’ लोकांनी विचारले, ‘‘कोण?’’ पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘ज्याला वृद्ध माता-पिता दोघांपैकी  एक अथवा दोघेही लाभले आणि तरीही तो स्वर्गाला मुकला.’’ (मुस्लिम)

निरुपण-
अल्लाहनंतर मनाणसावर सर्वाधिक हक्क कुणाचे असतील तर ते माता-पित्यांचे आहेत. माता-पिता वृद्धावस्थेत जर कोणाला लाभले तर ही अल्लाहची महान कृपा आहे. हे मोठे भाग्य  आहे. असा माणूस सहजपणे स्वर्गात आपले ठिकाण ‘रिझर्व्ह’ करू शकतो. अर्थात वृद्ध माता-पित्यांची सेवा करून.

पैगंबर मुहम्मद (स.) एकदा म्हणाले, ‘‘माता-पित्यांना एका प्रेमाच्या नजरेने पाहणे एक सार्थक हज करण्यासमान आहे.’’ त्यावर कोणी विचारले, ‘‘मग जर मी दिवसातून शंभर वेळा  त्यांना प्रेमाने पाहिले तर?’’ पैगंबर म्हणाले, ‘‘तर तुला शंभर हजचे पुण्य लाभेल. अल्लाहच्या खजिन्यात कसलीच कमतरता नाही.’’

माता-पित्यांच्या थोरवीसंबंधी अशा आशयाचे अनेक उपदेश पैगंबरांच्या वाङ्मयात उपलब्ध आहेत. तात्पर्य हे आहे की वृद्धावस्थेत माता-पिता लाभणे आणि आपल्या हातून त्यांची सेवा  घडणे यासारखे भाग्य दुसरे नाही. असा माणूस निश्चितच ऐहिक जीवनातही सुखी-समाधानी व यशस्वी आहे आणि मरणोत्तर जीवनात तर त्याच्यासाठी यशाची अर्थात स्वर्गाची हमी  आहे. वृद्ध माता-पित्यांच्या स्वरूपात शाश्वत वर्ग प्राप्त करण्याची चालून आलेली एवढी सुवर्णसंधी जो दवडील व माता-पित्याकडे दुर्लक्ष करून त्यांना झिडकारून वृद्धाश्रमाची वाट दाखवील  अशा नीच माणसाविषयी काय बोलावे?
उपरोक्त उपदेशामध्ये पैगंबर अशा अभाग्यांना जणू शाप देत आहेत. पैगंबर (स.) म्हणतात, ‘‘तो अपमानित झाला! तिरस्कृत झाला!’’ अर्थात त्याचे वाटोळे झाले! आणि एकदा नव्हे  दोनदा नव्हे तर तीन वेळा पैगंबरांनी या शापाचा उल्लेख केला. यासाठी की लोकांनी ही बाब गांभीर्याने घ्यावी. लोकांनी चिंतेने विचारल्यावर पैगंबर (स.) म्हणाले, ‘‘तो ज्याला माता- पित्यांपैकी एक अथवा दोघेही वृद्धावस्थेत लाभले, मात्र तरीसुद्धा तो स्वर्गाला, जन्नतला मुकला.’’
चंगळवादाच्या विळख्यात अडकलेल्या सद्य समाजासाठी हा पैगंबरी उपदेश मोठा मोलाचा आहे. आज एका विद्यापीठाचे माजी कुलगुरू वृद्धाश्रमात आहेत, माजी केंद्रीय मंत्री वृद्धाश्रमात  आहेत! आपण देशातील हजारो वृद्धाश्रमांत जाऊन प्रत्यक्ष पाहू शकतो की कसे कसे महाभाग वृद्धाश्रमात खितपत पडलेले आहेत! संतती असूनही! आणि हो, प्रॉपर्टी असूनही! अजून वेळ  गेलेली नाही. या परस्थितीतूनही आपण समाजाला सावरू शकतो. मात्र त्यासाठी गरज आहे या चंगळवादाच्या विळख्यातून बाहेर येण्याची! आणि जीवनासंबंधी पैगंबरी दृष्टिकोनातून  चिंतन करण्याची!

(संकलन : डॉ. सय्यद रफीक)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget