Halloween Costume ideas 2015

डॉ. अल्लामा इक्बाल यांच्या काव्यात ‘इत्तेहाद मिल्लत’चा संदेश

सोलापूर-
‘खादिमाने उर्दू फोरम’ व मिल्लत वेलफेअर असोसिएशन’च्या संयुक्त विद्यमाने ‘कवी इक्बाल यांच्या कवितेतून समाज एकोप्याचा संदेश’ या विषयावर कार्यक्रम अल हसनात एज्युकेशन ट्रस्ट मुंबईचे रऊफ खान यांच्या अध्यक्षतेखाली व शहर काझी मुफ्ती अमजद अली काझी, जमियत उलमा-ए-हिंदचे मौलाना हारीस, रहमानीया मशिदीचे प्रमुख वक्ते मौलाना ताहेर बेग या प्रमुख वक्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.
डॉ. शफी चोबदार यांनी फोरमच्या वतीने झालेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. मिल्लत असोसिएशनचे जब्बार शेख यांनी मिल्लतचा अहवाल सादर केला. सचिव कुतबोद्दीन शेख, विकारअहमद शेख, अय्युब नल्लामंदू, मजहर अल्लोळी, मन्नान शेख,अन्वर कमिशनर, नासर आळंदकर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. व्यासपीठावर जमियत अहले हदीसचे अध्यक्ष मुखतार हुमनाबादकर, जमियत अहले कुरेशचे हाजी अय्युब कुरेशी, शहर काझी अमजदअली काझी, एस. ए. जब्बार, फोरमचे अध्यक्ष विकार शेख, उपाध्यक्ष अय्युब नल्लामंदू, सचिव डॉ. शफी चोबदार इ. उपस्थित होते.
मौलाना ताहेर बेग यांनी उर्दू ज्येष्ठ विद्वान कवी यांच्या अनेक कवितांच्या आधारे समाजात एकोपा कसा व कशासाठी जरुरी आहे हे सिध्द केले आणि आम्ही जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत आमची उन्नती व प्रगती होणार नाही आणि समाजाला योग्य दिशा मिळणार नाही.
मौलाना हारीस म्हणाले, अल्लामा इक्बाल हे उर्दूचे थोर कवी होते .त्यांनी आपल्या अनेक कविता मुस्लिम समाजाला उद्देशून लिहिल्या आणि झोपल्याचे सोंग करत असलेल्या समाजाला जागे करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कवितेतून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय सुधाराचा संदेश मिळत असतो, त्यासाठी आपण स्वत: प्रयत्नशील राहिले पाहिजे. आपसातातील भेदभाव हे माणसांना माणुसकीपासून दूर नेणारे असतात, असा संदेश कवी इक्बाल यांनी अनेक वेळा अनेक कवितेतून दिलेला आहे. आज आम्ही इक्बाल यांच्या शायरीचे वाचन करतो परंतु ती समजून घेत नाही, म्हणूनच आज आम्ही आपसात भांडत बसलो आहोत.
शहर काझी सय्यद अमजदअली म्हणाले, अल्लामा इक्बाल यांच्या शायरीतून आपल्याला सामाजिक संदेश मिळतो हे जगजाहीर आहे, ‘एकही सफमें खडे होगये महेमूद व आयाज, न कोई बंदा रहा न बंदानवाज’ हा शेर आम्ही अनेकदा ऐकतो. परंतु त्या दोन ओळीमध्ये एक मोठा संदेश सर्व जातीजमातींसाठी लपलेला आहे. त्याला आम्ही समजू शकलो नाही, हे आमचे दुर्देव म्हणावे लागेल. राजा व रंक यांच्यातले अंतर या दोन ओळींमधून मिटवून दिलेले आहे. परंतु आजसुध्दा आम्ही गरीब श्रीमंत, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव करीत बसलो आहोत. जोपर्यंत समाजात बंधुभावाची भावाना वाढत नाही तोपर्यंत समाजात सामाजिक परिवर्तन होणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष रऊफ खान म्हणाले, उर्दू भाषा ही मातृभाषा आहे. यातूनच आम्ही आमच्या मुलांना शिक्षण दिले पाहिजे, कारण उर्दूतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. भाषेला रोजी, रोटी किंवा नोकरीशी जोडणे ही चुकीची धारणा आहे. मराठीतून किंवा इंग्रजीतून शिकले तर नोकरी लवकर लागते हा विचार चुकीचे आहे. प्रत्येकाने आपआपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. आमची मातृभाष उर्दू आहे तर आम्ही आमचे संपूर्ण शिक्षण उर्दूतून घेतले पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शफी चोबदार यांनी केले. आभार फोरमचे अध्यक्ष विकारअहमद शेख यांनी मानले.

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget