Halloween Costume ideas 2015

आत्महत्या : अधिरतेमुळे चुकणारी वाट

-अब्दुल कय्यूम शेख अहमद
असंवेदनशीलता
       आत्महत्येचे प्रयत्न रोखले जाऊ शकतात, गरज आहे आपापल्या परीने प्रयत्न करणाऱ्यांची. आत्महत्या केल्याने प्रश्न सुटत नाही हे सर्वमान्य असूनही वारंवार घडणाऱ्या अशा दु:खद घटनांवर योग्य विचार केला जात नाही. शेजारी लागलेली आग आपल्या घरापर्यंत पोहोचणार नाही या भ्रमात राहून प्रत्येक माणूस यंत्राप्रमाणे धावत आहे. म्हणूनच आज जगभरातील प्रत्येक वयोगटात आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. नैसर्गिक मृत्यू येण्यापूर्वीच एका मागोमाग एक जीवन संपविण्याचे निर्णय घेतले जात असताना ठोस उपाययोजना अंमलात न येणे हे समाजमन असंवेदनशील बनत चालल्याचे दर्शविते.
व्यक्ति आणि समाजव्यवस्था दोन्हीही दोषी
आर्थिक चणचण, बेरोजगारी, नातेसंबंधातील तणाव, शैक्षणिक प्रश्न इ. कारणांची चर्चा करून सर्वच मोकळे होतात आणि घटनेला जबाबदार असणाऱ्या दुसऱ्या बाजूकडे डोळेझाक होते.
व्याजावर आधारित निर्दयी कर्जव्यवस्था व्यसनांना चालना देणारे उद्योगधंदे, बाजारपेठ बनलेली शिक्षण व्यवस्था, घर किंवा घराबाहेरील कार्यक्षेत्रांमध्ये आढळणाऱ्या व्यवस्थापनातील त्रुटी, लग्नकार्यात बाधा बनलेल्या वाईट प्रथा, जागोजागी होणारे अन्याय व अत्याचार आणि वैध मार्गाने रोजगार शोधण्यात दारोदारी वाया जाणारी युवाशक्ती. ही सर्व बोलकी उदाहरणे आहेत आणि ही सर्व प्रगतीची चिन्हे नाहीतच तर समाजाला अधोगतीकडे नेणारी आहेत.
हे मुद्दे माणसांचे जीवन सुलभ व्हावेत या हेतूने येथे प्रस्तुत केले आहेत अन्यथा आपले जीवन सुरक्षित व सुव्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी प्रथमत: व्यक्तीचीच आहे. गंभीर किंवा दीर्घकालीन आजारामुळे धैर्य सुटणे, जीवनव्यवहारात मिळालेल्या अपयशामुळे निराश होणे, अवास्तव चिंता, निरनिराळ्या प्रकारचे काल्पनिक भय, राग, लोभ इ. सर्वांना मनात जागा देऊन आपण स्वत:च आपले मन कमकुवत करतो.
सत्य हेच आहे की परिस्थिती कितीही कठीण असली तरी माणसाच्या आवाक्याबाहेर नसते. सृष्टीच्या निर्माणकत्र्याने कोणत्याही जीवावर त्याच्या शक्तीपेक्षा जास्त जबाबदारीचा भार ठेवला नाही. प्रत्येक संकटावर मात करण्याची क्षमता व प्रत्येक दु:ख झेलण्याची शक्ती माणसामध्ये आहे. पण तो जरा विसराळूसुद्धा आहे. रात्र आली तर भयभीत होतो. पहाट होईपर्यंत धीर धरत नाही. रात्र ही ठराविक काळापुरतीच असते. कुणी संयम ठेवो अथवा न ठेवो दिवस उजाडण्यासाठी वेळ लागतो. पण एकदा सूर्य उगवला की कृतज्ञ राहणे आपले कर्तव्य आहे हे माणूस विसरतो. 
ही वेळ आहे ‘आपली माणसं' जपण्याची
जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या समोर निराशा व्यक्त करते. आपले अपयश, आपल्यावर असलेला दबाव, होणाऱ्या छळाबद्दल काही बोलून दाखवते, आपली भावनिक व मानसिक अस्थिरता दर्शविते, तेव्हा कृपया तिला वेळ द्या. तिला गंभीर न घेणे हा आपला दोष ठरू शकतो. तिला मार्गदर्शन देणे, तिच्या समस्येवर योग्य उपाययोजना करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे. एकमेकांना धीर देणे, एकमेकांशी सहानुभूती बाळगणे यामध्ये मिळणाऱ्या आनंदाला व सुखाला शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. भौतिक सुख व साधनसंपत्तीला आपला देव मानून जगणाऱ्या चंगळवाद्यांनी हा अनुभव जरूर घ्यावा.
अनुचित घडू नये यासाठी काय करावे?
एखादी व्यक्ती आत्महत्या करणार असल्याचे कळले तर करण्यासारखी बऱ्याच गोष्टी असतात, पण सर्व त्यामध्ये प्रशिक्षित नसतात. मुळात त्या क्षणी व्यक्तीला बोलते करणे आणि तिच्या भावनांचा निचरा होऊ देणे गरजेचे असते. नाजुक अवस्था असेल, व्यक्ती चिडलेली, भावनाविवशतेत असेल तर प्रतिक्रिया देणे टाळावे. हेल्पलाइनची मदद घ्यावी.
सरकारी हेल्पलाईन १०४ आहे. या नंबरवर फोन लावून तेथील समूपदेशक व प्रशिक्षित व्यक्तींशी संपर्वâ साधून मदद घेता येते. इंटरनेटच्या माध्यमातून स्प्ूाम्प्.ग्ह च्या मदतीने इतर हेल्पलाईनशी संपर्वâ होऊ शकतो.
आपणा सर्वांना एक विनंती आहे, माणसांच्या कल्याणासाठी कुरआनमध्ये सांगितलेल्या आणि आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणींचा एकदा आपल्या बुद्धी विवेकाने आढावा घ्यावा. एक खरा एकेश्वरवादी जो आपले आचरण आपल्या विचारांच्या अधीन ठेवतो तो दु:खांना, संकटांना कसे सामोरे जातो हे जरूर तपासून पाहा.
एकेश्वरवादीचे मन आत्महत्येच्या विचाराला धुडकावून लावते
कुरआनमध्ये ( सूरह बलद -९०/४) नुसार हे स्पष्ट करण्यात आले आहे की वर्तमान जीवन हे मनोरंजन किंवा ऐश व आरामासाठी नसून काबाडकष्ट करण्याचे व यातना सहन करण्याचे ठिकाण आहे आणि यातच माणसाची परीक्षा आहे. याचा भक्कम पुरावा माणसाची जन्माची वेळ आणि ती परिस्थिती आहे. ती घटना व ती वेळ आईसाठी किती कठीण व यातनामय असते आणि रडत येणारे बाळसुद्धा अडचणीत वेढलेला असते. यावरून स्पष्ट होते की पुढेही अडचणी व कष्टांना तोंड देत जीवनाची परीक्षा द्यावी लागणार आहे. तसेच परीक्षेचा निकालही लागेल आणि त्यामध्ये यश किंवा अपयश मिळणे हेही निश्चित आहे. 
दुसरे कष्ट आणि यातनामय परिस्थितीतच माणसाचे कर्तृत्व व मोठेपण कसाला लागते. बिकट परिस्थितीतच माणसाचे सद्गुण बहरतात आणि तो मानवतेच्या उच्च शिखरावर पोहोचतो. कष्ट व यातना माणसाला त्रास देण्यासाठी नव्हे तर त्याचे स्थान उंचावण्यासाठी असतात.
माणसाचे धैर्य सोडण्याचे कारण हेच आहे की तो वर्तमान जीवनालाच सुखसमृद्धी व मौजमजा किंवा ऐश व आराम करण्याचे स्थान समजतो व हीच अपेक्षा बाळगतो.
एकेश्वरवादी हा विचार करतो की जीवन अमानत आहे. जीवन देणारा मालक सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. या सृष्टीमध्ये माझे स्थान केवळ एखाद्या टृस्टीसारखे आहे. मालकाच्या इच्छेविरुद्ध कारभारात आपल्या मर्जीने मी ढवळाढवळ करु शकत नाही. मृत्यूची वेळ ठरलेली आहे. ठरलेल्या वेळी नैसर्गिक मृत्यूने न मरता आत्महत्येच्या प्रयत्नात मेलो तर अधिकार नसलेल्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप केल्याची शिक्षा मिळेल. संसारातून स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न मरणोत्तर जीवनात महाग पडेल आणि स्वत:च्या उणिवा, दोष व कमतरतेची शिक्षा त्यांना का द्यावी ज्यांनी माझ्यासाठी कित्येक बलिदान दिले. माझ्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. जे माझ्या सुखदु:खात सहभागी बनले. इतरांनी घेतलेल्या एवूâण कष्टापुढे माझ्या कष्टाची किंमत काय? मी आत्महत्येची पळवाट का स्वीकारावी?
एकमेव ईश्वरावर विश्वास ठेवणारा हेच मानतो की जे संकट येऊन कोसळले आहे त्याचे निवारण ईश्वराखेरीज अन्य कोणीही करूच शकत नाही. म्हणून तो संकट आणि त्रासासमोर एखाद्या मजबूत पाषाणासारखा उभा राहतो. 
एकेश्वरवादी केवळ अल्लाहचेच भय बाळगतो. त्यामुळेच त्याच्या मनातील सर्व प्रकारचे भय लोप पावतात. तोच एकमेव ईश्वर सर्वाचा रक्षणकर्ता आहे म्हणून फक्त त्यालाच संकट व अडचणीत हाक मारतो. तोच सर्वशक्तिशाली आहे म्हणून फक्त त्याच्या समोर आपली गाऱ्हाणी ठेवून प्रार्थना करतो.
लाभ व हानीचा स्वामी फक्त एकच ईश्वर आहे व सर्व काही त्याच्याच हाती आहे. म्हणून मी इतर कोणाचीही अपेक्षा बाळगणार नाही. कितीही संकटे आली तरी मला विश्वास आहे की त्या एकमेव ईश्वराची साथ मला सोडणार नाही.
भाग्यावर पूर्ण विश्वास ठेवणारा एकेश्वरवादी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. परंतु अपयश आल्यास तो हा विचार करतो की जे काही घडले ते अल्लाहने निर्धारीत केलेल्या भाग्यानुसार घडले. अल्लाहचा प्रत्येक निर्णय उद्देशपूर्ण असतो. निश्चितच यामध्ये कोणता तरी भलाईचा पैलू असेल आणि भविष्यकाळातही अल्लाहचा प्रत्येक निर्णय माझ्या भलाईसाठीच असेल. मी पुन्हा प्रयत्न करणार, हातपाय हलविणार पण खचून जाणार नाही आणि नाउमेद होणार नाही.
एकेश्वरवादीचा हा विश्वास, अल्लाहशी असलेली त्याची श्रद्धा त्याला मानसिक समाधान देते. मोठमोठ्या संकटातून, दु:खांच्या आघातातून, कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्याचे अनेक मार्ग त्याला सापडतात. हेच मार्गदर्शन प्रत्येक काळात प्रत्येक समाजात प्रेषितांनी केले. एकेश्वरवादाकडे लोकांना बोलविले.
माणसाला जीवन का देण्यात आले? सृष्टी का निर्माण करण्यात आली? सृष्टीमध्ये माणसाचे स्थान काय आहे? माणसाने आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात कसे वागावे? याचा अभ्यास करण्यासाठी कुरआन आणि  आदरणीय मुहम्मद (स.) यांनी दिलेल्या शिकवणींचा जरूर अभ्यास करावा. कारण आज मार्गदर्शनाचे विश्वसनीय, प्रामाणिक आणि परिपूर्ण साधन हेच आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget