इचलकरंजी (अशफाक पठाण)
महापूराचे संकट टळले असले तरी घरात, परिसरात पसरलेली दुर्गंधी, साफसफाई व स्वच्छतेची समस्या सर्वात मोठी समस्या आहे. या अडचणीत विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, संघटना धावून आल्या आहेत. त्याच पध्दतीने इचलकरंजीतील समस्त मुस्लिम बांधवांनीही शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिम राबवत सामाजिक बांधिलकी व बंधुता जोपासली. विशेष म्हणजे जाती-पातीच्या भिंती तोडून टाकत नदीवेस नाका परिसरातील मरगुबाई मंदिराची संपूर्ण साफसफाई व स्वच्छता केली.
शहर आणि परिसरात गत चार आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावभाग आणि मळेभागातील संपूर्ण नागरी वस्ती पूराच्या पाण्याखाली गेली होती. तब्बल सात दिवस अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी राहिले होते. आता पूर ओसरु लागला असून संपूर्ण परिसर आणि घरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. घरातील प्रापंचिक साहित्याची वाताहात झाली आहे. त्यामुळे सर्वांसमोर स्वच्छता आणि साफसफाईचे आव्हान उभे ठाकले आहे. ही समस्या आणि अडचणी जाणून घेत शुक्रवारी इचलकरंजीतील समस्त मुस्लिम समाजाने याकामी पुढाकार घेत 2 हजार स्वयंसेवकांसह विविध भागात स्वच्छता मोहिम राबविली.
2 हजार स्वयंसेवकांची विविध टीममध्ये विभागणी करुन त्यांना भाग वाटून देण्यात आले. यामध्ये 10 ट्रॅक्टर-ट्रॉली, 2 जेसीबींचा समावेश होता. प्रथमत: नदीवेस नाका परिसरातील मरगुबाई मंदिराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर पि. बा. पाटील मळा, महासत्ता चौक ते शिक्षक कॉलनी (आमराई रोड), बौध्दविहार, मख्तुम दर्गा, महादेव मंदिर परिसर, सिकंदर दर्गा परिसर, आंबी गल्ली, शेळके मळा, जामदार गल्ली आदी भागात मोहिम राबविली गेली. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील नवीन व जुन्या पुलाचीही स्वच्छता करण्यात आली. दोन्ही पुलावर मोठ्या प्रमाणात जमलेला कचरा हटवून हे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी खुले करण्यात आले. त्याचबरोबर चंदूर गावातही 200 स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबवत नागरिकांना सहकार्य केले. या मोहिमेला आमदार सुरेश हाळवणकर यांनी भेट देऊन पाहणी केली. सुरु असलेल्या कामाबद्दल व मुस्लिम समाजाने दिलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. या कामी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, आरोग्य सभापती सौ. संगिता आलासे, आरोग्य निरिक्षक विजय पाटील व प्रशासनाचे सहकार्य लाभले.
महापूराचे संकट टळले असले तरी घरात, परिसरात पसरलेली दुर्गंधी, साफसफाई व स्वच्छतेची समस्या सर्वात मोठी समस्या आहे. या अडचणीत विविध सेवाभावी, सामाजिक संस्था, संघटना धावून आल्या आहेत. त्याच पध्दतीने इचलकरंजीतील समस्त मुस्लिम बांधवांनीही शहरातील विविध भागात स्वच्छता मोहिम राबवत सामाजिक बांधिलकी व बंधुता जोपासली. विशेष म्हणजे जाती-पातीच्या भिंती तोडून टाकत नदीवेस नाका परिसरातील मरगुबाई मंदिराची संपूर्ण साफसफाई व स्वच्छता केली.
शहर आणि परिसरात गत चार आठवड्यापासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने गावभाग आणि मळेभागातील संपूर्ण नागरी वस्ती पूराच्या पाण्याखाली गेली होती. तब्बल सात दिवस अनेक नागरी वस्त्यांमध्ये पाणी राहिले होते. आता पूर ओसरु लागला असून संपूर्ण परिसर आणि घरामध्ये दुर्गंधी पसरली आहे. घरातील प्रापंचिक साहित्याची वाताहात झाली आहे. त्यामुळे सर्वांसमोर स्वच्छता आणि साफसफाईचे आव्हान उभे ठाकले आहे. ही समस्या आणि अडचणी जाणून घेत शुक्रवारी इचलकरंजीतील समस्त मुस्लिम समाजाने याकामी पुढाकार घेत 2 हजार स्वयंसेवकांसह विविध भागात स्वच्छता मोहिम राबविली.
2 हजार स्वयंसेवकांची विविध टीममध्ये विभागणी करुन त्यांना भाग वाटून देण्यात आले. यामध्ये 10 ट्रॅक्टर-ट्रॉली, 2 जेसीबींचा समावेश होता. प्रथमत: नदीवेस नाका परिसरातील मरगुबाई मंदिराची साफसफाई व स्वच्छता करण्यात आली. त्याचबरोबर पि. बा. पाटील मळा, महासत्ता चौक ते शिक्षक कॉलनी (आमराई रोड), बौध्दविहार, मख्तुम दर्गा, महादेव मंदिर परिसर, सिकंदर दर्गा परिसर, आंबी गल्ली, शेळके मळा, जामदार गल्ली आदी भागात मोहिम राबविली गेली. त्याचबरोबर पंचगंगा नदीवरील नवीन व जुन्या पुलाचीही स्वच्छता करण्यात आली. दोन्ही पुलावर मोठ्या प्रमाणात जमलेला कचरा हटवून हे दोन्ही मार्ग वाहतूकीसाठी खुले करण्यात आले. त्याचबरोबर चंदूर गावातही 200 स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहिम राबवत नागरिकांना सहकार्य केले. या मोहिमेला आमदार सुरेश हाळवणकर यांनी भेट देऊन पाहणी केली. सुरु असलेल्या कामाबद्दल व मुस्लिम समाजाने दिलेल्या सहकार्याबद्दल कौतुक केले. या कामी अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे, आरोग्य सभापती सौ. संगिता आलासे, आरोग्य निरिक्षक विजय पाटील व प्रशासनाचे सहकार्य लाभले.
Post a Comment