Halloween Costume ideas 2015

शरिअतवर आम्ही समाधानी आहोत

पुणे (वकार अहमद अलीम) - सर्व धर्मीय महिलांवर होत असलेल्या अत्याचारासंबंधी केंद्र शासन तोंडात मिठाची गुळणी घेऊन मौन धारण करते. पण मुस्लिम महिलांवर मात्र सरकारची विशेष नजर आहे. पंतप्रधान म्हणतात, मुस्लिम स्त्रिया ”बिचाऱ्या” आहेत. आम्ही बिचाऱ्या नाहीत, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी दिलेल्या शरिअतवर आम्ही अत्यंत खुश व समाधानी आहोत. म्हणून संसदेत प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकास विरोध करण्यासाठी, त्याचा निषेध करण्यासाठी व तो रद्द करावा यासाठी दुपारच्या रखरखत्या उन्हाची पर्वा न करता आम्ही येथे जमलो आहोत. प्रचंड संख्येने जमलेल्या समस्त मुस्लिम भगिनींना धन्यवाद देऊन, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचा प्रत्येक कार्यक्रमास अशीच उपस्थिती दाखवून झोपेचे सोंग घेतलेल्या शासनास जागे करण्याचे आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या (रूक्न) डॉ. आस्मा जोहरा यांनी केले
    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आवाहानानुसर कुल जमाअती तंजीम पुणे यांच्या वतीने 10 मार्च रोजी  ’तहफ्फुजे शरियत’निमित्त महिलांची रॅली आयोजित केली गेली होती. रॅलीचा समारोप करताना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सदस्या (रूक्न) डॉ. आस्मा जोहरा यांनी उपस्थित सुमारे 50 हजार मुस्लिम भगिनींसमोर प्रस्तावित तिहेरी तलाक कायद्याचे पोस्टमार्टम केले. एम.डी.सह द्विपदवीधारक असलेल्या डॉ. आस्मा यांनी सांगितले की, तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडताना प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी सांगितले होते की, या विधेयकाद्वारे मुस्लिम भगिनींना गुलामीतून बाहेर काढून त्यांना स्वातंत्र्य देण्यात येईल. त्यांना सन्मान प्रदान करण्यात येईल. परंतु, सत्यस्थिती अशी आहे, साडे चौदाशे वर्षापूर्वी इस्लामचे अंतिम प्रेषित यांनी समस्त महिलांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा हक्क व अधिकार बहाल केलेला आहे. स्त्री पुरूषांना समानता देणारा इस्लाम हा एकमेव धर्म आहे. इस्लामने स्त्रीयांना अर्थाजनापासून पूर्ण अलिप्त ठेवून अर्थाजनाची संपूर्ण जबाबदारी पुरूषांवर टाकली आहे. दरवर्षी 8 मार्चला महिला दिवस साजरा होतो. पण भारतात एका वर्षामध्ये 2 कोटी ’स्त्रि लिंग’ गर्भात मारून टाकले जातात. म्हणजेच दररोज 4 हजार 800 महिलांचा मुडदा पाडला जातो. लग्नात हुंडा, मानापमानाच्या नावाखाली 36 हजार 200 महिलांना जीवंत जाळण्यात आले. कौटुंबिक अत्याचाराच्या 41 टक्के महिला शिकार होतात. मुस्लिम समाजात केवळ तिहेरी तलाक हीच समस्या शिल्लक राहिली, असा समज करून दिला जात आहे. मुस्लिम महिलेला गुलामीत जखडून ठेवल्याचा गैरसमज पसरवून मुस्लिम पुरूषांनाही बदनाम केले जात आहे. पण आम्ही महिलांना खरेखुरे स्वातंत्र्य इस्लामने दिले आहे. तिहेरी तलाक विधेयकाद्वारे इस्लामिक शरिअतमध्ये बदल करण्याचा धूर्त डाव शासनाने टाकला आहे. इस्लामी शरिअतमध्ये कोणताही बदल आम्हाला मान्य नाही. संवैधानिक अधिकाराद्वारे आम्ही ते होऊ देणार नाही.यावेळी डॉ. आस्मा यांनी उपस्थित विराट जनसमुदायास आवाहन केले, हे विधेयक तुम्हास मंजूर आहे का? महिलांनी नाही म्हटले. विधेयकास विरोध करण्यासाठी हातवर करण्याचे आवाहन केल्यानंतर समस्त महिलांनी निषेधाचे प्रतिक म्हणून आपापले हात वर केले.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget