2 एप्रिल 2022 रोजी संध्याकाळी राजस्थानच्या करोलीमध्ये हिंदू नववर्षानिमित्त एक शोभायात्रा काढली होती. ज्या दरम्यान, जातीय दंगल भडकली. राजस्थानचे पोलीस महासंचालक मोहनलाल लाठेर यांनी प्रेसला दिलेल्या माहितीनुसार ’’दंगलीचे कारण रॅली दरम्यान, लावण्यात आलेल्या आपत्तीजनक घोषणा होत्या.’’
मुळात ही रॅली मुस्लिम बहुल इलाक्यामधून मोटर सायकलला जाण्याची परवानगीच का देण्यात आली आणि विना परवानगी रॅली त्या भागात केली तर पोलीस काय करत होते? इत्यादी प्रश्नाचे उत्तर पोलीस महासंचालकांनी दिलेले नाही. या घटनेचे व्हिडीओ एव्हाना सर्वत्र व्हायरल झालेले आहेत. त्यात स्पष्ट दिसून येते की, अगोदर मुस्लिम
धर्मियांच्या दुकानांची ओळख पटविली गेली आणि त्यानंतर त्यांना पेटवून देण्यात आले. मुख्य बाजारातील 60 पेक्षा जास्त अल्पसंख्यांकांच्या दुकानांना पेटवून देण्यात आले. जे आगीत अक्षरशः भस्म झाले. अनेक लोक भाजून जखमी झाले. याच बाजारातील जनरल स्टोअर चालविणारे संजय गुप्ता यांनी सांगितले की, आम्ही आमच्या दुकानात होतो.रॅली हाटवडा मार्केटकडे गेली आणि अचानक पळापळ सुरू झाली. आम्ही सर्व पटापट दुकाने बंद केली.मला शंका आहे हा सर्व काही नियोजित घटनाक्रम होता.
’’ संजय गुप्तांचे दुकान जसेच्या तसे आहे. परंतु, त्यांच्या समोरील एका अल्पसंख्यांक बांगडी विक्रेत्याचे दुकान जळून भस्म झाले. प्रत्यक्ष दर्शींच्या मते मोहल्ल्यातून रॅलीवर दगडफेक करण्यात आली. हे जरी खरे आहे असे ग्रहित धरले तरी मुळात रॅली त्या भागात गेलीच कशी आणि त्यात सामील लोकांनी प्रक्षोभक घोषणा दिल्याच कशा, यावर कोणीही चकार शब्द काढत नाही. बांगडी बाजारमधील जफरच्या अनेक दुकाने आहेत. त्या सर्व जाळून टाकण्यात आल्या. मुस्लिम समाजाच्या दुकाणांना चिटकून असलेले काही हिंदू बांधवांची दुकानेही या आगीत जळून भस्म झाली. त्यात हेमंत अग्रवाल या स्टोअर चालकाचे दुकानही भस्म झाले. त्यात त्याचे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे हे सर्व काँग्रेस शासीत झाले. याचे आश्चर्य वाटते.
Post a Comment