Halloween Costume ideas 2015

विश्वास : प्रेषितवाणी (हदीस)

    माननीय सअद (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जो काही अल्लाह निर्णय घेईल, तो मान्य करणारा आणि त्यावर समाधान व्यक्त करणारा मनुष्य भाग्यशाली आहे. तसेच अल्लाहपाशी सुख-समृद्धीची प्रार्थना (दुआ) न करणारा आणि अल्लाहच्या निर्णयावर निराश होणारा मनुष्य दुर्भाग्यशाली आहे.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : ‘तवक्कुल’ म्हणजे अल्लाहला आपला प्रतिनिधी बनविणे आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे. पालनकर्त्याला प्रतिनिधी म्हणतात आणि सुख-समृद्धीबाबत विचार करणारा आणि वाईटापासून वाचविणाऱ्याला पालनकर्ता म्हणतात.
    ‘मोमिनचा प्रतिनिधी अल्लाह आहे.’ याचा अर्थ असा होतो की त्याला यावर दृढविश्वास असतो की अल्लाहकडून जे काही येते ती भलाई आहे, त्यातच माझ्याकरिता समाधान आहे, अल्लाह ज्या स्थिती ठेवील त्यावर मी आनंदी आहे. मोमिन स्वत:हून प्रयत्न करीत असतो आणि मग मामला अल्लाहच्या हवाली करतो आणि म्हणतो, ‘‘हे पालनकर्त्या! तुझ्या दुर्बल दासाने हे काम करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मी दुर्बल व विवश आहे. या कामात जी काही त्रुटी राहिली असेल तिला तू पूर्ण कर. तू वर्चस्वशाली व शक्तिशाली आहे.’’
    एक मनुष्य म्हणाला, ‘‘हे अल्लाहचे पैगंबर मुहम्मद (स.)! मी आपल्या सांडणीला बांधून ठेवू आणि अल्लाहवर विश्वास ठेवू अथवा तिला सोडून देऊ आणि विश्वास ठेवू?’’ पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘अगोदर तू तिला बांधून ठेव मग विश्वास ठेव.’’ (हदीस : तिर्मिजी)
स्पष्टीकरण : एखाद्या वस्तूला प्राप्त करण्याच्या ज्या काही पद्धती असतात त्यांचा पूर्णत: अवलंब करा आणि मग अल्लाहपाशी दुआ करा की ‘‘मी उपाय केला आहे, आता तू मदत कर.’’ हे आहे ‘तवक्कुल!’
    माननीय अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्याचे मन प्रत्येक डोंगरकपारीत भटकत असते. जर एखादा मनुष्य आपल्या मनाला डोंगरखोऱ्यात भटकण्यासाठी सोडून देत असेल तर त्याला कोणती दरी त्याला नष्ट करील याची अल्लाहला पर्वा नाही. जो मनुष्य अल्लाहवर विश्वास ठेवील त्याला अल्लाह त्या डोंगरकपारीत आणि मार्गांवरून भटकण्यापासून आणि नष्ट होण्यापासून वाचवील.’’ (हदीस : इब्ने माजा)
स्पष्टीकरण : जर मनुष्य अल्लाहला आपला प्रतिनिधी व पालनकर्ता बनवीत नसेल तर त्याचे मन नेहमी उद्विग्न राहील आणि अनेक मनोवृत्तींचे घर बनून राहील, परंतु जो मनुष्य आपल्या मनाला अल्लाहकडे वळवील त्याला निश्चिंतता प्राप्त होईल.
पश्चात्ताप आणि क्षमायाचना
    माननीय अनस बिन मालिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘दास गुन्हा केल्यानंतर क्षमा मागण्यासाठी जेव्हा अल्लाहकडे परततो तेव्हा अल्लाहला आपल्या दासाच्या परतण्यावर त्या मनुष्याच्या तुलनेत अधिक आनंद होतो, ज्याचे आयुष्य ज्या सांडणीवर अवलंबून होते ती सांडणी एखाद्या वाळवंटात हरवली असेल आणि मग त्याला ती अचानक सापडली असेल (तर ती सांडणी सापडल्यानंतर त्याच्या आनंदाला पारावार उरणार नाही.) अशाच मनुष्याच्या पश्चात्तापाने अल्लाहला आनंद होतो. इतकेच नव्हे तर अल्लाहचा आनंद त्याच्या तुलनेत वाढलेला असतो कारण तो दया व कृपेचा स्रोत आहे. (हदीस : बुखारी, मुस्लिम)
    माननीय अबू मूसा अशअरी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अल्लाह रात्री आपला हात पसरतो जेणेकरून ज्या मनुष्याने दिवसा एखादे पापकर्म केले असेल त्याने रात्री अल्लाहकडे परतावे आणि दिवसा तो आपला हात पसरतो जेणेकरून रात्री जर एखाद्याने पापकर्म केले असेल तर त्याने दिवसा आपल्या पालनकत्र्याकडे परतावे आणि पापकर्मांची क्षमा मागावी. अल्लाह असेच करीत राहील, सूर्य पश्चिमेला उगवेपर्यंत (म्हणजे अंतिम निर्णयाचा दिवस येईपर्यंत). (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : ‘अल्लाहचे हात पसरणे’ म्हणजे तो आपल्या पापी दासांना बोलवितो की
    माझ्याकडे या, माझी दया तुम्हाला आपल्या बाहूत घेण्यास तयार आहे. जर तुम्ही तात्पुरते भावनेच्या भरात रात्री पापकर्म केले असेल तर दिवस उजाडताच क्षमा मागा, जर उशीर कराल तर शैतान तुम्हाला आणखीनच दूर करील आणि अल्लाहपासून दूर जाण्यात आणि दूर जात राहण्यात मनुष्याचा नाश आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget