Halloween Costume ideas 2015

डॉ. बाबासाहेब समताकाशातील प्रज्ञासूर्य

- प्रा. आरिफ ताजुद्दीन शेख, औरंगाबाद
डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र. समतेचा लढा व्यापक पायावर उभा करण्याची भूमिका आंबेडकरांनी घेतली व सामाजिक आर्थिक समता प्रस्थापित करण्यावर भर दिला. अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला श्रेष्ठ विद्वान हजारो वर्षांपासून चालत आलेल्या समाजव्यवस्थेविरूद्ध लोकशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी बंडाचा झेंडा उभारला. समतेचा हक्क हा पवित्र आहे व तो अबाधित व अभेद्य असला पाहिजे. समाजातील तळागाळातील माणूस समतेच्या तत्त्वाने आत्मगौरवाने उभा राहू शकतो. समताकाशातील प्रज्ञासूर्याने भारतीय समाजाला झालेला जातिभेदाचा वॅâन्सर फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीने या रोगावर उपचार केला. त्यांच्या उपचारात्मक दृष्टीचा लाभ आजही देशाला होऊ शकतो.
प्रारंभीच्या काळापासून बाबासाहेबांचेया लेखनत इस्लाम आणि मुस्लिम समाजासंबंधी संदर्भ येतात. बहिष्कृत हितकारणी सभेचे मुखपत्र असलेल्या ‘बहिष्कृत भारत’ या आपल्या वृत्तपत्रात आंबेडकरांनी महाराष्ट्रातील समाजसुधारक लोकहितवादी यांची इस्लामवरील लेखमाला छापली होती. आंबेडकर जर इस्लामविरोधी आणि मुस्लिमविरोधी असते, तर महत्प्रयासाने सुरू केलेल्या आपल्या वृत्तपत्रातील महत्त्वाची जागा त्यांनी इस्लामसारख्या विषयावर खर्च केली नसती. इस्लाममधील समतावादी तत्त्वांमुळे आंबेडकर प्रभावित झाले होते. इस्लाममधील दृढ ऐक्याच्या भावनेची त्यांनी नेहमीच स्तुती केली आहे. मुस्लिम समुदायातील एकसंघतेमुळे ते भारावून गेले होते. याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणातून येतो.
बाबासाहेब इस्लाममधील समतावादी तत्त्वामुळे प्रभावित झाले आणि बार्शी जि. सोलापूर येथे भरलेल्या मुंबई प्रांतिक बहिष्कृत परिषदेत मे १९२४ मध्ये ते म्हणतात, ‘‘माझी कात्री आहे की, जर आपण आज धर्मत्याग केला आणि केलाच आहे तर  त्याऐवजी माझ्या मते महंमदी धर्म स्वीकारणे बरे.’’ हिंदू धर्माच्या तुलनेत बाबासाहेबांना ‘इस्लाम’ धर्म हा निश्चितच चांगला वाटत होता. कालांतराने त्यांचा हा विचार बदलला आणि बौद्ध धम्माचा अंगीकार केला. याचा अर्थ ‘इस्लाम’ हा निश्चित चांगला वाटत होता. ‘इस्लाम’ धर्माच्या ते विरोधी नव्हते. इस्लामच्या अनुयायांकडून मूळ इस्लाम बिघडवून टाकला गेला याची त्यांना खंत वाटत होती. ते मुस्लिम नेत्यांवर नाराज होते. इस्लामवर नाराज नव्हते. त्यामुळे धर्मावलंबन किती महत्त्वाचे असते याकडे लक्ष देता येते. धर्मांतर करण्याची इच्छा असल्यास इस्लामचा स्वीकार करा, असे आग्रही प्रतिपादन त्यांनी ‘बहिष्कृत भारत’ मधून केले होते. (१५ मार्च १९२९)
जोपर्यंत समाजातील तळागाळातील माणूस आत्मगौरवाने उभा राहात नाही तोपर्यंत हा देश उभा राहाणार नाही. केवळ थोर पुरुषामुळे देश मोठा होत नसतो. देश मोठा होण्यासाठी आपल्याला व शासनाला प्रयत्न करावे लागतील. याचे श्रेय जनतेला व शासनाला जाईल. आपल्या राष्ट्राविषयी प्रत्येक व्यक्तीच्या मनात पराकोटीचे प्रेम असायला हवे. राष्ट्राची जर उभारणी करावयाची असेल तर सर्वांत मोठे काम कोणते असेल तर त्यांनी समाजातील सर्वांना समान दर्जा देण्यावर भर दिला.
सामाजिक समता स्थापन करण्यासाठी भारतीय समाज व्यवस्थेचा फार गंभीरपणे आणि अत्यंत सखोलपणे बाबासाहेबांनी विचार केल्याचे लक्षात येते. समाजात बंधुभाव असणे महत्त्वाचे आहे. बंधुभावाचे तत्त्व नसेल तर समाज दुभंगलेलाच राहणार आणि त्यामुळे राष्ट्र दुर्बल राहणार. जर आपल्याला प्रगती करावयाची असेल तर मला असे वाटते सर्व धर्मांतील लोकांनी गुण्यागोविंदाने राहावे आणि देशाच्या विकासाला हातभार लावावा. कारण बंधुभाव हा काही किराणा दुकानात मिळत नाही किंवा कायद्याने देता येत नाही. तर तो आपापल्या चांगल्या आचरणातून निर्माण होत असतो. जेव्हा राज्यघटना अंतिमत: तयार झाली तेव्हा जी उद्देशिका निर्माण झाली, त्यात बंधुभाव हा शब्द बाबासाहेबांनी योजेलला आहे. स्वातंत्र्य, समता यांच्या रक्षणाची हमी बंधुभावाची मानसिकता देऊ शकते. की मानसिकता आपल्याला बाबासाहेबांच्या समतावादी विचारसरणीतून मिळू शकते.
विषमता, अन्याय, जातिभेद याविरूद्ध लढण्यासाठी ‘भीमा’ची गदा सदैव सिद्ध असे आणि आंबेडकर म्हणजे विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र, असे उद्गार आचार्य अत्रे यांनी त्यांच्या लढ्याविषयी काढले आहेत. राजकारण हे बाबासाहेबांच्या आवडीचे क्षेत्र नव्हते. केवळ दलित बांधवांच्या उत्थानासाठी ते त्यात पडले. त्यांचा मूळ पिंड अभ्यासकाचा. इतक्या हुशार, तल्लख, विद्वानाला परदेशात राहून खूप धनदौलत जमविता आली असती. पण बाबासाहेबांनी तो मार्ग स्वीकारला नाही. आपल्या असंख्य पीडित बांधवांची प्रगती त्यांना साधायची होती. त्यांच्यात माणूस म्हणून जगण्याची क्षीण झालेली अवस्था व पात्रता निर्माण करायची होती. बाबासाहेबांनी संघर्ष करण्याचा व आपल्या बांधवांकडून करवून घेण्याचा निश्चय केला. हा संघर्ष होता जातिव्यवस्थेविरूद्ध. हा संघर्ष होता दुष्ट क्रूर वागणुकीविरूद्ध, हा संघर्ष होता न्याय्य हक्क मिळविण्याचा. समाजातील पुनर्रचना करण्यासाठी त्यांनी जुन्या अमानुष परंपरा व रुढी यावर प्रखर प्रहार केले आणि समाजाची झोपमोड करून त्याला गदागदा हलविले. सामाजिक न्याय व समतेवर त्यांनी भर दिला होता. हे करण्यासाठी बाबासाहेबांनी प्रभावी भाषणे, परखड वृत्तपत्रीय लिखाण लोकांत शिक्षणाचा प्रसार इत्यादी मार्ग कार्यतत्परतेने चोखंदळले. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी निरनिराळ्या चळवळी केल्या. त्यात महाडच्या चवदार तळ्याचा सत्यागृह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश इत्यादींमुळे समाजपुरुषाची झोपमोड करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
२० जुलै १९४२ रोजी समता सैनिक दलाची परिषद भरली. ७० हजारांहून अधिक भोत्तäयांनी त्यात हजेरी लावली होती. या परिषदेत जे आंबेडकरांचे स्वागत करून त्यांना मानपत्र दिले गेले याप्रसंगी समता सैनिक दलाच्या समूहापुढे केलेल्या भाषणात आंबेडकर म्हणतात, ‘‘माझा स्वत:चाही अहिंसेवर विश्वास आहे; पण अहिंसा व नेभळटपणा यात मी फरक करतो. नेभळटपणा हा दुबळेपणा असतो आणि स्वेच्छेने लादलेला दुबळेपणा हा काही सद्गुण म्हणता येणआर नाही... तुम्ही कोणत्याही टीकेला घाबरू नका. कोणालाही उगाच दुखापत करू नका. ज्याला तुमची मदत लागेल त्यालाच ती करीत चला. यातूनच तुम्ही लोकांची मोठीच सेवा करू शकाल... गुंडांनी बायकांना पळवून नेल्याचे शहरात आपण अनेकदा ऐकतो. खेड्यात आपल्या लोकांवर सवर्ण-हिंदूंनी जुलूम केल्याच्याही वार्ता नेहमी कानी पडतात. अशा प्रकरणांमुळे समाज समता दलाने लक्ष घालायला पाहिजे. या घटना गंभीर असून तुमच्यासारख्या संघटनाच त्याबाबत काहीतरी करू शकतात.’’
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे काम पूर्ण झाल्यावर घटना समितीत त्यांनी जे भाषण केले ते उल्लेखनीय आहे. बाबासाहेर सदस्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘आपले काम पूर्ण झाले. उद्या सूर्योदय होऊ देत. नवीन भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले. पण अजून सामाजिक व आर्थिक स्वातंत्र्य उदय पावायचे आहे.’’­

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget