Halloween Costume ideas 2015

हज यात्रेत नेमकं काय केलं जातं?

बकर ईद म्हणून सर्वसाधारणपणे आपल्या देशात जो उत्सव प्रचलित आहे त्याचं खरं नाव ईद उल अज़हा आहे. ईद उल अज़हा म्हणजे आहुती देण्याचा सण होतो. याला त्यागोत्सव  देखील म्हटलं जाऊ शकतो. हा एक संस्कार आहे. आज आपण एका जनावराची आहुती देतोय, पण उद्या सत्यासाठी, मानवी समाज व देशासाठी प्राणाची, मालमत्तेची, वेळ व  कलागुणांची आहुतीही द्यावी लागली तरी त्यासाठी आपण तयार असण्याची त्यागाची मानसिकता या संस्कारातून निर्माण होते. हा कोणताही नवस किंवा बळी देण्याचा अंधश्रद्धेचा प्रकार  नाहिये. उलट मटणाची भाजी खाल्याने पाप लागते, विटाळ होतो, हीच एक अंधश्रद्धा आहे. हीच अंधश्रद्धा अस्पृश्यतेच्या आणि मॉब लिंचिंगच्या मूळाशी आहे. हा खाद्य विटाळ दूर होणे  आज आवश्यक आहे...
हज यात्रेचे सर्व सोपस्कार मक्का शहर व त्याच्या भोवताल परिसरातच पूर्ण केले जातात. दर दरवर्षी अरबी वॅâलेंडरमधील जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला प्रत्यक्ष हजला सुरूवात  होते, तर पुढील पाच दिवस हाजी लोकांचे विविध सोपस्कार केले जाऊन बारा तारखेला त्याची सांगता होते.
खाली लुंगीसारखं एक कापड गुंडाळून आणि वर एका कपड्यानं अंग झाकलं जातं. त्याला अहेराम म्हणतात. पण फक्त या दोन कपड्यांनाच अहेराम म्हटले जात नाही, तर अहेराम ही  एक अवस्था आहे. या अवस्थेत काही विशिष्ट गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या आहेत. जसे शिवलेले कपडे नेसणे, उंच बूट नेसणे, सुगंधीत अत्तर किंवा इतर क्रिम वगैरे लावणे, शरीर- संबंध करणे, शरीरसंबंधांविषयी शृंगारिक चर्चा करणे, विषारी जीवांव्यतिरीक्त इतर जीवांची शिकार करणे, भांडणं करणे, केसं कापणे, नखं कापणे इत्यादी गोष्टी अवैध ठरविल्या गेल्या  असून त्यावर या अवस्थेत प्रतिबंध लागू होतात. म्हणूनच अहेराममध्ये पुरूषांनी फक्त दोन कपडे नेसायचे असतात. पायात साधी स्लीपर घालायची असते.
महिलांचा अहेराम म्हणजे फक्त चेहऱ्याला कपडा लागू द्यायचा नाही. त्यामुळे बऱ्याच महिला तिथे एकतर चेहरा उघडा ठेवतात किंवा एक हॅटसारखी टोपी नेसतात आणि त्या टोपीला  एक कपडा जोडून तो खाली लोंबकळता सोडून देतात. महिला अहेरामच्या व्यस्थतीत साधे कपडे नेसू शकतात. त्यावर बुरखा नेसू शकतात. असा अहेराम नेसून मक्का शहरातील  मस्जिद-एहराम येथे भाविक प्रवेश करतात. या मशिदीच्या सर्वसाधारपणे मध्यभागी काबागृह आहे.
हजयात्रेचा केंद्रबिंदू म्हणजे काबागृह. याविषयी कुरआनातील अध्याय क्रमांक ३ मधील श्लोक क्रमांक ९६ मध्ये अल्लाह सांगतो - ‘‘निसंशय (जगातलं) सर्वात पहिलं उपासनागृह (धर्मस्थळ) जे मानवांकरिता बांधण्यात आले आहे, ते (म्हणजे जे) मक्का शहरी विद्यमान आहे.’’
इथे ‘मानवांकरिता’ हा शब्द फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अल्लाह अन् त्याच्या प्रेषितांशी इमान राखणारा कुणीही तिथं जाऊ शकतो, उपासना करू शकतो, मग तो कोणत्याही जातीपातीत जन्मलेला का असेना, कारण हे धर्मस्थळ मानवांकरिता बांधलेलं आहे. परंतु फक्त पर्यटन म्हणून, मौज मजा करण्याकरिता तीथं जाता येत नाही.
काबागृहाची चारही टोकं ज्या देशांच्या दिशेने आहेत, त्या देशांवर आधारित त्यांची नावं दिलेली आहेत. महत्त्वाचं म्हणजे काबागृहाच्या पुर्वेकडे म्हणजे भारताच्या दिशेने असलेल्या कोपऱ्याला चक्क ‘रूवन-उल-हिंद (भारताकडचा कोपरा)’ असे नाव आहे. ही आम्हा भारतीयांसाठी अभिनास्पद बाब आहे. या काबागृहाच्या भोवती विविध देशांतून आलेले अल्लाहचे  भाविक भक्त जेंव्हा गोलाकार रांगेत नमाज पढण्याकरिता उभे राहतात, तेंव्हा जागतिक मानवी एकात्मता अक्षरश: आपण डोळ्याने पाहू शकतो. त्या वेळी एक अश्वेत वर्णीय आफ्रीकन  हा गौरवर्णिय प्रेंâच माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. एक रशियन हा अमेरिकन माणसाच्या खांद्याला खांदा लाऊन उभा असतो. विविध भाषा बोलणारे इथे एकाच भाषेत  मंत्रोच्चार करतात. हा एक सांस्कृतिक चमत्कारच म्हणावा लागेल. इथे येऊन सगळे वर्णभेद, सगळे जातीभेद, सगळा प्रांतवाद, सगळे राष्ट्रभेद लोकं विसरून जातात. अशा प्रकारे काबा 
हे आंतरराष्ट्रीय मानवी एकात्मतेचे केंद्र आहे. ईदच्या दिवशी याच एकात्मेच्या दुधात मानवी प्रेमाची साखर पडते आणि जगभरात बंधुत्त्वाच्या भावनेने ओतप्रोत असं एक उत्साहाचं वातावरण पसरतं.
काबागृहावर नजर पडतातच ही प्रार्थना म्हटली जाते- ‘‘अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर,अल्लाहु अकबर व ला इलाहा इल्लाहो व अल्लाहु अकबर’’ याचा भावानुवाद असा होतो - अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहच सर्वश्रेष्ठ आहे, अल्लाहशिवाय कुणीही उपासना करण्यास लायक नाही, अल्लाहच (ईश्वरच) सर्वश्रेष्ठ आहे.  याशिवाय आणखीही काही दुआ येथे म्हटल्या जातात. त्यानंतर काबागृहाभोवती सात प्रदक्षिणा घातल्या जातात. नमाज पढली जाते. जवळच असलेल्या सफा व मर्वा या दोन  टेकड्यां दरम्यान धावत पळत सात फेऱ्या मारल्या जातात. याला ‘सई’ म्हणतात. या सईची पाश्र्वभूमीदेखील बोधप्रद आहे. ती पाश्र्वभूमी जाणून घेण्याकरिता आपल्याला प्रेषित इब्राहीम (अ.)   यांचा इतिहास माहित असणे आवश्यक आहे.
प्रेषित इब्राहीम (अ.) यांना ईश्वराकडून प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाज सुधारणेला सुरूवात केली. चळवळीच्या कामानिमित्त प्रेषित इब्राहीम (अ.) हे ईश्वरी कार्याकरिता  पॅलेस्टीनला जात असताना त्यांची पत्नी हाजरा व त्यांचं तान्हं बाळ (प्रेषित इस्माईल अ.) यांना एकटेच सोडून गेले होते. त्या वेळी मक्का शहर हे पूर्णपणे विराण झालेलं होतं. प्रेषित  नूह यांच्या काळात आलेल्या महाजलप्रलयात कस्रfचत ही वस्ती त्या वेळी उद्ध्वस्त झालेली असणार बहुतेक. त्यामुळे प्रेषित इब्राहीम (अ.) आले त्यावेळी मक्का हे शहर वसलेलं  नव्हतं. काबागृहाचाही जिर्णोद्धार अजून व्हायचा होता. चोहीकडे भयाण प्रचंड वाळवंटी प्रदेश. आजूबाजूला सफा व मर्वा नावाच्या दोन टेकड्या होत्या. आदरणीय हाजरा यांचं लेकरू एकदा  तहानेने रडत होतं. आपल्या लेकराला पाणी पाजण्याकरिता त्या इकडं तिकडं पाहू लागल्या. तेंव्हा त्यांना दूरवरच्या सफा टेकडीवर पाणी दिसू लागलं. हाजरा त्या दिशेने धावत गेल्या.  पण टेकडीवर पोहचल्यावर त्यांना तिथं पाणी सापडलं नाही. वाळवंटी भागात जमिनीतून निघणारी वाफ ही दुरून पाणीच दिसते. याला ‘मृगजळ’ म्हणतात. हाजरांना मृगजळ दिसत  होतं. सफा टेकडीवरून पाहिलं असता त्यांना मर्वा टेकडीवर पाणी असल्याचा भास झाला. म्हणून त्या तिकडेही धावत सुटल्या. पण तिथंही पाणी नव्हतं. तेदेखील मृगजळच होतं. अशा  प्रकारे तहानेने कासाविस झालेल्या आपल्या लेकरासाठी भर उन्हात उजाड- वैराण वाळवंटी सफा-मर्वा टेकड्यांदरम्यान त्या सैरावैरा धावत होत्या. लेकरासाठी धावपळ करणाऱ्या त्या  आईवर अल्लाहला दया आली. हाजरांचं लेकरू ज्याठिकाणी रडत होतं, तिथून अल्लाहने एक झरा फोडला. त्या झऱ्याच्या पाण्याला हाजरांनी वाळूने अडवलं आणि ‘‘ज़म़जम (थांब-थांब)’’  म्हटलं. अशाप्रकारे त्या झऱ्याला ज़म़जम नाव पडलं. आज त्या झऱ्याचं पाणी पाइपद्वारे दूरदरपर्यंत नेण्यात आलं. मस्जिद-एहराममध्ये जागोजागी नळांद्वारे या झऱ्याचं पाणी उपलब्ध  आहे. अतिशय चवदार, पवित्र, आरोग्यदायी व शुद्ध असं पाणी. नेहमी वाहतं पाणीच शुद्ध असते. एका जागी तुंबलेलं पाणी हे शुद्ध असूच शकत नाही. पण ज़म़जम याला अपवाद आहे.   एकाच ठिकाणी साठलेलं हे पाणी हजारों वर्षांपासून शंभर टक्के शुद्ध असल्याचं वैज्ञानिक प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आदरणीय हाजरा यांनी आपल्या तहानलेल्या लेकरासाठी पाणी  आणण्याच्या आशेने सफा व मर्वा या दोन टेकड्यांदरम्यान धावाधाव केली होती. त्या माऊलीची ती धावपळ अल्लाहला इतकी आवडली की, जगाच्या शेवटपर्यंत या दोन टेकड्यांदरम्यान  धावणे हजसाठी येणाऱ्यांकरीता अनिवार्य करून टाकलं. या धावण्याला ‘सई’ म्हणतात. हा अल्लाहने अशा महिलांचा केलेला सम्मान आहे, ज्यांचे पती किंवा वडिल हे सामाजिक  परिवर्तनाच्या चळवळीत गुंतले असल्यामुळे महिलांना कुटुंबाचं आकाश पेलावं लागतं आणि असा संघर्ष करावा लागतो. माता हाजरांच्या त्या लेकींना सलाम! सई केल्यानंतर मस्जिद- ए-हरामच्या बाहेर निघून केसांचं मुंडन केलं जाते आणि अहेराम काढून नेहमीचे कपडे नेसले जातात. या संपूर्ण सोपस्काराला उमरा म्हणतात. हजपूर्वी हा उमरा करावा लागतो. हजचे एकूण सोपस्कार पाच दिवसांत पूर्ण केले जातात. जिलहज्ज महिन्याच्या आठ तारखेला म्हणजे हजच्या पहिल्याच दिवशी अहेराम धारण करून मक्का शहराच्या बाहेर ‘मीना’ नावाच्या  एका मैदानात भाविक एक दिवस व एक रात्र मुक्काम करतात. या दिवशी भावीक भक्त तंबूत राहून नमाज पढतात, यथाशक्ती अल्लाहचं नाम:स्मरण करतात, कुरआन पठन करतात,  तर काही जन आरामही करतात. दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ तारखेला यात्रेकरू ‘अराफात’ मैदानात जाण्याकरिता निघतात. सर्वसाधारणपणे सूर्य डोक्यावरून ढळण्यापूर्वीच या मैदानात  भाविक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या मैदानात सूर्यास्तापर्यंत थांबले जाते. भाविक इथे नमाज पढतात. इमामचे प्रवचन ऐकतात. आपल्या पापांची क्षमा मागतात, अल्लाहची करूणा भाकतात.
भूतलावरील पहिले मनुष्य व इस्लामचे पहिले प्रेषित आदम (अ.) यांना अल्लाहने जन्नतमधून खाली भूतलावर अवतरीत केले. तिथे जन्नतमधूनच आलेल्या त्यांच्या पत्नी व भूतलावरील प्रथम महिला हव्वा यांच्याशी त्याच मैदानात भेट झाली. त्या दोघांनी त्या मैदानात प्रार्थना केली. नंतर ते लगतच्या ‘मुजदलफा’ मैदानात जाऊन तिथे त्यांनी मुक्काम केला.  दुसऱ्या दिवशी ते मीना नावाच्या मैदानात आले आणि नंतर आज जिथे मक्का शहर आहे, तिथे आले. काबागृहाचा जिर्णोद्धार करून त्याला सात प्रदक्षिणा घातल्या. अशाप्रकारे मक्का  शहरातून निघून अराफातमध्ये थांबणे, नंतर मुजदलफा येथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी मीना येथे जाऊन तिथे आणखी काही सोपस्कार पूर्ण करून पुन्हा मक्का शहरात परत  येणे आणि काबागृहाला सात प्रदक्षिणा घालणे हे सोपस्कार आजही हजयात्रेत केले जातात. म्हणून हज हा मानवी इतिहासाचा सर्वात जुना धार्मिक संस्कार मानला जातो. तसेच ईद उल  ज़ोहा हादेखील मानवी  इतिहासाचा सर्वात जुना उत्सव मानला जातो. अराफात मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे. या मैदानात आज जमतात तसं क़यामत (महाप्रलया)च्या दिवशी असंच  सगळे माणसं याच मैदानात एकत्रित जमणार आणि केल्यासवरल्याचा हिशेब अल्लाहकडून घेतला जाणार आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होऊन सगळी माणसं मरणार आणि ‘हश्र’च्या   दिवशी सगळी माणसं जीवंत होऊन अल्लाहसमोर ज्या मैदानात उपाqस्थत केले जाणार, त्या मैदानाचा केंद्रबिंदू हेच मैदान राहणार असल्याची माहिती इस्लामी ग्रंथात आपल्याला  मिळते. खरंच, एक ना एक दिवस सर्वांना मरण अटळ आहे. एक दिवस हे विश्व नष्ट होणारच असल्याचं विज्ञानदेखील मानते. माणूस मेल्यानंतर ़कयामतच्या दिवशी  पुन्हा कसा  काय परत जीवंत होणार याविषयी अल्लाह कुरआनाच्या अध्याय क्रमांक १९ मधील श्लोक क्रमांक ६६ मध्ये सांगतो-
‘‘मनुष्य म्हणतो, काय खरोखरच जेव्हा मी मेलो असेन तेव्हा पुन्हा जिवंत करून बाहेर आणला जाईन? काय मनुष्याला आठवत नाही आम्ही पूर्वी त्याला निर्माण केले आहे जेव्हा तो  काहीच नव्हता?’’
माणूस आईच्या गर्भात येण्यापूर्वी कुठं असतो? आईवडिलांच्या शरीरातील दोन भिन्न तत्त्वांच्या मिश्रणातून माणूस जन्म घेतो, ते तत्त्व कुठून येते? ते जे अन्न खातात त्यातून. ते  अन्न कुठून येते? जमिनीतून, पाण्यातून. म्हणजे जमीनीतली माती, पाणी, हवा, प्रकाश व इतर तत्त्वे मिळून एक माणूस उत्पन्न होतो. त्यापूर्वी तो कुठेच नसतो. तो मोठा होतो.  मरतो. मरून त्याची माती होते किंवा राख होते. हाडं उरतात. तो जेंव्हा काहीही नसताना अल्लाह (ईश्वर) त्याला उत्पन्न करू शकतो, तेंव्हा त्याचे काहीतरी अवशेष शिल्लक असताना  का नाही त्याला पुन्हा जीवंत करू शकत? त्याला हे शक्य आहे. एक खून करणाऱ्या आणि शंभर खून करणाऱ्यालाही या जगात फक्त एकदाच फाशी दिली जाऊ शकते. तेंव्हा इतर ९९  खुनांची शिक्षा केंव्हा मिळणार? मग ईश्वर जर न्यायी आहे, तर मग तो न्याय केंव्हा करणार? यासाठी नक्कीच तो एक दिवस सर्वांना जमा करून हिशेब घेणारच आहे, यावर इमान  ठेवल्याशिवाय गत्यंतर नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेऊन परलोक नाकारणे, हिशेबाचा दिवस नाकारणे म्हणजे त्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह उत्पन्न करून त्याचा घोर अपमान करणे होय.   अशा ईशद्रोही लोकांना तो नरकात टाकणार. म्हणून मेल्यानंतर जीवंत होऊ, यावर प्रत्येकाला इमान राखणे गरजेचं आहे. अशाप्रकारे आपण मेल्यानंतर पुन्हा जीवंत होऊन याच मैदानात  येणार आहोत, याची तीव्र जाणीव या मैदानात होते. या अरफातच्या मैदानात पहिले मानव आदम व हव्वा यांची भेट होऊन मानवी समाजाच्या लौकिक कर्मकलापाची सुरूवात इथेच  झाली होती आणि मानवी कर्मांचा हिशेब होऊन लौकिक जीवनाचा शेवटदेखील इथेच, याच मैदानात होणार आहे, इन्शाल्लाह! या ईदच्या दिवशी हजयात्रेकरू व्यतिरिक्त जगभरातील  सक्षम मुसलमान जनावरांची कुरबानी करत असतो. ईदच्या दिवशी किंवा त्यानंतरच्या दोन दिवसांतही कुरबानी केली जाऊ शकते. या कुरबानीची जी सामाजिक पाश्वभूमी आहे,  तीदेखील समजून घेणे गरजेचे आहे. कुरबानीचा उद्देश एखाद्या जनावराचा जीव घेणे नाही. एखादा नवस फेडण्याकरिता कुरबानी केली जात नाही की फक्त पार्टी करून मौज मजा  करण्याकरिता कुरबानी केली जात नाही. अल्लाह कुरआनात अध्याय क्रमांक २२, श्लोक क्रमांक ३७ मध्ये सांगतो -
‘‘अल्लाहप्रत त्यांचं (जनावरांचं) मांस किंवा रक्त पोचत नसते तर त्यामागची तुमची निष्ठा पोचते.’’
प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी दिलेल्या आदेशावरून कुरबानीच्या मटणाचे तीन भाग केले जातात. एक भाग स्वत:साठी अन् स्वत:च्या कुटुंबियांकरिता, दुसरा भाग हा आपले नातेवाईक   व मित्रांकरिता पण मटनाचा तीसरा भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. अशा प्रकारे या कुरबानीच्या निमित्ताने ज्या गोरगरिबांना मटण  हे महिनोगिणती  डोळ्याने पाहायलाही मिळत नाही, अशांना या ईदनिमित्त ते खायला मिळते. म्हणून बळी व कुरबानीत फरक आहे. माणसाच्या नावाने देवासाठी बळी दिला जातो, तर अल्लाहच्या  नावाने माणसासाठी कुरबानी दिली जाते, गोरगरिबांसाठी कुरबानी दिली जाते. फक्त जनावरांचं मांस पाहून नव्हे तर गरिबांची रिकामी खळगी भरलेली पाहून अल्लाह प्रसन्न होत  असतो. त्यासोबतच सामाजिक क्रांतीकरिता आपली व आपल्या कुटुंबियांची कुरबानी देण्यासही ही कुरबानी प्रेरणा देत असते, ही ईद प्रेरणा देत असते. अशा त्याग व कुरबानीचा उत्सव असणाऱ्या ईद-उल-़जोहाच्या आपल्या सर्वांना सदिच्छा!
ईद मुबारक!

- नौशाद उस्मान

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget