Halloween Costume ideas 2015

लोकहो आरोग्य सांभाळा!

world health day

टू व्हिलर असो की फोर व्हिलर बाहेर जाताना जेव्हा आपण आपली गाडी काढतो तेव्हा सगळं तपासलं जातं. टायरमधली हवा, पेट्रोल, डिझेलचे प्रमाण इत्यादी का तर प्रवासात काही अडथळा येवू नये व प्रवास सुरळीत व्हावा म्हणून. परंतु , जीवनाच्या प्रवासात साथ देणाऱ्या शरीररूपी गाडीकडे आपला हलगर्जीपणा का?

आपण आपल्या जीवनात महत्त्वाच्या गोष्टींचे नियोजन करत असतो. जीवनाच्या विविध टप्प्यांमध्ये विविध प्रकारच्या चिंतेनेग्रस्त असतो. लहानमुलांना शाळेच्या अभ्यासाची चिंता, कॉलेजमध्ये गेले की करिअरची चिंता, मग जॉब, बिझनेसची चिंता, नंतर लग्नाची चिंता, लग्न झाल्यास मुला-बाळांची चिंता पुढे त्यांचे, शिक्षण, पालनपोषणाची चिंता. वगैरे या सर्व गोष्टींची चिंता पूर्वनियोजन करण्यात राहून जाते. ती म्हणजे आपल्या आरोग्याची चिंता, आरोग्याचे नियोजन.

चांगले शरीर असे पर्यंत आपण आरोग्याची चिंता करत नाही किंवा आपल्याला काही काळजी वाटत नाही. खूप कमी लोक आपल्या शरीराची निरोगी असताना काळजी घेत असतात. किंबहुना अधिक लोक तर दुर्लक्षच करतात. काही नागरिक इन्शुरन्स (विमा) काढून ठेवतात आणि मोकळे होतात. व्यायाम, वॉकिंग, वर्क आऊटला सुरूवात होते ती रोग जडल्यानंतर. स्थुलता वाढल्यानंतर. वजन खूप वाढल्यानंतरच शुगर, बीपी, हार्टअटॅक आल्यानंतरच. तोपर्यंत शरीरला इजा झालेली असते. 

निरोगी असतानाच जर काय आपण आपल्या शरीराची काळजी घेतली, तर रोग होण्याची शक्यता कमी असते. मला बघून व ऐकून खूप आनंद होतो. जेव्हा साठी पार केलेले माणे पेशंटस सांगतात की त्यांना शुगर, बी.पी., अ‍ॅस्टिडीटी सांध्यांचे आजार इ. काहीच नाही तेव्हा मी हमखास त्यांना त्यांच्या आरोग्याचे राज विचारते आणि नेहमी संतुलीत आहार व नियमित व्यायाम या दोन गोष्टी आढळतात. 

रोग म्हणजे काय आणि आरोग्य कसे जपावे याबद्दल काही माहिती. 

रोग : 

रोग म्हणजे शरीर क्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीराच्या महत्त्वाच्या जैविक कार्यांमध्ये अडथळा आणणारी स्थिती होय. शरीरक्रियात्मक म्हणजे शरीराच्या कार्यामध्ये बिगाड होणे. 

उदा. पचनक्रियेत, रक्ताभिसरण संस्थेत, किडनीच्या क्रियेत वगैरे बिघाड होणे. आंतरे इंद्रीयात बिघाड होते. मानसशास्त्रीयरित्या म्हणजे मेंदूच्या कार्यात बिघाड व मनाचा समतोल ढासळणे. आरोग्य म्हणजे नुसतं शारीरिकपणे चांगले असणेच नव्हे तर आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक संतुलनाची स्थिती होय. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसीकदृष्ट्या सक्षम असते ती आरोग्य संपन्न मानली जाते. आरोग्य हीच खरी संपत्ती. हेल्थ इज वेल्थ. हा सुविचार आपल्याला माहित असणार. आरोग्याला संपत्ती का म्हटले आहे? आरोग्य उत्तम असले तरच माणूस कार्यक्षम. दैनंदीन काम करून संपत्ती मिळवू शकतो. 

आरोग्य चांगले तर आयुष्य सहज आणि सोपे होते. वेळेवर भूक लागते, झोप येते, ताजेतवाने वाटते. याउलट रोगीट माणसाला भूक लागत नाही. झोप येत नाही, चिडचिडपणा होतो, कामात रस राहत नाही. साथीच्या रोगांत ताप, अंग दुखणे, मळमळ, उलट्या, डोकं दुखणे, सारखं पडून राहणे अशी लक्षण असतात. 

कालावधीनुसार रोगांचे दोन प्रकार असतात. 

1. तीव्र रोग (अ‍ॅक्युट डिसीज) 3 दिवस ते आठवड्यामध्ये बरे होणारे रोग. उदा. फ्लू, व्हायरल फिव्हर.

2. दीर्घकालीन रोग (क्रॉनिक डिसीज) - अस्थमा (दमा), किडनी फेल्यूर, पाईल्स इत्यादी. कारणांनुसार : 1. आनुवंशिक रोग उदा. डाऊन संलक्षण. 

2. संसर्गजन्य रोग : (पसरणारे रोग) : उदा. सर्दी, वायरसमुळे होणारे आजार (कांजण्या, डोळे येणे, गोवर, कोरोना, टी.बी. डेंग्यू इत्यादी.).

3. असंसर्गजन्य (न पसरणारे रोग) : उदा. मधुमेह, हृदयविकार, केसर इत्यादी काही विशिष्ट कारणांमुळे शरीरातच उद्भवतात व या रोगांपासून इतर व्यक्तींना काही धोका नसतो. 

निरोगी राहण्यासाठी काही उपाय : 

1. स्वच्छतेची काळजी घेणे, घर, परिसर स्वच्छ ठेवणे. 

2. जेवण्याअगोदर, नंतर, वॉशरूमला जावून आल्यास व बाहेरून आल्यास हात साबणाने धुणे.   3. स्वच्छ पाण्याचा वापर करणे, पाणी उकळून थंड करून पिणे, टायफॉईड, कॉलेरा, अतिसार सारखे आजार दुषित पाणी पिल्यानेच होतात. एकदा जर टाईफॉईड झाला तर पुन्हा-पुन्हा होण्याची शक्यता असते. जेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती कमी पडत असते, पाणी उकळून पिणे हेच त्यावर योग्य उपाय. 

4. भरपूर पाणी पिणे, दिवसांतून 8-10 ग्लास, कमी पाणी पिल्याने किडनी निकामी होऊ शकतात. 

5. पौष्टिक आहाराचे सेवन करणं अत्यंत आवश्यक आहे. 

6. जास्त मीठ असणारे पदार्थ कमी प्रमाणात घ्या. 

7. जास्त साखर असणारे पदार्थ ही कमी प्रमाणात घेणे. 

8. जंक फूड : उदा. वडापाव, पिझ्झा, बर्गर टाळणे.

9. गरजेपेक्षा जास्त खाणे टाळा.

10. जेवणात प्रोटिनयुक्त पदार्थांचा समावेश करा. 

11. दररोज व्यायाम करणे व शांत झोप.

जगभरात 7 एप्रिल हा ’’जागतिक आरोग्य दिवस’’ म्हणून साजरा केला जातो.  73 वर्षापूर्वी याच दिवशी 7 एप्रिल 1948 रोजी ’जागतिक आरोग्य संघटना म्हणजे (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, (डब्ल्यूएचओ)’ या संघटनेची स्थापना  झाली होती. जिनेव्हा स्वित्झरलँड येथे 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येवून सोडविणे यावर एकमत झाले. विभिन्न वंशाच्या समस्या वेगळ्या अस वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यानंतर 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनात आरोग्य दिवस साजरा करण्यास सुरूवात झाली. 

गेल्या सात दशकांत सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रातील सुधारणांमध्ये डब्ल्यूएचचाही वाटा आहे. कुठल्याही नव्या आजाराची माहिती मिळवणं आणि ती लोकापर्यंत पोहोचविणं, आजारांच्या साथी पसरत असतील तर त्या विषयी देशांना सावध करणे. जवळपास 193 देश याचे सदस्य आहेत. त्यात आपल्या भारताचाही समावेश आहे. लस आणि उपचारांविषयी संशोधन आरोग्यासाठी निधी जमा करणे आणि ती गरज असेल तेथे पोहोचवणं अशी   कामं ही संघटना करते. 

डब्ल्यूएचओ च्या प्रयत्नांमुळे स्मॉलपॉक्स (देवीरोग) रोगाचे उच्चाटन (इराडिकेशन), पोलिओसारख्या रोगांवर नियंत्रण शक्य झाले. सध्या जगभरात कोरोनाने हाहाकार उडवला आहे. त्यासाठी जागतिक आरोग्य संघटना यावर काम करीत आहे. जेव्हा अशा प्रकारचे आजार संपूर्ण जगभरात पसरतात तेव्हा जागतिक आरोग्य संघटना महत्त्वाची भूमिका बजावत असते. मागच्या वर्षी सपोर्ट नर्सेस आणि मिडवाईव्हस अशी थीम होती. कारण कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. यंदा गरीब लोकांनाही आरोग्य सेवा चांगल्या मिळावेत म्हणून बिल्डींग ए फेअर हेल्दी वर्ल्ड ही थीम देण्यात आली आहे.  भारत सरकार तर्फे आयुष्यमान भारत हा उपक्रम चालविण्यात येतो. 

- डॉ. सीमीन शहापूरे 

8788327935

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget