Halloween Costume ideas 2015

हे काय? आणि कधी संपणार?


स्त्री सन्मानाचे प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी सुचविलेले उपाय हेच खरे उपाय आहेत. वेश्यांना खोटा सन्मान देणे हे उपाय नव्हे; याचा अर्थ असा नाही की ज्या महिला आज वेश्या व्यवसात आहेत त्यांचा सन्मान व्हायला नको. माझे मत असे आहे की सन्मानापेक्षा जास्त त्यांना पूनर्वसनाची गरज आहे. ते सरकारने करावे हाच त्यांचा खरा सन्मान ठरेल.

आमची आजी घराबाहेर लेकरांना सोडायची नाही, लेकरं खेळण्यासाठी जरी बाहेर पडली की तिच्या काळजात धासत व्हायची. या मागे एकच मोठे कारण होते ’’उमराव जान’’ चित्रपट तिने पाहिला होता. सारखी सांगायची घराबाहेर गेलात तर कोणीतरी उचलून नेईन. ’’वेश्या’’ हा स्त्रीला संबोधीत करताना वापरला जाणारा सर्वात तिरस्कारीत शब्द आहे असे मला वाटते.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या एका पिठाकडे जेव्हा वेश्या व्यवसाय संबंधी सुनावणी सुरू असताना जी टिप्पणी केली तिची चर्चा देशभर झाली. न्यायमूर्ती एल. नागेश्वरराव आणि इतर दोन सन्माननीय न्यायमूर्तींच्या पीठाने पोलिसांना निर्देश देताना असे म्हटले की, वेश्याव्यवसाय हा सुद्धा एक व्यवसाय आहे त्यामुळे या व्यवसायात स्वतःच्या मर्जीने उतरलेल्या महिलांचा सन्मान व्हायला हवा. कोर्टाच्या निदर्शनास आले आहे की पोलीस जेव्हा वेश्या वस्तीवर छापे टाकतात तेव्हा देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत त्यांची वर्तणूक अतिशय क्रूर असते. 

कोर्टाने या संबंधित नाराजगी व्यक्त करताना स्पष्ट केले आहे की, ज्या महिला स्वतःच्या मर्जीने हा व्यवसाय करतात त्यांनासुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. यानंतर या निर्णयाच्या समर्थनार्थ आणि विरोधात अनेक प्रतिक्रिया उमटल्या. कोणी काय प्रतिक्रिया दिल्या याबाबत चर्चा न करता आज यातील मूलभूत मुद्यांवर चर्चा करण्याचा माझा मानस आहे.

वैद्यकीय व्यवसाय करत असताना एक महिला डॉ्नटर म्हणून माझ्याकडे येणाऱ्या पेशंट महिला असतात. त्यातील अनेक अतिशय गरीब, मोलमजूरी करणाऱ्या असतात पण त्या सन्मानाने जगत असतात. त्यांच्याशी रोज संवाद होतो. त्यावरून माझा असा ठाम विश्वास आहे की कोणतीही महिला स्वतःच्या मर्जीने वेश्या व्यवसायात जाणार नाही. 

वेश्या पैदा नहीं होती, वो बनाई जाती है

ज्या महिला या व्यवसायात आहेत त्या विशिष्ट परिस्थितीला बळी पडलेल्या असतात. आजकाल मुक्त सामाजिक व्यवस्थेत कोवळ्या वयातील तरूण मुली प्रेमाच्या नावाखाली प्रियकराच्या भूलथापांना बळी पडतात, लग्नापूर्वीच त्याच्या स्वाधीन होऊन जातात. जन्मभर ज्यांनी पालनपोषण केले त्या आई-वडिलांचा विरोध डावलून ह्या मुली निघून जातात. किंबहुना त्यांना न सांगताच अनेक मुली आपल्या प्रियकराकर विश्वास ठेवून पळून जातात. यातील अनेक प्रियकर त्यांना भूलथापा देऊन शहरात घेऊन जातात. चार-दोन महिने एकत्र राहतात, सूखाचे दिवस ओसरतातच. एक दिवस प्रियकर त्यांना एखाद्या कुंटणखान्यात विकून पोबारा करतो. अशाप्रकारे अनेक मुली या व्यवसायात ओढल्या जातात. तरूण मुलींचा अखंड पुरवठा सुरू असतो. आई-वडिलांचा विरोध डावलून आपल्या मर्जीने घर सोडून आल्यामुळे व परतीचे दोर कापले गेलेले असल्यामुळे अशा परिस्थितीत या मुली त्या व्यवसायात विवश होऊन अडकतात. या व्यवसायात एकही मुलगी अडकणार नाही याची काळजी घेणे ही खरतर सभ्य समाजाची जबाबदारी आहे. यात फक्त मुलींचा नव्हे तर मुलांच्या भविष्याचाही प्रश्न आहे, कितीतरी मूले

शिक्षणासाठी पैसे घेऊन आई-वडिलांचे पैसे यामागे उधळून टाकतात. आपल्या मुला-मुलींना पवित्र तारुण्य द्यायचे असेल तर हे व्यवसाय बंदच केले पाहिजे. 

’’मय ही नही मिलेगी साकी, 

तो पिलाओगे कहाँ से तुम?’’ 

परंतू असे होताना दिसत नाही. उलटपक्षी अडकलेल्या अशा असहाय महिलांना सन्मान देण्याचे निर्देश कोर्ट देते यापेक्षा दुसरे दुर्दैव ते कोणते? अनेक महिला विधवा झाल्यावर निराधार होतात. त्यांच्या पूनर्वसनाची कुठलीही विश्चासार्ह व्यवस्था नसल्यामुळे नाविलाजाने त्या या व्यवसायामध्ये ओढल्या जातात. अशा परिस्थितीत या महिला स्वतः च्या मर्जीने आल्या असा   अर्थ जर समाज काढत असेल तर ते त्या महिलेचे नव्हे तर समाजाचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

इस्लामला हा व्यवसाय मान्य नाही. तो या व्यवसायाचा निषेध करतो. वेश्याव्यवसाय थांबविण्याचे सोपे उपाय प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी चौदाशे पन्नास वर्षापूर्वीच सुचविलेले आहेत. ते म्हणजे समाजमध्ये मुला-मुलींचे लग्न वेळेवर व कमी खर्चात होईल याची व्यवस्था करणे. प्रेषित सल्ल. यांनी म्हटलेले आहे की, ‘‘सबसे बेहतरीन निकाह वो है जिसमें खर्च कम हो.’’ 

आज लग्न म्हणजे संकट असल्याचा भास मुलीच्या आई-वडिलांना होत आहे म्हणून कन्याभ्रृण हत्या करण्याची पद्धत रूढ झाली आहे. कायदा करुन सुद्धा ही पद्धत थांबवता आलेली नाही हे विशेष. प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दाखविलेला मार्ग म्हणजे वेळेवर व कमी खर्चात लग्न करण्याचा मार्ग. हा मार्ग अवलंबविला गेला तर सहज लग्नं होतील. त्यामुळे मुलींना प्रेमप्रकरणात पळायची व प्रियकराच्या भूलथापांना बळी पडण्याची वेळच येणार नाही आणि आई-वडिल्लाना सुद्धा त्रास होणार नाही.

एकदा असे झाले असे झाले की नवीन इस्लाम स्विकारलेल्या काही बदवी (ग्रामीण) मुस्लिमांच्या चर्चेदरम्यान असा प्रश्न उपस्थित झाला की कोणाचा कबिला श्रेष्ठ? त्यावर आपसात गरमागरम चर्चा होऊन प्रकरण हातगाईवर येऊ लागले. कोणालाच दुसऱ्या कबिल्याचे श्रेष्ठत्व मान्य नव्हते. तेव्हा त्यांच्यापैकी एकाने हा प्रश्न प्रेषित सल्ल. यांच्याकडे नेण्याचा सल्ला दिला. तेव्हा सर्वजण प्रेषित सल्ल. यांच्याकडे हजर झाले व आपले गाऱ्हाणे मांडले. तेव्हा प्रेषित सल्ल. उत्तरले, ’’ तुमच्यापैकी ज्या कबिल्यामध्ये विवाह जितका सोपा व व्याभिचार तितकाच कठीण असेल तो कबिला तितकाच श्रेष्ठ.’’ यावरूनसुद्धा सरळ सोप्या लग्नाचा सरळ संबंध वेश्याव्यवसायाशी असल्याचे स्पष्ट होते. लग्न महाग असेल तर ते होणार नाहीत आणि त्यातून व्याभिचार आणि त्या पुढचा अटळ असतो.  

येथे अगदी संक्षेप मध्ये इच्छिते की, इस्लाममध्ये विवाहची संकल्पना अशी आहे की मुलाने मुलीला बघून पसंत करावे व दोन वकील आणि गवाह (साक्षीदार) यांच्या समक्ष इजाब (मागणी) व कुबूल (स्वीकार) व्हावे मुलाने मुलीला महर अदा करावे व वलिमाची दावत ही मुलानेच करावी. मुलीच्या आईवडिलांवर दहेज, हुंडा व लग्नादिवशीची आलीशान मेजवानी हे सगळे इस्लाम मध्ये निषिद्ध आहे. परंतु वस्तुस्थिती या याउलट आहे. त्यामुळे लग्न अवघड होत चाललेत व वेश्याव्यवसाय फुलताहेत. आपण खराब झालेले जोवण आपल्या लेकरांना खाऊ घालत नाही. चांगल्या आणि वाईट पर्यायांपैकी आपण चांगला पर्याय

आपल्या लेकरांसाठी निवडणार. वेश्या ही पण कुणाचीतरी मुलगी, कुणाचीतरी बहीण असणार. आपण आपल्या मुलीसाठी हा व्यवसाय पसंत करणार का? किंवा आपला मुलगा ह्या वाम मार्गाला लागावा हे आपल्याला मान्य असेल का? मग समाजाची प्रतेक मुलगी आपलीच व मुलगाही आपलाच आहे असे समजून आपल्याला हा व्यवसाय बंद होईपर्यंत शांत बसायचे नाही, असा संकल्प करावा लागणार आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक ते सर्व प्रयत्न करावे लागतील. याशिवाय वेश्याव्यवसाय थांबवण्याचा एक उपाय म्हणजे पुनर्विवाह होय. समाजामध्ये तसाही पुरुषांचा मृत्यूदर महिलांपेक्षा जास्त असतो. त्यात कोरोनासारख्या महामारी नंतर तर तरुण विधवांची संख्या लक्षणीयरित्या वाढलेली आहे, अशा परिस्थितीत त्यांना सन्मानाने समाजात सामावून घेण्याचा उपाय म्हणजे पूर्नर्विवाह होय. पूनर्विवाहाला चुकीचे समजणे हीच एक मोठी चूक आहे.

याशिवाय एकापेक्षा जास्त लग्न करण्याचा सक्षम पुरूषांनी विचार करायला हवा. जेणेकरूनसमाजामध्ये अतिरिक्त ठरलेल्या महिलांचे समायोजन चांगल्या प्रकारे होऊ शकेल व त्यांना सन्मानाने जगण्याची संधी मिळेल. 

स्त्री सन्मानाचे हे प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी सुचविलेले उपाय हेच खरे उपाय आहेत, वेश्यांना खोटा सन्मान देणे हे उपाय नव्हे. याचा अर्थ असा नाही की ज्या महिला आज वेश्या व्यवसात आहेत त्यांचा सन्मान व्हायला नको. माझे मत असे आहे की सन्मानापेक्षा जास्त त्यांना पूनर्वसनाची गरज आहे. ते सरकारने करावे हा त्यांचा खरा सन्मान ठरेल. माझे स्वप्न आहे की ह्या जगातून वेश्या व्यवसाय संपावा, अल्लाहकडे प्रार्थना आहे की तो माझे हे स्वप्न माझ्या आयुष्यातच खरे झालेले बघण्याची संधी देवो व सगळ्यांना यासाठी प्रयत्न करण्याची सदबुद्धी देवो. (आमीन).

- डॉ. सिमीन शहापुरे


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget