Halloween Costume ideas 2015

संयम आणि दृढता : प्रेषितवाणी (हदीस)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)
माननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,
मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.
माननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.
तिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.
त्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.)! अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?’’
तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)
स्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या 
संकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.
विश्वास
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget