Halloween Costume ideas 2015

नावात काय ठेवलंय? फार काही

- राम पुनियानी
अलिकडे अनेक दलित संघटना, उत्तर प्रदेश सरकारद्वारे त्यांच्या अधिकारिक अभिलिखानमध्ये भिमराव आंबेडकर नावासमोर रामजी शब्द जोडण्याचा विरोध करीत आहेत. ही गोष्ट खरी आहे की, संविधान समितीच्या अध्यक्षाच्या रूपात डॉ. आंबेडकरांनी , तयार झालेल्या संविधानाच्या प्रतीवर केलेल्या सहीत भिमराव रामजी आंबेडकर असे लिहिलेले होते. परंतु, साधारणपणे त्यांचे नाव लिहितांना रामजी हा शब्द लिहिला जात नाही. तांत्रिकदृष्ट्या उत्तरप्रदेश सरकारच्या या निर्णयाला आव्हान दिले जाऊ शकत नाही. परंतु, हे ही म्हणणे चुकीचे नाही की, हा निर्णय आंबेडकरांना ’आपला’ घोषित करणार्या हिंदूत्ववादी राजकारणाचा हा एक भाग आहे. भाजपासाठी भगवान राम तारणहार आहेत. त्यांच्या नावाचा उपयोग करून भाजपाने समाजाला धार्मिक आधारावर धु्रवीकृत केले. मग तो राम मंदिरचा मुद्दा असेल, राम सेतूचा किंवा मग रामनवमीच्या पूर्वसंध्येला जाणून बुजून घडवून आणलेली हिंसा असेल. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आपण भारतामध्ये दोन विरोधाभासी प्रवृत्तींचा उत्कर्ष होताना पाहतो. एकीकडे दलितांविरूद्ध अत्याचार वाढलेले आहेत. दुसरीकडे आंबेडकर जयंती उत्सव अधिकाधिक ताकदीने साजरे केल्या जात आहेत आणि हिंदू राष्ट्रवादी एकसारखे आंबेडकरांचे स्तुतीगान करीत आहेत. 
या सरकारच्या गेल्या चार वर्षाच्या कार्यकाळात आपण दलितांवर झालेल्या अत्याचाराची अनेक उदाहरणे पाहिलेली आहेत. आय.आय.टी. मद्रास मध्ये पेरियार स्टडीसर्कलवर सर्वात अगोदर प्रतिबंध लावला गेला. रोहित वेमुला याची संस्थागत हत्या झाली. गुजरातच्या उना मध्ये दलितांवर घोर अत्याचार केले गेले. मे 2017 मध्ये जेव्हा योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाले तेव्हा सहारणपूरमध्ये हिंसा भडकाविली गेली आणि त्यात मोठ्या संख्येत दलितांची घरे जाळली गेली. दलित नेता चंद्रशेखर रावणला जमानत मिळाल्यानंतरही अद्याप तो जेलमध्ये आहे. कारण त्याच्यावर आरोप आहे की, त्यांनी ती हिंसा भडकाविली. दलितांची घरे जाळण्याची घटना भाजपा खासदाराच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मिरवणुकीनंतर झाली. ज्या मिरवणुकीत, ” यु.पी. में रहेना होगा तो योगी-योगी कहेना होगा” व ’ जय श्री राम’ हे नारे आक्रमक स्वरूपात लावले गेले. महाराष्ट्रातील भीमा-कोरेगावमध्ये दलितांविरूद्ध हिंसा भडकविली गेली. यासंबंधी प्रकाश आंबेडकर यांचे म्हणणे रास्त आहे की, हिंसा भडकाविणार्या मुख्य कर्ता-धर्ता भिडे गुरूजीला अजून अटक झालेली नाही. केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेल्या व्ही.के. सिंग यांनी 2016 मध्ये दलितांची तुलना कुत्र्यांशी केली होती व अलिकडेच एक अन्य केंद्रीयमंत्री अनंतकुमार हेगडे यांनीही असेच म्हटलेले आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरला जेव्हा योगी आदित्यनाथ मुशहर जातीच्या लोकांच्या भेटीला जात होते तेव्हा त्यांच्या भेटीपूर्वी स्थानिक अधिकार्यांनी दलितांमध्ये साबनाच्या वड्या आणि शॅम्पू वाटप केले जेणेकरून ते अंगोळ-पाणी करून स्वच्छ राहतील! 
मोदी-योगी पद्धतीच्या राजकारणाच्या मुळाशी असलेले तत्वज्ञान, निवडणुकांमध्ये आपले हित साध्य करण्याच्या आतुरतेमुळे हे सगळे घडत आहे. खरे पाहता योगी-मोदी आणि आंबेडकर यांच्या मुल्यांमध्ये मुलभूत फरक आहे. आंबेडकर भारतीय राष्ट्रवादाचे पक्षधर होते आणि जाती व्यवस्थेचे उन्मूलन करू पाहत होते. त्यांचा असा विश्वास होता की, जाती आणि अस्पृश्यतेची मूळे हिंदू धर्मग्रंथात आहेत. त्याच मुल्यांना नकारण्यासाठी आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले. त्यांनी भारतीय संविधानाचे निर्माण केले, जे स्वाधिनता संग्रामाच्या वैश्विक मुल्यांवर आधारित होते. भारतीय संविधानाचा मूळ आधार स्वातंत्र्य, समता व बंधुत्व व सामाजिक न्याय ही मुल्य होत. दूसरीकडे हिंदू महासभा सारखी संस्था होती. जिचा पाया हिंदू राजा आणि हिंदू जमीनदारांनी मिळून रचला होता आणि हे लोक भारताला त्याच्या गौरवशाली भूतकाळात परत घेऊन जाण्याची भाषा बोलत होते. त्या भूतकाळात जेथे वर्ण आणि जातींना ईश्वरकृत समजले व मानले जात होते. हिंदुत्ववादी राजकारणाचे अंतिम उद्देश आर्यवंश आणि ब्राह्मणी संस्कृतीवर आधारित हिंदू राष्ट्राचे निर्माण आहे. संघ याच राजकारणाचा पक्षधर आहे. 
माधव सदाशिव गोळवलकर व अन्य हिंदू चिंतकांनी आंबेडकरांच्या विपरीत हिंदू धर्मग्रंथांना मान्यता दिली. सावरकरांचे म्हणणे होते की मनुस्मृती हाच हिंदूंचा कायदा आहे. गोळवलकर यांनी मनुला जगाचा सर्वश्रेष्ठ विधीनिर्माता म्हणून निरूपित केले होते. त्यांचे म्हणणे असे होते की आणि जे पुरूष सुक्तामध्ये म्हटलेले आहे की, सूर्य आणि चंद्र ब्रह्माचे डोळे आहेत आणि सृष्टीची निर्मिती त्याच्या नाभीतून झालेली आहे. ब्राह्मण हे ब्रह्माच्या डोक्यातून उपजले, हातातून क्षत्रीय, जांगेतून वैश्य आणि पायातून शुद्र. याचा अर्थ असा की, ते लोक जे या चार स्तरांमध्ये विभाजित आहे तेच हिंदू आहेत. 
भारतीय राज्यघटना लागू झाल्यानंतर संघाच्या मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये एक संपादकीय लिहून राज्यघटनेची घोर निंदा केली गेली होती. संघ अनेक वर्षांपासून म्हणत आलेला आहे की, भारतीय राज्यघटनेमध्ये अमुलाग्र परिवर्तनाची गरज आहे. अलिकडेच केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी याच बाबीची पुनरावृत्ती केली होती. डॉ.आंबेडकरांनी जेव्हा संसदेमध्ये हिंदू कोडबिल सादर केले होते तेव्हा त्या बिलाचा जबरदस्त विरोध झाला होता. दक्षीणपंथी शक्तींनी आंबेडकरांची घोर निंदा केली होती. परंतु, आंबेडकर आपल्या म्हणण्यावर ठाम राहिले. ते म्हणाले, ” तुम्हाला फक्त शास्त्रांचाच नव्हे तर शास्त्राधारित सत्तेलाही नाकारावे लागेल. जसे की, गुरूनानक आणि गौतम बुद्धांनी नाकारले होते. तुमच्यामध्ये एवढे धाडस असायला हवे की तुम्ही हिंदूंना हे समजावून सांगू शकाल की, त्याच्यात जे काही चुकीचे आहे तोच त्यांचा धर्म आहे. तोच धर्म ज्याने जातीच्या पावित्र्याच्या धारणेला जन्म दिला आहे. ”
आज काय चालले आहे? आज प्रत्यक्षात जातीप्रथेला औचित्यपूर्ण ठरविले जात आहे. भारतीय इतिहास अनुसंधान परीषदेचे अध्यक्ष वाय.सुदर्शन यांनी अलिकडेच म्हटले होते की, इतिहासामध्ये जातीप्रथेविरूद्ध कधीच कोणी तक्रार केलेली नाही आणि याच प्रथेने हिंदू समाजाला स्थायीत्व दिलेले आहे. एस.सी.एस.टी. अत्याचार निवारण कायद्याला कमकुवत करणे आणि विद्यापीठांमधून या व ओबीसी वर्गातील पदांमधील आरक्षण संबंधी नियम बदलून टाकणे या गोष्टी सामाजिक न्याय तत्त्वावर आणि डॉ. आंबेडकरांवर केलेला सरळ हल्ला आहे. 
जशी-जशी हिंदू राष्ट्रवादाची आवाज बुलंद होवू लागलेली आहे. त्या समक्ष ही समस्याही उत्पन्न होत आहे की, ते दलितांच्या सामाजिक न्याय हस्तगत करण्याच्या महत्त्वकांक्षेला तोंड कसे द्यायचे. हिंदू राष्ट्रवादी राजकारण, जातीय आणि लैंगिक पदक्रमावर आधारित आहे. या पदक्रमाचे समर्थन आरएसएसचे चिंतक व संघ परिवारातील नेते करत आलेले आहेत. त्यांच्यासमोर प्रश्न हा आहे की, ते दलितांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करू इच्छित नाहीत. परंतु, त्यांना निवडणुकीमध्ये त्यांची मत हवी असतात. म्हणूनच ते एकीकडे दलितांचे नायक बाबासाहेब आंबेडकर यांना आपला सिद्ध करण्याचा भरपूर प्रयत्न करतात तर दुसरीकडे दलितांना आपल्या झेंड्याखाली गोळा करण्याच्या प्रयत्नात लागलेले आहेत. त्यांची इच्छा आहे की, दलित, भगवान राम आणि पवित्र गायीवर आधारित त्यांच्या कार्यक्रमाला स्विकार द्यावा. 
हा एक विचित्र कार्यकाळ आहे. ज्यात एकीकडे त्या सिद्धांतांची आणि मुल्यांची अवहेलना केली जात आहे. ज्यांच्यासाठी डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर संघर्ष केला आणि दुसरीकडे त्यांची अभ्यर्थनाही होत आहे. अलिकडे तर आंबेडकरांच्या नावाचा उपयोग हिंदूत्ववादी लोक श्री रामच्या आपल्या राजकारणाला गती देण्यासाठीही करू इच्छित आहेत. (इंग्रजीतून हिंदीत भाषांत अमरिश हरदेनिया, हिंदीतून मराठी भाषांतर एम.आय. शेख, बशीर शेख)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget