Halloween Costume ideas 2015
July 2019

सहावर्षात 234 जणांचा गेला बळी : डोंगरी इमारत दुर्घटनेत 14 ठार तर 9 जखमी


मुंबईच्या चंदेरी दुनियेत वावरताना येथील प्रशासन, नागरिक भानावर आहेत का नाही, असा प्रश्न वारंवार पडतो. दर पावसाळ्यात नितनियमाने इमारती कोसळून शेकडो नागरिक  मृत्यूमुखी पडणाऱ्या घटनांवरून येथील नागरिकांची गफलत दिसून येते. अनधिकृत इमारती, मुलभूत सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि नागरिकांची गफलत अशा घटनांना  कारणीभूत ठरतात. त्यामुळे दोष फक्त कोणा एकावर जात नाही तर संपूर्ण व्यवस्थेवर जातो. त्यात महत्त्वाची भूमिका असते ते बिल्डर आणि महापालिकेची. गेल्या सहा वर्षात  म्हणजेच 2013 ते 2018 या कालावधीत इमारत कोसळण्याच्या तब्बल 2 हजार 704 दुर्घटना झाल्या त्यात 234 बळी गेले असून 840 जखमी झाल्याची माहिती शकील शेख यांना  माहितीअधिकारात महापालिकेने दिली आहे.
गेल्या पंधरवाड्यात मुंबई येथील मलाड परिसरात इमारत दुर्घटनेत जवळपास 30 जणांचा मृत्यू झाला.तर कित्येक जखमी झाले. आणि आता डोंगरी भागातील चार मजली केसरबाई  इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला, तर 9 जण जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. जखमींवर जे.जे. रुग्णालयात  उपचार सुरू असून जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अजून अनेक जण अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात असून रात्री उशिरापर्यंत ढिगारा उपसण्याचे काम सुरू होते.
या घटनांत जेवढी महापालिका दोषी आहे तेवढीच या इमारतीचे मालक अन् राहत असलेले लोक. मात्र लोक पोटापाण्यासाठी मुंबईत येवून राहिलेले असतात आणि ते येथील बिल्डर्स  किंवा घरमालकांच्या जाळ्यात अडकतात. लोकांना पोटापाण्याची सोय करण्यात दिवस अन् रात्र कशी जाते याचे भानही राहत नाही. त्यातच कितीही अडचणी आल्यातरी या मायावी  नगरीत राहणे लोक भाग्याचे समजतात. म्हणूनच वर्षानुवर्षे मुदत संपलेल्या इमारती उभ्या असतात. कधी कधी झुलत असतात, इमारत हळू हळू आपला एक-एक भाग सोडत असते.   तिचे वय संपत आलेले असते मात्र त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असते. महापालिकाही प्रत्येक इमारतीचे ऑडिट इमाने इतबारे करते का नाही यात शंका आहे. त्यामुळेच अशा  इमारती ढासळत आहेत. निष्पाप जीवांचा बळी गेल्याने महापालिकेच्या गलथान कारभारावर सर्वच स्तरांतून सध्या टीका ही केली जात आहे.
ढिगाऱ्याखालून मंगळवार, 16 जुलैच्या रात्रीपर्यंत 9 जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले. दुपारी दोन वाजता एका 15 ते 16 वर्षांच्या मुलीला सुरक्षितरीत्या बाहेर काढले. याचदरम्यान  ढिगाऱ्याखाली दोन वर्षांची एक लहान मुलगी अडकल्याचे दिसले. तिचीही सुटका केली. इमारत दुर्घटनेप्रकरणी डोंगरी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत, अधिक तपास सुरू केला  आहे.

मृतांची नावे : साबिया निसार शेख (वय 25), अब्दुल सत्तार कालू शेख (वय 55), मुजमिल मन्सूर सलमानी ( वय 15), सायरा रेहान शेख (वय 25), जावेद इस्माईल (34), अरहान  शेहजाद (40), कश्यप अमिरजान (13), सना सलमानी (25), झुबेर मन्सूर सलमानी (20), इब्राहिम (दीड वर्ष) , अरबाज (7), शहजाद (8), यामिन मन्सूरी (54). अल्लाह यांची  मग्फीरत करो आमीन. तर जखमींमध्ये फिरोज नाझिर सलमानी (वय 45), आयशा शेख (3), सलमा अब्दुल सत्तार शेख (55), अब्दुल रेहमान (3), नावेद सलमानी (35), इम्रान  हुसेन कलवानिया (30), जाविद (30), जीनत (25), अलमा मोहम्मद रशिद इद्रिशी (28). आदींचा समावेश आहे. पालिका, म्हाडाने जबाबदारी झटकली
दुर्घटनाग्रस्त इमारत कोणाच्या अखत्यारीत आहे, यावरून महापालिका आणि म्हाडात वाद निर्माण झाला आहे. सदर इमारत म्हाडाची असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. तर   दुर्घटनाग्रस्त कौसरबाई इमारत ही म्हाडाच्या कार्यक्षेत्रातील असून ती कोसळलेली नाही, तर या इमारतीच्या मागील अनधिकृतरीत्या बांधलेला भाग कोसळला आहे. हा कोसळलेला भाग  म्हाडाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, असे स्पष्टीकरण म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.
डोंगरी परिसरात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल. ही इमारत शंभर वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती धोकादायक म्हणून घोषित केली होती. तिच्या  पुनर्विकासाचे काम विकासकाकडे सोपविण्यात आले होते. पण त्यामध्ये दिरंगाई का झाली याची चौकशी केली जाईल. बचाव व मदतकार्यानंतर दुर्घटनेची चौकशी व अन्य आवश्यक  बाबींवर निर्णय घेण्यात येईल असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखाची मदत तर जखमींना 50 हजारांची मदत देण्यात येईल.

- बशीर शेख

मुस्लिमांना आम्ही ज्या गोष्टीकडे बोलावितो ती गोष्ट ही आहे की, त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव होईल व ती पूर्ण करण्यासाठी ते तयार होतील. ती जबाबदारी जी की मुस्लिम  होण्याच्या नात्याने त्यांच्यावर येते. तुम्ही फक्त एवढे म्हणून सुटका करून घेऊ शकणार नाहीत की, ’’आम्ही मुस्लिम आहोत आणि आम्ही अल्लाह आणि त्याच्या धर्माला मानलेले  आहे.’’ उलट जेव्हा तुम्ही अल्लाहला आपला ईश मानलेले आहे आणि त्याने जो धर्म तुम्हाला दिलाय त्याचा तुम्ही एक व्यवस्था म्हणून स्वीकार केलेला आहे. तर त्यासोबत काही  जबाबदाऱ्यासुद्धा तुमच्यावर येतात ज्यांची जाणीव तुम्हाला असायला हवी आणि त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची चिंता तुम्हाला असायला हवी. जर तुम्ही ती जबाबदारी पार पाडणार  नाहीत तर त्याच्या कोपापासून या जीवनात वाचू शकाल ना परलोकात. त्या जबाबदाऱ्या काय आहेत? त्या फक्त एवढ्याच नाहीत की तुम्ही अल्लाहवर, त्याच्या दुतांवर, त्याच्या  ग्रंथावर, त्याच्या प्रेषितांवर आणि निवाड्याच्या दिवसावर विश्वास ठेवला. ती जबाबदारी फक्त एवढीही नाही की तुम्ही नमाज अदा केली, रोजे राहिले, हजला गेले आणि जकात दिली.  ती फक्त एवढीही नाही की तुम्ही विवाह, घटस्फोट, वारसाहक्क इत्यादी गोष्टींमध्ये इस्लामने घालून दिलेल्या कायद्याची अंमलबजावणी केली. या सर्वासोबत एक मोठी आणि अवजड  जबाबदारी आपल्यावर ही अनिवार्यरित्या येते की, तुम्ही सगळ्या जगासमोर या सर्व गोष्टींचे साक्षीदार म्हणून उभे रहा. ’मुस्लिम’ या नावाने तुम्हाला एक वेगळा समुदाय  बनविण्यामागचा जो उद्देश्य कुरआनने स्पष्ट केलेला आहे तो हाच आहे की, तुम्ही अल्लाहच्या सर्व बंद्यांसमोर सत्याची साक्ष द्याल. जेणेकरून उद्या ते हे आरोप करू शकणार नाहीत  की त्यांना अंधारात ठेवले गेले.
कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’आणि या प्रमाणे आम्ही तुम्हाला एक उत्कृष्ट समुह बनविलेला आहे जेणेकरून तुम्ही लोकांसमोर साक्ष द्याल आणि प्रेषित तुमच्यासमोर साक्ष  देतील.’’ (सुरे बकरा आयत नं. 145).
हा मुस्लिम समुदायाला जन्माला घालण्याचा खरा उद्देश आहे. जर का हा उद्देश तुम्ही पूर्ण केला नाही तर लक्षात ठेवा तुम्ही तुमचे आयुष्य व्यर्थ घालविले आहे. सत्याची साक्ष देण्याचे  कर्तव्य अल्लाहने तुमच्यावर टाकलेले आहे. त्याचा आदेश आहे की, ’’हे लोकहो! ज्यांनी श्रद्धा बाळगली, अल्लाहसाठी उभे राहणारे आणि ठीक-ठीक सत्याची साक्ष देणारे बना.’’ (सुरे  मायदा आयत नं.6). आणि हा फक्त केवळ आदेशच नाही तर ताकीदवजा आदेश आहे. अल्लाह फरमावितो की, ’’त्या व्यक्तीपेक्षा मोठा अत्याचारी आणखीन दूसरा कोण असेल  ज्याच्याकडे अल्लाहकडून एक साक्ष आलेली आहे आणि त्याने ती लपविली.’’ (सुरे बकरा आयत नं. 140).
त्यानंतर अल्लाहने तुम्हाला हे सुद्धा दाखवून दिले आहे की, या कर्तव्यपूर्तीचा परिणाम काय होणार आहे? तुमच्यापूर्वी या साक्षीदाराच्या पिंजऱ्यामध्ये ज्यू लोकांना उभे केले गेले होते.  मात्र त्यांनी काही प्रमाणात सत्याला लपविले आणि काही प्रमाणात सत्याच्या विरूद्ध साक्ष दिली. म्हणून ते सत्याचे नव्हे तर असत्याचे साक्षीदार होऊन गेले. याचा परिणाम हा झाला की  अल्लाहने त्यांना दूर लोटून दिले. त्यांच्यावर अल्लाहचा कोप झाला. कुरआनमध्ये म्हटलेले आहे की, ’’अपमान आणि दारिद्रय त्यांच्यावर टाकून देण्यात आले आणि त्यांनी आपल्या  डोक्यावर अल्लाहचा कोप ओढवून घेतला.’’ (सुरे बकरा आयत नं.61).
हीच साक्ष ज्याची जबाबदारी आता तुमच्यावर टाकण्यात आलेली आहे. याचा अर्थ जे सत्य तुमच्याकडे आलेले आहे, जे सत्य तुमच्यावर स्पष्ट करण्यात आलेले आहे, मानवाला  जीवनात आणि मरणोप्रांत जीवनात यशस्वी होण्याचा जो एकमेव मार्ग आहे, तो तुम्हाला दाखविण्यात आलेला आहे. या सर्वांची साक्ष तुम्ही जगासमोर द्यावी व सांगावे की, हाच सत्य  मार्ग आहे. तुमची साक्ष अशी असायला हवी की, सत्य आणि असत्य दोहोंमधील फरक ठळकपणे वेगळा दिसेल आणि जगातील लोक हा तर्क देऊ शकणार नाहीत की, आम्हाला तर  सत्याचा पत्ताच नव्हता. हीच साक्ष घेऊन अनेक प्रेषित पृथ्वीवर पाठविण्यात आले होते. हीच साक्ष देणे त्या सर्वांवर अनिवार्य करण्यात आले होते आणि शेवटचे प्रेषित मुहम्मद  (सल्ल.) यांच्यानंतर ही साक्ष देण्याची जबाबदारी सामुहिकरित्या मुस्लिम समाजावर टाकण्यात आलेली आहे. जशी की ती पे्रषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर त्यांच्या जीवन काळामध्ये  व्यक्तीगत स्तरावर टाकण्यात आलेली होती.
ही साक्ष किती महत्त्वाची आहे, याचा अंदाज याच गोष्टीवरून लावा की, मानवजातीसाठी अल्लाहने विचारपूस आणि बक्षीस आणि शिक्षेचा जो कायदा केलेला आहे तो पूर्णपणे याच  साक्षीवर अवलंबून आहे. अल्लाह युक्ती (हिकमतवाला), दया आणि न्याय करणारा आहे. त्याच्या हिकमत आणि दया तसेच न्यायप्रियतेशी ही गोष्ट अजिबात सुसंगत नाही की लोकांना  त्याची मर्जी माहितच नसावी आणि त्याने त्यांना त्याच गोष्टीला जबाबदार धरावे की ते त्याच्या मर्जीच्याविरूद्ध का चालले? लोकांना हे माहितच नसेल की सत्य मार्ग कोणता आहे?  आणि तो (अल्लाह) लोकांची मार्गभ्रष्ट झाले म्हणून पकड करेल. लोकांना या गोष्टीचा थांगपत्ताच नसेल की त्यांना कोणत्या गोष्टींबाबत विचारले जाईल ? आणि त्या अनोळखी  गोष्टीबद्दल त्यांच्याशी विचारपूस केली जाईल. म्हणूनच अल्लाहने जगाची सुरूवातच एका प्रेषिताला पाठवून केली. त्यानंतर वेळोवेळी अनेक प्रेषित पाठविले. ज्यांनी लोकांसमोर सत्याची  साक्ष दिली व त्यांना समजावून सांगितले की तुमचे व्यवहार कसे असावेत व तुम्हाला जन्माला घालण्याचे कारण काय? तसेच अल्लाहची मर्जी काय आहे?
जीवन जगण्याचा हाच खरा मार्ग आहे. हीच पद्धत आहे ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मालका (अल्लाह)ची मर्जी संपादन करू शकता. हे ते काम आहे जे तुम्ही करायला हवे आणि हे ते  काम आहे ज्यांच्यापासून तुम्हाला लांब रहायचे आहे. ह्या अमुक गोष्टी आहेत ज्यांच्याबाबतीत मेल्यानंतर तुमच्याकडे विचारपूस केली जाईल. हीच ती साक्ष आहे जी अल्लाहने आपल्या  प्रेषितांच्या मार्फत लोकांसमोर दिली होती. त्याचा उद्देश्य कुरआनमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे की, लोकांना अल्लाहसमोर हा तर्क देण्याची संधी राहू नये की आम्ही अनभिज्ञ होतो  आणि जी गोष्ट आम्हाला माहितीच नव्हती त्याला जबाबदार धरून तुम्ही आम्हाला पकडताय. ’’ (हे सारे प्रेषित) आनंद वार्ता देणारे आणि भीती घालणारे बनवून पाठविण्यात आले होते  जेणेकरून हे प्रेषित आल्यानंतर लोकांकडे (आपण निर्दोष) असल्याचा तर्क अल्लाहसमोर कोणी देऊ शकणार नाही. अल्लाह जबरदस्त शक्तीमान आणि हिकमतवाला आहे’’ (सुरे निसा  : 165).’’येणेप्रमाणे अल्लाहने हा तर्क पुढे केला जावू नये म्हणून त्याची जबाबदारी प्रेषितांतवर टाकली आणि त्यांना या महत्वाच्या जबाबदारीवर नेमले की, जर त्यांनी सत्याची साक्ष लोकांसमोर ठीक-ठीक दिली तर मग लोक आपल्या कर्मासाठी स्वतः जबाबदार राहतील. मात्र जर प्रेषितांकडून साक्ष देण्यामध्ये निष्काळजीपणा करण्यात आला आणि त्यामुळे लोक  पथभ्रष्ट झाले तर मात्र प्रेषितांची पकड होईल. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर प्रेषितांच्या पदाची ही नजाकत होती की, एक तर त्यांनी सत्याची ठीक- ठीक साक्ष देऊन लोकांना कारण  सांगण्याची संधीच देऊ नये, नाहीतर लोक उलट त्यांच्यावर आरोप लावतील की, ह्यांनी आपल्या पदाचा मान राखत अल्लाहचा संदेश आमच्यापर्यंत ठीक- ठीक पोहोचवलेला नाही. लोक  म्हणतील ऐ अल्लाह! जीवन जगण्याचा जो सरळ मार्ग तुम्ही प्रेषितांना सांगितला होता तो मार्ग तर त्यांनी आम्हाला दाखविलाच नाही. हेच कारण होते की, प्रेषित मुहम्मद सल्ल. आपल्यावरील या जबाबदारीच्या ओझ्याच्या जाणीवेसंबंधी अतिशय संवेदनशील होते. आणि म्हणूनच त्यांनी त्यांच्या तर्फे सत्याची साक्ष देण्यामध्ये कुठलाच निष्काळजीपणा केला नाही  आणि लोकांना त्यांच्यावर आरोप करण्याची संधीच मिळू नये यासाठी आयुष्यभर जीव तोडून प्रयत्न केले.
प्रेषितांच्या मार्फत ज्या लोकांपर्यंत सत्य, ज्ञान आणि उपदेशाचा मार्ग पोहोचला ते एक उम्मत (समुदाय) बनवले गेले आणि त्यांच्या दर्जाला शोभेल अशी ही नाजूक जबाबदारी, जीचे  ओझे प्रेषितांवर टाकले गेले होते आता या उम्मतच्या वाट्याला आलेले आहेत. प्रेषित (सल्ल.) यांचे पायीक आणि वारस होण्याच्या प्रतिष्ठेतून त्यांचा हा मान ठरविला गेला की, त्यांनी  सत्याची साक्ष द्यावी. त्यानंतरही लोक सुधरले नाही तर मग त्यांची पकड केली जाईल. आणि जर यांनी (मुस्लिमांनी) सत्याची साक्ष देण्यामध्ये टाळाटाळ केली किंवा सत्याऐवजी  असत्याची साक्ष दिली तर इतर लोकांच्या अगोदर हे स्वतः पकडले जातील. अगोदर त्यांच्याकडून त्यांच्या कामागिरीबद्दल विचारपूस होईल आणि त्या लोकांच्या कर्माबाबतही विचारपूस  यांच्याचकडून केली जाईल की तुम्ही सत्याची साक्ष न दिल्यामुळे किंवा चुकीची साक्ष दिल्यामुळे हे बाकीचे लोक मार्गभ्रष्ट, दंगेखोर आणि पापी झाले. (क्रमशः)

वो वफरेब खुर्दा शाहीं जो पला हो किरगिसों में
उसे क्या खबर के क्या है रहवे रस्मे शाहबाजी
 
1947 किंवा त्यानंतरच्या चार-दोन वर्षात जन्माला आलेल्या मुस्लिमांची एक पीढि उतारवयाला पोहोचलेली आहे. मात्र गेल्या 72 वर्षात या पीढितून सर्वमान्य असे नेतृत्व उभे राहिलेले  नाही. त्यानंतर जन्माला आलेल्या व आज तारूण्यात असलेल्या मुस्लिम युवकांमध्ये सुद्धा नेतृत्वगुणांचा स्पष्ट अभाव आढळून येतो.
साधारणपणे मुस्लिम नेतृत्वाची विभागणी तीन गटामध्ये करता येते. 1. मदरशातून तयार झालेले नेतृत्व. 2. सामाजिक चळवळीतून तयार झालेले नेतृत्व आणि 3. विविध राजकीय  पक्षांमधून पुढे आलेले नेतृत्व. सच्चर समितीच्या अहवालानुसार 4 टक्केच मुस्लिम तरूण मदरशात शिक्षण घेतात. मात्र याच 4 टक्के तरूणांच्या ताब्यात देशातील सर्व मदरसे आणि  मस्जिदीं आहेत. यांचाच मुस्लिम जनमानसावर प्रचंड पगडा आहे. मात्र त्यांनी स्वतःहून स्वतःला मुस्लिम समाजाच्या धार्मिक नेतृत्वापुरते सीमित करून घेतले आहे. सामाजिक  चळवळीतून पुढे आलेल्या नेतृत्वाला मुस्लिम समाजाने कधीच पूर्णपणे स्वीकारलेले नाही. त्याचे कारण म्हणजे मुस्लिम समाज हा धर्माधारित नेतृत्वाशिवाय दुसऱ्या कोणाचे नेतृत्व स्वीकारण्यास मानसिकरित्या तयार नसतो. राहता राहिले तीसऱ्या प्रकारचे नेतृत्व, ते म्हणजे राजकीय पक्षातून पुढे आलेले मुस्लिम नेतृत्व, तर त्यांच्याबाबतीत अशी स्थिती आहे की,  मुस्लिम त्यांच्याकडे त्याच वेळी जातात ज्यावेळी त्यांच्याकडे काही काम असते. बाकी वेळा ते त्यांच्यापासून सुरक्षित अंतरावर राहण्यातच धन्यता मानतात. मुस्लिम नेतृत्वाची अशी ही
शोकांतिका आहे.

युवा मुस्लिम नेतृत्व
युवा नेतृत्व कुठल्याही समाजाचा पाठीचा कणा असतो. दुर्दैवाने स्वातंत्र्यानंतर या समाजामध्ये युवा नेतृत्व निर्मितीची प्रक्रिया जवळ-जवळ ठप्प पडलेली आहे. म्हणून हा समाज  कणाहीन झालेला आहे. मॉबलिंचिंगच्या सत्तरहून अधिक बळी गेलेल्या लोकांपैकी एकानेही विरोध करण्याचा साधा प्रयत्नसुद्धा केलेला नाही. यावरून एक सत्य अधोरेखित होते, ते हे की,  नेतृत्व नसल्यामुळे या समाजाचा आत्मविश्वास रसातळाला गेलेला आहे. युवा नेतृत्व विकास हे मुस्लिम समाजातील अनेक दुर्लक्षित विषयांपैकी एक विषय आहे.

फिरकाबंदी
फिरकाबंदी है कहीं और कहीं जाते हैं
क्या जमाने में पनपने की यही बाते हैं
प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्यानंतर मुस्लिम समाज अनेक फिरक्यां (गटा) मध्ये विभागला गेला. म्हणून कुठल्याही एका गटातून जरी एखादे सालस नेतृत्व पुढे आले तरी इतर गटांची   त्याला साथ मिळत नाही. म्हणून ते नेतृत्व पूर्णपणे खुलू शकत नाही.

युवा नेतृत्व कसे तयार होते?
शरीके हाल जबतक शाने इस्लामी नहीं होती
मुसलमां पैदा होने से मुसलमानी नहीं होती
युवा नेतृत्व निर्मितीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका संतुलित शिक्षणाची असते. असे शिक्षण जे भौतिक आणि नैतिक दोन्हीही दृष्टीने उच्चतम असते. मुस्लिम समाजातील युवक या  बाबतीत दुर्देवी ठरलेले आहेत. मदरशातून पुढे आलेले तरूण स्वतःमध्ये उच्चतम नैतिक मुल्य बाळगून असतात. मात्र भौतिक शिक्षणाच्या बाबतीत ते कमी पडतात. तर उच्च भौतिक  शिक्षण घेतलेले मुस्लिम तरूण नैतिक मुल्यांच्या बाबतीत कमी पडतात. या अशा विचित्र कोंडित सापडल्यामुळे मुस्लिम तरूणांमधून आश्वासक असे नेतृत्व निर्माण होऊ शकत नाहीये,  ही खरी दुर्देवाची बाब आहे.
शिवाय, स्वातंत्र्यानंतर सातत्याने गरीबीत राहिल्याकारणाने गरीबी सोबत बाय डिफॉल्ट (आपोआप) येणारे अवगुण मुस्लिम युवकाच्या एका मोठ्या समुहामध्ये आल्यामुळे नेतृत्व वगैरे  गोष्टीपर्यंत जाण्याची त्यांची वैचारिक क्षमताच नसते. केवळ छोटे-छोटे धंदे करणे किंवा छोटे-छोटे जॉब मिळविणे, इथपर्यंतच त्यांची झेप असते. 2011 च्या जणगणनेनुसार 42.7 टक्के  मुस्लिम हे जाहील (अज्ञानी / निरक्षर) तर उरलेल्या पैकी अवघे 7 टक्के पदवीधर आहेत. अशा भीषण जहालतीतून उत्कृष्ट युवा नेतृत्व पुढे येईल, याची आशा करणे व्यर्थ आहे. तसे  पाहता गरीबीमुळे समाजातून नेतृत्व निर्माण होत नाही, हा गैरसमज आहे. कन्हैयाकुमार, नरेंद्र मोदी पासून ते नेल्सन मंडेलापर्यंतच्या नेत्यांनी हा समाज खोटा ठरलेला आहे. परंतु,  भारतीय मुस्लिमांमध्ये असा अपवाद अजून जन्माला यायचा आहे.

नेतृत्वसाठी आवश्यक गुण
वो जिनके होते हैं खुर्शिद आस्तीनों में
उन्हें कहीं से बुलाओ बडा अंधेरा है
निस्वार्थीपणा : कुठल्याही समाजामध्ये, कुठलाही त्याग करण्याची तयारी असलेला, स्वयंप्रेरित, ध्येयवेडा, लोककल्याणासाठी स्वतःला वाहून घेतलेला निस्वार्थ तरूणवर्ग जोपर्यंत तयार  होत नाही तोपर्यंत त्या समाजातून खरे नेतृत्व पुढे येत नाही. स्वातंत्र्यापूर्वी प्रत्येक समाजातून पुढे आलेल्या सालस नेतृत्वाचा अभ्यास केला असता वरील विधानाची सत्यता वाचकांच्या  लक्षात येईल. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात चंगळवादी संस्कृती एवढ्या वेगाने फोफावली आहे की, स्वार्थापलिकडे जावून समाज व देशहितासाठी काही मोठे करण्याची क्षमता आज  साधारणपणे कोणत्याची समाजाच्या तरूणांमध्ये नाही. विचारधारेला बाजूला सारून काँग्रेसमधून भाजपामध्ये होत असलेल्या घाऊक स्थलांतराने माझे वरील विधान सत्य ठरविलेले आहे.  मुस्लिम तरूणही यास अपवाद नाही. नाही म्हणायला निःस्वार्थपणे छोटी-छोटी समाजोपयोगी कामे काही मुस्लिम तरूणांचे गट करीत असतात. परंतु, एवढ्याने नेतृत्व आकारास येवू  शकत नाही. कुंडीत लावलेल्या शोभेच्या झाडासारखी ही कामे आहेत.
दूरदृष्टीचा अभाव मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने मुस्लिम युवकांमधून आश्वासक असे नेतृत्व पुढे येत नाहीये. मुस्लिम आरक्षणाच्या पुढे जावून विचार करणारे, मॉबलिंचिंगचा निषेध  करण्यापलिकडे काही करता येईल काय? याचा विचार करणारे मुस्लिम तरूण आज दिसत नाहीत, हे नेतृत्व नसल्याची निशाणी आहे. नेत्यांमध्ये आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे  विश्लेषण करण्याची क्षमता असावी लागते. ज्या योगे भविष्यात येणाऱ्या संकटाचा त्यांना अचूक अंदाज येतो व ते संकट कसे थोपवावे याची उपाययोजना सुद्धा ते करू शकतात.  आपल्याकडे संकट कोसळल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया देण्यापलिकडे मुस्लिम नेतृत्व काही करतांना दिसून येत नाही.
लोकांचे म्हणणे शांत चित्ताने ऐकण्याची क्षमता, जबाबदारी घेण्याची वृत्ती, विपरित परिस्थितीतही निराश न होता लोकांना प्रेरणा देण्याची क्षमता, उदारता, प्रसंगी नुकसान सोसूनही  दुसऱ्यांशी न्याय करण्याची उपजत प्रवृत्ती, आपले अधिकार मागे ठेवून दुसऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देण्याची समज, संकट समयी कणखरपणे उभे राहण्याची क्षमता इत्यादी नेतृत्वास  आवश्यक असणारे गुण युवकांमध्ये उच्चदर्जाच्या भौतिक व नैतिक शिक्षणाच्या संतुलनातूनच निर्माण होऊ शकतात. नाहीतर भ्रष्ट आणि एकांगी नेतृत्व आकारास येते जे की फक्त  स्वतः व स्वतःच्या जाती-धर्मातील लोकांपुरताच विचार करते व त्याचे भयंकर परिणाम देशाला भोगावे लागतात. याच गोष्टीचा अनुभव आपण गेल्या 72 वर्षांपासून घेत आहोत.
तरूण मुस्लिम नेतृत्वाला आपल्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मुल्यांची जाण तसेच त्या मुल्यांना पुढील पीढिपर्यंत यशस्वीपणे हस्तांतरित करण्याचे भान असायला हवे. नसता  पुढच्या शंभर दोनशे वर्षात मुस्लिम समुदाय केवळ नावापुरताच राहील. मुल्यहीन मुस्लिम समाज बाद झालेल्या चलनासारखा असतो. दिसायला देखना परंतु, निरूपयोगी. इतिहासात  महानतम असलेले अनेक मानवसमुह उदाहरणार्थ बाबील, बनी इसराईल, रोमन, पर्शियन आजही तग धरून आहेत. पण त्यांच्यातील मुल्य हरवून गेलेली आहेत. म्हणून त्यांना काडीची  किमत राहिलेली नाही.
मुस्लिम नेतृत्वाला या सर्व गोष्टींची फक्त जाण असून भागणार नाही तर त्याला बहुसंख्य समाजाच्या मानसिकतेचे सुद्धा अचूक विश्लेषण करता आले पाहिजे व दोन्ही समाजातील  साम्यस्थळे शोधून दोहोंतील संबंध दृढ करण्यासाठी आवश्यक ते उपाय योजता आले पाहिजे. ह्या नेतृत्वाला आपल्या समाजाची बलस्थाने आणि त्रुटींचाही चांगला अभ्यास हवा. हाती  असलेल्या संसाधनांची ही जाणीव हवी. तामीरे नौ (नौनिर्मिती)चा ध्यास हवा.

नेतृत्व उभारणीतील अडचणी
मुस्लिम समाजाचा खरा प्रश्न अडाणी जनता आणि अशिक्षित तरूण हा आहे. फिरकाबंदीबरोबर ही दोन महत्त्वाची कारणे आहेत, ज्यामुळे मुस्लिम नेतृत्व उभे राहू शकत नाहीये. केवळ  नावापुरती धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस आणि चार-दोन प्रादेशिक पक्षाच्या गुलामीतच धन्यता मानणारा फार मोठा गट मुस्लिमांमध्ये अस्तित्वात आहे. हा गटही मुस्लिम नेतृत्व   उभारणीतील एक अडसर आहे. इस्लाम जेव्हा गरीब होता पण लोकांमध्ये इस्लामी मुल्यासंबंधी व्यापक जागरूकता होती. तेव्हा चिखलातून कमळ फुलावेत तसे गरीबीतूनही चार पवित्र  खलीफा (रजि.) व्यतिरिक्त हजरत उस्मान बिन जैद (रजि.), हजरत खालील बिन वलीद (रजि.), हजरत उमरू बिन इलियास (रजि.), हजरत अबु उबैदा बिन जर्रा (रजि.), हजरत  सलाउद्दीन अय्युबी (रहे.), मुहम्मद अल फातेह (रहे.) सारखे सालस नेतृत्व मुस्लिमांमधून पुढे आले. सध्या ही प्रक्रियाच बंद पडलेली आहे.
वर्तमान काळातील स्थानिक मुस्लिम राजकीय युवा नेतृत्वावर नजर टाकली असता त्यांच्या सामर्थ्यापेक्षा उणीवाच जास्त दिसून येतात. तर राष्ट्रीय पातळीवर नजर टाकली असता  उमर खालीद व शहेला रशीद सारख्या विवादास्पद आणि व्यर्थ तरूणांची नावे डोळयासमोर येतात. राजकारणाशिवाय, समाजकारण, क्रीडा, अर्थ, शिक्षण, आरोग्य, शासन, प्रशासन,   कायदा, न्याय इत्यादी जीवनावश्यक क्षेत्रातसुद्धा चमकदार कामगिरी करून भविष्यात नेतृत्व प्रदान करू शकणाऱ्या मुस्लिम तरूणांची नावे अपवादानेच आढळून येतात.

एक सोनेरी पहाट
आ तुझको बतात हूं तकदीरे उमम क्या है
शमसीरो सना अव्वल ताउसो रूबाब आखीर
नेतृत्वाची ही पोकळी भरून काढण्यासाठी मुस्लिम तरूणांची फक्त एक संघटना माझ्या नजरेसमोर आहे. ती म्हणजे एसआयओ. याच संघटनेतून पुढे आलेले अवघ्या 48 व्या वर्षी जमाअत-ए-इस्लामी हिंद सारख्या प्रभावशाली संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतेच निवडलेले गेलेले सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांचे नेतृत्व, अंधारी रात्र संपल्यानंतर अलगदपणे सोनेरी  पहाट उजाडावी, तसे पुढे आलेले आहे. त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या स्ट्रॅटेजिक हॉलमध्ये 21 एप्रिल 2019 रोजी दिलेल्या भाषणाचा गांभीर्याने विचार केला तरी त्यांची दूरदृष्टी  आणि नेतृत्व देण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो. याच संघटनेतून भविष्यात मुस्लिम नेतृत्व पुढे येवू शकेल, एवढीच आशा बाळगतो व थांबतो. शेवटी अल्लाहकडे प्रार्थना करतो की, ’’ऐ  अल्लाह! आमच्या तरूणांतून सशक्त नेतृत्व निर्माण होऊन समाज आणि देशाच्या सेवेसाठी पुढे येऊ दे. आमीन.’’

- एम.आय.शेख
9764000737

कुठलाही विजय आपल्या नावे करून घेण्यासाठी गुणवत्तापूर्ण खेळाडू आपल्या टीममध्ये असणे आवश्यक असते आणि त्यासोबत त्यांच्यात विजयाची प्रेरणा निर्माण करण्यासाठी टीम  प्रशासनाचे मोठे योगदान असते. नुकताच आयसीसी वर्ल्डकप 2019 पार पडला आणि त्यात इंग्लंडने हा कप आपल्या नावे केला. इंग्लंड आणि न्यूझिलंड यांच्यात झालेला अटीतटीच्या  सामन्यात इंग्लंडला जास्तीच्या चौकारांच्या आधारे विजयी घोषित करण्यात आले आणि पहिल्यांदाच इंग्लंड नंबर एकची टीम म्हणून नावारूपास आली. याचे विजयाचे विविध अंगानी  विश्लेषण करता येईल. मात्र इंग्लंडच्या विजयी टीमकडे सुक्ष्म दृष्टीटाकूने पाहिले असता इंग्लंड हा गुणवत्तेला प्राधान्य देणारा देश असल्याचे चटकन आपल्या लक्षात येईल. याचा   आदर्श इतर देशांनी घेतला तर निश्चितच ते प्रगतीकडे वाटचाल करतील, यात शंका नाही. विषय खेळाचा असो का राजकारणाचा की समाजकारणाचा अथवा अन्य कुठलाही; गुणवत्ता  हीच सर्वपरे असते.
आता हेच पहा ना इंग्लंडला विजयी करण्यामध्ये ज्याने सिंहाचा वाटा उचलला त्या बेन स्टोक हा मूळचा न्यूझिलंडचा. त्याच्यावर विश्वास दाखवून इंग्लंडने त्याला आपल्या संघात स्थान  दिले आणि त्याने चमत्कार करून दाखविला. जी गोष्ट स्टोकची तीच कॅप्टन इयान मॉर्गनची. हा मूळचा आर्यलैंडचा खेळाडू. डब्लिनमध्ये 10 सप्टेंबर 1986 जन्मलेला. त्याची गुणवत्ता  पाहून इंग्लंडने त्याला संघाची जबाबदारी सोपविली. ती त्याने जीव ओतून सांभाळली. गोलंदाज जोफ्रा आर्चर हा ब्रिज टाऊन बार्बाडोस, वेस्ट इंडिज असून, टॉम कुरन, जेसम रॉय हे  दक्षिण आफ्रिकेचे गुणवंत खेळाडू होत. जोफ्रा तर कृष्णवर्णीय. तरी त्याच्या कातडीच्या रंगाचा विचार न करता त्याच्या गुणवत्तेचा विचार केल्यानेच त्याने इंग्लंडला विजयापर्यंत  पोहोचविण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग नोंदविला. मोईन अली, आदिल रशीद हे पाकिस्तानी वंशाचे ब्रिटशमध्ये जन्मलेले खेळाडू व सच्चे पक्के मुसलमान. त्यांच्या दाढीचा विचार न  करता त्यांच्या गुणवत्तेचा विचार केल्याने त्यांनी नुसता खेळच केला नाही तर आपल्या श्रद्धेची ऊर्जा त्यांनी इतर खेळाडूंना स्थलांतरित केली व संघाचे मनोधैर्य खचणार नाही, याची दक्षता घेतली.
त्याचा परिणाम असा झाला की, अनेक सामने हरल्यावरसुद्धा संघाचे मनोबल टिकून राहिले. म्हणूनच कप जिंकल्यानंतर कॅप्टन मॉर्गन याला पत्रकारांनी विचारले की, हा कप तुम्ही  नशिबाने जिंकलाय काय? तर त्याने उत्तर दिले की आमच्या बरोबर अल्लाह होता. स्वतः ख्रिश्चन धर्मीय असून, आपल्या यशाचे श्रेय अल्लाहला देण्यामागे आदिल रशीद व मोईन अली  यांची खरी भूमिका होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूळ ब्रिटीश वंशाच्या खेळाडूंनीसुद्धा आपले मन मोठे करून या विदेशी खेळाडूंच्या गुणवत्तेचा आदर राखला. त्यांना योग्य ते सहकार्य  केले. त्यामुळे हा संघ एकसंघ झाला. नसता संघामध्ये संघ असता तर त्यांनी वर्ल्डकप कधीच जिंकला नसता. या ठिकाणी न्यूझिलंड संघाचा उल्लेख न करणे त्यांच्यावर अन्याय  करण्यासारखे होईल. त्यांनी खऱ्या खेळ भावनेने ह्या वर्ल्डकपमध्ये खेळून जगभरातील क्रिकेट रसिकांची मने जिंकली. इंग्लंडच्या विजयापेक्षा जास्त चर्चा न्यूझिलंडच्या पराजयाची झाली.  इंग्लंडच्या संघाने कप जिंकला मात्र न्यूझिलंडच्या संघाने प्रेक्षकांची मने जिंकली. विजयश्री पर्यंत बरोबरी साधली मात्र चौकारांच्या संख्येच्या आधारामुळे त्यांना पराजय पत्कारावा लागला.
एवढेच नव्हे तर इम्पेरियल बँक ऑफ इंग्लंड जी की तेथील रिझर्व्ह बँक आहे. तिच्या गव्हर्नरपदी निवड होणाऱ्यांच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये भारताचे रघुराम राजन यांचे नाव  अग्रस्थानी आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की आज जगाने एका अशा कालखंडात प्रवेश केलेला आहे जेथे धर्म, जात, देशाच्या सीमा गळून पडलेल्या आहेत. आता प्रगती  करावयाची असेल तर चारही बाजूंनी गुणवान माणसं प्रत्येक देशाला आपल्याशी जोडून घ्यावी लागतील. ही बाब आपल्या देशाच्या राजनेत्यांच्या लक्षात जेवढ्या लवकर येईल तेवढ्या  लवकर आपल्या देशाचे भले होईल. आपल्या देशात प्रादेशिक अस्मिता एवढी जपली जाते की, एखाद्या प्रांताचे जास्त खेळाडू संघात गुणवत्तेनुसार स्थान प्राप्त करीत असतील तरी  केवळ ते एका विशिष्ट प्रांताचे आहेत म्हणून त्यांचा विरोध होताना दिसून येतो. या क्षुद्र मानसिकतेतून जोपर्यंत आपण निघणार नाही तोपर्यंत आपला देश प्रगती करणार नाही. त्यामुळे  प्रत्येकाने आपल्या गुणवत्तावाढीकडे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- बशीर शेख

शहरीकरण हा आजच्या सोशल मीडियाचा विक्षिप्त अविष्कार आहे, असं जाणकार सांगतात. चकाकणारं जे कांही असतं ते सोनच असतं, अशी सोशल मीडियाची ख्याति झाली आहे.  त्याचा वापर कुणीही करतात. क्षणिक ठिणगीला वणव्यात रूपांतरित करण्याचे धाढस केवळ आणि केवळ सोशल मीडियाच करू शकते, ही आजची वस्तुस्थिती आहे. शहरातली ही लागण  अगदीं थेट गावा खेड्यात जाऊन संचारली आहे, ह्यात नवीन असं काहिच नसेल, मात्र त्यामुळे विपरित परिणाम झाल्याचे ही नाकारता येत नाहीं. म्हणुन गांवाचे शहरीकरण झाले, हा सुद्धा अतिरेक असेल.
जियोचं भूत एव्हढं संचारलंय कीं आधिच अरूंद असलेल्या गाड़ी रस्त्याच्या कडेला चिकटुन खोदकाम करण्याचे सत्र दिवसरात्र सुरू आहे आणि ते सुद्धा आधुनिक यंत्रणेचा क्रूर वापर करून  केलेल्या खोद कामात कम्युनिकेशनच्या आधुनिक जाडजुड वायरिंना जमिनीखाली दाबण्यात येत आहे. तद्नंतर उसकरुन ठेवलेला गाडी रस्ता तसाच सोडुन काम पुढे जात आहे. त्यामुळे  गरिबी में आटा गीला.. या म्हणी प्रमाणे गाडी रस्ता पुन्हां गुदमरतोय. संबंधित गावाच्या हद्दीतील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन केवळ माणुसकी म्हणून सुद्धा न सांगता, प्रशासनास  डावळणे म्हणजेच हा अतिरेक आहे. सोशल मिडिया चा हा प्रताप म्हणावा का प्रकोप?? कोणाला हवा आहे हा सुधार? आणि तो ही गावांत राहणाऱ्याना डावलून!! टेलिफोन एक्सचेंजला  जाऊन चोकशी केली असतां सर्व लॅण्डलाईन वायरिंगचे मातीआड असलेले जाळे बुलडोझर मुळे विस्कटले गेले, तसं झालं असेल, पण सदर कामात दुर संचार कार्यालयास सुद्धा कळवलेले  नाहीं त्यांना विश्वासात घेतले जात नाही, असे येथील कामगार म्हणाले. फोन धारकाना मात्र नको तो जाच सोसावा लागला. विरोध आधुनिकतेला नाहीं, विरोध येणाऱ्या नवनवीन  वंâपन्यांना ही नाहीं, गावकरी हे जाणून आहेत की केवळ पर्यटकासाठी या टेली कम्युनिकेशनच्या सुविधाचा खटाटोप नाही. त्यामागें नक्कीच वावीण्य असेल तर ते येऊ दे. पण  स्थानिकानां सपशेल डावलून किंबहुना ते खेडूत म्हणुन दुर्लक्षित करून कसं चालेल?,
कोकणाला निसर्गाने समुद्र किनारा दिला आहे. त्यामुळे बहुतांश जीवन हे खाऱ्या पाण्यावर अवलंबुन होतं, आहे आणि यापुढेही राहणार. जाणकारांनी, प्रशासनाने तसेच राजकीय पुढाऱ्यानी   कोकण किनारी जनजीवन व्यथित न होता जे प्रकल्प येऊ शकतील त्यास जरूर आणावेत. एक एनरॉन आला का आणला गेला? त्यामुळे त्या पचक्रोशीतील जनजीवन किती उध्वस्त  झालें ? ह्याची जाणीव कुणास झाली आहे का? तेथील संपूर्ण परिसर हा एक उद्धवस्त कर्मभोग म्हणुन नैराश्य व्यक्त करतांना दिसतो. आजही ह्याच ठिकाणी कधी काळी एनरॉन
नामक विदेशातून आलेली का आणलेली ... कंपनी होती...!!हवेतून घिरट्या घालणारी हेलीकॉप्टर पाहिली, पाण्यातुन जाणारी जलवाहतूक पाहिली, महागड्या गाडीतून गाठीभेटी घेणारे मुत्सद्दी येऊन गेले. एनरॉनचा परिसर जणू पंचतारांकित वैभवाने नटलेला दिसायचा, आणि दिया तले अंधेरा प्रमाणे आम्हीं सर्व परिसारतले फयान सारखी वादळं अनुभवत राहिलो.  सोशिक समाज इथला, संपूर्ण कोकण महिनाभर चक्क काळोख गिळत राहिलं. आम्हीं सोशिक म्हणुन आजही केवळ ईशवरी शक्ती समोर नतमस्तक होतो. पण अजूनही एक  पर्यवरणास पूरक असा प्रकल्प का येत नाही? ह्याचं उत्तर जे पर्यावरण तज्ञ आहेत ते का देऊ शकत नाही? हेंच कळत नाही. केवळ शासनाला किंवा लोकप्रतिनिधीस दोष देऊन कसं  चालेल? समुद किनारी निसर्ग संपन्न अशा कोकण भूमित पूरक असें प्रकल्प कसे येऊ शकतील ते शासनास पटवून द्यावेत. स्थानिक अशा पूरक उद्योगाचे स्वागत करतील.  समुद्रातून मासेमारी करुन आपला उदरनिर्वाह करणारे कोकणी मच्छीमार बांधब... आणलेली मच्छी त्याचे डबाबंद प्रकल्प, शिवाय कोल्ड स्टोरेज अशी सुविधा त्यांना उपलब्ध करून  दिल्यास मच्छिमार जगू शकेल. त्या व्यतिरीक्त बोटीने जलवाहतूक झाल्यास येथील आंबा, सुपारी, नारळ अशा बागायती पिकांना गोवा, मुबंई सारखी व्यापारी दालनं खुली होऊ  शकतील. शेती पूरक असें प्रकल्प कोकणात आल्यास इथला स्थानिक इथंच टिकेल. इतर सुविधांसाठी सुद्धा शासन विचार करू शकेल. पण केवळ गावठी, खेडूत म्हणुन तिरस्काराने  त्याची अवहेलना करू नये. सोशल मिडियामुळे गावांत अनेकाच्या हातीं ऍन्ड्रॉइड आलेत म्हणून कोकणात सर्व कांही आलबेल आहे असे नाहीं. सर्व कोकणवासियांनी जागृत राहिलं  पाहिजे. तरचं आणि तेंव्हाच परिसरातील लोकांना उद्योग मिळू शकेल.

– इक्बाल मुकादम, 
मो.:९४२०१०५९८५

शकील शेख (येवला)–
झारखंड मध्ये झालेल्या मॉब लिचिंग च्या विरोधात येवल्यातून मुस्लिम समाज तसेच अर्जुन कोकाटे भाऊसाहेब आहेर महिंद्र पगारे एॅड समीर देशमुख नानासाहेब शिंदे अजहर शाह  रश्मी ताई पालवे अश्विनी जगदाळे रेखाताई साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी अजहर शाह यांनी सदर निवेदन सर्वाना वाचून सांगितले व  अश्या घटना आपल्या देशात नेहमी होत असल्या तर आपल्या देशाचे भवितव्य धोक्यात येईल असे मनोगत व्यक्त केले प्रा अर्जुन कोकाटे यांनी घडलेल्या घटनेच निषेध व्यक्त करत  राष्ट्र सेवा दल अश्या घटनेचा निषेध करते तसेच महिलांनी आपली संख्या वाढवायला हवी अश्या कामासाठी असे आव्हान केले.
किशोर सोनवणे यांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत आपले जाहीर पाठिंबा आहे असे मत व्यक्त केलं नानासाहेब शिंदे यांनी काँग्रेस पक्ष अश्या घटना कधी सहन करणार नाही दोषींवर सरकारने लवकरच निर्णय घ्यावा असे सांगितले समीर देशमुख यांनी आजच्या या निवेदन साठी मी आमच्या आय काँग्रेस च्या वतीने जाहीर पाठिंबा देतो भाऊसाहेब आहिरे यांनी वंचित बहुजन आघाडी च्या वतीने आपले समर्थन व्यक्त केले महिंद्र पगारे यांनी आपल्या भाषणात जोरदार घोषणाबाजी केली त्यानंतर बशिर पठाण शेरू भाई मोमीन यांचे ही  भाषण झाले या वेळी महिलांनीही आपले सहभाग नोंदवला तहसीलदार यांना निवेदन महिलांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी सर्व उपस्तिथानी घडलेल्या घटनेचे निषेध व्यक्त केले  याप्रसंगी अडव्होकेट साजिद शेख शकिर शेख जावेद मोमीन हमजा मन्सूरी अजीज शेख फारुख शेख भानुदास पठारे संदिप जोंधळे रेखाताई साबळे रश्मी ताई पालवे आफरिन शेख  इशरत खान कविता माळी दयानंद जाधव बखतीयार शेख फरीद खान सूत्र संचालन व नियोजन अजहर शाह यांनी केले.

भारत! एक असा देश आहे ज्याचा इतिहास हजारों वर्षे जुना आहे. मोहम्मद बिन कासिमच्या भारतावरील आक्रमणापूर्वी येथील हिंदू प्रजा आपल्याच हिंदू राजाला वैतागली होती व  आपल्याच देशात असुरक्षित होती. कोणीतरी आपल्याला राजाच्या जाचापासून मुक्ती मिळवून देईल याची वाट ती पाहत होती. मग जेव्हा मोहम्मद बिन कासिमना आपल्या   देशवासियांना मुक्त करण्यासाठी भारतावर हल्ला केला तेव्हा त्याने येथील जनता, मुले, स्त्रिया व वृद्धांना इजा केली नाही, उलट त्या गरीब जनतेसाठी जणू ते मसीहा ठरले. त्यांनी   लढाईत विजय मिळवलाच सोबतयेथील जनतेच्या मुक्तीचे कारण ठरले आणि येथूनच या देशाची प्रगती व मुस्लिमांच्या भव्य अशा इतिहासाला सुरुवात होते.
या देशावर मुस्लिम  राजांनी आठशे वर्षे राज्य केले. इतक्या मोठ्या काळापर्यंत कोणा एका समुदायाचे शासन याची प्रचिती आहे की आम्ही या देशावर खूप प्रेम केले, येथील जनतेला प्रेमाची वागणूक दिली,  या देशातील नयनरम्य ठिकाणांपासून केवळ आनंदच नाही लुटला, तर त्यांना अधिक सुशोभित केले. देशाला धनवान आणि जनतेला खुशहाल केले. अर्थात या देशाला सोन्याची चिमणी  करण्यात आमचा सिंहाचा वाटा. आणि इतके असूनसुद्धा आज आम्ही आमच्याच देशात परके, आम्हीच संशयित, कोठेही आमचाच तिरस्कार का? ज्या समुदायाने या देशाला आज्ञानाच्या  अंधकारातून प्रगतीच्या प्रकाशात आणले आज तोच समुदाय काठावर! या देशाला जगातील सात आश्चर्यांपैकी एक अजुबा ताजमहल आम्ही दिला. तो लाल किल्ला ज्याच्यावरुन सर्वप्रथम भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिरंगा फडकावून केली व जिथे दरवर्षी १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला आमच्या देशाचे पंतप्रधान तिरंगा ध्वज फडकवितात तो लाल किल्ला आमचा. ज्याच्या बुलंदीवर भारताला गर्व आहे असा कुतुबमिनाराची निर्मिती आम्हीच केली. इंग्रजांविरोधात लढा देणारा नवाब  सिराजुद्दौला पण मुसलमान होता. ज्याची जीवनज्योत संपेपर्यंत ‘आता आम्ही गर्वाने म्हणू शकतो की संपूर्ण भारतावर आमचा राज्य आहे’ असे उदगार ज्याच्या भीतीपोटी इंग्रज काढू  शकले नाहीत, असा स्वातंत्र्यसेनानी टिपू सुलतान पण मुसलमान होता. ते बहाद्दर पठाण खान अब्दुल ग़फ़्फार खान ज्यांनी भारताच्या सरहद्दीवर इंग्रजांशी झुंज दिली व 'सरहद्द  गांधी'च्या उपाधीने ओळखू लागले ते पण मुसलमान होते. जिगरबा़ज सैनिक शहीद अब्दुल हमीद ज्याने पाकिस्तानाचे टँक उडवून स्वत:चे देशासाठी बलिदान दिले तोखील एक  मुसलमान होता. यांच्या व्यतिरिक्त मौलाना आ़जाद, सर सय्यद अहमद खान, हाकिम अजमल खान, मौलाना मोहम्मद अली जौहर, मौलाना शौ़कत अली, अश़फा़कउल्ला खान, हसरत  मुहानी आणि ह़जारों उलेमांनी या देशासाठी आपले प्राण गमाविले ते सर्व मुसलमान होते.
एवढेच नाही तर 'तहरीक ए ख़िला़फत' आमची, रेशमी रुमाल तहरीक आमची, इंकलाब ज़िंदाबाद हा नारा आम्हीच दिला. गांधींना महात्माची उपाधि आम्हीच दिली. ‘सारे जहाँ से अच्छा’  गीत आमचे. एवढेच नव्हे तर देश स्वतंत्र्याच्या लढ़ामध्ये ज्या भाषेने देश व देशातील जनतेला एका डोरमध्ये बांधून प्रत्येक भारतीमध्ये स्फूर्ती व ऊर्जेचा संचार करणारी उर्दू भाषा  आमचीच. इतके असून सुद्धा आजतागात आम्ही आमच्याच देशात परके का?
या देशाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात आम्हीच पोहोचविले. या देशाला मि़जाईल आम्हीच दिले, भारतीयांना युद्धात तोफ चालविणे आम्हीच शिकविले, सांस्कृतिक जगतात आमचेच  राज्य, ज्याच्या मधुर वाणीने एकेकाळी भारतीयांना पीसे लावले तो मोहम्मद रफी मुसलमान, ज्यांच्या ़ग़जलांच्या सागरात प्रत्येक भारतीयाला बुडण्यात म़जा येते असे मीर आणि
गालिब मुसलमान, क्रिकेटच्या मैदानात ज्या क्रिकेटपटूंनी देशाचे नाव शिखरावर पोहोचविले असे अ़जहरुद्दीन, टाईगर मंसूर अली खान, सय्यद किरमानी, वसीम जा़फर, जाहिर खान,   इरफान पठाण, यूसुफ पठाण, मोहम्मद शमी सर्व मुसलमान. पहिली शिक्षिका फातेमा शेख मुसलमान, टेनिस स्टार सानिया मि़र्जा मुसलमान, पक्ष्यांचे वैज्ञानिक डॉक्टर सलीम अली  मुसलमान, गामा पहिलवान मुसलमान, वैज्ञानिक डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मुसलमान, शहनाईचे फनकार उस्ताद बिस्मिल्लाह खान मुसलमान, तबलावादक जाकिर हुसैन मुसलमान,   भारताला ज्याने प्रथम: ऑस्कर मिळवून दिले ते संगीतकार ए आर रहमान मुसलमान, भारताचे चार राष्ट्रपती जाकिर हुसैन, मुहम्मद हिदायतुल्लाह, फकरुद्दीन अली अहमद, डॉ. ए पी  जे कलाम मुसलमान. भारतात प्रत्येक क्षेत्रात मुसलमान पुढेच मग भारत आमचा का नाही?
आज भारताची जी जगावर छाप आहे त्यात इतराप्रमाणे आमचा पण सिंहाचा वाटा आहे, भारताच्या वैज्ञानिक, शैक्षणिक, कृषी, व्यपार, सामाजिक, राजनीतिक, क्रीडा इ. सर्वच क्षेत्रांत  भारताच्या विकासात मुसलमान सामील, तरी पण आमचेच देशबांधव आम्हाला परके समजतात. ‘हम ही जब न होंगे तो क्या रंगे मह़िफल’ अर्थात; आमच्याविना तुमचे मन कसे  रमणार? या भारताच्या ओटीत झालेल्या संगोपनाच्या उपकाराची परतफेड करत या देशाला वैभव, संपत्ती, नावलौकिक आम्ही मिळवून दिले, तर मग आमच्यावरच आरोप का की  आम्ही वफादार नाही?
ते आम्हीच होतो जेव्हा बहादूर शाह चित्तौडवर आक्रमण करण्यास निघाला तेव्हा एक हिंदू राणी कर्णवतीने जेव्हा आपल्या मदतीसाठी आपल्या मानलेल्या भावाला- हुमायूँला बोलविले  तेव्हा ह़जारों सैन्याची फौज घेवून तो राणीच्या मदतीला धावला. ते आम्हीच होतो जेव्हा एका स्त्रीच्या अब्रूवर बेतले तेव्हा तिला न्याय मिळवून देण्याकरिता मुस्लिम राजाने आपल्या   निकटवर्ती मुस्लिम इसमास मृत्युदंडाची शिक्षा दिली. शिवाजी महाराज कसे होते त्यांचा चित्र काढून शिवाजी महाराजांचा देखणा चेहरा जगासमोर आणणारा मुसलमान. शिवाजी  महाराजांचे सच्चे वफादार आम्हीच होतो. बाळ ठाकरे साहेबांच्या अखेरच्या दिवसांत त्यांचा जीव वाचविन्यासाठी जो डॉक्टर धडपड करीत होता तो मुसलमान. उत्तर प्रदेशात लहान  बाळांचा जीव वचवीणारा डॉक्टर कफील पण मुसलमान. इतका असून सुद्धा आमचे देशबांधवांच्या मनात आमच्याविषयी द्वेषाची भावना का?
भारताचा स्वर्ग काश्मीर आबाद आमच्यामुळे, चाँदनी चौकची सुंदरता आमच्यामुळे, लखनौची ऩजाकत आमच्यामुळे, दिल्लीची सभ्यता आमच्यामुळे, इतकेच नव्हे तर मुरादाबादची भांडी  आमची, फिरोजाबादची चूड़ी-बांगड़ी आमची, बनारसची साड़ी आमची, अलीगढचे कुलूप आमचे, मालेगांव-भिवंडीचे कापड आमचे, जेव्हा एवढे काही आम्ही या देशाला दिले तर मग का 
भारत आमचा देश नाही?
का स्वतंत्र्यानंतर ७० वर्ष होऊन सुद्धा आमच्या देशप्रेमावर प्रश्नचिन्ह आहे? या देशाच्या मातीत आमचाही रक्त, घाम मिसळलेले आहे. याच्या बंजर जमिनीला कष्टाने आम्ही पण  सुपीक केले. या देशाची सुरक्षा व शांतीसाठी सीमारेषेवर आम्ही सुद्धा अहोरात्र उभे आहोत. मग का आमच्यावर दहशतवादचा आरोप लावला जातो?
हे मान्य आहे आज आमची आपल्याच देशात किंमत शून्यसारखी आहे पण माझ्या देशबांधवांनो, हे लक्षात ठेवा, आम्ही ते शून्य आहोत जे एकत्र आल्यास त्याची किंमत दहा करते,  दहासोबत जोडल्यास त्याला शंभर करते आणि शंभरसोबत जर जोडले गेले तर त्याची किंमत हजार करू शकते. पण माझ्या देशबांधवांनो, तुम्ही जर आम्हाला हटविण्याचा प्रयत्न केला  तर तुमचाही फायदा होणार नाही, कारण जसे शून्य हटविल्यानंतर फक्त एकच उरते, त्याच प्रकारे तुम्ही पण एकटेच पडणार. हा देश आमचा आहे, आमचा प्रिय भारत! आणि आम्ही   याच्यासाठी काय नाही केले, याच्या उन्नतीकरिता आम्ही जीवाचे रान केले. हा देश आमचा आहे, या देशातील प्रत्येक वस्तूवर आमचा पण बरोबरीचा वाटा आहे आणि आम्हाला वगळून  या देशाची कल्पना रंगहीन व अर्थहीन आहे. म्हणूनच असे म्हणणे चुकीचे नाही की,

‘हम ही जब न होंगे तो क्या रंगे मह़िफल’!

-शेख साबेर, टेंभुर्णी, जालना
मोबाइल: ९४२१३२७०३४

लातूर (शादाब शेख)
- स्टूडंटस् ईस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडीया, लातूर शहर शाखेच्या वतीने शहरातील सात खाजगी व एक मनपा शाळेतील तब्बल 200 होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक  साहीत्याचे वाटप करण्यात आले. शहरातील डॉ. इक्बाल ऊर्दू गर्ल्स हायस्कूल, हजरत सूरतशाह वली ऊर्दू स्कूल, मौलाना आझाद स्कूल, अलफलाह ऊर्दू हायस्कूल, रूकय्याबेगम ऊर्दू  स्कूल, एच.पी हायस्कूल, सिटीझन प्रायमरी स्कूल व खाडगाव रोड येथील म.न.पा. शाळेचा समावेश होता. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत ज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यात  आले व जीवनात ऊंच भरारी घेण्याकरीता करावे लागणारे प्रयत्न यावर सखोल मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या स्तूत्य उपक्रमात वरील नमूद शाळांतील  सर्व शिक्षकांचे व शाळा व्यवस्थापन समितीचे मोलाचे सहकार्य लाभले. याप्रसंगी शहराध्यक्ष अली हैदर पटेल, सचिव अब्दूल्लाह मनियार, डॉ.मिर्झा तंजील बेग, इंजी.शादाब शेख, एच.पी.शाळेचे मुख्याध्यापक प्रा.मजहर शेख, अहमद सर,पर्यवेक्षक मठपती सर तसेच खाडगाव रोड येथील म.न.पा.शाळेचे वैजापूरे सर, स्थानिक नगरसेवक मा.अय्यूब मनियार, इक्बाल   ऊर्दू शाळेचे कादरी सर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. या अमूल्य कार्यात संघटनेच्या सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.

प्रा. फ. म. शहाजिंदे शहाजिंदे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार साताऱ्यात संपन्न


सातारा : (कलीम अजीम)
जे अनुभवले, जगताना जे भोग वाट्याला आले ते प्रामाणिकपणे लिहीत गेलो. माझ्या लिहिण्यामुळे कुणाचे नुकसान होईल, असे काहीच लिहिले नाही. कुणाला बरे वाटेल, कुणातरी  चांगले वाटावे म्हणून मी कधीही लिहिले नाही. जे माझ्या संवेदनशील मनाला लिहिण्यासारखे, लोकांना सांगण्यासारखे वाटले, ते लिहीत गेलो, असे विधान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. फ. म.   शहाजिंदे (लातूर) यांनी सातारा येथे काढले. प्रा. शहाजिंदे पंच्चाहत्तरीत पदार्पण करत आहेत, या अमृत महोत्सवानिमित सातारा येथे त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात   आला होता, त्याला उत्तर देताना प्रा. शहाजिंदे यांनी आपला लेखन प्रवास उलगडून दाखविला. मुस्लिम जागृती अभियान व परिवर्तनवादी संघटना यांच्या वतीने शहरातील पाठक भवन  येथे सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या निमित्ताने प्रा. शहाजिंदे लिखित ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ या पुस्तकाचा डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा झाला. यावेळी इतिहास संशोधक सरफराज अहमद,  मिनाज सय्यद, सत्याग्रही विचारधाराचे सहसंपादक कलीम अजीम, साहिल कबीर, प्रा. पुरुषोत्तम शेठ, संध्या चौगुले हे मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना शहाजिंदे पुढे म्हणाले, हितसंबंध जोपासण्यासाठी, कुणाला चांगले म्हणण्यासाठी मी कधीही लिहिले नाही, मी मराठी मुसलमान आहे, मी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष मराठीचे अध्यापन केले. मुसलमान असून मराठी बोलतो! त्याला मराठी बोलता येते का? तो कसला मराठीचा प्राध्यापक? तो मटन खाणारा? तो चार लग्न करणारा? इत्यादी  असा शेलक्या भाषेत मला हिणवण्यात आले. पदोपदी माझ्या भारतीयत्वाचा पुरावा मागितला गेला, जातीभेदाच्या अनेक वेदना माझ्या वाट्याला आल्या. समाजातील अभिजन व्यवस्थेने  जे मला जे भोग दिले त्यातून भरमसाठ वेदना माझ्या वाट्याला आल्या, त्या वेदनांनी मला लिहायला भाग पाडले आणि मी लिहिता झालो, असे सांगून शहाजिंदे म्हणाले की,  मराठवाड्यातील खेड्यात राहणाऱ्या एका मुस्लिम माणसाचा सत्कार सातारा येथे होतोय ही आजच्या काळात फार दुर्मिळ गोष्ट आहे. असे प्रसंग माझ्या जीवनात आले नाहीत. ही   संस्मरणीय घटना आहे. ‘दखलपात्र शब्दांचा उरूस’ पुस्तकाच्या लोकार्पण सोहळ्यानंतर डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर यांनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकरांच्या विवेकवादी धोरणावर प्रकाश टाकला. शहाजिंदे यांच्या लेखनातून याच महापुरुषाचा विचार आपल्यासमोर येतो, असेही दाभोलकर म्हणाले. इस्लाम आमि मुस्लिम समाजाचे सामाजिक  चारित्र्य सोयीने विकृत केले जात आहे, असे प्रतिपादन इतिहास संशोधक सरफराज अहमद यांनी केले. अनेक महापुरुषांनी इस्लामचा विचार मानवी कल्याणाचा विचार म्हणून मांडला,  पण हे अलीकडे विसरून इस्लामचा विकृत चेहरा मांडण्यातच अनेकजण अग्रणी आहेत, सुधारणावाद्यांनी ऐकिव माहितीवर नाही तर इस्लामला वाचून समजून घ्यावे, त्याशिवाय  त्यांचे  जनकल्याणाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असेही सरफराज अहमद म्हणाले. स्वागत मिनाज सय्यद यांनी तर प्रास्ताविक मुस्लिम जागृती अभियानचे मुजफ्फर सय्यद यांनी केले.  सूत्र संचालन साहित्यिक व कवी साहिल कबीर यांनी केले. यावेळी मुजावर खान, नंदकुमार चोरगे, डॉ. वैशाली चव्हाण, डॉ. अनिमिष चव्हाण, विजय मांडके, दिनकर झिंब्रे, सय्यद  गुरुजी, कॉ. किरण माने, सुधीर पवार, प्रा. सुनील गायकवाड, डॉ. राजश्री देशपांडे, जयंत उथळे, दिलिप ससाणे, दिलीप गलांडे, आरिफ बागवान, सलीम आतार आदी मान्यवर उपस्थित होते.

नागपूर (डॉ. रशीद)
हज यात्रेपूर्वी शुद्ध मनाने आतापावेतो केलेल्या सर्व गुन्ह्यांची माफी अल्लाहकडे मागावी. हजला जाण्यापूर्वी कोणाचा हक्क अदा करावयाचा असल्यास तो अदा करून टाकावा. कोणाची  काही चीज वस्तू अमानत असेल तर ती ज्याची त्याला परत करून टाकावी आणि हे सर्व झाल्यानंतर स्वतःच्या हलाल संपत्तीतून हज करावे. असे नाही झाले तर केलेला हज वाया  जाईल, अल्लाहकडे तो हज कदापी स्वीकार्ह होणार नाही. एवढेच नव्हे तर शिर्क (अल्लाहसोबत दुसऱ्या कोणालाही ईश समजणे), बहुदेववाद इत्यादीपासून स्वतः ला वाचविणे जरूरी आहे.  नसता सर्व पुण्यकर्म वाया जातील, असे मत सुमैया समरीन यांनी हजला जाणाऱ्या यात्रेकरूंसमोर व्यक्त केले.
त्या नागपूरच्या जाफर नगर टीचर्स कॉलनीमधील मर्कज मस्जीदच्या सभागृहामध्ये जमाअते इस्लामी हिंद नागपूर पश्चिमच्या महिला विभागाद्वारे आयोजित हज यात्रेवर जाणाऱ्या संमेलनात बोलत होत्या. जेबा खान यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.

१. माननीय उमर बिन खत्ताब (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की कर्मांची भिस्त फक्त दृढनिश्चयावर आहे आणि मनुष्याला ते सर्व मिळेल ज्याचा   त्याने निश्चय केला असेल, अल्लाह आणि पैगंबरांसाठी केलेली ‘हिजरत’ उत्तम ‘हिजरत’ होय आणि भौतिक जगासाठी केलेली अथवा एखाद्या महिलेशी विवाह करण्यासाठी असलेली  ‘हिजरत’ या जगासाठी अथवा महिलेसाठीच समजली जाईल. (बुखारी व मुस्लिम)
२. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले की अल्लाह तुमचा चेहरामोहरा आणि तुमच्या संपत्तीला पाहणार नाही तर तुमची हृदये आणि  तुमच्या कर्मांना पाहील. (मुस्लिम)
३. माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे सांगताना ऐकले की अंतिम निवाड्याच्या (‘कयामत’च्या) दिवशी सर्वप्रथम एका अशा   मनुष्याच्या बाबतीत निर्णय देण्यात येईल ज्याला हौतात्म्य लाभले असेल, त्याला अल्लाहच्या न्यायालयात उभे केले जाईल. मग अल्लाह त्याला आपल्या सर्व देणग्यांची आठवण करून  देईल आणि त्याला त्या सर्व देणग्या आठवतील तेव्हा विचारले जाईल, ‘‘तू माझ्या देणग्या प्राप्त करून कोणते काम केले?’’ तो म्हणेल, ‘‘मी तुझ्या प्रसन्नतेसाठी (तुझ्या जीवनधर्माचा  (‘दीन’चा) विरोध करणाऱ्यांविरूद्ध) युद्ध केले, इतकेच नव्हे तर मी आपले प्राण दिले.’’ अल्लाह त्याला म्हणेल, ‘‘तू ही गोष्ट खोटी सांगितली की माझ्यासाठी युद्ध केले, तू फक्त यासाठी  युद्ध केले (आणि शौर्य दाखविले) की लोकांनी तुला शूरवीर म्हणावे. मग जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘त्या हुतात्म्याला तोंडघशी फरफटत घेऊन जा  आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला नरकात टाकले जाईल. मग एक दुसरा मनुष्य अल्लाहच्या न्यायालयात उभा केला जाईल, तो ‘दीन’ (जीवनधर्म) चा ज्ञानी आणि ‘दीन’  शिकविणारा असेल. त्याला अल्लाह आपल्या देणग्यांची आठवण करून देईल आणि त्याला सर्व देणग्या आठवतील. तेव्हा त्याला विचारले जाईल, ‘‘त्या देणग्या प्राप्त करून तू कोणते   कर्म केले?’’ तो म्हणेल, ‘‘हे अल्लाह! मी तुझ्यासाठी तुझ्या ‘दीन’चे ज्ञान प्राप्त केले आणि तुझ्यासाठी दुसऱ्यांना त्याचे ज्ञान दिले आणि तुझ्यासाठी पवित्र कुरआनचे पठण केले.’’   अल्लाह म्हणेल, ‘‘तू खोटे सांगत आहेस. लोकांनी तुला ‘आलिम’ (विद्वान) म्हणावे यासाठी तू ज्ञान प्राप्त केले, लोकांनी तुला कुरआन जाणणारा म्हणावे यासाठी तू कुरआनचे पठण   केले; तेव्हा जगात तुला त्याचा बदला मिळाला.’’ मग आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत घेऊन जा आणि नरकात फेकून द्या.’’ तद्वत त्याला फरफटत नेण्यात आले आणि   नरकात फेकण्यात आले. आणि तिसरा मनुष्य तो असेल ज्याला अल्लाहने जगात ऐशोआराम प्रदान केला होता आणि प्रत्येक प्रकारची संपत्ती दिली होती. या मनुष्यास अल्लाहसच्या  समोर हजर केले जाईल आणि तो आपल्या सर्व देणग्या सांगेल आणि त्याला अल्लाहच्या सर्व देणग्या आठवतील आणि मान्य करील की होय, या सर्व देणग्या त्याला देण्यात आल्या  होत्या. तेव्हा त्याचा पालनकर्ता त्याला विचारील, ‘‘माझ्या देणग्या प्राप्त करून तू कोणते कर्म केले?’’ तो उत्तर देईल, ‘‘जेथे जेथे खर्च करणे तुला पसंत होते तेथे मी तुझी प्रसन्नता  प्राप्त करण्यासाठी खर्च केले.’’ अल्लाह म्हणेल, ‘‘खोटे बोलतोस. तू ही सारी संपत्ती लोकांनी तुला दानशूर म्हणावे यासाठी खर्च केलीस. मग त्याच्या बदला तुला जगात मिळाला.’’  मग  आदेश देण्यात येईल, ‘‘याला तोंडघशी फरफटत न्या आणि नरकाच्या आगीत फेकून द्या.’’ तद्वत त्याला नेऊन नरकाच्या आगीत फेकून देण्यात येईल.

(हदीस : सही मुस्लिम)

(१५२) याविरूद्ध जे लोक अल्लाह आणि त्याच्या सर्व पैगंबरांना मानतील आणि त्यांच्या दरम्यान फरक करणार नाहीत, त्यांना आम्ही अवश्य त्यांचा मोबदला प्रदान करू१७९ आणि  अल्लाह मोठा क्षमा करणारा व दया करणारा आहे.१८०
(१५३) हे पैगंबर (स.)! हे ग्रंथधारक जर आज तुमच्याकडे मागणी करीत आहेत की तुम्ही आकाशातून एखादे लिखित त्यांच्यावर उतरवा१८१ तर याहून वरचढ अपराधयुक्त मागण्या  यांनी पूर्वी मूसा (अ.) यांच्याजवळ केल्या आहेत. त्याला तर यांनी सांगितले होते की आम्हाला जाहीररीत्या ‘अल्लाह’ प्रत्येक दाखवा आणि त्यांच्या याच उदंडतेमुळे अकस्मात त्यांच्यावर  वीज कोसळली१८२ होती. मग त्यांनी वासराला आपला उपास्य बनविला. वस्तुत: यांनी उघड उघड संकेतचिन्हे पाहिली होती,१८३ याउपरदेखील आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही मूसा  (अ.) यांना स्पष्ट फर्मान प्रदान केले,
(१५४) आणि या लोकांवर तूर पर्वताला उचलून यांच्याकडून (या फर्मानाच्या पालनाची) प्रतिज्ञा घेतली.१८४ आम्ही यांना आदेश दिला की दरवाजातून नतमस्तक होऊन दाखल व्हा.१८५  आम्ही यांना सांगितले की ‘सब्त’च्या कायद्याचा भंग करू नका आणि यावर यांच्याकडून पक्के वचन घेतले.१८६
(१५५) सरतेशेवटी यांच्या प्रतिज्ञाभंग करण्यामुळे आणि या कारणास्तव   की यांनी अल्लाहच्या वचनांना खोटे ठरविले आणि अनेक पैगंबरांना नाहक ठार केले आणि इथपर्यंत सांगितले  की आमची हृदये आवरणांत सुरक्षित आहेत.१८७ वस्तुत:१८८ खरे पाहता यांच्या असत्यप्रियतेमुळे अल्लाहने यांची हृदये मोहरबंद केली आहेत. आणि यामुळेच हे फारच कमी श्रद्धा  ठेवतात.




१७९) म्हणजे जे अल्लाहला आपला एकमेव उपास्य आणि स्वामी मानतात आणि त्याच्या सर्व पैगंबरांचे अनुयायित्व स्वीकारतात, असेच लोक आपल्या कर्मांचा मोबदला प्राप्त् करण्यास  योग्य आहेत. हे जसे सत्कर्म करतील तसा त्यांना मोबदला मिळेल. राहिले ते लोक ज्यांनी अल्लाहच्या प्रभुत्वाचा आणि अधिपत्याचा स्वीकार करतांना दुसऱ्याला त्याचा भागीदार  बनविले आणि ज्यांनी त्याच्या पैगंबरांपैकी कोणाला मानले किंवा कोणाला मानले नाही; अशा विद्रोही लोकांचे केले सवरले सर्व वाया जाणार कारण अशा लोकांचे कोणतेच कर्म अल्लाहजवळ विधीसंगत कृत्य नाही.
१८०) म्हणजे जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान धारण करतील त्यांचा हिशेब अल्लाह कठोरपणे घेणार नाही. तर त्यांच्यासाठी अत्यंत नरमाईने आणि क्षमाशीलतेने काम घेतले जाईल.
१८१) मदीना येथील यहुदी लोक पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी विचित्र मागण्या करीत असत. त्यापैकी एक ही होती की आम्ही आपले पैगंबरत्व तोपर्यंत मान्य करणार नाही जोपर्यंत  आमच्या डोळयादेखत एक लिखित ग्रंथ आकाशातून उतरत नाही किंवा आकाशातून लेखी आमच्या प्रत्येकाच्या नावावर लेख यावे ज्यात पैगंबर मुहम्मद (स.) हे अल्लाहचे पैगंबर आहेत  आणि त्यांच्यावर ईमान धारण करा असे नमूद केलेले असावे.
१८२) येथे एखाद्या घटनेचे विस्तृत विवरण देणे अपेक्षित नाही तर यहुदी लोकांच्या अपराधांची संक्षिप्त् सूची देणे हा उद्देश आहे. म्हणून त्यांच्या समष्टी इतिहासातील काही ठळक  घटनांकडे धावते संकेत केले आहे या आयतीत ज्या घटनेचा उल्लेख आहे ते सूरह अल्बकरा आयत नं. ५५ मध्ये आलेली आहे. (पाहा सूरह २, (अल्बकरा, टीप ७१)
१८३) स्पष्ट निशाण्यांशी अभिप्रेत त्या निशाण्या आहेत ज्या आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांना पैगंबरत्व बहाल केल्यानंतर अवतरित झाल्या. फिरऔन समुद्रात बुडणे आणि  बनीइस्त्राईलचे इजिप्त्मधून बाहेर पडण्यापर्यंतच्या काळात निरंतर त्या काळातील लोकांच्या अवलोकनात त्या निशाण्या आल्या होत्या. स्पष्ट आहे की इजिप्त्च्या साम्राज्याच्या  महाशक्तीच्या पंज्यातून ज्याने बनीइस्राईलींना सोडविले होते ते काही गाईचे वासरू नव्हते, तो तर समस्त सृष्टीचा निर्माणकर्ता व पालनकर्ता अल्लाह होता. परंतु त्या काळातील लोकसमुदायाच्या असत्यतेचा तो उच्चंक होता की अल्लाहचे सामथ्र्य आणि अल्लाहची मेहरबानीच्या अनेक ज्वलंत निशाण्या त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या तरी तो समुदाय आपल्या  उपकारकर्त्या अल्लाहपुढे झुकला नाही तर गाईच्या वासरूच्या कृत्रिम मूर्तीपुढे नतमस्तक झाला!
१८४) स्पष्ट आदेश म्हणजे आदरणीय पैगंबर मूसा (अ.) यांना शिलालेखावर लिहून दिलेले आदेश होते. पुढे कुरआन मध्ये ७ : ४३ याचा उल्लेख तपशीलासह येणार आहे. प्रतिज्ञेशी  अभिप्रेत ते वचन आहे जे तूर पर्वतावर बनीइस्राईलच्या प्रतिनिधीकडून घेण्यात आले होते. कुरआन २ : ६३ मध्ये याचा उल्लेख आलेला आहे आणि सूरह ७ आयत १७१ पुन्हा  याविषयीचा उल्लेख येणार आहे.
१८५) तपशीलासाठी पाहा सूरह २ (अल्बकर) आयत, ५८-५९ तसेच अल्बकराची टीप नं. ७५.
१८६) तपशीलासाठी पाहा, सूरह २ आयत ६५ तसेच अल्बकराची टीप नं. ८२-८३.
१८७) म्हणजे तुम्ही काहीही म्हणा आमच्या मनावर ह्याचा काहीच परिणाम होणार नाही. यहुदीच्या या कथनाकडे कुरआन २:८८ मध्ये संकेत आलेला आहे. खरेतर हे लोक सर्व  असत्यवादी अज्ञानी लोकांच्या प्रमाणे गर्व करतात की ज्या धारणा, रूढी-परंपरा आणि कर्मकांड आम्ही आमच्या पूर्वजांकडून प्राप्त् केलेल्या आहेत, त्यांच्यावर आमचा दृढविश्वास आहे.  तसेच कोणत्याही स्थितीत आम्ही त्यांच्यापासून अलग होऊ शकत नाही. (पाहा, सूरह २ (अल्बकरा) टीप नं. ९४)
१८८) हे ते वाक्य आहे ज्यात संदर्भापासून दूर जाऊन दुसरी गोष्ट सांगितली गेली आहे.

ब्रिटीश प्रसारमाध्यमे मुस्लिम समुदायाविषयी नकारात्मक बातम्या देऊन मुस्लिमांची प्रतिमाच नकारात्मक करत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘मुस्लिम काऊन्सिल ऑफ ब्रिटन’  (एमसीबी) या संस्थेच्या ‘सेंटर फॉर मीडिया मॉनिटरींग’ विभागाने ब्रिटीश माध्यमांच्या वार्तांकनावर नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आले आहे. ब्रिटीश माध्यमांच्या अशा  वार्तांकनामुळे ‘इस्लामोफोबिया’ वाढत असल्याचेही या संशोधनात म्हटले आहे. बहुतांश ब्रिटीश प्रसारमाध्यमे इस्लाम आणि मुस्लिम समुदायाविषयी नकारात्मक आणि दिशाभूल करणारे  वृत्त प्रसारित करत असतात. त्यामुळे इस्लामफोबिया म्हणजेच मुस्लिमांविषयी भीती किंवा आकस तयार होण्यास यामुळे मदत होत असल्याचे या संशोधनात सांगण्यात आले आहे.  तीन तुकड्यात हे संशोधन प्रकाशित केले जाणार असून त्यातील हा पहिला अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. यात ब्रिटीश प्रसारमाध्यमांनी मुस्लिम समुदायाविषयी केलेल्या  वार्तांकनाविषयी काही तथ्ये मांडण्यात आली आहेत. ऑक्टोबर २०१८ पासून ब्रिटनमधील वृत्रपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरच्या ११,००० लेख आणि कार्यक्रमांचा अभ्यास करुन हा अहवाल  मांडण्यात आला आहे. ज्या पद्धतीने ब्रिटीश माध्यमांनी इस्लाम किंवा मुस्लिमांविषयी वार्तांकन केले आहे ते गंभीर असल्याचे संशोधकाने म्हटले आहे. वृत्तवाहिन्यांवरच्या डिबेट शोमधून  (चर्चासत्रांतून) काही उजव्या विचारसरणीचे नेते आणि प्रवक्ते इस्लाम आणि मुस्लिमांविषयी पूर्वग्रह पसरवत असल्याचे मतही यात व्यक्त करण्यात आले आहे. संशोधनानुसार, या  कालावधीत प्रिंट मीडियामध्ये प्रकाशित झालेल्या ५९ टक्के बातम्या आणि लेखांमध्ये मुस्लिम समुदायाचे नकारात्मक वर्तन अधोरेखित करण्यात आले आहे. तर एकतृतीयांशपेक्षा अधिक  लेखांमध्ये चुकीची माहिती देण्यात आली आहे किंवा सरसकट संपूर्ण समुदायाविषयी नकारात्मकता तयार करण्यात आली आहे. एकट्या ‘मेल ऑन संडे’ या वृत्तपत्रातील ७८ टक्के   बातम्या या ब्रिटनमध्ये राहणाऱ्या मुसलमानांविषयी नकारात्मकता दाखवणाऱ्या होत्या. वृत्तवाहिन्यांमध्ये ‘स्काय न्यूज’मध्ये सर्वाधिक दिशाभूल करणारे वार्तांकन करण्यात आले आहे.  या वाहिनीवर प्रसारित झालेले १४ टक्के व्हिडीओ हे अतिशय पक्षपाती होते. प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये मुस्लिमांविषयी तुलनेने सकारात्मक वार्तांकन केले जाते. विशेषत: ‘आय  टीव्ही’च्या प्रदेशिक वाहिन्यांवर मुस्लिमांविषयी पक्षपाती असेल असे कोणतेही प्रसारण केले जात नाही. ‘सेंटर फॉर मीडिया मॉनिटरींग’ला आशा आहे की, मुस्लिम आणि इस्लामवर  वार्तांकनांची ही उदाहरणे पत्रकारांसाठी महत्त्वाची ठरतील’, असे या अहवालाचे सह-लेखक पैâसल हनीफ यांना वाटते. माध्यमांद्वारे करण्यात आलेल्या वार्तांकनाचा परिणाम तेथील  नागरिकांवर झाल्याचे दिसून येते. ‘होप नॉट हेट’ या मोहिमेचे सदस्य यूगोव्ह पोल यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार ६० टक्के लोकांना इस्लाम पाश्चात्य संस्कृतीला धोका असल्याचे वाटते,  तर ५० टक्क्यांहून अधिक लोकांच्या मते इस्लाम ब्रिटिशांच्या जीवनाला धोका आहे. ‘मुस्लिम काऊन्सिल ऑफ ब्रिटन’चे मिकदाद वर्सी आपला हा अहवाल सादर करताना म्हणतात की  मुस्लिमांबद्दलचे नकारात्मक वार्तांकन ते थांबवू इच्छित नाहीत, मात्र आपण केलेल्या वार्तांकनाचा कल कोणता आहे हे समजून घेणे पत्रकारांचे काम आहे. पत्रकारांनी फक्त दहशतवाद   आणि अतिरेक्यांवर लक्ष केंद्रित न करता मुस्लिमांबाबतचे सकारात्मक आणि सत्य घटनांचे प्रसारण त्यांनी करावे. आपण लिहिलेले नकारात्कम लेख योग्य आणि सत्यघटनांवर  आधारित असावेत. त्यांचा सर्वसाधारणपणे मुस्लिम समाजावर वाईट परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. वर्सी यांनी ब्रिटीश प्रसारमाध्यमांमध्ये मुस्लिमांच्या चांगल्या  प्रतिमांच्या प्रचारात यशस्वी झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांच्या देखरेखीसाठी मुस्लिम काऊन्सिलद्वारे मुस्लिम मीडिया मॉनेटरिंगची स्थापना केली. ‘ब्रॉडकास्टिंग कोड’मुळे ब्रिटीश  टेलिव्हिजनवर मुस्लिमांच्या नकारात्मक प्रतिमा सादर करण्याचे प्रमाण तेथील वृत्तपत्रांपेक्षा तुलनेने कमी असल्याचे आढळून येते. त्यामुळे स्थानिक दूरदर्शन प्रसारणांमध्ये इस्लाम  आणि मुस्लिमांविषयी सकारात्मक वार्तांकन आणि कथा दर्शविल्या जातात. मुस्लिमांविषयी बातम्या प्रसारित करताना बुरखा घातलेली स्त्रीचे चित्र देणे अनेक वृत्तपत्रांच्या संपादकांना  योग्य वाटते. मात्र आपल्या वार्तांकनाद्वारे मुस्लिम वाचक कसे आकर्षित होतील याकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे, असा सल्लाही या अहवालाद्वारे देण्यात आलेला आहे. इस्लाम आणि  मुस्लिमांविषयीच्या प्रसारमाध्यमांची भूमिका ‘इस्लामोफोबिया’ खतपाणी घालते, हे सेन्सॉरशिप नसून पारदर्शकता आहे. या मीडियातील इस्लामोफोबियाच्या रोगाची सुरूवात यूरोपातून  संपूर्ण जगभर पसरली आहे. भारतदेखील त्यास अपवाद नाही. ‘अमेरिकन मुस्लिम पॉल : २०१९’ या अहवालाच्या लेखिका आणि ‘इन्स्टिट्यूट फॉर सोशल पॉलिसी अ‍ॅण्ड अन्डरस्टँडिंग  (आयएसपीयू) च्या संशोधन संचारिका दलिया मॉगाहेद यांनी म्हटले आहे की सुमारे ५० टक्के अमेरिकनांना त्यांच्या वास्तविक जीवनात मुस्लिम माहीतच नाहीत आणि उर्वरित पन्नास  टक्क्यांना मीडियावर अवलंबून राहावे लागते. मात्र इस्लाम आणि मुस्लिमांबद्दलचे अमेरिकन मीडियाचे ८० वार्तांकन नकारात्मक असल्याचे आढळून येते. हे सर्व मोडून काढून जागतिक  पातळीवर सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा विडा मॉगाहेद आणि मिकदाद वर्सी यांच्यासारख्या लोकांनी उचलण्याची आवश्यकता आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

आदरणीय जाबीर (रजी.) कथन करतात की, आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) जेव्हा प्रवासात निघत तेव्हा सगळ्यांच्या (काफीला) पाठीमागे चालत. कृश, कमजोर लोकांना आपल्या  वाहनावरती (उंटावर) बसवून घेत आणि त्याच्यासाठी प्रार्थना करीत असत. (अबु दाऊद) आदरणीय अनस (रजी.) प्रेषिताविषयी आपला अनुभव सांगतात की, प्रेषित (स.) आजारी  व्यक्तिची विचारपूस करीत. अंत्ययात्रेमध्ये सामिल होत होते. नोकर आणि गुलामांचे निमंत्रण स्विकारीत. (बहकी)
आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) चे जीवन सर्व जगातील मानवांसाठी एक आदर्श मॉडेल आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक झळाळी, चमक देतो. त्याच्या  जीवनातील प्रत्येक क्षण अनुकरणीयच नव्हे तर मानवांसाठी मार्गदर्शन आहे. त्यांचे जीवन एक खुले पुस्तक आहे ज्याच्या प्रत्येक पानावर आम्हाला जीवन जगण्यासाठी प्रकाश आहे जो  जीवनाच्या कठीणतम मार्गात सुद्धा मार्गदर्शन करीत असतो. प्रेषिताचे जीवन राजे महाराजासारखे नव्हते तर समाजातील एकत्र सामान्य माणसाच्या जीवनासारखे होते. असामान्य  व्यक्तिमत्वाचे सामान्य जीवन होते. समाजातील प्रत्येक मागासाबरोबर ते सहजपणे मिसळत, जेणेकरून त्या सामान्य माणसाला प्रेषित आपलेच आहेत असे वाटावे.
आदरणीय जाबीर हे प्रेषितांचे सहयोगी होते. ते आपल्या अनुभव कथन करतात आणि हा अनुभव प्रवासातील आहे. प्रेषित (स.) जेव्हा प्रवासात निघत तेव्हा त्यांच्या बरोबर पुष्कळ  लोक असत. ज्याप्रमाणे अरबस्तानात त्याकाळी लोक जत्थ्यांनी प्रवासाला निघत. जेव्हा हे जत्थे निघत तेव्हा जत्त्थाचा प्रमुख सर्वात पुढे असायचा. पण जेव्हा प्रेषित (स.) प्रवासाला  निघत तेव्हा ते जत्थाच्या सर्वात शेवटी राहत. प्रवास करत ह्याला कारण म्हणजे ते सर्व जत्थाधील सर्वांची काळजी घ्यायचे, सर्वांकडे लक्ष द्यायचे, कुणी जत्थ्यामधून सुटला तर नाही  ना? ह्याची देखरेख ते स्वत: करायचे. आजारी, कमजोर, वृद्ध लोकांना आपल्या वाहनावरती बसवून घेऊन जात. म्हणजेच ह्या लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांची आपलुकीने काळजी  घेत. येवढे करून आदरनीय प्रेषित थांबत नसत तर परमदयाळू अल्लाहपाशी त्या सर्व आजारी, वृद्ध लोकांसाठी दुआ (प्रार्थना) करीत. जगात अनेक महापुरुष होऊन गेले पण ह्या  पद्धतीने आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेणारा विरळाच. म्हणून तर त्यांचे सहकारी त्यांचा अत्यंत आदर करीत, त्यांना जावापलीकडे जपत, त्यांच्या आज्ञा तंतोतंत पाळीत. एकदा  मशीदीत प्रेषित प्रवचन देत होते, समोर काही लोक उभे होते. प्रेषितांना बसण्यास सांगीतले. ते उभे असलेले तर खाली बसले, परंतु ज्यांनी हे ऐकले ते बसले म्हणजेच मशीदीच्या बाहेर  जे लोक होते ते सुद्धा बसले. असे आज्ञापालन व्हायचे. प्रेषितांच्या आदेशाचे ह्याला कारण म्हणजे प्रेषितांचे सर्वाबरोबर प्रेमळ वागणे होय.
दुसऱ्या कथनात प्रेषितांचे दुसरे एक अनुयायी आपला अनुभव कथन करतात. आदरणीय प्रेषित आजारी माणसांची नेहमी विचारपूस करीत. आदरणीय प्रेषित, जेव्हा त्यांना माहीत होई   की, क्ष व्यक्ति आजारी आहे, तेव्हा ते स्वत: त्या आजारी व्यक्तिच्या घरी जात. त्याच्या कपाळावर हात ठेवित. त्याला काही सूचना करीत. त्याला धीर देत आणि परतताना त्याच्या  आरोग्यासाठी अल्लाहपाशी दुआ करीत. आजारी माणसाची विचारपूस करणे हे सत्कृत्य मानले गेले. प्रेषित नेहमी कामात अग्रेसर राहत. जेव्हा जेव्हा कुणाचा मृत्यू होत असे तेव्हा  प्रेषित त्याच्या अंतयात्रेमध्ये स्वत: सामील होत होते. मग तो गरीब असो की श्रीमंत. अंत्ययात्रेत सामील होऊन प्रेषित कबरस्तानापर्यंत जात. मयत व्यक्तिबद्दल अल्लाहशी दुआ करीत  आणि मयताचा दफनविधी होईपर्यंत थांबत.

(१४४) हे श्रद्धावंतांनो! श्रद्धावंतांना सोडून इन्कार करणाऱ्या अधर्मींना आपले मित्र बनवू नका. काय तुम्ही इच्छिता की अल्लाहला स्वत:च्याविरूद्ध उघड पुरावा द्यावा?
(१४५) खात्री बाळगा की ढोंगी नरकामध्ये सर्वात खालच्या थरात जातील आणि तुम्हाला त्यांचा सहाय्यक कोणीच आढळणार नाही.
(१४६) परंतु यांच्यापैकी जे पश्चात्ताप करतील आणि आपल्या वागणुकीत सुधारणा करतील आणि अल्लाहशी बांधील राहतील आणि आपला धर्म फक्त अल्लाहसाठीच निर्भेळ  ठेवतील,१७४ असे लोक श्रद्धावंतांसमवेत आहेत. आणि अल्लाह श्रद्धावंतांना अवश्य महान मोबदला प्रदान करील.
(१४७) शेवटी अल्लाहला काय पडले आहे की तुम्हाला विनाकारण त्याने शिक्षा द्यावी. जर तुम्ही कृतज्ञ दास बनून राहिलात१७५ आणि ईमानच्या मार्गावर चालत राहिलात तर अल्लाह  मोठा गुणग्राहक आहे.१७६ आणि सर्वांची परिस्थिती जाणणारा आहे.
(१४८) अल्लाह हे पसंत करीत नाही की माणसाने अपशब्दाकरिता तोंड उघडावे परंतु या व्यतिरिक्त की एखाद्यावर अत्याचार केला गेला असेल,आणि अल्लाह सर्वकाही ऐकणारा व  जाणणारा आहे.
(१४९) (अत्याचारपीडित अवस्थेत जरी तुम्हाला अपशब्द उच्चारण्याचा हक्क आहे) परंतु जर तुम्ही अंतर्बाह्य चांगुलपणाच दाखवाल अथवा कमीत कमी वाईटाकडे दुर्लक्ष कराल, तर अल्लाह (चादेखील हाच गुण आहे की तो) मोठा क्षमा करणारा आहे (यद्यपि तो शिक्षा देण्याचे) पूर्ण सामथ्र्य बाळगतो.१७७
(१५०) जे लोक अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांशी द्रोह  करतात आणि इच्छितात की अल्लाह आणि त्याच्या पैगंबरांच्या दरम्यान भेदभाव करावा आणि म्हणतात की आम्ही काहींना मान्य करू आणि काहींना मानणार नाही व कुफ्र व ईमान यांच्या दरम्यानातून एक मार्ग काढण्याचा निश्चय करतात,
(१५१) ते सर्व पक्के अधर्मी आहेत१७८ आणि अशा अधर्मीयांसाठी आम्ही अशी शिक्षा तयार करून ठेवली आहे जी त्यांना अपमानित व तिरस्करणीय करून सोडणारी असेल.



१७४) आपल्या धर्माला अल्लाहसाठी विशिष्ट करण्याचा अर्थ आहे, की मनुष्याची वचनबद्धता अल्लाहशिवाय दुसऱ्या कोणाशीही जुडलेली नसावी. आपल्या सर्व आवडीनिवडी, प्रेम आणि  श्रद्धांना अल्लाहसमोर समर्पित करावे. अल्लाहच्या प्रसन्नतेसाठी सर्वकाही समर्पित करण्यास तयार राहावा.
१७५) `शुक्र'चा मूळ अर्थ होतो उपकाराची स्वीकृती व कृतज्ञतेची अनुभूती होणे. आयतचा अर्थ होतो, ``तुम्ही अल्लाह प्रति  कृतघ्नता आणि विश्वासघातकीपणाची पद्धत स्वीकारू नये तर  त्याचे खरे कृतज्ञ दास बनून राहावे. अशा स्थितीत अल्लाह तुम्हाला शिक्षा देणार नाही.'' एका उपकार करणाऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याची खरी पद्धत हीच आहे की, (१) मनुष्याने  मनापासून त्याचे (उपकारकर्त्याचे) उपकार मानावे. (२) तोंडाने त्याचा स्वीकार करावा आणि (३) उकृतीतून कृतज्ञ होण्याचे प्रमाण द्यावे. याच तिन्ही गोष्टींना एकत्रित केल्याने `शुक्र'   नावाची मानसिकता बनते. या `शुक्र'ची अपेक्षा हीच आहे की मनुष्याने उपकाराला फक्त त्याच्याशीच जोडावे ज्याने ते उपकार केले आहेत. दुसऱ्या कोणालाही कृतज्ञता अभिव्यक्ती आणि  बक्षीस स्वीकार करण्यात मूळ उपकारकर्त्याचा भागीदार बनवू नये. माणसाचे मन आपल्या उपकारकर्त्याविषयी प्रेम आणि कृतज्ञतेने भरलेले असावे. तसेच उपकारकर्त्याच्या विरोधकांविषयी थोडीशीही आसक्ती आणि निष्ठेचे अंश आपल्या मनात ठेवू नये. तिसरा म्हणजे उपकारकर्त्याचा आज्ञापालक आणि वचनबद्ध असणे आवश्यक आहे. त्याने दिलेल्या  बक्षीसांना त्याच्या सांगण्याविरुद्ध (आदेशाविरुद्ध) वापरात आणू नये.
१७६) मूळ अरबी शब्द `शाकीर' आहे याचे भाषांतर `गुणग्राहक' करण्यात आले आहे. `शुक्र' जेव्हा अल्लाहकडून दासाकडे असेल तर अर्थ होतो `सेवावृत्तीचा स्वीकार' किंवा गुणग्राहकता  आणि जेव्हा दासांकडून अल्लाहकडे असेल तर `उपकार मानण्याच्या अर्थाने' घेतले जाते. अल्लाहकडून त्याच्या दासांचा `शुक्र' अदा करण्याचा अर्थ होतो की अल्लाह `नाकद्री' (दुर्लक्ष)  करणारा नाही. जेवढी आणि जशी सेवा दासाने अल्लाहच्या मार्गात केली असेल तर अल्लाहजवळ त्याचा सन्मान होतो आणि कोणीही सेवा केली परंतु त्याला बक्षीस किंवा मोबदला मिळाला नाही असे कधीही होत नाही.
१७७) या आयतमध्ये मुस्लिमांना एक अत्यंत उच्च् श्रेणीची नैतिक शिकवण दिली आहे. दांभिक, यहुदी आणि मूर्तीपूजक लोक मिळून त्या काळी सतत इस्लामच्या मार्गात अडथळे  निर्माण करीत होते. इस्लामचा स्वीकार करणाऱ्यांना त्रास देत असत व त्यांच्यावर आतोनात अत्याचार करीत असत. वाईटातील वाईट डाव ते या इस्लामी आंदोलनाविरुद्ध खेळत होते.  यामुळे मुस्लिम समाजमनात घृणा आणि क्रोध निर्माण होणे स्वाभाविक होते. अल्लाहने मुस्लिमांच्या मनात अशाप्रकारच्या भावनांचे वावटळ उठतांना पाहिले व आदेश दिला, ``अपशब्द  बोलण्यासाठी आपले तोंड उघडणे अल्लाहजवळ शोभनीय कृत्य नाही. नि:संदेह, तुमच्यावर अत्याचार होत आहे आणि पीडित व्यक्ती अत्याचाऱ्याच्या विरोधात आवाज उठवित असेल तर  त्याला तो हक्क आहे. परंतु तरीही श्रेष्ठ आचरण हेच आहे की प्रकट व अप्रकटरित्या तुम्ही भलाई करावी आणि दुराचाऱ्यांना क्षमा करावी. तुम्हाला आपल्या शिष्टाचारात अल्लाहच्या शिष्टाचाराशी जवळीक साधली पाहिजे, कारण अल्लाहचे सान्निध्य तुम्हाला हवे आहे आणि त्याची शान आहे की तो अतिसौम्य आणि सहिष्णु आहे. कठोरतम अपराध्यांनासुद्धा तो  उपजीविका देतो, तसेच मोठमोठ्या अपराधांना क्षमा करतो. म्हणून त्याचे सान्निध्य प्राप्त् करण्यासाठी तुम्हालासुद्धा अत्यंत उदार मनाचे आणि साहसी बनले पाहिजे.
१७८) म्हणजे अधर्मी होण्यात ते जे अल्लाहला मानत नाहीत आणि अल्लाहच्या पैगंबरांनासुद्धा मानत नाहीत, ते लोक जे अल्लाहला मानतात परंतु पैगंबरांना मानत नाहीत आणि ते  लोक जे एखाद्या पैगंबराला मानतात आणि कोणाला मानत नाहीत हे सर्व एकसारखे आहेत. यांच्यापैकी अधर्मी होण्यात कोणीही तसुभर कमी नाही.

सार्वत्रिक निवडणुका झाल्या. मोदी-०.२ कालखंडाची सुरूवात झाली. याचबरोबर जवळपास सर्वच गोष्टींची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. इतकेच नव्हे तर ज्या प्रमाणे भाजपला भरघोस  मताधिक्क्य मिळाले अगदी त्याच धर्तीवर त्यांच्या पाठिराख्यांचा अराजकतेचा उन्माद उशिरा आगमन झालेल्या मानसूनमधील धबधब्यासारखा उभाळून येऊ लागला आहे. भय, घृणा,  हिंसा, हत्या इत्यादी सर्व वारंवार होतच असतात. मात्र त्यांचे मुक्तपणे घडण्यामागची कारणे, आधार, संधी आणि बहाणा सहजासहजी असामाजिक तत्त्वांच्या हाती लागत आहे. धर्म आणि राजकारणाची एकमेकांमध्ये घुसखोरी झाल्याचे दररोज आपणास दिसून येत आहे. संसदेतदेखील धार्मिक घोषणाबाजी ऐकायला मिळत आहे. धर्मनिरपेक्ष संविधानांतर्गत बनलेल्या   संसदेत धार्मिक घोषणा दिल्या जातात. धार्मिकतेचा ही नवीन उभारी सर्व धर्मांच्या काही मानवतावादी आणि आध्यात्मिक मूल्यांप्रती निष्ठा वाढविण्याचे प्रमाणदेखील असायला हवी. मात्र  असे घडताना दिसत नाही, हे दुर्भाग्य. खरे तर प्रेम, पावित्र्य, सद्भावाचे दमन करणारी ही विकृत धार्मिकता आहे. ही धार्मिकता इतर धर्मांशी घृणा, त्यांच्याप्रती असहिष्णू आणि  आक्रामक झाल्याचे दिसून येते. व्रूâरता, अमानवीयता, हिंसा, हत्या इत्यादींचा आधार घेण्यात तिला कसलाही संकोच वाटत नाही. हिंसा-हत्या-लिंचिंग इत्यादी प्रकारच्या अगदी विकोपाला  पोहोचलेल्या मानसिकतेत मानवता, पावित्र्याला नगण्य स्थान उरले आहे. कोणत्याही व्यक्तीची प्रतिष्ठा, त्याचे शरीर, त्याचा प्राणसुद्धा आता सुरक्षित राहिलेला नाही. राजकारण, धर्म,  जात, मीडिया, बाजार यांच्या महाआघाडीने भारतीय समाजाला कोणत्या स्थितीत नेऊन सोडले आहे हेच आजच्या परिस्थितीचे द्योतक आहे. आज भारतीय समाज, त्याचा सुशिक्षित  भाग नैतिक समाज उरलेला नाही. तो नीतीमत्तेला थारा नसलेल्या राजकारणाच्या  कचाट्यात सापडला आहे. प्रामाणिकपणा, सत्याचा आदर, भलेपणा, बंधुभाव,मदत इत्यादी गुण   कस्रfचत सर्वसामान्य लोकांमध्येच उरलेले आहेत. त्यांची दुर्दशा, त्यांच्या जीवनावश्यक समस्या कुणालाही दिसत नाहीत. मोदी-०.१ काळात श्रीमंतविरोधी व काळा पैसा बाहेर   काढण्यासाठी नोटबंदी लादली गेली, मात्र त्यामुळे गरिबांचे रोजगार नष्ट झाले. मोदींनी निवडणुका जिंकल्यानंतर भाजपच्या कार्यालयात दिलेल्या भाषणात म्हटले होते की आता फक्त  दोन जाती असतील – एक गरीब आणि दुसरी गरिबी हटविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे योगदान देणाऱ्यांची. राजकीय जुमलेबाजीच्या मदतीने मोदी सरकारने सांस्कृतिक राष्ट्रवादाबरोबरच सांस्कृतिक समाजवादाची नीतीवरदेखील कार्य करण्यास सुरूवात केलेली आहे. त्याचाच गैरफायदा समाजातील असामाजिक तत्त्व घेत असताना दिसत आहेत. विशिष्ट  समाजाला लक्ष्य करून त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना जीवे मारले जात आहे. अशा प्रकारच्या घटना पाहता एखाद्या समाजात भीतीचे वातावरण निर्माण होणे साहजिकच आहे.  मात्र अशा घटनांना निश्चित प्रत्येकाने विरोध केला पाहिजे. आपल्यावर होत असलेला अन्याय निमूटपणे सहन करणे हेदेखील महाभित्रेपणाचे लक्षण आहे. भित्रा वारंवार मरत असतो,  मात्र बहादूर एकदाच मरतो. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार प्रत्येक भारतीयाला माहीत असले पाहिजेत. जर कोणी एखाद्याच्या जीवावर अथवा संपत्तीवर हल्ला करीत असेल तर  त्याचा बचाव करण्याचा त्याला कायद्यानुसार अधिकार आहे. स्वत:चा बचाव करणे कायद्याचे उल्लंघन नसून लोकतांत्रिक अधिकार आहे. आजकाल सुरू असलेल्या मॉबलिंचिंगच्या घटना  पाहता फक्त मुस्लिमच नव्हे तर हिंदू बांधवदेखील त्यास बळी पडलेले दिसून येतात. दोन्ही समाजात न्यायप्रिय लोक अस्तित्वात आहेत, त्यांच्याकडून मॉब लिंचिंग अथवा मॉब  टेररिझमचा विरोध होत आहे. मुस्लिम तरुण आणि काही संघटनांनी शांततापूर्ण विरोध सुरू केला आहे. मात्र या सर्व गोष्टींचा सरकारवर कसलाही परिणाम होताना दिसून येत नसला  तरी अन्याय, दुव्र्यवहार, दमन व अत्याचाराविरूद्ध यथाशक्ती आवाज उठविण्याची गरज आहे. मालेगावात लाखोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी रस्त्यावर उतरून सरकारला मॉब लिंचिंगविरूद्ध जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या शुक्रवारी मुस्लिम समाजाच्या जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी झालेल्यांनी खिशाला काळ्या फिती लावल्या  होत्या. ‘संविधान बचाव... देश बचाव’, ‘हिंदू, मुस्लिम’, ‘शिख, इसाई हम सब एक है’, ‘सबल मिलके एक बनो...भारत जोडो’, ‘तबरेज तेरे खुनसे इन्कालाब आयेगा’... अशा घोषणा  मोर्चेकरी देत होते. भारतीय राज्यघटनेने सर्व भारतीयांना आपल्या धर्मप्रमाणे राहण्याचा व जीवन जगण्याचा अधिकार दिला आहे. परंतु काही कट्टरवादी मानसिकतेचे समाजकंटक हे  देशाला बरबाद करण्याचे व तोडण्याचे षडयंत्र रचत आहे. नियोजनबद्ध पद्धतीने अल्पसंख्याक समाजाची मॉब लिचिंगद्वारे हत्या करून माणुसकी संपविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यातूनच  झारखंड येथील तबरेज अन्सारी याची हत्या करण्यात आली आहे. सरकारने या घटना रोखण्यासाठी कडक कायदा करून समाजकंटकांना फाशीच्या शिक्षेची कायद्यात तरतूद करावी,  त्याचबरोबर मुस्लिम समाजाची प्रगती होण्यासाठी आरक्षण देण्यात यावे, अशा प्रकारच्या मागण्या या मोर्चाद्वारे सरकारकडे करण्यात आल्या ही सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने निश्चिच  जमेची बाजू ठरेल.
-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४,
Email: magdumshah@eshodhan.com

कोणतंही क्षेत्र असो. मुस्लिमांकडे बघण्याचा एकूण दृष्टिकोन हा पूर्वग्रहदूषितच असतो. कधी व्यक्ती म्हणून तर कधी समाज म्हणून. क्रिकेट हे क्षेत्रही त्याला अपवाद नाही.  जगभरातल्या अनेक क्रिकेट संघांमधे आज मुस्लिम खेळाडू आहेत. त्यांचा धर्म मुस्लिम असला तरी त्यांनी आपल्या क्षमतेच्या जोरावर स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलंय.

क्रिकेट जातीधर्माच्या भिंती उद्ध्वस्त करणारा खेळ आहे. हा सांघिक खेळ असल्यानं संघातल्या प्रत्येकाला दिलोजानसे खेळावं लागतं. इथं कोण कुठल्या जातीधर्माचा आहे हे बघायचा  प्रश्नच येत नाही. खेळ तेढ संपवणाराच असतो. यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड्कप स्पर्धेत दहा टीम सहभागी झाल्यात आणि ते सगळे एकमेकांशी गुण्यागोविंदानं लढताहेत. मुस्लिमांकडे नेहमी  संशयानं पाहिलं जातं. या स्पर्धेतले संघ बघितले तर दिसतं की पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांग्लादेश या तीन संघांमधे मुस्लिमांचा भरणा अधिक आहे. बांग्लादेशच्या संघात  जरुर काही हिंदू आहेत. पण भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका ह्यांच्या संघात एक तरी मुस्लिम आहे. श्रीलंका, न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजमधे कुणी मुस्लिम नाही. ह्याचा  अर्थ ह्या स्पर्धेत मुस्लिम खेळाडू बरेच आहेत आणि ते व्यवस्थित खेळताहेत. त्यांच्याकडे खिलाडूवृत्ती आहे आणि सांघिकरित्या खेळायची वृत्ती आहे.


मानवतावादी दृष्टिकोन असलेले खेळाडू
इंग्लंडच्या संघात दोन मुस्लिम चेहरे आहेत. एक मोईन अली तर दुसरा आदिल रशिद. दोघंही फिरकीपटू आहेत. म्हणजे इंग्लंडच्या फिरकी विभागाचे ते आधार आहेत. हे दोघंही मूळचे  पाकिस्तानातले. मोईन पाकव्याप्त काश्मिरमधल्या मिरपुरी जमातीचा आहे. त्याचे आजोबा मिरपूरहून इंग्लंडमधे स्थायिक झाले. त्यांनी ब्रिटिश बेट्टी कॉक्स हिच्याशी विवाह केला. म्हणून  मोईन तसा संमिश्र वंशाचा ठरतो. त्याचे वडील टॅक्सी ड्रायवर होते. त्यांच्या आजूबाजूची सगळी मुलं क्रिकेट खेळणारी होती. म्हणून मोईनही त्यांच्यात राहून क्रिकेटपटू झाला. कबीर  अली हा तर त्याचा चुलत भाऊ. मोईन लहान वयातच वारविकशायरसाठी खेळायला लागला आणि इंग्लंडच्या यंग टीमकडूनही खेळला. तो ह्या टीमचा यंग वर्ल्ड्कप स्पर्धेत कर्णधारही  होता. तो लगेचच इंग्लंडच्या मुख्य संघातही आला. २०१४ मधे भारताविरुद्धच खेळताना त्याने आपल्या रिस्टबॅन्डवर ‘सेव्ह गाझा आणि फ्री पॅलेस्टाईन’ असा लोगो वापरला होता. त्याचा  तेव्हाचा दृष्टिकोन मानवतावादी होता. पण आता धोनीच्या बलिदान लोगोवरुन झालं तसंच तेव्हा झालं. त्याला तो लोगो काढावा लागला. मोईन हा भरपूर चॅरिटी करत असतो. त्याचा  सहकारी आदिल रशिद मूळचा पाकिस्तानचा. त्याचा जन्म इंग्लंडमधल्या ब्रॅडफर्डचा. पण तोही मिरपुरी आहे. पाकव्याप्त काश्मिरमधून १९६७ मधे त्याचे वडील इंग्लंडमधे आले. ह्याचा  जन्म १९८८ चा. दोन्ही भाऊ हसन आणि अमिर हेही चांगले क्रिकेटपटू आहेत. आदिलला ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू हेरी जेन्नर ह्याने प्रतिभाशोध योजनेंतर्गत हेरलं. इंग्लंडला याचा   लाभ करुन देणारा ऑस्ट्रेलियाचाच आहे लेहमन. त्याने आदिलला खूप साहाय्य केलं. पाकिस्तानातल्या पंजाबमधे तो लोकांसाठी काम करतोय.

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे विक्रमवीर
दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन मुस्लिम आहेत. त्पापैकी हाशिम अमला तर त्यांचा आघाडीचा फलंदाज आहे. वनडे आणि कसोटी दोन्ही प्रकारात त्यांच्या नावावर विक्रम आहेत. त्याचे  वाडवडील गुजरातमधल्या सूरतचे अन्सारी कुटुंबातले. सगळे जण पक्के धार्मिक. हाशिमचा मोठा भाऊ अहमदही छान क्रिकेट खेळायचा. दक्षिण आफ्रिकेत ते चांगल्या शाळेत शिकले.  हाशिम युवा विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार होता. नंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात समालोचन करणाऱ्या ऑस्ट्रेलियन डीन जोन्सने  अमलाची लांबलचक दाढी पाहून त्याचा टेरिरिस्ट असा उल्लेख केला यावरुन मोठा वाद झाला. जोन्सचे करारपत्र रद्द करण्यात आले. त्याने अमलाची माफी मागितली. पण अमलाने कुठलीही तक्रार केलेली नव्हती.

मॉलमधे काम करताना मिळाली संधी
इम्रान ताहिर हा गुगली टाकण्यात माहिर आहे. आज तो ४० वर्षांचा आहे. तरीही दक्षिण आफ्रिकेचा त्याच्यावर भरोसा आहे. त्याचा जन्म लाहोरचा. घरची परिस्थिती बेताची. एका  मॉलमधे तो नोकरीही करत होता. त्याला पाकिस्तानच्या यंग टीम आणि अ टीममधे खेळायची संधी मिळाली. पण तो चमकला नव्हता. इंग्लडमधे कौंटी खेळता खेळता त्याला दक्षिण  आफ्रिकेत जायची संधी मिळाली आणि तिथंही काही वादानंतर तो स्थिरावला. सर्वाधिक २७ संघांकडून खेळण्याचा एक वेगळाच विश्वविक्रम त्याच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाकडून  खेळणारा पहिला पाकिस्तानी असा मान उस्मान ख्वाजाने मिळवलाय. तो आज संघाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. त्याला वाटचाल करताना बरेच टोमणे, शेरेबाजी सहन करावी लागल्याचं तो सांगतो. त्याचा जन्म इस्लामाबादचा. वयाच्या पाचव्या वर्षी त्याचा परिवार ऑस्ट्रेलियात आला. तो हुशार विद्यार्थी होता. तो वैज्ञानिक होणाऱ्या परीक्षा उत्तीर्ण झाला आहे.

शमी
तेज आणि अचूक माऱ्यामुळे टीम इंडियात भारताच्या शमी मोहम्मदने एक तेज गोलंदाज म्हणून आपलं नाव दुमदुमत ठेवलंय. शमी हाही साध्या कुटुंबातला. उत्तर प्रदेशातल्या अमरोहामधल्या साहसपूर ह्या गावचा. त्याचे वडील शेती करणारे. पण ते चांगले गोलंदाजी करायचे. त्यांची तिन्ही मुलं वेगात गोलंदाजी करायच्या वेगानं झपाटलेली. त्यांच्यापैकी शमीने  प्रगती केली. त्याला वडलांनी बद्रुद्दीन या प्रशिक्षकाकडे सोपवलं आणि मग देवव्रत दास या भल्या माणसानं त्याचे गुण हेरून त्याला सर्वोतोपरी साहाय्य केलं. आपल्या घरीही त्याला ठेऊन   घेतलं आणि कलकत्यात आणलं. तिथे त्यांनीच निवड समिती सदस्य संबारन बॅनर्जीला त्याला बघायला लावलं. संबारनही प्रभावित झाला आणि एके दिवशी नेटमधे सौरव गांगुलीलासुद्धा  त्याच्यात गुणवत्ता आढळली. मग काय शम्मीने सर्वांच लक्ष वेधलं. आणि भारतीय अ संघातून चमकला. त्याने अल्पावधित आपल्या तेज आणि अचूक माऱ्याने आपली भारतीय  संघातली जागा बळकट केली. दुखापतींमुळे त्याच्यावर संघाबाहेर राहण्याची वेळ वारंवार येत असते आणि पत्नी बरोबरच्या झगड्यामुळे त्याच्यावर पोलीस कारवाईही झाली. ह्या  प्रकरणाबाबत मंडळाने नरमाईचं धोरण घेतल्यानं तो आज भारतीय संघात आहे. मात्र त्याचे सर्व सहकारी तो एक मनमिळाऊ, शांत स्वभावाचा असल्याचं सांगतात.

खरं तर हेच क्रिकेटचे बंदे
इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, भारत या संघातले हे मुस्लिम खेळाडू आपल्या संघासाठी मन लावून खेळताना आज दिसताहेत. त्यांची कामगिरी समाधानकारकही झालेली आहे.  याचबरोबर बांग्लादेश टीमने अतिशय एकजूट दाखवत स्पर्धेत चमकदार कामगिरी केलीय. तर पाकिस्तानचा संघ भारताविरुद्धची लढत गमावल्यानं आपल्या चाहत्यांना पचवून मैदानात  उतरताना दिसलाय. अफगाणिस्तानचा संघ ह्या स्पर्धेतला लिंबू टिंबू संघ त्यांच्यात बेबनाव असल्याचं म्हटलं जातं. पण तरीही त्यांनी भारताविरुद्धच्या लढतीत चांगली झुंज दिली.  तेव्हा  हे सारे खेळाडू कुठल्या धर्माचे आहेत त्याचा विचार न करता त्यांच्या जिगरीला मानलं पाहिजे. हेच खरे तर क्रिकेटचे बंदे आहेत.

-संजीव पाध्ये
(साभार : कोलाज डॉट इन)

येत्या काळाचा नैराश्यमयी अंधार भयभीत करणाराच आहे, तरीही अस्सल भारतीयत्वाची अखंड जाणीव प्रत्येक उपऱ्या सहिष्णूतेच्या संघर्षात ठळक करत राहू. बळी म्हणून अधोरेखित,  संशयी म्हणून सवयीचे, होण्यापेक्षा आपल्यातल्याच ‘अहं’ला गाडून, इमानेइतबार सुखाचा उजेड उजळवत राहू
सध्या श्रीरामाच्या साक्षीसोबतीनेच लोकशाहीची विटंबना सुरू आहे. नव्या राष्ट्रवादाची विद्वेषी प्रखरता घेऊन उभा आहे. देशाचा भविष्य असणारा तरूण वर्ग एकीकडे निराशावादाचा कहर  खोल वेदना देतोय. एकीकडे मुठभरांच्या हातात संपत्तीचे केंद्रीकरण होतय; आणि मधला नागरीक भरडला जातोय, जात-धर्म अस्तित्व अस्मितेंच्या भुलावणाऱ्या गोड थापेबाजीत !  जखमांची सवय आणि मुरदाडलेपणा काहींना पशुप्रीय, पशुसम बनवित आहे. प्रत्येक पालखीचा ऊदो-ऊदो सुरूय, अखंड गजर पालखी वाहणाऱ्यांची डोकी सडवली जाताहेत ’धर्म’ प्रीयतेच्या नावाखाली.
येणारा काळ सामान्यांसाठी अतिभयानक आहे. सर्व क्षेत्रातील मुस्कटदाबी जीवघेणी ठरतेय. प्रश्नांचे अनेक घोळ मांडून ठेवलेत आणि उत्तरांच्या वाटा तोकड्या, अहंवाद झाल्या आहेत.  साधारणतः बारोमास किंवा वर्षभर काही मांडण्याचा प्रयत्न केला इथे. भयाण वर्तमानाच्या खाणाखुणा अस्वस्थ करताहेत. त्यांच्या मागे, सुगावा लावण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला,  आतली कळ मांडत राहिलो.
’अस्वस्थ वर्तमान’ व ’ऊपरी सहिष्णूता’ या दोन्ही शब्दांचे केवळ संदर्भ न शोधता अनुभवाचा पसारा मर्यादेत इथे सांडत राहिलो. सुरूवातीला ईदच्या घाईत नजिब आठवत राहिला. ’तो  कुठे हरवला’ या शिर्षकाने आज या अंगाने लिहितानाही नजीब आठवतोयच. तबरेजसाठीच्या मोर्च्यांचे फोटो अजून अपलोड होताहेत मोबाईलवर. एकरेषीय समतल असाच राहिलाय हा  काळ. काळ बनून, मनमस्तिष्कावर घाला घालतोय. परिवर्तनाची हाक देणाऱ्यांची संख्या वाढली की कमी याची चिकित्सा कधीतरी होईल, पण नजिब, मोहसिन, पहलू, अख्लाक,  आसिफा, डॉ. पायल तडवी अशी ज्ञात आणि हजारो अज्ञात असे बळी, भयाण कुरूपतेचा चेहरा घेऊन समोर उभे आहेत.
’सुकून’ मिळावा म्हणून दुवाप्राथ र्नेत मग्न राहून सुद्धा चिड-वैतागाला आवर नाही घालता येत. ’सब्र का फल मीठा होता है’ ऐकत राहिलोय. दिवसागणिक वाढणाऱ्या अतिअंधधार्मिक  कट्टरतेने भितीच्या भक्कम भिंती उभ्या झाल्यात. गल्ली-रस्त्यांत निरागसतेने बागडणाऱ्या छोट्या चिल्ल्यांपिल्यांचा आवाजही आता धार्मिक झालाय. झेंडे आणि नोटांचे राजकारण  शिरलंय प्रत्येकात. याऊपर चिंता आहे समुहसंघी प्रबळ मानसिकतेची. खोलवर पाळंमूळं रूजवत, बहुजात-बहुजनी तरूणांच्या हातात लाठीकाठी शस्त्रांचे आणि घातकी प्रशिक्षणाचे  वर्गबैठका शाखा फुलत आहेत.
जातीच्या काजव्यांचा उजेड डोळ्यांना त्रासदायक होतोय. धर्म नावाचा अजस्त्र किडा वळवळत गिळंकृत करतोय माणूसपण!! पहिल्यांदा रस्त्यावर येणाऱ्या न्यायाधिशांपासून, नोटबंदीच्या  मरणप्राय गर्दीपर्यंत. थापाअफवांच्या अफिमी वक्तव्यांपासून - संविधान दहनाच्या सनातनी सोहळ्यापर्यंत, लेखक साहित्यिकांच्या हत्यासत्रापासून लोहिया, भट्ट सारख्या गुन्ह्यापर्यंत किंवा  अगदी भोतमांगेंच्या विनान्याय मृत्यूपासून आसिफाच्या तडफेपर्यंत डॉ. कफिल अहमद यांच्या प्रामाणिकतेला दिलेल्या जबर शिक्षेपासून..’भात-भात’ म्हणून मेलेल्या आदिवासी  बालकांपर्यंत.. पुतळ्यांची उंची वाढली जरी, धरणांना खेकड्यांनी पाडे पर्यंत. लोकशाहीला ईव्हीएम मधून संपण्यापर्यंत... किंवा रामनामजप पे नथुरामापर्यंत... नालासोपारा  शस्त्रसाग्यांपासून- कोरेगाव भिमाच्या दंग्यापर्यंत अगदी ट्रोलिंगच्या नीच पातळीपासून खा. मोईत्राच्या फॅसिझमच्या भाषणापर्यंत सगळ्याच क्षेत्रातला सनातनी चिरतरूण होतोय. शासकीय-  प्रशासकीय योजनांच्या बोजवाऱ्यांपासून प्रचंड जाहिरातीचंच्या गदारोळापर्यंत ..विद्यार्थ्यांच्या संविधानिक लढाईपासून, शेणमुत्राच्या गाई पर्यंत... हातातला मोबाईल, मीडिया, न्यूजचॅनेल्स,  मालिका, सिनेमॅटिक बायोपिकचा पिसारा... पीक जोमानं तरारूण जोरात आहे, फवारणी गडद झालीय केवळ हिंसा तिरस्कार द्वेषाची... अभ्यासक्रमातील बदल, संस्थाचे खाजगीकरण,  कर्जाऊ रकमांचा काळ्या पैसे परत आणण्याच्या वल्गनेचा काळ, पतंजली रामदेवी फुसक्या बाणापासून हंगामी लोकनेत्यांच्या उपोषणाचा काळ, ’पैसा फेको-तमाशा देखो’ परफेक्ट लागू  पडणाऱ्या उसण्या विचारवंत-शास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञांचा काळ.
चिकित्सा झाली डायरेक्ट हिंसेचा पवित्र पावित्रा घेणारा काळ. काळ कठीण भयाण भयंकर... समाधानाची गोष्ट, पाकळी फुलावी दुर्लक्षित फुलाची पावसात तेवढ्याच मुठभरांचा आक्रोश  रस्त्यावर उतरला. युनोतल्या आवाजाची व्हिडीओ क्लीप फिरली मीडियावर ’एक पत्थर तो तबियत से उछालो यारो’ म्हणत का असेना मान्सूनच्या मौसमात मौसमी हंगामी रक्षण  आरक्षणाच्या टिकाटिपण्या झडल्या.
तुकड्या-तुकड्यांच्या या लेखनात सरळधोपट अस्वस्थता किंवा जाणवणाऱ्या गोष्टी मांडत राहिलो. कुणी प्रत्यक्ष ’दाद’ दिली, कुणी साद. कुणी फोनवरून संवाद केला. काहींनी थातूर मातूर  म्हणून अधिक अभ्यासू होण्याची प्रेरणा दिली. काहींनी सूचना, सुधार सुचविल्या. अनुभव भिडतात. उतरतात सरळं.. कुठलाही अभिनिवेश आणि अभ्यासू बांधिलकी न घेता लिहलं.  उण्यादुण्याची खिचडी मात्र चारदोनांची भूक भागवित असेल तर सध्या तेही योग्यच! ’’जात से जात जलाते चलो’’च्या उघड अजेंड्यात सामिल न होता, कट्टरभिंतींना उखडून  टाकण्याची धडपड स्पष्ट होत राहो.
येत्या काळाचा नैराश्यमयी अंधार. भयभीत करणाराच आहे, तरीही अस्सल भारतीयत्वाची अखंड जाणीव प्रत्येक उपऱ्या सहिष्णूतेच्या संघर्षात ठळक करत राहू. बळी म्हणून अधोरेखित,  संशयी म्हणून सवयीचे, होण्यापेक्षा आपल्यातल्याच ’अहं’ला गाडून, इमानेइतबार सुखाचा उजेड उजळवत राहू. धरणाच्या भिंती ध्वस्त होताहेत. मजुरांवर इमारतींच्या भिंती कोसळताहेत.  माणूस मरतोय. संवेदना जिवंत रहावी यासाठी माणुसकीआड येणाऱ्या भिंती मुद्दाम पाडू या.. लिहिण्याचा भावनिक पिसारा फुलतोय. मोर होऊन नाचण्याची ही वेळ नक्की नाही. हा वेदनोचा पसारा सावरतो.

‘‘साहिल पे खडे हो, तुम्हे क्या गम चले जाना,
मै डूब रहा हूं अभी डूबा तो नहीं हूँ’’

- साहिल शेख
9923030668

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget