Halloween Costume ideas 2015

सोवळ्यांची ‘ओवळी’ मानसिकता

धर्म माणसाचा मूळ स्वभाव असून तो त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. मानवी इतिहासाशी तो इतका निगडीत आहे की धर्माला नजरेआड करून इतिहासाची मांडणीच  करता येत नाही. धर्म ही प्रत्येक व्यक्तीची अत्यंत वैयक्तिक बाब असली तरी समाजाशीत्याचा तेवढाच दृढ संबंध आहे. म्हणजे धर्माचा अवलंब करताना सभोवतालच्या  समाजाचीही दखल घ्यावी लागते. मानव समाजाचा घटक असल्याने समाजाचा दबाव त्यावर येतो आणि कौटुंबिक वारसाने जो धर्म त्याला मिळालेला असेल त्याच धर्मात  तो वावरतो.
कौटुंबिक धर्म आता त्याचा वैयक्तिक धर्म म्हणून ओळखला जातो. प्रत्येक धर्म माणसाला समाजाच्या माध्यमाने संबोधतात त्या समाजेच माणसाच्या विचार व  स्वातंत्र्यावर दडपण येत असते. पण याची जाणीव त्याला होत नसते. कारण सामाजिक व्यवहारांमध्ये माणूस आपोआपच सहभागी होत राहतो. त्याच्या जडणघडणासाठी तो  योगदानही देतो. म्हणून पूर्वजांकडून मिळालेला धर्म खरा की खोटा याचा एक सामान्य माणूस कधीही विचार करीत नाही. या प्रसंगी असे प्रश्न मांडले जातात की, सामाजिक आणि धार्मिक तत्त्वे आणि मूल्ये परस्परविरोधी आहेत का? माणसाने वैयक्तिक पातळीवर स्वत:च्या मुक्तीसाठी निवडेला मार्ग (धर्म) जर सर्वश्रेष्ठ ठरवला तर मग  संस्कृतीने विणलेल्या समाजाची त्यापासून अवहेलना तर होत नाही ना? स्वत:च्या आत्म्याच्या शांततेसाठी या जगाकडे पाठ फिरविली आणि एकांतवासात जाऊन वास्तव्य  केले तर त्यापासून त्यांच्या पदरी काय पडणार?
यापेक्षा जर त्यांनी समाजातील वाईट वृत्ती नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले असते तर आपल्या बरोबरच आपल्या समाजालाही वाचविले असते. आपल्या साथीदारांचे, मित्रांचेही भले केले असते. एवढ्यावरच न थांबता पुढे जाऊन सांगितले जाते की, माणसाचा विकास समाजाच्या विकासाशी बांधिल आहे. समाज म्हणजे मानवाचे  सामूहिक कार्यक्षेत्र. त्या कार्यक्षेत्राकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वत:च्या अस्तित्वाचा इन्कार करणे होय. या जगातील आपल्या स्नेहसंबंधींचा माणूस सहप्रवासी आहे आणि या  प्रवासात आपल्या सोबत्यांना बरोबर घेतल्यानेच त्याला देवाचे दर्शन घडेल. एकंदर अशी परस्परविरोधी विधाने समाजशास्त्रज्ञ आणि धर्मपंडित माणसासमोर मांडतात, स्वाभाविकच माणसाला या दुहेरी पेचप्रसंगाला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे त्याच्या स्वतंत्र व्यक्तित्वात आणि सामाजिक अस्तित्वात तणावाचे वातावरण निर्माण होते.  अलीकडच्या काळात दलित अत्याचाराचा प्रश्न वादग्रस्त होत असतानाच नुकतेच पुण्यातील ‘सोवळे’ प्रकरण चव्हाट्यावर आले आणि जातियवादी व्यवस्थेची मानसिकता  पुन्हा एकदा उघड झाली. धर्माच्या शिकवणींच्या नावाखाली जे काही आज अंमलात आणले जात आहे, ते धर्माच्या मूळ शिकवणीत नाही. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रीतीरिवाजांना धर्माचा आधार देण्यात आला आहे. म्हणूनच या रीतीरिवाजांना धार्मिक प्रावित्र्य प्राप्त झाले असल्याने आणि धर्मपंडितांनी त्यास मान्यता दिली असल्याने  सामान्य माणूस त्यांना आव्हान देत नाही. त्या रुढीपरंपरांनाच तो खरा धर्म समजतो. या रुढीपरंपरा कोणत्याही संस्कृतीवर आपला प्रभाव टावूâ शकतात. त्यामुळे या  रुढीपरंपरा त्या त्या संस्कृतीशी संलग्न असलेल्या समाजाचा गाभाच बनून जातात. त्यातही त्यांना धार्मिक मान्यता मिळाली तर मग श्रद्धा आणि धर्माची शिकवण म्हणून  कोणीही सामान्य माणूस त्यांच्या आहारी जातो आणि त्यालाच तो खरा धर्म समजतो. तोच वारसा पुढील पिढ्यांना आपोआपच मिळतो. अशा परिस्थितीत जर कुणी  धर्माच्या विरूद्ध बोलले, वागले अथवा त्याचा त्याग करण्याचे धाडस केले तर स्वाभाविकच अशा माणसाला समाजाशी तोंड द्यावे लागते. एकदा का कोणत्याही प्रकरणाला  धार्मिक पाठबळ मिळाले की मग कसलेच स्वातंत्र्य उरत नाही. विचारवंत आणि धर्मपंडित हातमिळवणी करून जनमाणसाला अंधारात ठेवून त्यांच्या भावनांना हात घालून  आपले हित साधण्याचे प्रयत्न धर्म आणि राजकीय सत्ताधारी करीत आले आहेत आणि यापुढेही करीत राहतील. कारण त्यांना सत्तेला आपल्या अधिपत्त्याखाली ठेवायचे
असते आणि तीच त्यांची गरज असते. धर्माचा वापर केल्याविना त्यांना हे करता येत नाही. मानवाला या जगात जर स्वातंत्र्य नसेल तर त्याचे जीवन गुलामगिरीत मग ती या जगात कुणाचीही असो, समाजाची, राष्ट्राची, धर्मपंडितांची असो, व्यतीत होईल. धर्म माणसाची वैयक्तिक बाब आहे, असे म्हणणारेच त्याची दिशाभूल करतात.  सोवळेपणाचा आव आणणाऱ्या ‘ओवळ्या’ मानसिकतेला माणसाने बळी पडू नये.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@gmail.com)

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget